Author: Annant Ppangarkar
मंगळवार, ०९ जुलै पोलिसांनी नाशिकमध्ये एका कारवाईत ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट गाडीत लाखो रुपयांचा गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गांजाने भरलेली गाडी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भारतनगर येथून ताब्यात घेतली आहे. या प्रकारणी चालकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून हा गांजा आणला गेल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई नाका येथील भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक चार चाकी वाहन संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात १९.६५० किलो गांजा आढळून आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी चालक किरण धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. याची चौकशी सुरू आहे. साधकाने…
मंगळवार ०९ जुलै | संगमनेर समाजातील अनेक घटकांसाठी जिव्हाळ्याचे असलेल्या व आर्थिक विकासाची गंगोत्री समजल्या जाणार्या संगमनेर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, उपाध्यक्षपदी मुकेश कोठारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संगमनेर मर्चंट बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सहाय्यक उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत एकमताने दोन्ही निवडी करण्यात आल्या. यावेळी बँकेचे प्रमुख मार्गदर्शक उद्योजक राजेश मालपाणी म्हणाले, संगमनेर मर्चंट्स बँकेच्या लोकाभिमुख आणि वेगवान सेवेमुळे दिवसेंदिवस बँकेकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होत असून बँकेच्या परिपूर्ण सेवेमुळे समाधानी होत आहेत. ग्राहकांची जिंकलेली मने आणि मिळवलेला विश्वास हाच बँकेचा सर्वश्रेष्ठ…
मंगळवार, ०९ जुलै | संगमनेर महाराष्ट्र पोलीस दलातील डीवायएसपी, एसीपी बढती घोटाळ्याची चर्चा असतानाच आता नगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना बदल्याच्या ठिकाणी नियुक्त न करणे, बदल्याच्या ठिकाणी न सोडणे याबाबतच्या घोटाळ्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश देवूनही अद्यापही बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. तसेच दोन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली व नेमणूक नसतानादेखील त्याला पोलीस अधीक्षकांचे खास मर्जी असल्याने नगर एलसीबीच्या विशेष पथकात वर्षभरापासून ठेवले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याची तक्रार खासदार निलेश लंके यांनी देखील केलेली आहे. नगर जिल्ह्यातील पोलीस पथकांच्या विविध कारवाया आणि त्यामागे…
मंगळवार, ०९ जुलै विधीमंडळातील विधानपरिषद सभागृहात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न झाला. विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य निरंजन डावखरे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती निलम गोर्हे यांनी सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली. डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर अभ्यंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधिमंडळातील विधानपरिषद सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला.
मंगळवार, ०९ जुलै : मुंबई विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भाई गिरकर आणि जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अंगणवाड्यांच्या प्रश्नावर वाजवी दरानुसार अंगणवाडी जागेचे भाडे द्यावे तसेच अंगणवाड्यांना आपण भेटी देणार असल्याची माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. गिरकर यांनी अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचा मुद्दा उपस्थित करत १४१७ अंगणवाडी केंद्रे भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी १२४८ अंगणवाडी केंद्रे हे स्वमालकीच्या इमारतीत आहे. उर्वरित अंगणवाड्याना स्वमालकीची इमारत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिथे जागा उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्या भाडे तत्त्वावर असतात, भाड्यासाठी देण्यात येणारा निधीमध्ये सुद्धा…
सोमवार, ०८ जुलै नुकतेच संगमनेरच्या स्थानिक वृत्तपत्रात बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबद वृत्त प्रसिद्ध झाले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपये मंजूर केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी वृत्तपत्रांना माहिती दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याबरोबरच छत्रपती शिवरांयाच्या स्मारकासाठी एसटी महामंडळाच्या जागेला माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. याचे सर्व श्रेय संबंधितांनी माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. स्मारकाची संकल्पना हीच मुळात माननीय पालकमंत्र्यांची आहे तेव्हा इतरांनी श्रेय घेऊ नये असेही पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी देखील या पूर्णाकृती स्मारकाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न केल्याचा…
सोमवार, ०८ जुलै अहमदनगर जिल्ह्यात आज व उद्या (दिनांक ८, ९ जुलै) दुजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रशासनाने केले हे आवाहन … मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब,…
सोमवार, ०८ जुलै हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य…
सोमवार, ०८ जुलै आई आणि पत्नीच्या कर्ज थकबाकीपोटी पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटता परत आल्याने दाखल असलेल्या खटल्यात श्याम दिगंबर मयूर (रा. मयूर ज्वेलर्स, संगमनेर) या आरोपीला संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी एक वर्ष साध्या कारावासाची आणि १० लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली. अधिक माहिती अशी, आरोपी श्याम दिगंबर मयूर यांची आई वत्सलाबाई दिगंबर मयूर आणि पत्नी संगीता शाम मयूर यांनी संगमनेर शहरातील गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेकडून प्रत्येकी एक वर्षाच्या कालावधीसाठी २ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जासाठी आरोपी शाम मयूर हा जामीनदार होता. कर्जदार कर्जाची रक्कम भरण्यात अपयशी ठरल्याने ते संस्थेत थकबाकीदार…
सोमवार, ०८ जुलै आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य दादा! पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजनेअंतर्गत आम्हाला तू दर महिन्याला १५००/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. या बदल्यात तू … गॅसचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक समस्या सोडण्याचा प्रयत्न कर. जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईतपण तुझी बहीण सुखी राहील. दादा, आणखी एक विनंती करते, तुझ्या लाडक्या भाचा-भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे सगळ्याना…
सोमवार, ०८ जुलै शीतपेयाच्या खरेदीपोटी व्यापाऱ्याला दिलेले चार चेक न वटल्याने तसेच मागणी करूनही आरोपीने पैसे न दिल्यामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या संगमनेर न्यायालयातील चार वेगवेगळ्या खटल्यात न्यायालयाने आरोपीला मोठी शिक्षा ठोठावली आहे. रोहित बाळासाहेब हासे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश गिरीश देशमुख यांच्या न्यायालयाने नुकताच हा निर्णय दिला. आरोपी रोहित हासे याने या खटल्यातील फिर्यादी ऋषिकेश एजन्सीचे मालक अनंत दिगंबर कल्याणकर यांच्याकडून पेप्सी, पेप्सी कोला इत्यादी पेये विक्रीसाठी खरेदी केले होते. या खरेदी पोटी त्याने कल्याणकर यांना प्रत्येकी ५० हजार, ६० हजार, ५२,६०५, ६० हजार रुपयांचे असे चार चेक दिले होते. मात्र कल्याणकर…
सोमवार, ०८ जुलै आपल्या शुद्ध आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अद्ययावत असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटतर्फे बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवारी (८ जुलै) होणार असून सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत बालकांना सुवर्णप्राशन संस्कार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्या बालकांना मोफत सुवर्णप्राशन करण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सिन्नर-घोटी रस्त्यावर धामणगाव येथे एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे आणि तज्ज्ञ चिकित्सक असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयाकडून मोफत सुवर्णप्राशन व विशेष आयुर्वेद चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. सुवर्ण प्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी…
रविवार ७ जुलै | अनंत पांगारकर पोलीस उपअधीक्षक, प्रांत अधिकारी कार्यालय, संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि दारूबंदी विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील शक्तिमान टॉवर्समध्ये अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात गंभीर घटना घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरला अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या अवकृपेने अवैध धंद्यांचा कलंक लागला आहे. शहरातील अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या एजंट मार्फत होणाऱ्या अर्थपूर्ण नात्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विविध विकास कामे, मोठी बाजारपेठ आणि सहकारी…
रविवार, ०७ जुलै १६ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. २००७ साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आंदोलन केले होते. २००८ साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं रान उठवलं होतं. मध्य रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिराळा तालुक्यात काही ठिकाणी हिंसक वळण…
रविवार, ०७ जुलै दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व प्रश्न सोडवण्यासाठी यथायोग्य सहकार्य करू असे आश्वासन दिले. राज्य सरकारने दुधाला ३० रुपये भाव सहकारी व खाजगी संघांनी द्यावा व सरकार ५ रुपयाचे अनुदान देईल, याप्रमाणे ३५ रुपये भाव देण्याचा शासन आदेश काढलेला आहे. मात्र राज्यातील…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या दोन महत्वाच्या भाषणांवरचं देशाचं लक्ष आजही सरत नाहीए. त्यात एक होतं ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं तर दुसरं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. या दोन भाषणांची तुलना करायची तर एक झकास आणि दुसरं भकास, असंच म्हणता येईल. संसदीय कार्यपध्दतीत सरकारवर होणार्या आरोपांना मुद्देसूद उत्तरं देणं ही उत्तर देणार्याची जबाबदारी असते. ती त्याने पार न पाडली तर संसदीय प्रणालीला ते मारक मानलं जातं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून संसदीय कार्यपध्दतीचा पुरता हिरमोड झाला आहेच. लोकसभेतील विरोधी पक्ष खासदारांची संख्या अगदीच मर्यादित झाल्याचा फायदा घेत मोदींच्या सरकारने नको…
शनिवार, ०६ जुलै जिल्ह्याच्या विकासाचे सातत्य टिकवून ठेवताना दर्जेदार व गुणवत्तापूर्वक विकास कामे करण्याचे व विकास कामांमध्ये अधिक गतिमानता आणण्यासाठी यंत्रणा प्रमुखांनी प्रलंबित प्रकरणांचा क्षेत्रीय स्तरावर आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री विखे यांनी हे निर्देश दिले. यावेळी सभागृहात आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…
प्रवीण पुरो | मुंबई राज्याची राजधानी असलेली मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली जात असल्याचा गंभीर आरोप व मुंबईला अदानीपासून वाचवा. तसेच जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमापुढे केला. विधानसभेत मुंबईतील जमिनी हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी अदानी कंपनीला मुंबई विकली जात असल्याचा आरोप केला. अदानी पूर्ण मुंबई गिळंकृत करीत असताना अदानीला राज्याचे प्रमुख पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपाचे नेते याविरोधात सांगत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.…
शनिवार, ०६ जुलै संजय गांधी निराधार योजनेचे जून महिना अखेर पर्यंतचे २ कोटी ४८ लाख ०४ हजार ८०० रुपयांचे अनुदान शनिवारी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. असे आहे अनुदानाचे वाटप – संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्याना ७७ लाख ७६ हजार ६०० रुपये जून महिन्याचे अनुसूचित जातीसाठीचे ५६२ लाभार्थ्याना ८ लाख ३५ हजार २०० रुपये एप्रिल, मे आणि जून महिन्याचे अनुसूचित जमातीसाठीचे २२६ लाभार्थ्यांना १० लाख ०८ हजार रुपये जूनचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनत सर्वसाधारण ५३११ लाभार्थ्यांना ७९ लाख ६६ हजार…
शनिवार ६ जुलै फायनान्स कंपनीकडे वारंवार केल्या जात असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांना त्या दृष्टीने तपास करावा लागणार आहे. दरम्यान या संदर्भात आश्वी (संगमनेर) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण फायनान्स कंपनीला वारंवार पैसे दिले मात्र फायनान्स कंपनीतील कर्मचारी आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे या मागणीला कंटाळून आपण आत्महत्या करत…
