Author: Annant Ppangarkar
संगमनेर- पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि सुनिताताई देशपांडे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त अमृत सांस्कृतिक मंडळाने ‘सुंदर मी होणार’चा हृदयस्पर्शी, हृदय हेलावून टाकणारा नाट्यप्रयोग सादर केला. या नाटकाने संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या गणेशोत्सवामध्ये सादर झालेल्या या नाटकासाठी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, सेक्रेटरी संदीप दिघे, सांस्कृतिक मंडळाचे संचालक भारत देशमुख, बबन सावंत, अनिल पाटोळे, संजय मांडे, विलास जोंधळे, अनिल मोकळ, अनिल वरपे, दिलीप तांबे, राजू बड, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, विक्रम खबाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.…
संगमनेर – संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी शहर पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. अटक केलेल्या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (२७, रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला संगमनेर न्यायालयाने मंगळवारी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर आरोपीला चिथावणी दिल्याच्या कारणावरून भास्कर लहानु खेमनर यांना सहआरोपी करण्यात आले आहे. खताळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ७९८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०९ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात भास्कर लहानू खेमनर (रा. संगमनेर) याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यांनी अटक केलेल्या आरोपीला गुन्हा करण्यास चिथावणी दिल्याने त्यांना सह-आरोपी करण्यात आले…
अहिल्यानगर- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत, गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूरमध्ये सापळा रचून तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे आणि एक पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने ही विशेष मोहीम सुरू केली होती. गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मध्य प्रदेशमधून गावठी कट्टे आणून श्रीरामपूरमध्ये त्यांची विक्री करणार आहेत. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी आपल्या पथकासह श्रीरामपूर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या हरेगाव फाट्यावर सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी…
संगमनेर, संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी बाजीराव केशव पवार यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र श्रीपत थोरात नावाच्या व्यक्तीने शासकीय कामकाजात अडथळा आणत मारहाण केल्याची तक्रार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना सोमवार, १ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी दीड ते अडीचच्या सुमारास घडली. ग्रामविकास अधिकारी बाजीराव पवार यांच्या तक्रारीनुसार, दुपारी १:३० वाजता राजेंद्र थोरात ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने दिलेल्या अपूर्ण माहितीचे रेकॉर्ड दाखवण्याची मागणी केली. त्यावेळी पवार यांनी त्याला उद्या येण्यास सांगितले. मात्र, दुपारी २:३० वाजता थोरात पुन्हा कार्यालयात आला आणि त्याने उर्वरित माहितीचे रेकॉर्ड तात्काळ देण्याचा आग्रह धरला. त्याने रेकॉर्ड मिळाल्याशिवाय…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला दिवस आहे. वृषभ- आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. नवीन संधी मिळतील आणि जुने प्रश्न सुटतील. सामाजिक संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क- आज तुम्हाला काही मानसिक तणाव जाणवू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी वादविवादांपासून दूर राहा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सिंह- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही…
अहिल्यानगर- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये १० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संगमनेर- संगमनेर नगर परिषदेने राबवलेला घनकचरा व्यवस्थापनाचा यशस्वी प्रकल्प आता देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. याच यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आंध्र प्रदेशातील एका विशेष टीमने नुकतीच संगमनेर येथील कचरा डेपोला भेट दिली. या टीमने कचरा वर्गीकरण, खत निर्मिती आणि वीज निर्मिती प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर व राहुल वाघ, तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी मोठे काम करण्यात आले होते. तर सध्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या प्रकल्पाला आणखी चालना दिली. संगमनेर नगर परिषद शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला, सुका आणि घातक कचऱ्यामध्ये वर्गीकरण करते. या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत आणि वीज तयार…
संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील निमोण सोनेवाडी गावातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या विरोधात सुरू असलेले उपोषण अखेर राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारी मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश थोरात यांनी प्रशासनाला दिले आहेत. निमोण सोनेवाडी ग्रामसभेने १२ सप्टेंबर २०२२ आणि २७ मे २०२५ रोजी गावात कोणत्याही स्टोन क्रेशरला परवानगी न देण्याचा ठराव केला होता. मात्र, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी खोट्या मासिक मीटिंग्ज दाखवून जनतेची फसवणूक केली. याविरोधात भागवत बाबूराव सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर सात दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. प्रशासनाचे या रास्त मागणीकडे दुर्लक्ष होत असताना, बाळासाहेब थोरात…
संगमनेर – दरवर्षीप्रमाणे यंदाही मेनरोड शिवसेना शाखा क्र. ११ च्या वतीने गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने भव्य गणेश उत्सव गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी, संगमनेर शहरातील सर्व गणेश मंडळांचे स्वागत आणि गौरव करण्यात येणार आहे. उद्योगपती ओंकारनाथजी व माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ हा स्वागत सत्कार आणि पारितोषिक वितरण सोहळा गणेश विसर्जन मिरवणुकीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मानाचे गणपती मंडळ तसेच इतर सर्व मंडळांना त्यांच्या उत्कृष्ट देखावे, भव्य मूर्ती आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी सन्मानित केले जाईल. या सोहळ्यात अनेक आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये, उत्कृष्ट मूर्ती, भव्य मूर्ती, उत्कृष्ट देखावा, भव्य देखावा, भव्य लायटिंग आणि भव्य मिरवणूक यांसाठी मंडळांना…
(टीप: हे सामान्य राशीभविष्य आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीवर आधारित राशीभविष्य वेगळे असू शकते. तुमचा दिवस शुभ असो!) मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि वरिष्ठ तुमच्या कार्याचे कौतुक करतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ (Taurus) : आज तुम्हाला तुमच्या कामात थोडे लक्ष द्यावे लागेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च जपून करा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. मिथुन (Gemini) : आज तुमच्या संवादाच्या कौशल्यामुळे तुमची अनेक कामे मार्गी लागतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी दिवस…
संगमनेर- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर यांनी आमदार हल्ला प्रकरणातील त्यांचे नाव समोर आल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, हे थोरातांना बदनाम करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. नेमकं काय म्हटलंय निवेदनात?- खेमनर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार हल्ला प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ याने त्यांना २२ ते २५ तारखेदरम्यान एक-दोन वेळा फोन केला होता. ‘साहेब कुठे भेटतील?’ एवढीच विचारणा त्याने केली होती. या १५-२० सेकंदाच्या फोनव्यतिरिक्त आरोपीसोबत त्यांचे आजवर कोणतेही बोलणे झालेले नाही. खेमनर पुढे म्हणतात की, त्यांना दररोज…
संगमनेर – राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, संगमनेर शहरातही मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या आरतीतून गणेशभक्ती दिसू लागली आहे. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती आमदार सत्यजीत तांबे व मैथिली तांबे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार तांबे यांनी संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. आरती सोहळ्याला मोठ्या संख्येने संगमनेरकर आणि भाविकांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आमदार तांबे यांनी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक नागरिकांच्या आग्रहामुळे आमदार तांबे यांनी शहरातील घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा…
संगमनेर- प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. मात्र राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यासाठी आमच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबावे लागतील, असा इशारा प्रसाद गुंजाळ यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी म्हटले आहे की, प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडींगचा व्यवसाय करत होते. मागील २० वर्षापासून त्यांची आणि माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडींगच्या व्यवसायात आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना…
संगमनेर, अहिल्यानगर – आमदार अमोल खताळ यांना मारहाण करणारा आरोपी प्रसाद गुंजाळ पोलीस कोठडीत असतानाच आता त्याच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे या हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार अमोल खताळ, संदेश देशमुख व इतरांच्याविरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार आपल्या मुलाची आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी आहे. या घटनेचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून, घटनेचे राजकारण झाले तर आम्हाला न्याय मिळणार नाही. हे केवळ आर्थिक फसवणुकीतून घडले असल्याचे गुंजाळ यांनी स्पष्ट केले आहे. अनिता गुंजाळ यांच्या तक्रार अर्जानुसार, त्यांचा मुलगा प्रसाद गुंजाळ आणि आमदार खताळ हे अनेक वर्षांपासून मित्र आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारण्यांवर जोरदार टीका केली आहे. राजकारण्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवावे कारण ते जिथे जातात तिथे ‘आग लावतात’, असे ते म्हणाले. नागपूरमधील महानुभाव पंथ परिषदेत बोलताना गडकरींनी धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले की, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगवेगळी आहेत. राजकारणी जिथे जिथे जातात, तिथे ते आग लावल्याशिवाय निघत नाहीत. धर्माला सत्तेत आणल्यास समाजाचे नुकसान होते, असा इशारा त्यांनी दिला. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, मात्र काही राजकारणी त्याचा गैरवापर करतात. यामुळे विकास आणि रोजगारासारखे महत्त्वाचे मुद्दे मागे पडतात,…
संगमनेर / अकोले – अकोले तालुक्यात ‘हनीट्रॅप’चा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सापळा रचून एका आरोपी महिलेला रंगेहाथ पकडले आहे. या हनीट्रॅपमध्ये अनेक जण अडकले असल्याची शक्यता असून, संबंधित महिलांनी अनेक पुरुषांना धमकावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली आहे. यामुळे काही जण कर्जबाजारी झाल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या टोळीने खंडणीसाठी अल्पवयीन मुलींचाही वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पीडित व्यक्तीने अकोले पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याची ओळख संगमनेर येथील कविता विधाते हिच्याशी झाली.…
मेष: आज तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्ही थोडे भावुक होऊ शकता. कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण संयम राखल्यास यश मिळेल. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. सामाजिक कार्यक्रमात भाग घेतल्याने फायदा होईल. तुमच्या संवाद कौशल्याचा उपयोग होईल. कर्क: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा, तरच प्रगती होईल. सिंह: आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या नेतृत्वामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. कन्या:…
संगमनेर:- संगमनेर शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती उद्या, सोमवारी सायंकाळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गणेशभक्तीच्या या मंगलमय वातावरणात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील अशी माहिती आयोजकांनी दिली. दरम्यान सायंकाळच्या साडेसहाच्या आरतीनंतर आमदार तांबे संगमनेर शहरातील विविध घरगुती गणपती आणि गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन शुभेच्छा देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतील.
संगमनेर:- माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या विविध योजनांमधून उपलब्ध झाला असून, यामुळे तालुक्यातील गावांमध्ये रस्ते, तीर्थक्षेत्रे आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निधीचा मोठा भाग रस्ते विकासासाठी वापरला जाईल. सुमारे १.५० कोटी रुपये गावांतर्गत रस्ते आणि शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत. शिवाय, ५० लाख रुपयांच्या निधीतून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाईल. उर्वरित १.५० कोटी रुपये गावातील मूलभूत सोयीसुविधांसाठी देण्यात आले आहेत. वर्ष २०२५-२६ या अंतर्गत…
संगमनेर- एका तथाकथित कीर्तनकाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात आता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गावातील पूर्वापार चालत आलेली पुरोगामी आणि वारकरी संप्रदायाची चांगली परंपरा जपण्यासाठी, तसेच समाजात विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी ठराव केला आहे. गावातील मारुती मंदिरासमोर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वांनी मिळून गावातील सलोखा आणि शांतता टिकवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला.यावेळी, सत्य बाजूने उभे राहिलेल्या वारकरी संप्रदायातील मान्यवर, कीर्तनकार, पत्रकार आणि समाज प्रबोधनकारांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले. गावात अशांततेचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते, असे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते. गावाची विकासाची वाटचाल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या…
