Author: Annant Ppangarkar
आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी आर्थिक नियोजनावर भर देणे आवश्यक ठरेल. अनपेक्षित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु व्यावसायिक क्षेत्रातील नवीन योजनांमुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि मुलांकडून शुभवार्ता मिळतील. वृषभ – कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अतिशय फायदेशीर ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन मालमत्ता किंवा गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या. आर्थिक आवक स्थिर असली तरी विनाकारण खर्च करणे टाळा. मिथुन – आज सहजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. अनावश्यक खरेदी टाळून बजेटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कर्क – व्यावसायिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर पोलिसांच्या वतीने शनिवारी, (२५ जुलै) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारींसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या तक्रार निवारण दिनी श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे होणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गोवंश तस्करी आणि कत्तलीच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कठोर कायदेशीर भूमिका घेतली आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणातील आरोपींवर आता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे अतिरिक्त वाढीव कलम लावून कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री संगमनेर-पुणे रस्त्यावर देवीगल्लीच्या पाठीमागे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ‘छोटा हत्ती’ (MH 14 CD 0839) वाहनाची तपासणी करण्यात आली होती. त्यात सुमारे तीन लाख रुपये किमतीचे ५०० किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपणासाठी काहीसा वेगळा आणि गूढ गोष्टींची आवड निर्माण करणारा ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळा. व्यवसायात अडकलेली कामे पुढे सरकतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आज विशेष आनंद आणि सुख लाभेल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाच्या कामांमध्ये अत्यंत लाभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखादा छोटा प्रवास संभवतो. मिथुन – आजचा दिवस अत्यंत शुभ फलदायी राहील. घरात आनंदी वातावरण असेल आणि रखडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण झाल्याने मनात उत्साह राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि धनलाभाचे चांगले योग आहेत. कर्क – शैक्षणिक आणि कला क्षेत्राशी जोडलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी): अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने रविवारी, (२६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत भव्य आणि ऐतिहासिक सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल २५ हजार भाविकांच्या एकत्र येण्यातून हा अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळा साकारणार असून, परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून या अभिनव उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून अविरत कार्यरत असलेल्या या केंद्राचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. सुरुवातीच्या काळात परिसरातील विरळ…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस नव्या संधी आणि उत्साहाने भरलेला असेल. व्यवसायात केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. थकीत रक्कम परत मिळून आर्थिक दिलासा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि जुने वाद मिटतील. वृषभ – आजच्या दिवशी संयमाने काम करण्याची गरज आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमची काम करण्याची शैली सर्वांना आवडेल. कौटुंबिक अडचणींवर चर्चेतून मार्ग निघेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. मिथुन – आज नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा कामाच्या ठिकाणी गौरव केला जाईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. कर्क – मालमत्तेचे किंवा जागेचे जुने वाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक, युवक, महिला व सर्व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षण मंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी घरात सरकारविरोधी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह समविचारी, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असं विद्यार्थी व संगमनेरकर मोठ्या संख्येने मशाल मोर्चात सहभागी झाले होते. हा विराट मशाल मोर्चा संगमनेर बस स्थानकापासून सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे हा मोर्चा महात्मा फुले स्मारकापर्यंत पोहोचला. यावेळी झालेल्या सभेत बोलताना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. दिल्लीतील या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी २४ जुलै रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थासह (शिवाजी पार्क) संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या एकत्रित आंदोलनात आघाडीचे सर्व प्रमुख घटकपक्ष पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याने राज्यभरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना झालेल्या बेदम मारहाणीचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर पसरल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाठीमारात मुंबई, पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक मराठी तरुण जखमी झाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. या अत्याचारी कारवाईचा आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर आलेल्या गदेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी संगमनेर येथे आज, बुधवारी (दिनांक २२ जुलै) सायंकाळी सहा वाजता भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ‘समविचारी प्रवाह, संगमनेर’ यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष, सर्वपक्षीय व समविचारी संघटना तसेच संगमनेरमधील नागरिक, विद्यार्थी सहभागी होणार आहे. संगमनेर बस स्थानक येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माळीवाड्यात या मोर्चाचा समारोप होणार आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: दैवी शक्ती, मंतरलेले उपचार आणि असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत गोरगरीब जनतेची आर्थिक, शारीरिक व मानसिक पिळवणुकीचा आरोप असलेल्या वडगावपान (ता. संगमनेर) येथील भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्या कुटुंबाला सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणात राजेंद्र गडगेची पत्नी अश्विनी राजेंद्र गडगे आणि मुलगा शिवम राजेंद्र गडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी मंजूर केला आहे. नेमके प्रकरण काय? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. राजेंद्र बापू गडगे…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि उत्साहाचा राहील. नोकरी आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. वृषभ – आज नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत संयम ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी शांततेने चर्चा करा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. मिथुन – आज तुमची निर्णयक्षमता उत्तम राहील. बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल आणि नवीन संधी चालून येतील. मित्रांशी संवाद वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल, परंतु वाहने चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क – आजचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी लावून धरली आहे. तसेच घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. घटनेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : खरीप हंगामाच्या ऐन गर्दीत सातत्याने मागणी करूनही युरिया खत उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले. महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रशासन व काही शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना मध्यस्थीची विनंती केली. थोरात यांनी तातडीने कृषी विभागाला शासकीय बफर स्टॉकमधील युरिया मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रशासनाने ती मागणी मान्य करताच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. नाशिक-पुणे महामार्गावर मंगळवारी सकाळपासूनच शेतकरी बांधव आणि महिला युरियासाठी पहाटे पाच वाजेपासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गरीब आणि गरजूंना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चा संगमनेरमधील मेडीकव्हर हॉस्पिटलने साफ बट्ट्याबोळ चालवला आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करत त्यांच्याकडून उघडपणे लाचेची उकळपटी करणाऱ्या मेडीकव्हर हॉस्पिटलमधील दोन बड्या धटिंगणांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. रुग्णाच्या आईवर उपचार करण्यासाठी आणि तिचे ऑपरेशन या योजनेतून करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डेटा एंट्री ऑपरेटर सुभाष धाडवड आणि त्याला खतपाणी घालणारा हॉस्पिटलचा मॅनेजर सुजित गायकवाड या दोघांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आवळल्या असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढती अनियमितता, परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थीविरोधी धोरणांमुळे तरुण वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी संगमनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या देशातील शिक्षण क्षेत्रात विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न, विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि विद्यार्थीहिताच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि युवकांमध्ये संतापाची लाट आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित असलेली सर्व महत्त्वाची कामे सहजासहजी मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. व्यवसायात धनलाभाचे चांगले योग आहेत आणि जोडीदाराचा सल्ला अत्यंत लाभदायक ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. नाहक खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. व्यवसायात घाईगडबडीने कोणतेही आर्थिक निर्णय घेणे टाळा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर अधिक एकाग्रता ठेवण्याचा हा काळ आहे. मिथुन – आजचा दिवस खूप छान आणि लाभदायक सिद्ध होईल. बौद्धिक क्षमता आणि कार्यकुशलता वाढेल. नवीन लोकांशी झालेले संपर्क भविष्यात व्यवसायात फायदेशीर ठरतील. मुलांशी संबंधित असणारे प्रश्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान मोठा गोंधळ उडाला. कॉकरोच जनता पार्टीतर्फे (CJP) पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी व तरुण रस्त्यावर उतरले होते. संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संसद मार्ग आणि जंतरमंतर परिसरात जोरदार लाठीचार्ज केला. हाय-सिक्युरिटी झोनमध्ये जमा झालेल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र झटापटीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. रेल भवनजवळ पोहोचलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या सर्व तणावपूर्ण परिस्थितीमुळे संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी करणे, संवाद साधणे आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हीच खरी लोकशाहीची ओळख असते. मात्र, आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणे हे स्पष्टपणे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर केला जात असेल आणि त्यांचे मतभेद दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीचा नाही तर हुकूमशाहीचा मार्ग आहे. सोनम वांगचुक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मन प्रसन्न राहील आणि आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. व्यापारात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरणात सलोखा राहील. प्रवासाचे योग येत आहेत, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने यात सुधारणा न केल्यास शिवसेनेच्या वतीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विनोद सूर्यवंशी हे आपल्या लहान बाळाला अँटी रेबीज लसीकरणासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता, तेथे आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर न्यायालयीन कामकाजाचे कारण सांगून गैरहजर होते, यामुळे अनेक पालक आपल्या आजारी…
