Author: Annant Ppangarkar
मंगळवार, २७ ऑगस्ट इलेक्ट्रॉनिक व्यवसायासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे ऑनलाइन प्रकरण प्रादेशिक कार्यालयाला पाठविण्यासाठी साडेपाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अहमदनगर कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असलेल्या छत्रपती संभाजी नगरच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचा प्रादेशिक व्यवस्थापक दत्तू आश्रुबा सांगळे याला सोमवारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असून त्यांना सदर व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला होता. सदर कर्ज व्याज परतावा योजनेचे ऑनलाइन प्रकरण…
सोमवार, २५ ऑगस्ट अहमदनगर – मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करावे. तसेच योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी येत्या शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विशेष कँपचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढाव्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे…
सोमवार, २६ ऑगस्ट पुणे – भांडण सोडविण्यास गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. पसार झालेल्या हल्लेखोरांना सोलापूर परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९ वर्ष, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २० वर्ष, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर आरोपींची नावे आहेत. हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड…
सोमवार, २६ एप्रिल | अनंत पांगारकर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या काळात अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती, मात्र संगमनेरकरांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दोन मटका टपऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना पंधरा दिवसाचा कार्यकाळ उलटून देखील अवैध धंद्यांचे माहेरघर असलेल्या ‘शक्तिमान टॉवर’चा पत्ता सापडलेला नाही. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी वादग्रस्त ठरलेल्या एलसीबी विरोधात केलेल्या उपोषणानंतर जिल्हा पोलीस दलात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या जागेवर नगरहून पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती केली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब…
सोमवार, २६ ऑगस्ट मुंबई – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जबाबदार राहील, अशी अट टाकण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी बंधपत्र सादर करावयाचे आहे. सध्याच्या संचालक मंडळातील संचालक मयत किंवा अपात्र झाल्याने नव्याने पदभार घेतलेल्या संचालकांनी पदभार घेतल्यापासून १० दिवसाच्या आत या संदर्भात बंधपत्र द्यायचे आहे. या कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत निवडून आलेल्या संचालकांकडून पदभार घेतल्यापासून ३० दिवसांच्या आत बंधपत्र द्यावयाचे आहे. यापूर्वी वैयक्तिक…
सोमवार, २६ ऑगस्ट नांदेडचे काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचे आज हैदराबादच्या किन्स रुग्णालयात आजारपणातून निधन झालं. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून निवडून आलेले काँग्रेसचे वसंत चव्हाण यांचा विजय महत्वपूर्ण मानला जात होता. त्यांनी तत्कालीन भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. गेल्या दीड वर्षांपासून ते डायलेसिसवर होते. गेल्या आठवड्यात १५ ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. शिवाय अचानक बीपीदेखील कमी झाला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने…
सोमवार, २६ ऑगस्ट संगमनेर रोटरी क्लबने माजी सैनिकांसाठी आयोजित केलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात युद्धभूमीवर लढलेल्या माजी सैनिकांनी युद्धाचे थरारक प्रसंग आणि यादरम्यान स्वतः त्यातून कसे बाहेर पडले याची माहिती सांगताना अनेकांच्या डोळ्यासमोर युद्धाचे ते थरारक प्रसंग उभे राहिले होते. बुधवारी (२३ ऑगस्ट) रोटरी हॉलमध्ये सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सैनिक कॅप्टन रावजी भागुजी घुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घुले यांच्यासह माजी सैनिक कार्तिक तांगडकर, सखाहरी माळी, सुभाष कातोरे, सुभाष खताळ, काशिनाथ घुले, काशिनाथ खिलारी, रामनाथ हासे, रमेश सातपुते, विजय जोशी, दत्तात्रय नवले, बाजीराव…
सोमवार, २६ ऑगस्ट संगमनेर – साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त संगमनेरच्या साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ आवसक यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी (३० ऑगस्ट) सकाळी ९ ते ४ या वेळेत संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील काशेश्वर विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे आवसक यांनी म्हटले आहे. नानांच्या जयंती वर्षानिमित्ताने साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारीत विषय सर्व गटातील स्पर्धकांसाठी देण्यात आलेले आहेत. स्पर्धेचे हे ४१ वे वर्ष आहे. इयत्ता तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी, नववी ते…
सोमवार २६ ऑगस्ट २०२४ मेष – धनस्थानी असलेली मंगळ गुरु चंद्र हर्षल युती आज तुमचा खिसा पाकीट मालामाल करणार. प्रवास खर्च वाढविणारा दिवस. वृषभ – जन्मस्थानी असलेला चंद्र गुरुचा राजयोग तुम्हाला आज वाहनयोग दर्शवतो. संततीकडून मात्र अपेक्षाभंगाच दुःख पदरी पडण्याची शक्यता. मिथुन – आज लांबचे प्रवास योग दर्शवतात. श्री गणेशाची आराधना करावी. कर्क – मित्रांबरोबर नाच गाण्याचा आनंद घ्याल. आज आपल्या हातून घडलेल्या कर्मामुळे मान सन्मान वाढेल. सिंह – आज सगळीकडे आनंदी वातावरण अनुभवाल. अध्यात्मिक प्रगती साधण्याचा दिवस. कन्या – आज खोट्याचा अगदी तिटकारा येईल व नेमके तेच आज अनुभवाल. चिडचिड वाढेल. तूळ – मनाचे धार्मिकता वाढलेली असेल. आज एखाद्या…
रविवार, २५ ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)… ✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा. ✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली. ✅ गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ. ✅ ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार. ✅ थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी. ✅ पर्यायी खडकवासला…
रविवार, २५ ऑगस्ट भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर पुण्यात कोयता गॅंगने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या रामटेकडी भागात घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून दोन्ही हल्लेखोर आरोपी अल्पवयीन आहे. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. यातील एकावर वीस तर दुसऱ्यावर चौदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्याच्या रामटेकडी भागात दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू होती. या हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड घटनास्थळी गेले होते. गुंडांना पकडत असताना अचानकपणे…
रविवार, २५ ऑगस्ट कल्याणवरून संगमनेरमध्ये यात्रेसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी एसटी बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अधिक माहिती अशी, पश्चिम कल्याण येथील कौशल्या हरी शिंदे (वय ६० वर्ष) ही महिला संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील आशापीर बाबा यात्रेला जाण्यासाठी कल्याण येथून बुधवारी (२१ ऑगस्ट) संगमनेरमध्ये आली होती. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्टैंडवर पारेगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने या महिलेला पाठीमागून धक्का देत तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे पेंडल असलेले सोन्याची साखळी लंपास केली. संबंधित…
रविवार, २५ ऑगस्ट भटके विमुक्त व आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संवाद यात्रा पुण्यातून २८ ऑगस्टला निघत आहे. २३ सप्टेंबरला मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. यादरम्यान ४ सप्टेंबरला ही यात्रा संगमनेरला येत असून यासाठी भटके विमुक्त, आदिवासी संयोजन समितीची नियोजन बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. ७२ या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त, आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा काढली जात आहे. संगमनेरमध्ये यात्रा आल्यानंतर यात्रेच्या स्वागत आणि समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात भटके विमुक्त आणि आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करून स्थानिक खासदार व आमदारांना पत्र घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संवादयात्रा भटक्या विमुक्त आदिवासींच्या वसाहतींना भेट देऊन, त्यांच्याशी संवाद साधून, भटके…
रविवार, २५ ऑगस्ट प्रवरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नदीकाठच्या नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाला सतर्कतेबाबत सूचना केल्या. भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. दोन्ही धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने नदीपात्रात धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे प्रवरेला पूर आला आहे. तर भोजापुर धरण देखील भरल्याने म्हाळुंगी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. आढळेलादेखील पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे रविवारी दुपारी थोरात आणि तांबे यांनी एकत्रितपणे प्रवरा आणि म्हाळुंगी नदीकाठी पाहणी करत या परिसरात असलेल्या साईनगर, नाईकवाडपुरा भागातील रहिवाशांची संवाद साधला.या परिसरातील…
एखाद्या सत्तेसाठी इतके लाचार झालेले पोलीस महाराष्ट्राने आजवर कधीच पाहिले नाहीत. यंत्रणा जेव्हा अशी लाचार बनते तेव्हा लोकं रस्त्यावर उतरतात. कायदा हातात घेतात. मग त्यांना दोष द्यायला सत्ता मोकळी असते. बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राला हेच दाखवून दिलं आहे. सत्तेचा माज आणि मी म्हणजे सत्ता, अशा तोर्यातील सरकारची लाज अखेर उच्च न्यायालयाला काढावी लागते, याचा अर्थ ज्यांनी त्यांनी घ्यावा. पण काळ सोकावतो तेव्हा जे घडायचं ते घडतं आणि राज्य वेठीस धरलं जातं. एका पोलीस अधिकार्याच्या मुर्खपणाची ही फळं महाराष्ट्र भोगतो आहे. उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले म्हणून हे थांबेल अशा भाबड्या मनस्थितीत कोणी राहू नये. कारण न्यायालयाला गृहित धरणारे सरकारमध्ये आणि सरकारच्या…
आजचे राशीभविष्य रविवार २५ ऑगस्ट २०२४ मेष— कर्म करत रहा. विजय तुमचाच आहे. आज मनातील गोष्ट कुणालाही सांगु नका. वृषभ— जोडीदार समजुतदारपणा दाखवेल. नवीन वास्तु प्रवेशाचा योग. मिथुन— बुद्धिवादात अग्रेसर रहाल. हुशारीने आज आर्थिक फायदा वाढवत रहाल. कर्क— आज खिसा पाकीट सांभाळा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आज कोणालाही जामीन राहू नका. सिंह— वादावादीत जिंकण्याचा दिवस. आज कामानिमित्ताने दिवसभर प्रवास घडेल. कन्या— पत्नीबरोबर वादावादी होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा कटकटीचा दिवस. तुळ— अतिशय आनंदी दिवस. मानसन्मान वाढविणारा दिवस. दुपारनंतर मात्र निराशावादी व्यक्तीच्या भेटीमुळे उदासी जाणवेल. वृश्चिक— बाहेरचे खाणे टाळा. पोटदुखीने हैरान व्हाल. आर्थिक विवंचनेचा दिवस. धनु— आज एखादा जमिनीचा व्यवहार यशस्वी…
★ आठवडाभरात अत्याचाराच्या अनेक घटना ★ राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत ★ कायदा व सुव्यवस्था ढासळली ★ बदलापूर प्रकरणात मंत्रालयातून दबाव होता काय? ★ संस्थाचालकांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला ★ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन तर दुसरीकडे त्यांचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ★ मंत्रालय टक्केवारीत गुंतले ★ राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप चुकीचे शनिवार, २४ ऑगस्ट गेल्या आठवडाभरात महिला, मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. प्रशासनाचा धाक राहिला नसून या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे. महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा…
शनिवार, २४ ऑगस्ट बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी राज्यात महाविकास आघाडीने सरकार विरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरविल्याने मविआने निषेध आंदोलन केले. संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी बस स्थानक चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या लावत मौन आंदोलन केले. त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात सहभागी झाले होते. बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा व असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची…
शनिवार, २४ ऑगस्ट जमिनीचे कायदेशीर निर्वाणीकरण झालेले नसताना न्यायालयाला अंधारात ठेवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि तथाकथित लाभार्थ्यांनी संगनमत करून संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावातील राखीव वन जमीनीचे वाटप करून टाकण्याचा बेकायदेशीर प्रताप करून ठेवला असल्याचा आरोप करीत, इतर शेतकऱ्यांचे, वनविभागाचे, पर्यावरणाचे त्यामुळे नुकसान होत आहे म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेत वनविभागाच्या प्रधान सचिवांना त्वरित चौकशी करून दहा दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथील राखीव वन जमीन (रिझर्व फॉरेस्ट)…
शनिवार, २४ ऑगस्ट बदलापूरसह राज्यात आणि देशात घडत असलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात ‘लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी’ संगमनेरमध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेत, तोंडाला काळी पट्टी बांधून बस स्थानकासमोर ११ वाजता करणार आंदोलन करणार आहे. महिला अत्याचाराविरोधात समाजातील जनभावना लक्षात घेत महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. मात्र या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत बंदला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने देखील बंद बेकायदेशीर ठरवत बंद करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. भारतीय न्यायव्यवस्था संविधानिक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून शनिवारचा बंद…
