Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यात विविध कामांकरिता ७५३.५२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्यात विविध विकासाची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण करा तसेच संपूर्ण निधी खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देत पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक विभागाने प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सुसंस्कृत राजकारण आणि सातत्याने होत असलेला येथील विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. सत्ता येते आणि जातेही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा एका दिवसात चित्र बदलेल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित २९ सरपंच व ३७ ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पंढरपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत, असं धक्कादायक विधान करत शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक असल्याचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात डॉ. स्वामी यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे. स्वामी यांनी असं विधान करत देशातील व राज्यातील आपल्याच सरकारला घरचाच आहेर दिला असल्याचे म्हटले जात आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी शनिवारी (२४ डिसेंबर) पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी ही धक्कादायक विधानं करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : खरेदीवेळी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या संरक्षणासाठी सरकारने काही कायदे बनविले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेरचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनी शनिवारी संगमनेरच्या तहसील कार्यालयामध्ये ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना विविध मान्यवरांनी त्यांच्या हक्काबद्दल माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी आपले आधारकार्ड ३१ डिसेंबर पर्यंत स्वस्तधान्य दुकानदारांकडे जमा करावेत. अन्यथा अशा शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येईल. असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. संगमनेर तालुक्यातील प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधा पत्रिकाधारक कुटूंब प्रमुखाचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात आलेले नाही. अशा कुटूंबाच्या याद्या स्वस्तधान्य दुकानादार, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच गावातील व्हाट्सअप ग्रुप वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कुटूंब प्रमुख म्हणून घोषीत झालेल्या सदस्याचे आधारकार्ड ऑनलाईन प्रमाणालीमध्ये समाविष्ट झालेले नाही. अशा कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आपले नांव असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नगर येथील यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणात तब्बल 25 महिने आणि 90 सुनावण्या झाल्यानंतर अखेर मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेसह 11 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नगर जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या न्यायालयासमोर हा खटला सुरू असून, आजच्या सुनावणीत हे दोषारोपपत्र सिद्ध झाले आहे. दरम्यान, या खटल्यातील एक महिला आरोपी अद्यापि फरार आहे. मुख्य आरोपी पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे, ज्ञानेश्वर उर्फ गुड्डय़ा शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश उर्फ तम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ, महेश वसंतराव तनपुरे, जयंत अकुला…
महाराष्ट्र संवाद न्यूज उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातामध्ये लष्करातील १६ जवान ठार झाले आहे. तर चार जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने थेट दरीत कोसळला. भारतीय लष्कराने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, 23 डिसेंबरला उत्तर सिक्कीममधील गेमा येथे एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा एक भाग होता, जे सकाळी चाटणहून थांगूच्या दिशेने निघाले होते. उत्तर सिक्कीम हा अतिशय धोकादायक भाग असून तो पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे. गेमाच्या वाटेवर एका तीव्र वळणावर लष्कराचे हे वाहन तीव्र उतारावरून घसरले. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज राजकारण परिस्थितीवर अवलंबून असते त्यामुळे कोठे जाऊन काम करू शकेल हे निश्चित नसले तरी 2024 ची विधानसभा निवडणूक आपण लढविणार आहोत पण मामांच्या विरोधात नाही, असे स्पष्टच सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना उद्देशून युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर भाजपची नजर असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तांबे म्हणाले पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज दिव्यांग विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी असून त्यांच्यामधील कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी संग्राम निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून या विद्यार्थ्यांमधील नैपुण्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे. जिल्हा समाज कल्याण कार्यालय व संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय आणि डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संगमनेरमध्ये संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंध मतिमंद मूकबधिर अस्थिव्यंग प्रवर्गाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. यावेळी तांबे बोलत होते. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, सहाय्यक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : प्राॅपर्टी कार्डमधील चुका दुरूस्त करण्याचे अधिकार आता भूमी अभिलेख विभागातील उपअधिक्षकांना मिळाल्याने स्थानिक कार्यालयातच याबाबतचे निर्णय करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनूसार झालेल्या निर्णयाचा मोठा दिलासा असंख्य प्राॅपर्टी कार्ड धारकांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. प्राॅपर्टी कार्डमधील होणाऱ्या चुकांबाबत असंख्य तक्रारी भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त होत होत्या. मात्र याबाबतचे अधिकार फक्त जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला असल्याने नागरीकांची मोठी अडचण होत होती. तक्रारींची संख्या आणि याबाबत निर्णय होण्यास लागणारा विलंब यामुळे नागरीकांच्या प्राॅपर्टी कार्ड मधील चुका वर्षानुवर्षे तशाच राहत होत्या. नगर येथील कार्यालयामध्ये हेलपाटे मारूनही असलेल्या चुका दुरूस्तीचे काम…
