Author: Annant Ppangarkar
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र आरोग्याची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. वृषभ – आजचा दिवस संमिश्र फळ देणारा आहे. मानसिक शांततेसाठी संयम बाळगणे आवश्यक आहे. व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील. मिथुन – तुमच्या बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यामुळे आज तुम्हाला मोठे यश मिळू शकते. नवीन लोकांशी झालेली भेट भविष्यात लाभदायक ठरेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या थकीत रकमेपोटी दिलेला चेक वटला नसल्याने दाखल झालेल्या धनादेश अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीला सहा महिने कारावास आणि सुमारे साडेसहा लाख रुपयांची भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल बुधवारी दिला. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील ज्वेलर्स व्यावसायिक आशिष सुभाष वर्मा यांनी राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेकडून ४० लाख रुपयांचे जमीन व गृहतारण कर्ज घेतले होते. या कर्जाची मुद्दल व व्याजासह थकबाकी रक्कम भरण्यासाठी त्यांनी पतसंस्थेला ३,२४,०५१ रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, आशिष वर्मा यांच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने संबंधित बँकेने तो धनादेश अनादरित (बाऊन्स) करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कौठे मलकापूर (संगमनेर): संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) प्रस्तावित असलेल्या जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला विरोध दर्शवत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. सौर प्रकल्पाचे काम तातडीने बंद करून सर्व साहित्य जागेवरून हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलन चिघळल्याने पोलिसांनी भाजप तालुकाध्यक्षासह १० ते १२ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. साकूर पठार भागातील हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौठेमलकापूर येथे शेकडो हेक्टर जागेवर एमआयडीसी उभारण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे शिवकृपा कृषी सेवा केंद्रावर धडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत ठिकाणी खतसाठा करून शेतकऱ्यांना बिल न देता युरियाची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईत उघडकीस आला. या कारवाईदरम्यान ३ हजार ७२४ रुपये किमतीच्या युरियाच्या १४ गोण्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधित दुकानदारावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनापुरी येथील शिवकृपा कृषी सेवा केंद्रात युरियाची गाडी उतरवून त्याची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याची पक्की माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर एलसीबीच्या पथकांनी मंगळवारी एकाच दिवशी संगमनेर शहर, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ११ वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. या धडक कारवाईत जुगार आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, एकूण ४४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेवून येणारा आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाइकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांती घ्या. वृषभ- आज तुम्हाला कामात थोडे धैर्य आणि संयम ठेवावा लागेल. घाईगडबडीत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात, त्यामुळे विचारपूर्वक पुढे जाणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात बराच फायदा होऊ शकतो आणि नवीन सहकार्य सुरू होऊ शकते. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील आणि जोडीदाराचे पूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील २७ विद्यालयांमधील दीड हजार विद्यार्थिनींना वर्षभर स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ‘मुक्कामार’ अभियान मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले असून, एकविरा फाउंडेशन आणि मुक्कामार फाउंडेशन यांच्यात नुकताच याबाबतचा महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. वडगाव पान येथील डी.के. मोरे जनता विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री तथा मुक्कामार फाउंडेशनच्या संस्थापक इशिता शर्मा आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार पार पडला. यावेळी बोलताना अभिनेत्री इशिता शर्मा यांनी देशातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र चिंता व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे हा कलंक असून, मुलींनी स्वतः…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी संस्थेची वाटचाल कायम गुणवत्तापूर्ण राहिली असून, जगातील बदलांनुसार नवीन अभ्यासक्रम राबवत हे विद्यापीठ गुणवत्तेच्या जोरावर देशात अग्रगण्य ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अमृत कला मंच येथे आयोजित अमृतवाहिनी विद्यापीठाच्या शानदार शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रिमोटद्वारे विद्यापीठाच्या फलकाचे व अधिकृत संकेतस्थळाचे (वेबसाईट) अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. रोहित दुबे पाटील, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन बुलढाणा: लेखक व सामाजिक विश्लेषक प्रवीण मोरेश्वर बागडे यांना साहित्यिक आणि वैचारिक योगदानाबद्दल ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. प्रवीण बागडे यांच्या सामाजिक प्रश्नावरील निर्भीड लेखन, संविधानिक मूल्यांची जागृती आणि परखड विश्लेषणाची दखल घेत सचिन खंडारे, विकास सुखधाने व समाधान सरकटे यांच्या निवड समितीने ही एकमताने निवड केली आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून बागडे यांचे कौतुक होत असून, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा हा सन्मान वंचित घटकांसाठी अधिक निर्भीडपणे लिहिण्याची नवी जबाबदारी देणारा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राजरोसपणे सुरू असलेल्या पठार भागातील अवैध वाळू वाहतुकीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत पाच लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ आणि रोहित येमुल यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती मिळवण्यासाठी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना करण्यात आले होते. सोमवारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरातील रहेमतनगर भागातील आर. के. प्लॉटींगजवळील काटवनात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून रवाना करण्यात आले होते. सोमवारी (१७ ऑगस्ट) हे…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याची साथ उत्तम लाभल्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण वेगाने पूर्ण होतील. वृषभ – मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा आजचा दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात घेतलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. नातेवाईकांशी जुने मतभेद संपुष्टात येतील. संध्याकाळच्या वेळी मनःशांतीसाठी धार्मिक अथवा शांत ठिकाणी वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. मिथुन – बौद्धिक आणि सर्जनशील कामांमध्ये आज विशेष यश मिळेल. संवादकौशल्यामुळे कठीण प्रसंगही सहजरीत्या हाताळता येतील. पैशांचा ओघ चांगला राहील परंतु नको त्या गोष्टींवर खर्च वाढण्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे आणि महानगरीय साहित्याचा पाया रचणारे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती सोहळा व गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात मातंग समाजातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ठरलेल्या प्रेरणा खवळे यांच्यासह प्रा. रघुनाथ खरात यांना ‘जीवनगौरव’ तर डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. भाऊसाहेब पवार, प्रा. तुकाराम सोळशे, प्राचार्य काळूराम बोरुडे, मिराबाई आव्हाड आणि प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिराच्या विकासकामात वनविभागाच्या हद्दीमुळे येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. श्रावणातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून आमदार खताळ यांनी आपल्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह मंदिरात जाऊन महापूजा, अभिषेक व आरती केली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मंदिराच्या नव्या वास्तूच्या निर्मितीची ग्वाही दिली. आमदार खताळ पुढे म्हणाले की, जनतेने सेवा करण्याची संधी दिल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिर परिसर वनजमिनीच्या हद्दीत येत असल्याने आवश्यक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहराच्या दृष्टीने आजचा सोमवार (१७ ऑगस्ट) ऐतिहासिक आणि आनंदाचा ठरला आहे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यात जागा हस्तांतरणाचा करार आज करण्यात आला असून, एसटी महामंडळाने स्मारकासाठी निश्चित केलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगरचे राजेंद्र दामोधर जगताप, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) प्रवरा नदीपात्रात धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानंतर एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी विनाक्रमांकाचा टाटा कंपनीचा टेम्पो आणि अवैध वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वाढत्या बेकायदेशीर वाळू उपशावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: स्वातंत्र्यदिनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत एकाच दिवशी तब्बल ६ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण १६ आरोपींवर ६ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून १,३७,५८० रुपये किमतीचा अवैध मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, अनंत सालगुडे आणि इतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात सरकारने काढलेल्या ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात घुलेवाडीच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अर्धनग्न धरणे आंदोलन सुरू केले आहे. रविवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात, कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांच्यासह अनेकांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी अत्यंत आक्रमक आणि तीव्र स्वरूपात हे आंदोलन करत असून सोमवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. शासनाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी ५ ऑगस्टच्या मूळ जीआरमध्ये काही सुधारणा केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष कायम आहे. विद्यार्थ्यांच्या मते, या सुधारणा अपुऱ्या असून हा शासन निर्णय तात्काळ पूर्णपणे…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी काळ अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेवाइकांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आज तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण होणारे खर्च टाळा आणि भविष्यातील नियोजनावर भर द्या. घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. व्यवसायात घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. मानसिक शांततेसाठी थोडे ध्यान किंवा अध्यात्माचा आश्रय घ्यावा. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि प्रगतीचा ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभल्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. वृक्षलागवडीच्या माध्यमातून परिसरातील हिरवाई वाढविण्यासोबतच गावाचे सौंदर्य आणि पर्यावरण समृद्ध करण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. तालुक्यातील घारगाव येथील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष गणेश धात्रक यांच्या मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घारगाव–शिदायकवाडी रस्त्यालगत शेत परिसरातील डोंगरावर आमदार खताळ यांच्या हस्ते वडासह करवंदाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी घारगावचे सरपंच नितीन आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेश फटांगरे,…
