Author: अनंत पांगारकर

जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी आहे. नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देत उद्दिष्ट ठेवून काम केल्यास यशस्वी उद्योजक होता येते. युवकांना व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी जयहिंद लोक चळवळीमुळे मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे गौरवोद्गार डॉ. आनंद गोडसे यांनी काढले. कार्यशाळेला यांची होती उपस्थिती: मालपाणी लॉन्स येथे जयहिंद लोकचळवळ व दे असरा या संस्थेच्यावतीने व्यवसाय व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, पुणे येथील प्रशिक्षक डॉ. आनंद गोडसे व ऐश्वर्या कुलकर्णी, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले,…

Read More

लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार. महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हे नेते करणार नेतृत्व: गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सांगितले की, राज्यातील सहा विभागात पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे…

Read More

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती… महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – ११ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम होत आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी हे होते उपस्थित: यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा व त्याची सुनावणी संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. का गेले होते सुप्रीम कोर्टात: इंदुरीकर महाराज यांच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयात इंदुरीकर यांना दिलासा मिळाल्यानंतर प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात पोहोचले होते. तेथे संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम करण्यात येऊन खटला चालविण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे इंदुरीकर यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काही दिवसांपूर्वी कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरले आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी ट्विटर द्वारे केला आहे. कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ते पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रिय होत विरोधकांचे आर्थिक घोटाळे समोर आणू लागले आहेत. मंगळवारी त्यांनी ट्विटरवर मुलुंड येथील कोविड सेंटरच्या शंभर कोटीच्या घोटाळ्याबद्दल आरोप केले आहेत. या माध्यमातून ते पुन्हा एकदा आपली तोफ विरोधकांवर डागू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये आता टोमॅटो पाठोपाठ कांदाही वधारला आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून प्रतिक्विंटल 2600 रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. असे मिळाले कांद्याला भाव: मंगळवारी (ता. 7 ऑगस्ट) झालेल्या कांदा लिलावामध्ये बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 2000 ते 2600 रुपयांचा भाव मिळाला. त्या पाठोपाठ दोन नंबर कांद्याला 1200 ते 1800 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये भावाने विकला गेला. असा मिळाला टोमॅटोला बाजार: याशिवाय बाजार समितीत टोमँटोला 1000 ते 2500 रुपयांपर्यंतचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यानच्या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे भारत सरकारने निश्चित केले आहे. यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. हर घर तिरंगा या अभियानाला पाठबळ देण्यासाठी भारतीय टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरु करण्यात आली असुन हे राष्ट्रध्वज प्रत्येकी २५ रुपयांप्रमाणे मिळणार आहे. स्थानिक टपाल कार्यालयातून नागरिकांना राष्ट्रध्वजाची खरेदी करता येईल. याशिवाय नागरिकांना टपाल खात्याच्या www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावरही ई- टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिक्षक डाकघर सुरेश एल. बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सध्या राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू आहे. या महसूल सप्ताहात सोमवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत महसूल कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान नेत्रदान, अवयव दाना बाबत जागृती करण्यात येऊन कर्मचाऱ्यांकडून संमती पत्रे भरून घेण्यात आली. महसूल सप्ताह : लोकाभिमुख कामांचा करुया निपटारा चला करू ‘महसूल सप्ताह’ साजरा हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात महसूल सप्ताह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचे करण्यात आले आयोजन: या सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सोमवारी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान,आरोग्य तपासणी शिबीर तसेच नेत्रदान व अवयव दान बाबत संमती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार यावर्षी पुन्हा संगमनेर महाविद्यालय जाहीर झाला आहे. महाविद्यालयाने यावर्षी तब्बल दहा पुरस्कार प्राप्त करत संगमनेरचा सन्मान वाढविला. असे आहेत पुरस्कार : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचेवतीने राष्ट्रीय सेवा योजना या विद्यार्थीभिमूख विविध उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणा-या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन कदम यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. प्रताप फलफले यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक म्हणून उल्लेखनिय कार्य केल्याबदद्ल पुरस्कार प्रदान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकारातील दीपस्तंभ थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती शताब्दी निमित्त वर्षभरात सहकार, कृषी व शैक्षणिक क्रांतीचा महोत्सव साजरा होणार असून या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब थोरात यांचे छायाचित्र असलेल्या शताब्दी महोत्सवाचा लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. यांनी केले अनावरण आणि यांची होती उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, शंकर खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर…

Read More