Author: अनंत पांगारकर

गुरुवार १२ डिसेंबर  नवी दिल्ली : देशात कोरोनानंतर तरुणांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली. या प्रकारानंतर कोरोना लशीमुळे तरुणांचे अचानक होणारे मृत्यू वाढल्याची सर्वत्र चर्चा होती. तसेच कोरोना लशीच्या दुष्परिणामांबाबतही उलटसुलट चर्चा होत होती. मात्र, कोरोनाची लस या मृत्यूंना कारणीभूत नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले. आरोग्य मंत्री नड्डा यांनी बुधवारी राज्यसभेमध्ये या संदर्भात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘आयसीएमआर’च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोना लशीमुळे मृत्यूची अचानक होणाऱ्या शक्यता कमी होते. ‘आयसीएमआर’च्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी’ने १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर एक अभ्यास केला. यामध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला, ज्यांचा १ ऑक्टोबर २०२१…

Read More

गुरुवार १२ डिसेंबर  मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने एक पत्रक काढले आहे. योजनेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांना माजी महिला व बालकल्याण मंत्री एका ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल आहे. लोकसभेला महायुतीला राज्यात मोठं अपयश पाहावं लागलं होतं. परंतु, त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली. महायुतीमधील नेत्यांनी या योजनेचा व त्यामार्फत महायुती सरकारचा जोरदार प्रचार केला गेला. परिणामी महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची…

Read More

विशेष प्रतिनिधी /मुंबई  बुधवार ११ डिसेंबर – लाडक्या बहिणींमुळे महायुतीचं सरकार आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने सांगतात. पण, लाडक्या बहीण योजनेसाठी नव्या अटी आणि शर्ती लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांना वगळले जाऊ शकते. मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम महिलांना यातून वगळण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सर्वाधिक लाभार्थी मुस्लिम – मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजने’चे सगळ्यात जास्त लाभार्थी हे मुस्लीम समाजाचे आहेत. मात्र, दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यात येऊ नये, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. यामुळे खरेच दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘लाडकी…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई बुधवार ११ डिसेंबर – भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमी खालच्या पातळीवर टीका करतात. मंगळवारी पडळकर यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे जाऊन शरद पवार यांच्याबद्दल टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पडळकरांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपने पडळकर यांना जाब विचारत स्पष्टीकरण मागितलं आहे. पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका करताच राज्यभर त्यांचा आणि ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या भाजपवर सर्वत्र जोरदार टीका होत होती. तरीही भाजपकडून याची अपेक्षित दखल…

Read More

बुधवार, ११ डिसेंबर संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या सहकार्याने शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेने सुरू केलेले वाँटर एटीएम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांना खाजगी पाणी पुरवठा करणार्‍या व्यक्तीकडून पाणी घ्यावे लागत आहे. पालिकेची शुद्ध पुरवठा योजना ठेकेदाराला फायदेशीर ठरली आहे संगमनेर नगर परिषदेच्यावतीने दररोज शहरातील उपनगरात नळाव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन टाकुन कायम स्वरूपी हा प्रश्न मार्गी लावला आहे. पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीजवळ साई मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. तरीही नगर परिषदेने दहा वर्षांपूर्वी नाशिक येथील ‘प्रथमेश एन्टरप्रायजेस’ या संस्थेला शहरात शुद्ध…

Read More

बुधवार, ११ डिसेंबर  सातारा – व्यवस्थेला लागलेली लाचेची कीड किती भयानक आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून साताऱ्यामध्ये मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडी सत्र न्यायालयाच्या आवारात घडल्यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यानंतर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. न्यायाधीशालाच लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यामुळे लाचखोरीमध्ये न्याय यंत्रणादेखील बरबटल्याचे समोर आले आहे. राज्यातील न्याय पालिका क्षेत्रात मोठी खळबळ या कारवाईमुळे उडाली आहे. फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी संबंधितांकडून पाच लाखांची…

Read More

बुधवार, ११ डिसेंबर तत्कालीन मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालिकेसाठी दिलेल्या निधीतून शंभरावर कामे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. रखडलेल्या या कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ही काम तातडीने पूर्ण केली जावीत यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा नेत प्रशासकांना मागण्यांचे निवेदन दिले. यांनी दिले निवेदन – मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, किशोर पवार, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, सिद्राम दिद्दी, योगेश जाजू, प्रमोद कडलग, अफजल शेख, एकनाथ श्रीपाद,…

Read More

बुधवार, ११ डिसेंबर – संगमनेर संगमनेरमधील उच्चभ्रूची वसाहत समजल्या जाणाऱ्या गोल्डन सिटीतील शिक्षकाचा शिवपुष्प बंगला अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या फोडत ५० ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १५ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात दागिने चोरीच्या तसेच दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना त्यातच आता दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घरे लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून मोठी गुप्तता राखली जात आहे. ७ डिसेंबरला घडलेल्या चोरीच्या दोन घटनादेखील तब्बल तीन दिवसानंतर समोर आल्या आहे. शिक्षक असलेल्या विलास कारभारी काळे यांनी…

Read More

मंगळवार, १० डिसेंबर – अहिल्यानगर  अवसायानात निघालेल्या नगर अर्बन सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या पाच लाखांपेक्षा वरील ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांची संघटित शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता शहरातील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बँक बचाव कृती समितीचे सदस्य डी. एम. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अर्बन बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांच्या ठेव रकमा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी कोणाही ठेवीदाराकडून बँक बचाव कृती समितीला याची माहिती दिली नाही. या ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी समितीने मोठा संघर्ष केला, लढा उभारला, याचाही…

Read More

बुधवार, १० डिसेंबर – मुंबई  लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे…

Read More