Author: अनंत पांगारकर
रविवार दि. २४ मार्च, अहमदनगर अहमदनगरमधील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात संगमनेरमधून अटक केलेल्या उद्योजक अमित पंडित याची जिल्हा न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठाडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता पंडितला जामीन मिळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात संचालकांसह काही कर्जदार देखील आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले आहे. संगमनेरमधील उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचा काही काळ अध्यक्ष असलेल्या अमित पंडितने ३३ कोटी रुपयाहून अधिक रकमेचा कर्जघोटाळा केल्याचे बोलले जाते. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आत्तापर्यंत या घोटाळ्यामध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले आहे. बडा कर्जदार असलेल्या पंडितचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी (ता.…
रविवार दि. २४ मार्च, संगमनेर अनंत पांगारकर तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील व्हाईट कॉलर आरोपींपर्यंत पोलिस यंत्रणेला पोहोचण्यात अपयश आले आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित समजला जाणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या आरोपीपैकी एकही आरोपी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेला नाही. नगर अर्बन बँकेत एकापाठोपाठ आरोपींवर कारवाई करत ठेवीदारांना दिलासा देणारी आर्थिक गुन्हे शाखेची यंत्रणा दूधगंगा प्रकरणी मात्र राजकीय दबावाखाली देखील असल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हाच एकमेव आरोपी सध्या अटकेत असून…
ॲड. गोरक्ष कापकर आज २३ मार्च, चार वर्षापूर्वी देशात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन, त्यानंतर देशात कोरोनाच्या महामारीने उद्भवलेली परिस्थिती ज्यांनी पाहिली आणि भोगली, ती त्यांच्या मरेपर्यंत स्मरणात राहील. खरं तर २०२० साल हे ‘माणूस आणि माणुसकी’ या दोन गोष्टी जगाला शिकवणारे वर्ष होते. अंतराळात जाऊन मंगळावर वस्ती करण्याच्या कल्पना करणारा माणूस, रस्त्या-रस्त्यावर अनवाणी पायाने अश्मयुगातील टोळ्यासारखा अदृश्य आजाराच्या भयाने जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. ना त्याच्या जवळ खायला होतं, ना जवळ पाणी प्यायला होतं. माणूस माणसाला परक्या माणसासारखा दूर लोटू लागला होता. एरव्ही समूहाने राहणारा माणूस उपाशीपोटी माणुसकीने अस्पृश्य समजून दूर लोटले म्हणून शहरातुन गावाच्या ओढीने आपल्या माणसाकडे…
प्रवीण पुरो – मुंबई भारतीय जनता पक्ष हा सत्तेशिवाय कोणाचाच होऊ शकत नाही, हे त्या पक्षाने आणि आजच्या त्या पक्षाच्या नेत्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे. सत्तेसाठी ते तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत काहीही करू शकतात. कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. राजकीय पक्ष म्हणून असलेले अभिनिवेष त्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी कधीच गुंडाळून ठेवल्याने येनकेन प्रकारेन सत्ता हेच केंद्र त्यांनी प्रमाण मानलं. आपलं काम भागलं की ते सोबत केलेल्यांची काहीही ठेवायची नाही हा त्या पक्षाचा आणि नेत्यांचा मूलमंत्र. तुम्ही कितीही खरे असा, त्यांच्या खोटेपणापुढे तुमचं काहीच चालत नाही, हे देशाच्या नव्या राजकारणाने दाखवून दिलं आहे. आज हे सांगण्याची वेळ म्हणजे येऊ घातलेल्या…
शनिवार दि. २३ मार्च, संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावर समनापुर लागत असलेल्या हॉटेल नेचर जवळील मैदानात २३ वर्षीय तरुणाचा गळा कापून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अवघ्या तीन तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या संदर्भात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून कौटुंबिक कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. शनिवारी सकाळी हॉटेल नेचर जवळील मैदानात खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस पथकाने…
शनिवार दि. २३ मार्च, अहमदनगर पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती. अशी खासदार विखे यांचे नाव न घेता टिपणी करत भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून पुन्हा उमेदवारी दिली असती तरी गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल, असे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना अंतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. आमदार राम शिंदे यांच्यासह…
शुक्रवार दि. २३ मार्च, संगमनेर शासकीय वसुलीच्या दृष्टीने मार्च महिना महत्त्वाचा समजला जात असल्याने शनिवार, रविवार आणि सोमवारी शासकीय सुट्ट्यांचे दिवस असतानादेखील संगमनेर नगर परिषदेचा वसुली विभाग सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे. २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली पथकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय करांचा भरणा वेळेत व्हावा यासाठी या मोहिमेअंतर्गत २३ ते २५ मार्च दरम्यान शासकीय सुट्ट्या असताना देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने वसुली विभाग सुरूच ठेवला जाणार आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कर निर्धारण…
शुक्रवार दि. २२ मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद सुरूच असल्याचे दिसते. भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर आल्या असताना या दौऱ्यावेळी आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती समोर आली आहे. अद्यापही शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. भाजपच्या बीडमधून उमेदवार असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. पाथर्डीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगरचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते. या दौऱ्यात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली. खासदार…
शुक्रवार दि. २२ मार्च, संगमनेर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आत्महत्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अद्यापही या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रुबाब पान शॉपमध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून सौरभ रावसाहेब खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने २९ फेब्रुवारीला सकाळी आठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अत्याचार केला होता. सौरभ खेमनर मुलीवर अत्याचार करत असताना त्याचा जोडीदार योगेश रामा खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने पान स्टॉलचे शटर बाहेरून बंद करून त्याला कुलूप लावून घेतले होते. तर त्यांचे आणखी दोघे मित्र प्रशांत…
शुक्रवार दि. २२ मार्च, अकोले ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्दीच्या बळावर सामान्य कुटुंबातील एखादा तरुण अथवा तरुणीही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते. घरात फारशी सुबत्ता नाही, रोज कमवायचे आणि खायचे अशा परिस्थितीत सामान्य कुटुंबात एखादा दिवा पेटला की त्याचा उजेड संपूर्ण कुटुंबासोबतच गावालाही जाणवतो. आणि गावासाठी ती अभिमानाची बाब ठरते, याचा वस्तुपाठ घालून देणारे उदाहरण संगमनेर नजीकच्या अकोले तालुक्यातील आदिवासी गाव असलेल्या कोतुळमध्ये समोर आले आहे. घरात सदासर्वदा दारिद्र शेळके कुटुंबात आई विडी कामगार, पेंटर काम करताना फावल्या वेळात एखाद्या वृत्तपत्रासाठी बातमीदारी करणारे वडील अशोक शेळके आणि चार मुले यांच्या कुटुंबात परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या स्वप्नाला संतोष (शिवा) शेळके याने…
