Author: Annant Ppangarkar
संगमनेर दि. ३० – शुक्रवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत संगमनेरमध्ये वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तब्बल तीन-चार तासांपासून गायब असलेली वीज रात्री उशिरापर्यंत न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनेक घरांमधून सुरू आहे. त्यामुळे महिलांचे सायंकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू असल्याने व त्यातच शहरातील महावितरण लाईटच्या बत्या गुल केल्याने अंधारातच हे कार्यक्रम सुरू होते. दरम्यान गायब झालेल्या विजेचा परिणाम शहरात तसेच उपनगरात जाणवत असून अनेक नागरिकांनी या संदर्भात महावितरणच्या कार्यालयाकडे विचारणा करण्यासाठी दूरध्वनी केले असता नागरिकांचे दूरध्वनी घेण्याचे टाळण्यात आले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी देखील फोन घेतले नाही. अंधाराचा…
संगमनेर दि. ३१- काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार असून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना पत्र दिले आहेत संतापाची लाट… संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अपर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये…
अहिल्यानगर दि. ३१- निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन बंद झाले असून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर थकीत रक्कम मिळणार असल्याचा फसवा दूरध्वनी संदेश अज्ञात व्यक्तीकडून निवृत्ती वेतनधारकांना येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कुठल्याही फसव्या संदेशाला निवृत्तीवेतनधारकांनी प्रतिसाद न देण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जनार्धन हरी सहारे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन विषयक लाभ प्रदान करताना कुठल्याही वसुली अथवा प्रदानाबाबत कोषागार कार्यालयामार्फत दूरध्वनी करुन संपर्क साधला जात नाही अथवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सांगितले जात नाही. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी अशा कुठल्याही प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये. अशाप्रकारचे संदेश प्राप्त झाल्यास, शंका आल्यास अथवा कुठल्याही प्रकारचे व्यवहार करण्यापूर्वी त्याची माहिती कोषागार कार्यालयास द्यावी. निवृत्तीवेतनधारकांनी…
संगमनेर दि. ३१ – संगमनेर तालुका हा मोठा असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार आश्वीला अपर तहसील कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र काही विरोधक जनतेत गैरसमज पसरवून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच नविन बदल केला जात आहे, मात्र या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. जनतेच्या सुचना व मागणीचा आदर करूनच अपर तहसीलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली असल्याचे माध्यमातील वृत्तांत म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयाबाबत जनतेत गैरसमज पसरविण्यात येत असून खुलासा करण्यासाठी गुरूवारी शासकिय विश्रामगृहामध्ये काही पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अपर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा विभाजनाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील २१ जिल्ह्यांच्या विभाजनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्ट नंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या चर्चेला उधाण आले होते. या चर्चांना पूर्णविराम देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशातून जिल्हा विभाजना ऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात तीन नवीन अपर तहसील कार्यालय सुरू केली जाणार आहेत. या योजनेला विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गती दिली आहे. संगमनेर, अकोले आणि नेवासे तालुक्याच्या तीनही तहसीलदारांनी…
अहिल्यानगर दि. ३१- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत सन २०२५ मधील पुढील नमूद १५ दिवसांसाठी ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेशाद्वारे परवानगी दिली आहे. हे आहेत ते दिवस… १९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती (तारखेनुसार शासकीय), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ ऑगस्ट, १, २ व ६ सप्टेंबर गणपती उत्सव, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २९ व ३० सप्टेंबर…
संगमनेर प्रतिनिधी – मोहसीन शेख गो शाळेच्या मॅनेजरने बजरंग दलाच्या तिघांच्या मदतीने जनावरांची चौकशी करण्यासाठी गो शाळेत गेलेल्या तिघा जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडी दांडक्याने तसेच लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकारामुळे रात्री रुग्णालय परिसरात व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. अधिक माहिती अशी, फिर्यादी रोहित खलील कुरेशी, त्याचा चुलत भाऊ अरबाज जलील कुरेशी व मित्र फैसल शेख हे तिघेजण गुरुवारी (३० जानेवारी) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सायखिंडी येथे…
अहिल्यानगर दि. ३१- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या शौर्याची चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती युवापिढीला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये (दूरदृष्यप्रणालीद्वारे) गुरुवारी (३० जानेवारी) उद्घाटन करण्यात आले. अहिल्यानगर पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सांस्कृतिक कार्य…
संगमनेर दि. ३० – सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र काही लोक संगमनेर मोडण्याचे षडयंत्र करत आहे. आश्वी बुद्रुक अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. संगमनेर तालुक्याचे विभाजन करत दोन तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयाच्या कार्य कक्षेत संगमनेर शहरालगतची गावे राजकीय हेतूने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यावरून संगमनेर तालुक्यात वाद निर्माण झाला आहे. नव्याने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयात…
संगमनेर दि. ३०- विना तारखेचे आणि संगमनेरच्या तहसीलदारांच्या बिना सहीचा आश्वी अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संगमनेरात मोठी खळबळ उडाली होती. अनेकांना अंधारात ठेवून हा प्रस्ताव थेट वरपर्यंत धडकल्याचे समोर आल्याने तालुक्यात पडद्याआडून खेळी करणाऱ्यांविषयी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत संगमनेरच्या फाळणीचा प्रस्ताव हा फक्त तहसील कार्यालयापुरता मर्यादित राहिलेला नाही, आता हा प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय ते मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे पुरावे बाळासाहेब थोरात यांनी दाखविले. थोरात यांनी संबंधितांच्या सहीचेच प्रस्ताव दाखविल्याने या प्रकरणातील वस्तुस्थिती देखील समोर आली आहे. अवघ्या चार ते पाच दिवसात संगमनेर तोडण्याचा कुटील डाव…
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रात प्रवास सुखकर होण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता परिवहन विभागाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार आहे. ओला, उबेरसारखेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे. तसेच, पुढील दोन महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्विस सुरू होणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि स्वस्तात होणार असल्याचे सांगितले जात आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई लोकल, बेस्ट बस, मुंबई मेट्रो, टॅक्सी, रिक्षा असे पर्याय असतानाही मुंबईकरांना…
संगमनेर दि. ३० – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आरक्षणाशिवाय सुरू असलेली ही भारतीय प्रक्रिया थांबविण्याची मागणी संगमनेर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी संगमनेरचे नवनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. दरम्यान जिल्हा बँकेवर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने आमदार खताळ या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. हिरालाल पगडाल, के. जी. भालेराव, राजाभाऊ अवसक, ॲड. किरण रोहम, सिताराम राऊत, अरुण ताजने, सूर्यकांत शिंदे, अरविंद सांगळे, प्राध्यापक बाबा खरात, विकास वाव्हळ, विश्वनाथ आल्हाट, हनुमंत उबाळे, सुखदेव मोहिते, ज्ञानेश्वर राक्षे, मनोज उपरे, संजय दारोळे, प्रशांत गायकवाड, अंतोन घोडके, दिलीप पराड, डॉ. दानिश खान, अमोल जगताप,…
अहिल्यानगर दि. ३०- दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हीईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबासमवेत जगण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे.
मुंबई दि. २९ : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक, सर ज. जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालयाचे (सायन) अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (मुंबई) माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय…
मुंबई दि. २९- नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे. माजी मंत्री व तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळविला आहे. मात्र राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील ही सर्व कामे रखडवून ठेवली आहेत. रस्ते दुरुस्तीसह रखडून ठेवण्यात आलेल्या सर्व कामांना तात्काळ गती देण्यात यावी या मागणीसाठी तांबे यांनी भोसले यांची भेट घेतली. आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी निधी दिला. अनेक रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला. परंतु मागील तीन वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी निधी मंजूर…
संगमनेर दि. २९- रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना संगमनेर तालुका पोलिसांनी निळवंडे शिवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इंडिका कारचा पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले तर या कारवाईदरम्यान दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडिका कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. मंगळवारी (दि. २८) पहाटे साडे पाच वाजेच्या तालुका पोलीस स्टेशनचे गस्तीचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये, चालक कोकणे हे मोबाईल पेट्रोलींग करून निळवंडे मार्गे करुन वडगावपानकडे येत असतांना त्यांना समोरून एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार (क्र. एम. एच. २३ ई ६८४७) हि निळवंडे-कवठे कमळेश्वर रस्त्यांने वेगांने…
संगमनेर – नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या संगमनेर शहरातील नवश्या गणपती मंदिर स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश जयंती पासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमुख कार्यकर्ते अमोल डुकरे यांनी दिली आहे. गणेश जयंतीला (शनिवार दि. १ फेब्रुवारी) सकाळी सव्वा सहा वाजता नवश्या गणपतीला महा अभिषेक करून महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पावणे सात वाजता महाआरती व त्यानंतर सात वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अंधकलाकारांचा भावगीते व भक्ती गीतांचा कार्यक्रम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून अमोल डुकरे व परिसरातील…
नागपूर, दि. २९ : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, रजिस्ट्रार डॉ. राजू हिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री…
मुंबई, दि. २८ : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असून केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे इत्यादी नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला…
संगमनेर दि. २८- संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी आता विकासाबरोबरच येथील एकजूट मोजण्यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड सुरू केली असून कोणत्याही स्थितीत सत्ताधाऱ्यांचा हा प्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब.2022 /प्रक्र. 94/म -10, दिनांक 17 जानेवारी 2023 या राजकीय दबावातून काढलेल्या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. खरे तर संगमनेर तालुका हा…
