Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रविवारी (3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात गुणवंत शिक्षकांसह पारनेरचे आमदार निलेश लंके व सिन्नरच्या जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांना गौरवले जाणार असल्याची माहिती समन्वयक अंतोन मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे यांनी दिली आहे. सातत्याने सामाजिक उपक्रम: संगमनेरमधील पठार भागातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जाणीव जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणीव फाउंडेशनच्यावतीने आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जनआरोग्यम परिवार आयोजित जाणीव फाउंडेशनचा यावर्षीचा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्कार सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार यांना जाहीर झाला आहे. अध्ययन, अध्यापनासाठी पुरस्कार: फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमित पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात नव संजीवनी ठरावा असा हा पुरस्कार पवार यांना देण्यात येणार आहे. रविवारी वितरण: शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार पवार यांना रविवारी (3 सप्टेंबर) बीएसटी महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात वितरित केला जाणार आहे. पुरस्काराबद्दल पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शासनाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठुबे वसंत विहार भागातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. मंगळवारपासून होते बेपत्ता: वसंत विहारच्या धर्मवीर नगर परिसरात राहणारे उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे मंगळवारपासून बेपत्ता होते. ते घरी परतले नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस ठुबे यांचा शोध घेत होते. बुधवारी रात्री आढळला मृतदेह: बुधवारी रात्री अक्षय ठुबे यांचा मृतदेह कोकणी पाडा परिसरातील जंगलात आढळून आला. तुबे यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्वरेने तपास…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – स्वतःसह कुटुंबातील सदस्य व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहारात सहभागी असलेल्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याने स्वतःच्या व्यक्तिगत शुभेच्छांच्या लाखो रुपयांच्या जाहिराती ठेवीदारांच्या पैशातून वृत्तपत्रांना दिल्याचे समोर आले आहे. कारनामे: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 81 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर या घोटाळ्यामागील मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याचे एक-एक कारनामे समोर येत आहे. यातील बहुतेक कारनामे पोलिसांकडे दाखल असलेल्या फिर्यादीत (FIR मध्ये) नोंदविण्यात आले आहे. कुटुंबातील सात जणांचा समावेश: संगमनेरच्या सहकारी पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक अपहार म्हणून दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराकडे बघितले जाते. विशेष म्हणजे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मोठे पाऊल उचलले होते. अत्याचारासाठी आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून सहा जणांना पोलिसांनी सहआरोपी केले आहे. यातील कॅफे मालकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. आत्तापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींसह लॉज चालक, कॅफे मालक अशा पाच जणांना अटक केली आहे. मंगळवारी अटक केलेल्या राहुल गौतम भालेराव या कॅफे मालकाला बुधवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. विविध ठिकाणी यांनी केला अत्याचार: संगमनेर शहरालगत राहावयास असलेल्या एका अंदाजे १७ वर्षे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – केवळ संगमनेरच नव्हेतर आसपासच्या चार जिल्ह्यांमधील उद्योग, व्यवसाय आणि व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देवून देशाच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्या संगमनेर मर्चन्ट्स सहकारी बँकेची 58 वी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. गतआर्थिक वर्षाचे चेअरमन ओंकार सोमाणी व विद्यमान चेअरमन संतोष करवा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान 3 मोहीमेत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. मावळलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला 8 कोटी 31 लाखांचा विक्रमी नफा झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावर्षी संस्थेच्या सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप केले जाणार आहे. प्रतिमा पूजन: प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ सभासद डॉ.अशोक पोफळे, नीलेश जाजू, नंदकुमार भडांगे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – विनयभंगाच्या दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी, तडीपार व एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकरता तीस हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या शिर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार विरोधात नाशिकच्या लाच लूचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे. एक ते दीड लाखाची मागणी: संदीप गडाख असे शिर्डी पोलीस ठाण्याच्या कारवाई झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. यासंदर्भात नासिक लाच लूचपतकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. नाशिकच्या तक्रारदाराविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या एका गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासाठी तसेच तक्रारदारावर तडीपारीची व एम.पी.डी.ए. नुसार कारवाई करू नये यासाठी पोलीस हवालदार संदीप गडाख यांनी पंचासमक्ष शिर्डीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर व संगमनेर शहरातील प्रत्येक वार्डात काँग्रेसची जनसंवाद यात्रा होणार असून या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा उलगडा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे व शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. येथे झाली बैठक: यशोधन कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित जनसंवाद यात्रेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणार: केंद्र सरकार हे संपूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने पाठ फिरविल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दुष्काळ नियंत्रण वॅार रुम बनवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वॅार रूममधून हे कामकाज होणार: राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेली गावे, तालुके, जिल्हा, विभाग या सर्वांवर या दुष्काळ नियंत्रण वॅार रुमच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तसेच या सर्वांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे. या वॅार रुममधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतील. पाणीसाठ्याचे आरक्षण…
जनतेला दिलासा देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे के.के. रेंज व अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यांच्या उपस्थितीत झाली बैठक: सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार…
