Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन बुलढाणा: लेखक व सामाजिक विश्लेषक प्रवीण मोरेश्वर बागडे यांना साहित्यिक आणि वैचारिक योगदानाबद्दल ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. प्रवीण बागडे यांच्या सामाजिक प्रश्नावरील निर्भीड लेखन, संविधानिक मूल्यांची जागृती आणि परखड विश्लेषणाची दखल घेत सचिन खंडारे, विकास सुखधाने व समाधान सरकटे यांच्या निवड समितीने ही एकमताने निवड केली आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून बागडे यांचे कौतुक होत असून, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा हा सन्मान वंचित घटकांसाठी अधिक निर्भीडपणे लिहिण्याची नवी जबाबदारी देणारा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राजरोसपणे सुरू असलेल्या पठार भागातील अवैध वाळू वाहतुकीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत पाच लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ आणि रोहित येमुल यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती मिळवण्यासाठी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना करण्यात आले होते. सोमवारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरातील रहेमतनगर भागातील आर. के. प्लॉटींगजवळील काटवनात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून रवाना करण्यात आले होते. सोमवारी (१७ ऑगस्ट) हे…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याची साथ उत्तम लाभल्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण वेगाने पूर्ण होतील. वृषभ – मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा आजचा दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात घेतलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. नातेवाईकांशी जुने मतभेद संपुष्टात येतील. संध्याकाळच्या वेळी मनःशांतीसाठी धार्मिक अथवा शांत ठिकाणी वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. मिथुन – बौद्धिक आणि सर्जनशील कामांमध्ये आज विशेष यश मिळेल. संवादकौशल्यामुळे कठीण प्रसंगही सहजरीत्या हाताळता येतील. पैशांचा ओघ चांगला राहील परंतु नको त्या गोष्टींवर खर्च वाढण्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे आणि महानगरीय साहित्याचा पाया रचणारे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती सोहळा व गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात मातंग समाजातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ठरलेल्या प्रेरणा खवळे यांच्यासह प्रा. रघुनाथ खरात यांना ‘जीवनगौरव’ तर डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. तुकाराम सोळशे, प्राचार्य काळूराम बोरुडे, मिराबाई आव्हाड आणि प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिराच्या विकासकामात वनविभागाच्या हद्दीमुळे येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. श्रावणातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून आमदार खताळ यांनी आपल्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह मंदिरात जाऊन महापूजा, अभिषेक व आरती केली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मंदिराच्या नव्या वास्तूच्या निर्मितीची ग्वाही दिली. आमदार खताळ पुढे म्हणाले की, जनतेने सेवा करण्याची संधी दिल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिर परिसर वनजमिनीच्या हद्दीत येत असल्याने आवश्यक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहराच्या दृष्टीने आजचा सोमवार (१७ ऑगस्ट) ऐतिहासिक आणि आनंदाचा ठरला आहे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यात जागा हस्तांतरणाचा करार आज करण्यात आला असून, एसटी महामंडळाने स्मारकासाठी निश्चित केलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगरचे राजेंद्र दामोधर जगताप, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) प्रवरा नदीपात्रात धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानंतर एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी विनाक्रमांकाचा टाटा कंपनीचा टेम्पो आणि अवैध वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वाढत्या बेकायदेशीर वाळू उपशावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: स्वातंत्र्यदिनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत एकाच दिवशी तब्बल ६ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण १६ आरोपींवर ६ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून १,३७,५८० रुपये किमतीचा अवैध मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, अनंत सालगुडे आणि इतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात सरकारने काढलेल्या ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात घुलेवाडीच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अर्धनग्न धरणे आंदोलन सुरू केले आहे. रविवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात, कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांच्यासह अनेकांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी अत्यंत आक्रमक आणि तीव्र स्वरूपात हे आंदोलन करत असून सोमवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. शासनाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी ५ ऑगस्टच्या मूळ जीआरमध्ये काही सुधारणा केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष कायम आहे. विद्यार्थ्यांच्या मते, या सुधारणा अपुऱ्या असून हा शासन निर्णय तात्काळ पूर्णपणे…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी काळ अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेवाइकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आज तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण होणारे खर्च टाळा आणि भविष्यातील नियोजनावर भर द्या. घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. व्यवसायात घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. मानसिक शांततेसाठी थोडे ध्यान किंवा अध्यात्माचा आश्रय घ्यावा. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि प्रगतीचा ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभल्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. वृक्षलागवडीच्या माध्यमातून परिसरातील हिरवाई वाढविण्यासोबतच गावाचे सौंदर्य आणि पर्यावरण समृद्ध करण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. तालुक्यातील घारगाव येथील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष गणेश धात्रक यांच्या मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घारगाव–शिदायकवाडी रस्त्यालगत शेत परिसरातील डोंगरावर आमदार खताळ यांच्या हस्ते वडासह करवंदाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी घारगावचे सरपंच नितीन आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेश फटांगरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध हत्यारांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान भिंगार कॅम्प आणि जामखेड परिसरातून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, स्टील मॅगझीन आणि दोन मोबाईल असा तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बिहारमधील एका तरुणासह तिघांना बेड्या ठोकल्या असून, एक संशयित पसार झाला आहे. बिहारचा तरुण जाळ्यात – बिहार मधील एक तरुण गावठी कट्टा विक्रीसाठी भिंगार नाला परिसरात आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १२ ऑगस्टच्या…
प्रवीण पुरो- आम्ही म्हणतो तसं वागायचं, आम्ही घेऊ तेच निर्णय, आम्हाला हवा असेल तसाच अहवाल द्यायचा, आमच्या म्हणण्याला होकार द्यायचा, आगाऊपणा केलात तर जागा दाखवली जाईल, या मध्यवर्ती सत्तेच्या कुटील हेतूने अधिकार्यांपुढच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आपल्या कलेप्रमाणे सहकार्य न करणार्या सर्वच क्षेत्रातील अधिकार्यांची अवस्था बिकट झाली आहे. सत्तेला जाब विचारण्याच्या भानगडीत पडलात तर एकतर तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतवलं जाईल, तुमच्या आणि नातलगांच्या घर, व्यापारावर धाडी टाकल्या जातील. तिथेही सुटलात तर हनी ट्रॅपिंगसारख्या आरोपात जिणं बरबाद केलं जाईल, असा घातक मार्ग मध्यवर्ती सत्तेने अवलंबलेला दिसतो आहे. सामान्य नव्हे, भारताची संशोधन संस्था असलेल्या इस्रोतील वैज्ञानिकांच्या मागे लागलेलं हे शुक्लकाष्ट आहे. या…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचला. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय शुभ आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. संयम बाळगून कामे पूर्ण करा. मिथुन – आजच्या दिवशी विचारांमध्ये स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या अतिभारामुळे काहीसा मानसिक ताण जाणवू शकतो, परंतु सहकाऱ्यांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. संवाद साधताना भाषेवर नियंत्रण…
अमोल शेलकर- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. गेल्या आठ दशकांच्या या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक प्रवासात भारताने गरिबी, भीषण अन्नटंचाई, युद्धे, दुष्काळ आणि गंभीर आर्थिक संकटे यांसारख्या अनेक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली आहे. आज जगाच्या पाठीवर भारताने एक स्वाभिमानी, सशक्त आणि महत्त्वाची जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. परंतु, या प्रवासाकडे केवळ अभिमानाने आणि कौतुकाने पाहून चालणार नाही. स्वातंत्र्याच्या या टप्प्यावर काही मूलभूत आणि गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. आपण स्वातंत्र्य मिळवले, पण त्याचा खरा अर्थ जपला का, आपण संविधान स्वीकारले, पण त्यातील मूल्ये खरोखर अंगीकारली का आणि आपण…
प्रविण बागडे, नागपूर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. शतकानुशतके चाललेल्या परकीय सत्तेच्या जोखडातून देश मुक्त झाला. तिरंगा अभिमानाने फडकला, स्वातंत्र्याची पहाट उगवली आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला अर्थ प्राप्त झाला. पण आज, स्वातंत्र्याच्या दशकांनंतर एक प्रश्न मनाला अस्वस्थ करतो, देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का? हा प्रश्न देशाच्या स्वातंत्र्यावर संशय घेणारा नाही, उलट स्वातंत्र्याचा खरा अर्थ शोधणारा आहे. कारण राष्ट्र स्वतंत्र झाले, सत्ता आपल्या हातात आली, राज्यघटना मिळाली, पण समाजातील प्रत्येक माणूस भय, भूक, विषमता, जातीयता, अन्याय आणि शोषणापासून मुक्त झाला का? स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेला हद्दपार करणे नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक पावले उचला. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला प्रत्येक कामात संयम ठेवावा लागेल. विनाकारण कोणाशीही वाद घालणे टाळा. व्यवसायात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. सायंकाळच्या वेळी एखाद्या जुन्या मित्राशी भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. पैशांची उधळपट्टी टाळा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. मिथुन – आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि यश मिळेल. नवीन आर्थिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौणखनिज चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निलंबित करण्यात आले आहे. गौणखनिज चोरी व अवैध वाहतुकीवर रोख लावण्यात निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाने हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात तीव्र खळबळ उडाली असून, चौकशीअंती आणखी एका तहसीलदारावर कारवाई प्रस्तावित असल्याची चर्चा रंगल्याने इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. हे संपूर्ण प्रकरण सावखेडा येथील वाळू घाटाशी संबंधित आहे. २६ मे रोजी या घाटावर नियमबाह्य पद्धतीने मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू असल्याचे महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आले…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या संगमनेरच्या भूमिपुत्रांनी संगमनेरमार्गे पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सुरु करण्याच्या मागणीसाठी कंबर कसली आहे. या मागणीला व्यापक पाठिंबा मिळवून देण्यासाठी पुणे शहरात लवकरच एका विशेष ‘पुणे–नाशिक रेल्वे परिषदेचे’ आयोजन केले जाणार आहे. पुणे आणि नाशिकदरम्यानचा हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशाच्या दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा रेल्वे मार्ग संगमनेरला जोडल्यास परिसरातील नागरिकांना दोन्ही प्रमुख शहरांशी जलद व आधुनिक रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी राहणाऱ्या संगमनेरकरांना एकाच व्यासपीठावर आणून या हक्काच्या मागणीसाठी भक्कम पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये प्रकल्पाची सद्यस्थिती, संगमनेरमार्गे रेल्वेची तांत्रिक व व्यावहारिक…
