Author: Annant Ppangarkar
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय क्रीडा नृत्य स्पर्धेत गीता परिवार संचलीत संस्कार बालभवनच्या मुलांनी देदीप्यमान यश मिळवले. स्पर्धेच्या प्रारंभापासून वर्चस्व प्रस्थापित करतांना बालभवनाच्या नृत्य कलाकांरानी 39 सुवर्णपदकांसह एकूण 50 पदकांची लयलुट केली. वैयक्तीक व सांघीक अशा दोन्ही प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवणार्या बालभवनला या राष्ट्रीय स्पर्धेचे अजिंक्यपद देण्यात आले. या स्पर्धेत बालभवनचे 25 नृत्य कलाकार सहभागी झाले होते. 13 वर्षांखालील मुलींच्या वैयक्तीक शास्त्रीय नृत्यप्रकारात रीत चेतन राजपाल, 17 वर्षांखालील गटातील अदिती राजेश लाहोटी यांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर पहिल्या क्रमांकासह सुवर्णपदक मिळवले. 21 वर्षांखालील गटात जीया अमित बाफनाने रौप्यपदक व रिया गोपाल साकीने कांस्यपदकाची कमाई केली. 17…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) मुलीला बोलल्याच्या कारणावरून आईसह नातेवाईकांनी शिवीगाळ लाथाबुक्क्याने मारहाण करत कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथे घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईसह चार जणांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमसेन माधव रुपवते (वय 28 वर्ष, धंदा मजुरी रा. समनापुर, ता. संगमनेर, ह. रा. पोखरी हवेली, संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश विलास सोनवणे, संतोष संपत साळवे, सविता विलास सोनवणे, सोनल भीमसेन रुपवते (सर्व रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमसेन रुपवते…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नऊ वर्ष वयाच्या चिमुरडीवर संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे सोमवारी रात्री अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी विकृत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेश जयराम सांगळे (रा. सोनेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे विकृत आरोपीचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे पीडित चिमूरडी आपल्या कुटुंबीयासमवेत एका विवाह समारंभासाठी आली होती. सोमवारी (ता. १५ मे) रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असताना पीडित चिमुरडी आपल्या आईसोबत तेथे उपस्थित होती. काही वेळानंतर पीडित चिमुरडी तेथून बाजूला गेले असता तिच्यावर लक्ष ठेवून असलेला रमेश सांगळे याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला अंधारात…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला ॲक्टिव्ह मोडवर आणतानाच शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान तसेच शासनाच्या विविध योजना मिशन मोडवर घेत गावागावत शिबीरे राबवा. जिथे भाजपचे आमदार नाही त्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही या योजना प्रभावीपणे राबवा. कोणी जर यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर माझा आदेश आहे म्हणून सांगा. विरोधकांच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका, काही अडचण आलीच तर थेट मला कळवा अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल यंत्रणांना दिले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे म्हणाले, शासनामार्फत…
जामखेड (महाराष्ट्र संवाद न्यूज) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये समसमान जागा मिळविणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडीत ईश्वर चिट्ठीने सभापतीपदाची माळ भाजपच्या तर उपसभापतीपदाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात टाकली आहे. सभापती उपसभापती निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिट्ठीचा कौल घेण्यात आला यात सभापतीपती भाजपचे शरद कार्ले तर उपसभापतीपदी विखे समर्थक कैलास वराट निवडून आले आहेत. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विखे गटाने राष्ट्रवादीसोबत केलेल्या युतीनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांच्या गटाने नऊ तर राष्ट्रवादीचे राळेभात आणि विखे यांच्या युतीने नऊ जागा मिळविल्या होत्या. यात राळेभात गटाला साथ तर त्यांच्याबरोबर युती केलेल्या विखे यांच्या गटाला…
नारायणगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) आंबेगाव तालुक्यात नासिक-पुणे महामार्गावर शेवळेवाडी परिसरात धावत्या एसटी बसचे मागचे दोन्ही चाके अचानक निखळली. दोन्ही चाक निखळल्यानंतर देखील काही वेळ बस महामार्गावर धावतच होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधनांमुळे मोठा अपघात टळला. बसमधील सर्व ३५ प्रवासी या अपघातातून सुखरूप बचावले आहे. सामान्य प्रवाशांची लालपरी असलेल्या बसचा हा अपघात भीषण होता. महामार्गावरून धावत असलेल्या बसचे दोन्ही चाके अचानकपणे निखळल्यानंतर देखील बस तिरपी होऊन पुढील दोन चाकांवर काही वेळ महामार्गावर धावत होती. धावणाऱ्या बसचे एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यामध्ये तर एक चाक बसच्या पुढे जाऊन पडले. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन बसमधील प्रवाशांच्या उरात…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री शहरातील जमजम कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे गोमांस ताब्यात घेतले आहे. संगमनेर शहरातील अनधिकृत कत्तलखान्यांची राज्यभर ख्याती आहे. शेकडोने छापे टाकून देखील येथील कत्तलखाने बंद झालेले नाहीत. चोरी छूपके जमजम कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती. मथुरे यांनी या कत्तलखान्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस पथक मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात या कत्तलखान्याचा शोध…
नेवासे (महाराष्ट्र संवाद न्यूज) त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान नेवासा फाटा येथे विश्व हिंदु परिषद दुर्गावाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रशिक्षण वर्गास नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील दुर्गांशी संवाद साधला ते म्हणाले, आजच्या दुर्गांनी राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या देवी होळकर यांचा आदर्श घ्यावा. यावेळी बोलताना त्यांनी लव जिहादबद्दल चिंता व्यक्त केली. मुलींनी या षडयंत्राला बळी पडू नये, असे ते म्हणाले. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळच्या वास्तविक घटनेवर आधारित असुन सर्वांनी हा चित्रपट बघावा व समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपला जन्म झाला आहे. आपन हिंदू आहोत, ही भाग्याची गोष्ट आहे. उद्याच्या दुर्गा तयार करण्याचे काम…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामायिक विहिरीवरील पिण्याच्या पाण्याचा कॉक फिरविण्याचा कारणावरून ४३ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण करण्यात आली. लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादीचा डावा पाय घोट्यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि फिर्यादी एकाच कुटुंबातील असून त्यांच्यातील वादाची परिणती थेट हाणामारीत झाली. संजय बाळासाहेब नेहे (वय 43 वर्ष, धंदा शेती व ड्रायव्हर रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे. तर राजेंद्र बाळासाहेब नेहे, सौरभ बाळासाहेब नेहे, पुष्पा राजेंद्र नेहे, मनीषा रावसाहेब नेहे (सर्व रा.…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) साताऱ्या पाठोपाठ नाशिकमध्येही एसीबीने मोठी कामगिरी केली असून तब्बल तीस लाख रुपयांची लाच घेताना एका वकिलासह सहकार विभागाचा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला आहे. यामुळे राज्याच्या सहकार विभागात खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा निर्णय बाजूने लावून देण्याच्या बदल्यात तीस लाखाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी तक्रारदार निवडून आले आहे. त्यांच्या निवडी विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन या सुनावणीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय ५७ वर्ष, रा. फ्लॅट नंबर २०१, आई हाईटस्, कॉलेज रोड, नाशिक व खाजगी…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्मचारी भविष्य निधि संघटन (ई.पी.एफ.ओ.) कडून सदस्य, निवृत्तीवेतन धारक आणि कंपनी मालकासाठी प्रत्येक महिन्यात ‘निधि आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगरच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. २९ मे २०२३ सर्वांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये मालपाणी इंडस्ट्रियल पार्क समोर अकोले रोड येथे शिवशक्ती इमारतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या सदस्यांच्या भविष्य निधीबाबत काही अडचणी असतील त्यांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. याच कार्यक्रमात तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे, असे सहायक भविष्य निधी आयुक्त जिल्हा कार्यालय, अहमदनगर यांनी कळविले…
सातारा (महाराष्ट्र संवाद न्यूज) जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या प्रोबेट अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी दोन लाखाची मागणी करणारा आणि त्यासाठी एक लाख रुपये लाच स्वीकारणारा खाजगी वकील एसीबीने रंगेहात ताब्यात घेतला आहे. विलास बाळकृष्ण कुलकर्णी असे या वकिलाचे नाव आहे. या घटनेतील तक्रारदार हे एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून सातारा दिवाणी न्यायालयात शिक्षण संस्थेच्या वतीने प्रोबेट अर्ज दाखल आहे. लोकसेवकावर प्रभाव पाडून या अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्यासाठी वकील कुलकर्णी यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत पैशाची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने सातारा विभागाच्या पोलीस उपाधीक्षक उज्वल वैद्य यांच्याशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती.…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम सन २०१६ पासून राबविण्यात येत आहे. योजनेची उद्दीष्टये :- ????नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. ????शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. ???? पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ????कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. योजनेचे वैशिष्टये :- ????कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. ????खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेलो आहे. ????विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. ????शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम २ टक्के…
शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. वाळू विक्री केंद्राच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत आहे. यातील सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसात वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राच्या कामकाजाचा महसूलमंत्र्यांनी सोमवारी (ता. १५ मे) श्रीरामपूर येथे आढावा घेतला. यावेळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सामंत, महसूली कर्मचारी, तलाठी आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, नायगाव वाळू केंद्रावर पंधरा हजार…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक न करता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विवेक अशोक पवार (वय ३५ वर्ष) असे या लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. पवार यांनी तक्रारदाराचा मावस भाऊ आणि त्याच्याबरोबर असलेले चार सहआरोपी यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करता अटकपूर्व जामीन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात दुचाकीचोरांनी आपले टार्गेट बदलले असून आता जुन्या दुचाकी ऐवजी नव्या दुचाकीकडे लक्ष वळविले आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास दुचाकीचोरांनी कोल्हार-घोटी मार्गावरील गांधी मोटर्स टीव्हीएस शोरूमचे पत्र्याचे गोडाऊन फोडत पावणेतीन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरून नेल्या आहे. अधिकारी बदलूनही नव्या अधिकाऱ्यांना शहरात कायद्याचा धाक निर्माण करण्यात यश येताना दिसत नाही. दररोज सुरू असलेल्या चोऱ्यांमुळे संगमनेरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांवर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस यंत्रणेमुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांच्या माहितीचा अभाव असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे चोरट्यांचे फावले आहे. तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदाराचीच पोलीस यंत्रणा उलट तपासणी घेऊ लागल्याने नागरिकांना देखील पोलीस ठाण्याची…
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) सध्याचे सीबीआयचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाल संपत आल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी कर्नाटकचे पोलीस महासंचालक राहिलेले प्रवीण सुद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने महासंचालकपदी ही निवड केली आहे. सीबीआयच्या महासंचालकपदाचा सूद यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असला तरी तो पाच वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो. सध्याचे सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचे ते जागा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांमधून प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मोदींच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे. कर्नाटकचे बीजेपी…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले एक विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आहे. खासदार राऊत यांच्या विधानावरून त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खासदार राऊत हे ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभासाठी नासिक मध्ये आले होते. याच विवाह समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने याच दिवशी अंतिम निकाल जाहीर केला होता. दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान हा निकाल आला आणि त्यानंतर सायंकाळी चार…
कर्नाटक सरकार मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेणार पाच महत्त्वाचे निर्णय; राहुल गांधींनी दिले संकेत
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) मतदारांनी बहुमताने कर्नाटक काँग्रेसच्या हाती सोपविल्यानंतर काँग्रेसने सरकार येताच आपल्या आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्या पाच वचनांच्या बळावर काँग्रेसला सत्ता सोपविले गेली त्या पाच वचनांची पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्तता करण्यासाठी मंजुरी दिली जाणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकहाती मोठा विजय मिळवत भाजपला सत्तेत येण्यापासून रोखले आहे. काँग्रेस सत्तेत येण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाच घोषणा कर्नाटकमध्ये महत्त्वपूर्ण ठरल्या आहे. यामध्ये सखी योजनेअंतर्गत कर्नाटकमधील सर्व महिलांना मोफत बस प्रवास, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये, युवा निधी अंतर्गत कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना दरमहा तीन हजार रुपये, बेरोजगार…
रविवार विशेष लेख महाराष्ट्रातल्या 2021मधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्यानंतरही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव म्हणजे ‘आयजीची खाट आणि बायजीचा थाट’ असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सारी पिसं उपटूनही आपणच जिंकल्याचं आणलेलं उसनं अवसान म्हणजे लाज कोळून पिण्याचा प्रकार होय. प्रचंड लत्ताप्रहार होऊनही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव पाहाता आजचे सत्ताधारी लाज कोळून पिणारे सत्तापिसाटच म्हटले पाहिजेत. महाराष्ट्रात अस्तित्वात आलेली सत्ता ही बेकायदा आणि घटनेची सारी तत्व गुंडाळून आलेलं सरकार होय, असं स्पष्ट मत व्यक्त होऊनही कोणी आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्या बुध्दीची तपासणीच करायला हवी. काहींना आनंद साजरा करण्यात असुरी असते. तीच असुरी…
