Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्यात एसएमबीटीच्या कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते, असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूटमध्ये आला. धूम्रपान करणाऱ्या कोपरगाव येथील ८७ वर्षीय अजीज मन्सुरी यांना गेल्या काही दिवसांपसून खोकल्याचा त्रास होता. अनेक ठिकाणी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र निदान झाले नाही. काही दिवसांनी त्यांच्या खोकल्यातून रक्तदेखील पडू लागल्याने मन्सुरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यात येतो आणि जातो असे घडत नसते. ती काही जादूची कांडी नाही. फिरवली की आला आणि गेला. कोणताही प्रकल्प लगेचच राज्याबाहेर जात नाही. आरोप कोणीही करू शकतो. मात्र आमचे सरकार उद्योगाला चालना देणारे उद्योगांचे स्वागत करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आणखीन एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेला आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, तीन-चार महिन्यांपासून गेल्या अडीच वर्षात प्रलंबित असलेल्या कामांना चालना देण्याचे काम आमच्याकडून सुरू आहे. विकास प्रकल्पांना वॉर रूममध्ये घेतले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जातोय. राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि थांबलेल्या प्रकल्पांना पुढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सत्तारूढ झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडका लावला असताना गरिबासाठी अन्नदात्री ठरलेली शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यभरात या थाळ्यांचे यशदा आणि टीस या दोन संस्थांमार्फत ऑडिट केले जाणार आहे. नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आधीच्या सरकारांच्या निर्णयांना जशी स्थगिती मिळाली तशाच पद्धतीने शिवभोजन थाळी देखील बंद केली जाण्याची चिन्हे होती. मात्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्यभरात यशोदा आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने अकोले नगरपंचायतीला विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, याशिवाय पुढील काळात भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले. बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर खासदार लोखंडे आज प्रथमच अकोलेत आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, जिल्हा संघटक विजय काळे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव, तालुका प्रमुख संजय वाकचौरे, शहराध्यक्ष गणेश कानवडे, संगमनेर तालुकाप्रमुख रमेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेनेच्या आणखी एका खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची वाट धरली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. कीर्तीकर शिंदें सोबत गेल्याने स्थानिक लोकाधिकार समिती देखील त्यांच्या रूपाने शिंदे गटाची ताकद वाढविणारी ठरणार आहे. मुंबईतील माहीम विधानसभा नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार कीर्तीकर यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षात प्रवेश केला. यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या आता तेरावर गेली आहे.…
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत, मात्र यातून जर कोणाचे पंचनामे करावयाचे राहिले असतील तर त्यांनी तातडीने तहसीलदारांकडे संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. अहमदनगर जिल्हयामध्ये ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय स्तरावरून देण्यात आले होते. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान झाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 जणांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखविणे असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान विवियाना मॉल मधील चित्रपटाचा शोध बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकांने शो बंद पाडल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले होते तसेच कोण जितेंद्र आव्हाड अशी विचारणा केली होती. यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आमदार आव्हाड यांच्यासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेडमध्ये असून गुरुवारी रात्री यात्रेत सहभागी झालेल्या दोघा यात्रेकरूंना ट्रकने उडविण्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये असून या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या यात्रेतून एक दुःखद घटना समोर आली. नवीन मोंढा परिसरातील सभा संपल्यानंतर यात्रा महादेव पिंपळगाव येथील कॅम्प कडे रवाना झाली. रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव येथील नांदेड अकोला पाळी चालणाऱ्या गणेशन (वय ६२वर्ष) आणि सययुल (वय ३० वर्ष) या दोघांना ट्रकने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा पुढे येऊ लागली आहे. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी नितीन गडकरी यांच्यासह दहा खासदारांचा राजीनामा मागितला जाणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे. या संदर्भात समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी म्हटले आहे की, संसदेत या खासदारांनी विदर्भ स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी ठराव न केल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. विदर्भा संदर्भात खासदारांना प्रेम राहिले नसल्याने या खासदारांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना राजीनामा मागितला जाणार आहे. वेगळ्या विदर्भासाठी भुवनेश्वर मधील अधिवेशनात भारतीय जनता पक्षाने ठराव केला होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं मात्र ते पाळले गेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राजकारणातली कटूता संपली पाहिजे. एका पक्षाने ठरवून ती संपणार नाही. सर्वांनीच ती संपवली पाहिजे. पण सोबतच नेत्यांनी शांत राहायचं आणि कुणाला तरी बोलायला सांगायचं ही प्रथा पण बंद झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. गुरुवारी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकारणातील कटूतेवर भाष्य केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकारणातील कटुता संपवायला हवी’ या आपल्या विधानाचा पुनरुच्चार करत खासदार राऊत यांना चिमटा काढला आहे. खासदार राऊत यांच्या जामीनाबद्दल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, न्यायालयाने निर्णय दिला आहे. तो योग्य की अयोग्य यावर ईडी बोलेल, ते उच्च न्यायालयात गेले आहे. त्या…
