Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची घोषणा करत २०६३ पदांची भरती केली जाणार आहे. खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखीने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा, मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुंबईत जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केले जाणार असल्याची घोषणा केली. दिव्यांगांसाठी हा मोठा निर्णय समजला जात आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राष्ट्र ठरले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात स्वतंत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामावर असलेल्या सुरक्षारक्षकासह त्याच्या साथीदाराला लोखंडी गजाने मारहाण करून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यास तब्बल पाच महिन्यानंतर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. ऋषिकेश सदाशिव वाव्हळ (वय २३ वर्ष) या तरुणाला पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र होंडा शोरूम च्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना लक्ष्मण चांगदेव फटांगरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. यावेळी त्यांच्यासह आणखी एक सहकारी होता. ५ जुलैला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना हालचाल जाणवली, त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला हटकले असता तेथे असलेल्या लोखंडी गजांची चोरी करण्याचा प्रयत्न असलेल्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात गजाने प्रहार केला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातामध्ये दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले दोघेही तरुण नात्याने चुलत भाऊ असून तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी आहे. आकाश विलास कुळधरण आणि ऋषिकेश विजय कुळधरण अशी या दोघा मृत भावंडांची नावे आहेत. कोल्हार-घोटी राज्यमार्गावर मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला. दोघा भावंडांच्या अपघाती मृत्यूने वडगाव पान गावात हळहळ व्यक्त होत आहे. लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत असलेली पिकअप आणि मांची फाट्याकडे वळण घेत असलेला ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. याच दरम्यान दुचाकीवरून जात असलेले दोघे तरुण या अपघातात सापडले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नासिक-पुणे महामार्गावर संगमनेर नजीक असलेल्या रायतेवाडी फाटा येथे एसटी बस आणि हुंडाई कारच्या झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहे. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातासंदर्भात अधिक माहिती अशी, नासिक येथील मित्तल कुटुंबीय गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या हुंदाई कारमध्ये संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यांची कार रायतेवाडी फाटा येथे आली असताना समोरून पुण्याहून संगमनेर कडे येणाऱ्या एसटी बसने कारला जोराची धडक दिली. या अपघातात अजयकुमार राजेंद्रकुमार मित्तल, त्यांची पत्नी दीपशिखा अजयकुमार मित्तल, मुलगा शिखर अजय कुमार मित्तल आणि सून आहण शिखर मित्तल (सर्व रा. फ्लॅट नंबर ८, साईप्रसाद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अल्पवयीन मुलीस रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केली आहे. संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथे हा प्रकार घडला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संगमनेर खुर्द येथे तक्रारदाराचे कुटुंबीय राहत असून ते मोलमजुरी करतात. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपी गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तक्रारदार कामावर जाण्यासाठी कुठले असताना त्यांची सोळा वर्षे सहा महिने वयाची मुलगी त्यांना अंथरुणावर झोपलेली दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात संगमनेर शहरात आणि नातेवाईकाकडे तिचा शोध घेतला, मात्र ती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज न्यायालयात सुरू असलेल्या खून आणि मोका केस मधून तक्रारदाराच्या मावस भावाला सुटकेसाठी मदत करण्याकरिता सत्र न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिकाने तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात हा लाचखोर लिपिक दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. सचिन अशोक देठे वय ३९ वर्ष असे या लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. लाच लुचपत विभागाने गुरुवारी ही कारवाई केली. तक्रारदाराच्या मावस भावाविरोधात खून व मोका केसचा खटला पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्याच्या साक्षीचे जाबजबाब टायपिंग करताना आवश्यक ते बदल करून केस मधून सुटकेसाठी मदत करतो असे सांगत सत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. परीक्षेसाठी प्रवेश पत्र काढण्याकरिता अकोले येथील सायबर कॅफेमध्ये गेलेल्या बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गावातीलच तरुणाकडून अनैसर्गिक वर्तन केल्याच्या कारणावरून आरोपी विरोधात अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे यांनी करत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या घटनेची सुनावणी सुरू होती. खटल्या दरम्यान आरोपी जामिनावर मुक्त होता. दोषारोप पत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्ही आमची सुरक्षा काढली. आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? आम्हाला कोणी हात लावतंय का? तुम्हीदेखील सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले या दौऱ्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर सुरक्षेविना फिरून दाखवा, असा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधासत्पणे फिरू शकतोय, असंही ते म्हणाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बारा वर्षाच्या मुलीने सोळा वर्षाच्या मुलाबरोबर पळून जात लग्न केले. नंतरच्या लग्न संबंधातून या मुलीला दिवस गेल्याने ही बाब समोर आली. तसेच या मुलीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे देखील तिने सांगितले आहे. पीडित मुलीच्या तोंडून हा प्रकार ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यामुळे पुणे जिल्ह्यातील बालविवाहाचा हा प्रकार समोर आला. अल्पवयीन पीडित बालिकेची ओळख एका यात्रेमध्ये आरोपी असलेल्या सोळा वर्षीय मुलासोबत झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र या मुलीने लग्नास नकार दिल्याने, मी विष पिऊन आत्महत्या करेल अशी धमकी वजा विनवणी आरोपीने पीडित मुलीला केली होती. त्यामुळे मुलीने लग्नाला होकार देत त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा निश्चित करण्यात आली नसून पुतळ्यासाठी करण्यात आलेली तरतूद देखील ५० लाखावरून २५ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे, अशाप्रकारे बोगस तरतुदी करण्यात आल्याचे स्पष्ट करत ‘खोटे बोला पण रेटून बोला, हे काँग्रेसचे विकास मॉडेल’ असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये भाजपची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे विधान जहागीरदार यांनी केले होते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी जागा…

Read More