Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता असून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्यास नाते अधिक दृढ होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आज मनासारख्या गोष्टी घडल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुनी थकलेली कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. प्रवासाचे नियोजन आखाल मात्र वाहने चालवताना दक्षता घेणे गरजेचे आहे. मिथुन: आज आपणास संमिश्र फळे मिळतील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असली तरी संयमाने परिस्थिती हाताळावी. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे. नातेवाईकांशी असलेले मतभेद दूर होऊन सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. कर्क:…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर शहरातील नाशिक पुणे रोड व कोल्हार घोटी रोडवरील नगरपालिका हद्दीतील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले असून शहरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीतील पुणे–नाशिक राज्य महामार्ग (SH 71A) व कोल्हार–घोटी राज्यमार्ग हे अत्यंत वर्दळीचे मार्ग असून या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात दुकानदार, फेरीवाले तसेच काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेषतः 132 के.व्ही. सबस्टेशन ते पुणे रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रवरा नदी पूल तसेच तीन बत्ती चौक ते…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- निवडणूक आयोगाच्या ‘सिस्टिमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना, शहरातील काही बीएलओनी घरोघरी न जाता नागरिकांना कार्यालयात बोलावून मनमानी कारभार सुरू केला असल्याचा आरोप ‘ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ने केला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी संगमनेरचे प्रांत अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार बीएलओ यांनी प्रत्यक्ष घराघरांत जाऊन पडताळणी करणे बंधनकारक आहे. मात्र, संगमनेरमध्ये अनेक बीएलओ दूरध्वनीवरून नागरिकांना थेट नगरपालिकेत किंवा ठराविक ठिकाणी बोलावून घेत आहेत. या प्रकारामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे. योग्य जनजागृतीच्या…

Read More

आजचे राशी भविष्य ​मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि ध्येयपूर्तीचा आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कठीण प्रसंगांवर सहज मात कराल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. ​वृषभ: आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र फळांचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे ठरेल. घरातील जुने वाद मिटवण्यास आज उत्तम संधी आहे. प्रियजनांच्या भेटीमुळे मनाला उभारी मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. ​मिथुन: आजच्या दिवशी…

Read More

मुंबई | प्रवीण पुरो तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन हा घातपाताचा प्रकार असेल आणि त्यामागे कोणीही व्यक्ती कितीही शक्तीमान असेल तर आकाश पाताळ एक करून त्यांना बाहेर काढू. कोणाचीही मुलाहिजा न ठेवता त्याला शोधून काढू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाचं प्रकरण विधानसभेत उपस्थित केलं होतं. अजित पवार यांच्या विमानाला अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, असा स्पष्ट आरोप करत रोहित पवार यांनी सरकारला घेरलं होतं. या प्रकरणाची…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी श्रीरामपूर आणि अकोले पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत धामणगाव पाट येथील दरोडा प्रकरणातील टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी पकडलेल्या या टोळीने नाशिक मधील दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढकांबे येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुरेगाव, ता. श्रीगोंदा येथील बाबुशा पिंग्या काळे, शुभम पिंग्या काळे आणि रवि लाला भोसले हे या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीकडून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्तवली आहे. १९ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास धामणगाव पाट येथील सुरेखा माधव भोर यांच्या घरी अज्ञात पाच इसमांनी प्रवेश करून घरातील सदस्यांना…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – नाशिकच्या सिन्नर येथील स्वयंघोषित कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या कृत्यांचा पर्दाफाश होत असतानाच आता त्याचे धक्कादायक संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. खरातने केवळ नाशिक वा इतर जिल्ह्यातच नव्हे, तर संगमनेरसारख्या भागातही मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यात खरातच्या मुलीच्या नावावर मोठी प्रॉपर्टी असल्याचे समोर येत आहे. या मालमत्तेमुळे आता तपासाची व्याप्ती वाढली असून, खरातच्या काळ्या साम्राज्याचा आणखी एक पदर उलगडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणावर सविस्तर निवेदन देताना खरातच्या कुंडलीतील सर्व काळेबेरे चव्हाट्यावर आणले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने केवळ नावाचाच नव्हे तर आपल्या ओळखीचाही मोठा खेळ…

Read More

नाशिक: अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची मालिका सुरूच आहे. आता खरात विरोधात सातवा गुन्हा दाखल झाला असून, एका पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पीडित तरुणी आणि तिचे कुटुंब शेतात घर बांधण्याबाबत विचारणा करण्यासाठी आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी २०२१ मध्ये अशोक खरातला भेटले होते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार तिने सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तक्रारीनुसार, खरातने शैक्षणिक सल्ला देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या आई-वडिलांना केबिनबाहेर काढले. त्यानंतर, तांब्याच्या पेल्यात मंत्रोच्चार केलेले पाणी पिण्यास देऊन तरुणीला बेशुद्ध केले किंवा तिचे मानसिक नियंत्रण मिळवले. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या समनापूर गावात ‘सीएल-३’ दारू विक्री परवान्यावरून सुरू असलेला वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. या प्रकरणी स्थानिक महिलांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावाची संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता, प्रशासनाने ग्रामसभेच्या निर्णयाला दिलेली बगल आणि संशयास्पद कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, गुंजाळवाडी येथील दारू परवाना समनापूर येथे स्थलांतरित करताना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, अंतर नियम आणि ग्रामपंचायत कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने संबंधित परवान्याचा ठराव स्पष्टपणे नामंजूर केलेला असतानाही, तो परवाना मंजूर कसा झाला, हा संशोधनाचा…

Read More

मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधींचा असेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आहारविहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ​वृषभ: आज आपल्या कामात काही अडथळे निर्माण होऊ शकतात, परंतु धैर्याने त्यावर मात करणे शक्य होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद टाळणे हिताचे ठरेल. धनलाभाचे योग आहेत, मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रवासाचे योग असून प्रवासात सतर्क राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ​मिथुन: आजचा दिवस संमिश्र…

Read More

अहिल्यानगर, प्रतिनिधी –  संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या दुर्दैवी ॲसिड हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत, पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ‘पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२’ अंतर्गत पीडितेसाठी एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले असून, ही संपूर्ण रक्कम वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- पंचायत समितीमधील एका सीआरपी महिलेच्या मानधनाचा प्रश्न आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झालेली कथित गैरवर्तणूक यावरून संगमनेरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित महिलेची तक्रार पोलीस प्रशासनाने दाखल करून घ्यावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी संगमनेर शहर पोलीस स्थानकासमोर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले. गेल्या दहा महिन्यांपासून सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या संबंधित महिलेचे मानधन थकीत होते. हे मानधन मिळवण्यासाठी ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली असता, त्यांच्याकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना माहिती मिळताच काही युवक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यानंतर ही…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई केली आहे. या टोळीने केलेल्या विविध गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत, आता त्यांच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या नवीन कलमान्वये संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवत कलम १११ अंतर्गत वाढीव कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आरोपींच्या जामिनावर बाहेर येण्याच्या शक्यता मावळल्या असून त्यांना मोठा कायदेशीर दणका मिळाला आहे. या संदर्भात श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र दाढ रोड, आश्वी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ उभे होते. यावेळी रवींद्र उर्फ बंटी आबासाहेब उर्फ रावसाहेब…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानधन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अभियान व्यवस्थापकानेच महिला कर्मचाऱ्याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी ही एका महिला बचत गटात समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडलेले होते, त्यासाठी त्या सातत्याने पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करत होत्या. याच संदर्भात २३ मार्च रोजी दुपारी त्या पंचायत समिती कार्यालयात गेल्या होत्या. तिथे भेटल्यावर त्यांनी अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे यांना आपल्या रखडलेल्या मानधनाबाबत विचारणा…

Read More

दैनिक राशिभविष्य: २४ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येऊ शकतात, ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट घ्यावे लागतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाई टाळावी आणि जोडीदारासोबतचे मतभेद संवादाने मिटवण्याचा प्रयत्न करावा. वृषभ: आजचा काळ प्रगतीकारक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आजचा दिवस योग्य आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे समाधान मिळेल. प्रकृतीची थोडी काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. मिथुन:…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. संगमनेर शहरासह परिसरातील विविध पेट्रोल पंपांवर आज सकाळपासूनच वाहनधारकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान अचानक पेट्रोल पंपावर उसळलेल्या वाहनधारकांच्या गर्दीमुळे खरोखर पेट्रोलचे त्यांचाही निर्माण झाली का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या संदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही अथवा माहिती देण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची किंवा इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या भल्या मोठ्या…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी दैनिक ‘प्रवरातीर’ परिवारातील मुख्य आधारस्तंभ आणि संस्थापक संपादक शिवपालसिंह ठाकूर यांच्या पत्नी व संपादक धीरज ठाकूर यांच्या मातोश्री अनिता शिवपालसिंह ठाकूर (वय ५५) यांचे आज सोमवारी (२३ मार्च) पहाटे चार वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगमनेर शहरासह माध्यम क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता ठाकूर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने ठाकूर परिवाराचा मुख्य आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. श्रीमती अनिता ठाकूर या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सात्विक स्वभावाच्या होत्या. ‘प्रवरातीर’च्या जडणघडणीत आणि…

Read More

दैनिक राशिभविष्य: २३ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील मात्र अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असली तरी संवादाने प्रश्न सुटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीकारक राहील. मिथुन आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. घाईघाईने घेतलेले निर्णय भविष्यात त्रासदायक ठरू…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कायदे, नियम आणि नीतिमत्ता यांचे पालन करणारा प्रत्येक जागरूक नागरिक हीच देशाची खरी ताकद असून, अशा नागरिकांच्या संघशक्तीच्या बळावरच भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उदयाला येत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. संगमनेर येथील राजस्थान युवक मंडळाच्या वतीने, मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘मंथन’ व्याख्यानमालेचा समारोप ‘विकसित भारत आणि आपण सगळेच’ या विषयाने झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना सांगितले की, देशालाच दैवत मानून प्रामाणिकपणे कार्य करणारे शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर आणि अभियंते हे घटक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- नाशिक येथे हजारो भाविकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि त्यातील राजकीय लागेबांधे पाहता, खरात याच्यासह त्याला पाठबळ देणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांची व प्रशासकीय घटकांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पीडित नागरिकांना तातडीने न्याय व आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पक्षाने लावून धरली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना माकपने म्हटले आहे…

Read More