Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील सोनांबेकर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य जनतेचा डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी या रुग्णास उपचारासाठी सोनांबेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेरच्या सोनांबेकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच दळवी यांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: समाजातील अनेक महनीय व्यक्तींपासून नेहमीच प्रेरणा मिळत असते. पूर्वीची आणि आजची परिस्थिती वेगळी असली तरी, आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्त्वाची ठरते. समाजाला भेडसावणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत घेतलेला विचार आणि कृती समाजाला अभिप्रेत जीवन जगण्यास प्रवृत्त करत असते. खऱ्या अर्थाने पुरस्कारासाठी सुयोग्य व्यक्ती शोधणे कठीण असते, मात्र संगमनेर रोटरी क्लबने या पुरस्कारांसाठी केलेली निवड सार्थ आणि समाजासाठी पथदर्शक आहे. ‘स्वार्थ विरहित सेवा’ या संकल्पनेप्रमाणेच संगमनेर रोटरी क्लबचे सामाजिक कार्य अत्यंत गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांनी केले. येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या सभागृहात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कडक उन्हाचा तडाखा आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून येत्या १५ एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे, तर डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होईल. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेत आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आपली मोहीम सुरूच ठेवली असून, सोमवारी झालेल्या कारवाईत तब्बल ९५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकाच आठवड्यात एलसीबीने केलेली ही चौथी मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. नगरहून येऊन एलसीबीचे पथक वारंवार कारवाया करत असताना, स्थानिक संगमनेर पोलीस मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आता सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डीले आणि उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: संगमनेर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात महायुतीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात डीजे लावून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या ४० वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ माघाडे परिवाराच्या माध्यमातून वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा जोपासली जात आहे. मात्र, यंदा प्राध्यापक अहिरे यांचे व्याख्यान सुरू असतानाच समोरून डीजेचा कर्कश आवाज करून हा कार्यक्रम उधळून लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे संगमनेरची सांस्कृतिक आणि सामाजिक एकता धोक्यात आल्याचा आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे पडसाद आता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचे काम काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले असून, यामुळे संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शेडगाव ग्रामपंचायत कार्यालयाने संगमनेरच्या तहसीलदारांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. जलजीवन योजनेचे मुख्य पाईपलाईनचे काम उद्भवापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत पूर्ण झाले होते, मात्र गावातील काही शेतकरी ही पाईपलाईन त्यांच्या क्षेत्रातून नेण्यास मज्जाव करत आहेत. यामध्ये दिलीप श्रीहरी नागरे, सत्पाल भिमाजी नागरे आणि सुखदेव रामभाऊ नागरे या शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकण्यास विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही हे शेतकरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता प्रत्यक्ष कृती आराखड्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून, शहरवासीयांनी दिलेल्या कौलानुसार संगमनेर बसस्थानक परिसरात महाराजांचे भव्य ‘पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक’ उभारले जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. या स्मारकाचा प्रवास संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा राहिला आहे. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी बसस्थानक परिसरातील मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, अशी अधिकृत मागणी करत या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव शासनदरबारी ताकदीने मांडला. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणानुसार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शहरातील नामांकित सोनांबेकर हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांवर रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला आहे. मात्र, हा कायदेशीर तपास प्रक्रियेचा भाग असतानाही, डॉक्टरांच्या असोसिएशनच्या संगमनेर शाखेने संघटित होऊन पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी यांच्यावर सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती. विशेष म्हणजे, चार महिने पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर फिर्यादीला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली आहेत, मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याचे पाणी आणि पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन दिले. हे निवेदन कार्यकारी अभियंता कवडे व हापसे यांनी स्वीकारले असून, यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, विजय मगर, विलास…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत (TCS) नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणिलैंगिक शोषणाच्या धक्कादायक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेन वॉशिंग करून त्यांचे धर्मांतर करण्याचा आणि त्यांना लैंगिक जाळ्यात ओढण्याचा हा भयानक कट समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची सुरुवात एका तरुणीच्या वागण्यातील बदलामुळे झाली. संबंधित तरुणीने हिंदू असूनही अचानक रोजे पाळण्यास सुरुवात केली, तिचा पेहराव बदलला आणि तिने हिजाब परिधान करण्यास सुरुवात केली. मुलीच्या या संशयास्पद वर्तणुकीमुळे तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, ज्यातून या संपूर्ण रॅकेटची माहिती समोर आली. तपास यंत्रणांना…
