Author: अनंत पांगारकर
राज्याच्या गृह विभागाने काढले बदल्यांचे आदेश; राज्यातील तब्बल 113 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याच्या गृह विभागाने सोमवारी तब्बल 113 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यापैकी 104 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे तर नऊ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत. बदल्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या पोलिस दलात सोमवारी मोठे फेरबदल केले. गृह विभागाने काढलेल्या आदेशामध्ये प्रसाद अक्कानारू, श्रीमती श्वेता खेडकर, विजयकांत सागर, प्रशांत वाघुडे, विशाल गायकवाड, अजित बोराडे, दत्ता नलावडे, दत्तात्रय कांबळे आणि श्रीमती ज्योती क्षीरसागर या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने आज काढलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर टिकास्त्र सोडणारे पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉग्रेसमधील मातब्बर नेते व प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या कन्या मेघना काकडे-माने यांनी मातोश्रीत उध्दव ठाकले यांच्या उपस्थितीत ‘शिवबंधन’ हाती बांधले आहे. मुंबईच्या अंधेरीस्थित असलेल्या काकडे-माने यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत ‘मशाल’ हाती घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. काकडे-माने यांच्या शिवसेना प्रवेशावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह नीलम गोर्हे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन अहिर, आदेश बांदेकर हे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. काकडे-माने यांचे वडील अंकुश काकडे हे राष्ट्रवादीतील बडे प्रस्थ आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे ते प्रवक्ते असून आजही त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात न्यायालयीन प्रकरणे आपसात सामंजस्याने मिटविण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे प्रकरणांची यादी सादर करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. भारतीय दंड संहितेच्या फौजदारी प्रसंहिता कलम ३२० प्रमाणे (न्यायालयाच्या परवानगीने) 298, 312, 323, 325, 334, 335, 337, 338, 341, 342, 343, 344, 346, 352, 355, 357, 358, 379, 381, 403, 406, 407, 411, 414, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 426, 427,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांची प्रतिमा जाळल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या शहरप्रमुखासह चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद जयवंत पवार, गुलाब पांडुरंग भोसले, अमोल त्रंबक कवडे आणि रवींद्र उर्फ पप्प्या नंदू कानकाटे यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला असून संगमनेर शिवसेनेत संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे समर्थकांचे दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेना उत्तर नगर जिल्हा उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या तक्रारीवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कारागृहातून रजेवर गेलेला कैदी अद्याप परतला नाही, तब्बल वर्षानंतर जाग्या झालेल्या कारागृह प्रशासनाने या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश कांतीलाल पंचाळ असे या कायद्याचे नाव असून तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहात शिक्षा भोगत असताना पंचाळ याने कारागृह प्रशासनाकडे काही दिवसांसाठी सुट्टीची मागणी केली होती. नाशिक रोड कारागृह प्रशासनाने त्याला 30 एप्रिल 2021 ते 16 मे 2021 अशी सुट्टी मंजूर केली होती. रजेवर गेलेला हा कैदी 16 मे 2021 मध्ये पुन्हा कारागृहात येणे अपेक्षित होते. मात्र हा कैदी पुन्हा आजतागायत नाशिक रोड कारागृहात परतला नसल्याचे समोर आले आहे. तब्बल वर्षभराचा कालावधी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळविला आहे. विरोधकांनी उमेदवार दिला नसला तरी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांपैकी एकही उमेदवार दोन हजाराचा पल्ला गाठू शकला नाही. शिवसेनेमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडा नंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक देशभर चर्चिली गेली. विविध कारणांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेतील फुटी नंतर प्रथमतः उद्धव ठाकरे गटाने हे मोठे यश मिळविले आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. पोट निवडणुकीआधीच शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चौथीही मुलगी झाली म्हणून पती-पत्नीने तिला विहीरीत टाकून मारले, मात्र बिबट्याने तिला पळवून नेल्याचा बनाव केला म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पती-पत्नीची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २०१४ मध्ये ही घटना घडली होती. सुदाम भिमाजी कोटकर आणि उज्ज्वला सुदाम कोटकर अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या पती-पत्नीची नांवे आहेत. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २१ जानेवारी २०१४ रोजी बिबट्याने आठ दिवसांच्या मुलीस पळवून नेल्याची घटना घडली होती. या चिमुरडीचा मृतदेह रामनाथ नामदेव कोटकर यांच्या शेतातील विहीरीत आढळून आला होता. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवयानी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गांजाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरमध्ये 172 किलो गांजा सह तब्बल 24 लाखाच्या माध्यमातून हस्तगत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या गांजा प्रकरणी सखोल तपास करून याची पाळमुळे शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलीस पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातात की संबंधितांना क्लीन चिट देतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. संगमनेर शहरानजीक कोल्हार-घोटी राज्यमार्गावर समनापुर शिवारात शहर पोलिसांनी ही कारवाई केली. एका ब्रिझा कारमधून कोल्हार घोटी मार्गावरील लोणी कडून संगमनेरच्या दिशेने गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी समनापुर…
रविवार विशेष | प्रवीण पुरो गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या भल्याच्या चर्चा करणार्यांमध्ये खरं कोण आणि खोटं कोण, याचा थांगच लागत नव्हता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, मीच तितका खरा असल्याचं ठासून सांगण्यासाठी प्रचंड खोटं बोलणं आणि याद्वारे जनतेला मुर्ख बनवण्याचे उद्योग लीलया सुरू आहेत. राज्यात येऊ घातलेल्या उद्योगांनी गुजरातला अधिकची पसंती देण्याच्या घटनेने दोन्हीकडून सर्वत्र टीकेचं माहोल उठलं असताना आपणच कसे बरोबर आणि विरोधक खोटारडे असल्याचे पाढे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वाचले. त्यांच्या तोंडी गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, तो तर आपला भाऊच आहे. फडणवीस अगदी योग्य बोलले. याच भावाने गेल्या सात आठ वर्षात महाराष्ट्राची उपटलेली पिसं पाहिली…
आजारपणातही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातून मोठ मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहे, याची सरकारला कोणतेही काळजी नाही. राज्यात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. शेतकरी मदतीची वाट बघतोय मात्र अशा स्थितीत सरकार कुठे आहे? असा प्रश्न निर्माण होतो. पुरोगामी विचारांची कास सोडू नका, आगामी काळात पक्ष वाढवावा लागणार असून निवडणुकांसाठी कामाला लागा, असा आदेश राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शुक्रवारपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” हे दोन दिवसांचे शिबिर सुरू आहे. प्रकृती अस्वस्थामुळे चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले शरद पवार या शिबिरासाठी उपस्थित राहणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली असतानाच…
