Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यासंदर्भात पोलीस प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मंगळवारी रात्री पोलीस प्रशासनाने दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल ४३ जिवंत गोवंश जनावरे कत्तली होण्यापूर्वीच वाचविली आहेत. विशेष म्हणजे यातील एका कारवाईत जिवंत गोवंश जनावरांनी आरडाओरडा करू नये, यासाठी कत्तलखाना चालकाने गोवंश जनावरांच्या तोंडाला काळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या चिकटविण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात दोघा कत्तलखाने चालकांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित सन १९९५ कलम ५, ९(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज | सकारात्मक माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली. मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?” ती म्हणाली, “ नाही. “बडी बेंच” नवा नाही.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी पेमगिरी येथील बाळासाहेब भोर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांतिसेनेचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी त्यांना नवनियुक्तीचे पत्र दिले आहे. याअगोदर भोर यांच्याकडे क्रांतिसेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती ती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. विशेष करून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आपापल्या परीने शक्य होईल त्याप्रमाणे न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. खांडगाव पेमगिरी रस्त्याचा प्रश्न असेल किंवा प्रवरेच्या पाटाच्या खोदकामात शेतकऱ्यांच्या तुटलेल्या पाईपलाइनचा प्रश्न असेल तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांबाबद त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी कुचकामी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनंत पांगारकर | संगमनेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीवरून शिर्डीमध्ये मंजूर केलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा विभाजनासाठी कळीचा मुद्दा ठरले आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा कृती समितीच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकार्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित आहे. उत्तर नगर दक्षिणचे मुख्यालय कोठे करावे, यावरून या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडले असून संगमनेर, श्रीरामपूरसह शिर्डी जिल्हा मुख्यालयाच्या स्पर्धेत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून महसूल मंत्री पद नगर जिल्ह्यात विशेषत: शिर्डी, संगमनेर मतदार संघामध्ये आहे. पालघर जिल्ह्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाल आहे. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे तिच्या मृत्यू झाल्याचा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत आहे. दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत रविवारी आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. दर्शना दत्ता पवार…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत संगमनेर येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक ऋषिकेश जगदीश मालाणी यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. ऋषिकेश मालाणी यांनी बँकिंग अँड फायनान्स या विषयांतर्गत “महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या समस्या आणि संभावनांचा अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य केले. त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रो. डॉ. आर. एन. वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी प्रबंधाच्या मौखिक सादरीकरणासाठी रेफरी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. वीणा हुंबे तर बहिस्थ परीक्षक म्हणून वींझर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजीव लाटे यांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. तसेच बोगस निविष्ठा विक्री व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. खरीप हंगाम तयारी संदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. तदनंतर उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी 3 जुलै 2023 रोजीच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागु राहतील, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने (ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त सोमवारी शहरातील नेहरू गार्डन जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नागरिकांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरदेखील एकनिष्ठ शिवसैनिकांनी रविवारी मुंबईत झालेल्या पदाधिकारी शिबिरात मोठी गर्दी केली होती. या शिबिरासाठी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबई येथे उपस्थित राहून मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले तसेच आज १९ जूनला शिवसेना शहर व तालुक्याच्यावतीने (ठाकरे गट) संगमनेर येथील नेहरू गार्डन परिसरातील कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी व…
विखे गटाची सत्ता उलथून सभासदांनी केले परिवर्तन महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – राहाता तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर गणेश परिसरातील सभासदांनी विश्वास ठेवून श्री गणेश परिवर्तन पॅनलचे 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय केले असून विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यभराचे लक्ष लागलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उठली होती. काँग्रेस पक्षाचे नेते व सहकारातील आदर्श नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच गणेशच्या निवडणुकीत लक्ष घातले. युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे व आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश परिवर्तन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी (ता २८मे) रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या वीस आरोपींना सोमवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जवळपास तीन आठवडे आरोपी तुरुंगामध्ये होते. शहरातील जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर धारदार शस्त्राचा वापर करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात जोर्वे येथील आठ जणांना बेदम मारहाण करत जखमी करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या घटनेचे पडसाद तालुक्यात व शहरात देखील उमटले. घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी करणाऱ्या नर्सने जवळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी समोर आला आहे. ऋतिका पांडुरंग आंधळे (वय 19 वर्ष, मूळ रा. गिरेवाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. नर्सिंग वसतिगृह, जिल्हा रुग्णालय अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नर्सचे नाव आहे. या नर्सच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये असलेल्या नर्सिंग वसतिगृहामध्ये रूम नंबर 77 मध्ये ऋतिका आंधळे राहत होत्या. त्यांनी शनिवारी रात्री वसतीगृहातील आपल्या खोलीत दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी नऊ वाजता सुमारास हा प्रकार समोर आला. आंधळे यांना रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. दर्शना दत्ता पवार ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. पुण्यात देखील तिने क्लास लावला होता. त्यानंतर ती गावी जाऊन सेल्फ स्टडी करत होती. तसेच तिने स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते. त्यामुळे पुण्यातील एका ॲकेडमीच्यावतीने तिचा सत्कार समारंभ…
महाराष्ट्र संवाद न्यूज हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो. ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रुप वाटते. लोकही त्यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात. काही तासात गावातील काना-कोपरा चकाचक झालेला असतो. ही किमया करणारा अवलिया आहे हरिभाऊ ज्ञानोबा उगले. अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांनी संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छेतेचा वसा घेतला असून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील एक हजार खेड्यांना भेटी देत तेथे स्वच्छता केली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक खेड्यांमध्ये एक रात्र मुक्काम करून त्यांनी ग्रामस्वच्छता करून घेतली आहे. ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले…
महाराष्ट्र संवाद न्यूज | रविवार विशेष आजच्या या तरूणी तरी कुठे आहेत हो… ध्यानावर कायम पडीक पडलेल्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर घालून टिचभर कपडे मोकाट फिरती गावभर दाखवून… अंगप्रदर्शन सेल्फी काढती ढीगभर काँलेजच्या नावाखाली पोरांसोबत जाती डेटवर उघड्या बोडक्या होऊन हुदंडती खुशाल बीचवर कुणाचं काही ऐकत नाही जुमानत नाही आईबापाला म्हणे आमची लाईफ स्टाईल तुमी मधे पडता कशाला ! क्षणभंगुर सुखासाठी पोरी लागती कुणाच्याही नादाला आंधळ्या प्रेमापायी बावळ्या मुकतात कायमच्या जीवाला बाँयफ्रेंन्ड, गर्लफ्रेंड ट्रेडच्या नावाखाली चाललाय धिंगाणा जाणती असो वा अजाणती बळी पडत आहे भोगांना… संस्कार, संस्कृती विसरून चालल्या वाहवत विनाशाला सगळ्याचं नाही पण बहुतेक लागल्यात वाईट वळणाला … दोष नाही एकट्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर – भारतीय अर्थव्यवस्था सध्या ज्या वेगाने वाढत आहे. जगात या क्रमवारीत भारताने ब्रिटनला मागे टाकले असून आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले. सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे स्व. सुधाकर पुंजाजी भगत यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवारी (ता.१७) चला अर्थ साक्षर होऊयात या अभियानांतर्गत, ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर कडलग बोलत होते. यावेळी लेखक, अभिनेते प्रा. राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांच्या ‘माय बापाची कहाणी’ या संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितिन…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीने सार्यांनाच अचंबित करून सोडलं आहे. राज्याच्या सत्तास्थानी कोण बसेल, मुख्यमंत्री कोण होईल आणि ज्याने राज्यातल्या राजकारणाचा खेळखंडोबा केला त्याच्यावर पश्चातापाची कशी वेळ येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. करावे तसे.. हा वाक्प्रचार या ठिकाणी चपलख बसतो आहे. हा नियतीचा खेळ आहे. नियत बदलली की जसे करावे तसे भरावे. राज्य भाजपच्या आजवर स्वत:ला सर्वेसर्वा समजणार्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या हे संकट ओढावलं आहे. सत्तेच्या सार्या नाड्या आपल्या हाती असताना आज पश्चाताप सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. सत्तेसाठी जे पेरलं तेच उगवू लागल्याचं हे त्यांच्यापुढचं चित्र आहे.…
लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला पळवून नेत सहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करणारा नराधम पकडला!
पीडित मुलगी गर्भवती; अकोले तालुक्यातील घटना जर आईच्या घरी गेली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्यास यश आले आहे. मात्र या दरम्यान पीडित मुलीवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश राजू उघडे (वय ३० वर्ष, हल्ली रा. विरगाव, ता. अकोले, मूळ रा. शेळके वस्ती, नांदुरी दूमाला ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – अहमदनगर जिल्हा ओबीसी समाजाचा मेळावा उद्या रविवारी (ता.१८ जुन) सायंकाळी ५ वाजता श्रीरामपुर येथील फातेमा हाऊसिंग सोसायटीत आयोजित केले असल्याची माहिती अन्वर हाजी शब्बीर तांबोळी यांनी दिली आहे. मुस्लिम ओबीसी समाजाचा अहमदनगर जिल्हा मेळावा ऑल इंडिया ओबीसी अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अहेमद अन्सारी यांचे अध्यक्षतेखाली व नाशिक जिल्हा अध्यक्ष तनवीर तांबोळी, संगमनेर येथील शफीभाई तांबोळी यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही अन्वर तांबोळी यांनी केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रक्तदानाची क्षमता हे माणसाला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविता येतात आणि कितीतरी परिवारांना सावरणे शक्य होते. रक्तदानाला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च दानाचे महत्त्व प्राप्त असून त्याला जीवनदान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या उद्योग समूहावर नीति आणि सदाचाराचे संस्कार करणार्या दामोदरशेठ यांच्या प्रत्येक स्मृतीदिनी रक्तदानाचा महायज्ञ त्यांच्या स्मृतींना खर्याअर्थी उजाळा देणारा असल्याचे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी केले. मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या 48 व्या स्मृती दिनानिमित्त अर्पण रक्त पेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून 127 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.…
