Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अन्न औषध प्रशासनाने नाशिकरोड भागात केलेल्या तब्बल १८ लाख रुपयांचा मिक्स गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने ज्या गोडावूनवर छापा टाकला तेथून अनेक पानटपऱ्यासह दुकानांमध्ये गुटखा पोहचविला जात असल्याचा अंदाज आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिक रोडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोडावूनवर छापा टाकला असता त्यांना तेथे ३ लाख ६१ हजार ५७० रुपयांचा वैधानिक इशारा नसलेला सिगारेटचा साठा आढळून आला. हा माल ताब्यात घेत गोडावून सील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयात वाद विवाद सुरु असतांना दसरा मेळाव्यासाठीही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतांना बीकेसीत शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी चालविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीची ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. लोंढे म्हणाले, शिंदे गट राज्याच्या विविध भागातून एसटी व खासगी बसेसमधून कार्यकर्ते आणत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे दहा कोटी रुपये भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले, असे वृत्त माध्यमातुन समजले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटना आक्रमक झाली आहे. मराठी शाळा ह्या गोरगरीब जनतेच्या आहेत, त्या कोणाच्या बापाच्या नाहीत असे ठणकावत छात्रभारतीने या निर्णयाचे पत्रक फाडून टाकत आणि संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला आहे. कमी पटसंस्थेच्या राज्यातील सतरा हजारापेक्षा अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह आहे, शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून १७३४ जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी दिली. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राबविण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतून मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. असे प्रतिपादन दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. हेमलता राठोड आदी उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात म्हणजेच प्रत्येकी 100 रुपयात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. दसरा मेळाव्या आधीच घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे शिधापत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत घेतला आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ केल्याने राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. त्यामुळे उद्याचा शिवसेनेचा दसरा मेळावा त्यांच्या गैरहजेरीत होणार आहे. खासदार राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होऊन त्यांची सुटका होईल असा अंदाज होता मात्र न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा वाढ केली आहे. तोपर्यंत राऊत यांना तुरुंगातच राहावे लागेल. 10 ऑक्टोंबरलाच त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सुसंस्कारित पिढी घडवण्याबरोबरच स्त्रियांनी स्व-संरक्षणार्थ सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या शारदा कर्पे यांनी केले. विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी संगमनेर प्रखंडाने दुर्गावाहिनीच्या स्थापना दिनी दुर्गाष्टमी निमित्त संगमनेरातील माऊली फर्निचर हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कर्पे “जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पूजा जाधव उपस्थित होत्या. कर्पे म्हणाल्या, सरस्वती नको सावित्री हे राजकारण सध्या सुरू आहे, सरस्वती ही विद्येची देवी असून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाचा पुढाकारामुळेच आपण सुशिक्षित झालो आहे, त्यामुळे दोन्हीही आमच्यासाठी पूज्यनीय आहे. या कार्यक्रमात हिंदु संस्कृती, महिला सक्षमीकरण, लव-जिहाद सारख्या अनेक विषयांवर प्रबोधन केले गेले. पारंपारिक वेशभूषा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भाजप नेते माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या एकहाती साम्राज्याला हादरा देत सत्तांतर करण्यात यश मिळविलेल्या आणि महाविकास आघाडीच्या वर्चस्वाखाली आलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सिताराम गायकर यांची तर उपाध्यक्षपदी अशोक भांगरे यांची मंगळवारी सर्वानूमते निवड करण्यात आली. भाजप नेते, माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड पितापुत्राच्या अधिपत्याखाली असलेल्या व नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने पिचड यांच्या पॅनेलचा सपशेल धुव्वा उडविला. कारखान्यावर गेली २८ वर्षे निरंकुश सत्ता भोगणाऱ्या पितापुत्रांना कारखान्याच्या या निवडणुकीत चंचुप्रवेश देखील करता आला नाही. पिचड पिता-पुत्रांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. कारखान्यात…
