Author: Annant Ppangarkar
पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) पुण्यातील वाघोली येथे एका गोडाऊनला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भीषण आगीमध्ये तिघांचाही कोळसा झाला असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. या धक्कादायक घटनेने पुणे हादरले आहे. वाघोलीच्या उबाळे नगर येथे शुक्रवारी रात्री लग्नाच्या सजावटीचे सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. रात्री पावणे बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत चार सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बऱ्याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या भीषण आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती…
पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलेसोबत अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असलेल्या निलेश अष्टेकर यांच्या विरोधात पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अष्टेकर काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलामध्ये नेमणुकीस होते. सध्या ते गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. पोलीस दलातील वड्या आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मूळची धुळ्याची असलेली ही 31 वर्षीय महिला सध्या ठाण्यामध्ये कळवा येथे राहावयास आहे. विधवा असल्याने धुण्याभांड्याची कामे करून ती आपला उदरनिर्वाह करते. अष्टेकर यांनी या महिलेच्या फेसबुक अकाउंटवर 19 फेब्रुवारी 2023 रोजी…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्वखर्चाने ग्राहकांच्या इच्छित स्थळी वाळू पोहोच केली जाणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायरपर्यंत असणारे टिप्पर टैम्पो व इतर ) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले आहे. राज्य शासनाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे या धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात वाळू उत्खनन वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन अशा स्वरूपाच्या निविदा मागविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता वाहतूकदारांना नोंदणी करावी लागणार आहे. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) घरीच झालेल्या प्रसूतीनंतर पोट दुखत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली. तिची शरीरयष्टी बघता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांकडे रुग्णाच्या आधार कार्डची मागणी केली आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाची घटना पोलीस ठाण्यात पोहोचली असतानाच त्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे. यामुळे संगमनेरमध्ये बालविवाहाचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या घटनेतील पीडित बालिका संगमनेर तालुक्यातील असून तिचे सासर देखील संगमनेर तालुक्यातच आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पालिकेच्या तक्रारीवरून तिचा नवरा सासू-सासरे आणि आई-वडिल…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी यातील रॅकेट उघड करत चौघा जणांना ताब्यात घेतलं असून चार जणांची सुटका केली आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने लोकांना डांबून ठेवत, त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून वेठबिगारी तसेच भीक मागून घेतली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पिलाजी भोसले, अमोल भोसले, अशोक भोसले आणि गंजा काळे अशी बेलवंडी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून आणखी दोघा आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. परराज्यातील मनोरुग्ण किंवा भोळसट लोकांना महाराष्ट्रामध्ये पाच-पाच हजार रुपयात विकले गेले असल्याचे समोर आले असून आरोपींनी मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना बेलवंडी…
शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी केली. लोणी बु. येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब…
आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलांच्या चळवळीमधून भीमक्रांती अवतरेल. महामानव बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देवून या देशात ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दोन प्रमुख शत्रू असून यांच्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याने त्यांना ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाहीर संभाजी भगत यांनी केले. तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आश्वी खुर्द येथे बुधवारी (ता. 3 मे) लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आश्वी परिसरातील नागरिकांनी न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविस्मरणीय सोहळा अनुभवला. कार्यक्रमास्थळी पेटत्या मशालीच्या ज्वाळा व हलगीच्या कडकडाटात प्रेक्षकांमधून जोरदार…
तिरुवनंतपुरम : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात भारतात ‘लव जिहाद’ या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी या चित्रपटाच्या विरोधात तब्बल सहा याचिका दाखल केल्याने न्यायालयाने तातडीने निर्णय देण्यास स्पष्ट नकार दिला. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यापासून ते शशी थरूरपर्यंत अनेक दिग्गजांनी या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या सहा याचिका काल केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर आता न्यायमूर्ती एन. नागेश आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठात सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उडालेला गदारोळ थांबण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून अशा आशयाचा ठराव राष्ट्रवादीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक सुरू होताच प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अवघ्या सोळा वर्षाच्या बालिकेसोबत बालविवाह करणाऱ्या नवरोबासह त्याचे आई-वडील आणि सासूवर संगमनेरच्या तालुका पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात कनोली गावचे ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे (वय 38 वर्षे, रा. हनुमंतगाव, ता. राहता जि. अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात कनोली येथील नवरदेव त्याचे आई-वडील आणि त्याच्या सासू विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन मे 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कनोली येथे आरोपींच्या घरी बालविवाहाचा प्रकार समोर आला. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत संगमनेर व अकोले तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना विविध महसूली, शैक्षणिक दाखल्यांचे तत्परतेने वितरण करण्यात येणार आहे. यासाठी आज शुक्रवारपासून (ता. ५ मे १५ जून २०२३) विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेचा लाभ घेण्याचे आवाहन संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने “जत्रा शासकीय योजनांची – सर्वसामान्यांच्या विकासाची” या उपक्रमांचे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्र विनासायास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थी, नागरिकांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा (सेतू)…
अहमदनगर, (महाराष्ट्र संवाद न्यूज) जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक ६ मे रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते व किटकनाशके याबाबत कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता ही बैठक पार पडणार आहे. खरीप हंगाम सन २०२३- २४ साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. शेतकऱ्यांची कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) जलजीवन आणि जीवन प्राधिकरणांच्या योजनांची काम ज्या ठिकाणी सुरू आहे ती बंद होता कामा नये. राजकारणासाठी काही लोक ही कामे बंद पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडू नये असा सल्ला राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीमध्ये टंचाई व खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. यावेळी थोरात बोलत होते. तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देताना थोरात म्हणाले, राजकारणासाठी कोणीही जनतेच्या भावनांशी खेळू नये.…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यावर्षी कमी व उशिरा होणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जशी मागणी येईल त्याप्रमाणे तातडीने पाण्याचे टँकर आणि रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी प्रशासनास केल्या. आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे, अकोले मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरात प्रांताधिकारी कार्यालयामध्ये टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी अनिल नागणे, प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, शितल घावटे, नायब तहसीलदार श्रीकांत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वर कमाईला चटावलेल्या आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून सतरा हजाराची लाच घेणाऱ्या विकास सुरेश जोंधळे या अभियंत्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बघणारा संगमनेर नगर परिषदेतील विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) याला बुधवारी सतरा हजाराची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने पकडले होते. जोंधळे यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी बाजू मांडली. न्यायाधीश मनाठकर यांनी लाचखोर आरोपी जोंधळे याला दोन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी सतरा हजार रुपयांची लाचखोरी करणारा संगमनेर नगर परिषदेतील कंत्राटी अभियंता बुधवारी नाशिक ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात पकडला. विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे गरिबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी लाचखोरी करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी लाचखोरीचे ग्रहण लागलेल्या संगमनेरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तलाठ्यासह एक खासगी इसम छत्तीस हजार रुपयांची लाचखोरी करताना ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यापाठोपाठ बुधवारी दुसरी घटना समोर आली आहे. किरकोळ कामासाठीदेखील नागरिकांना अधिकाऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री दोन वाजता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी एकरकमी थकीत कर्ज भरून खाते बंद करणा-या लाभार्थ्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलतीस मुदतवाढ देण्यात आली आहे. योजना ठराविक कालावधीसाठी म्हणजेच 30 एप्रिल 2024 पर्यत राबविण्यात येणार असुन थकीत असलेल्या लाभार्थ्यांनी या शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून थकीत असलेले कर्ज एकरकमी भरून थकीत व्याजावर 50 टक्के सवलत घेवुन आपले कर्ज खाते बंद करावे. तसेच कर्ज थकबाकीदारांनी आपल्यावर होणा-या कार्यवाहीबाबत गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दिनेश चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नवे वाळू धरण अस्तित्वात येण्याच्या पूर्वसंध्येला संगमनेरच्या महसूल विभागाने खांडगावमध्ये केलेल्या कारवाईत जेसीबी आणि वाळू साठा ताब्यात घेतल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, महसूलने पुन्हा एकदा केलेल्या कारवाईत जेसीबीसह ट्रॅक्टर पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या घटनांमधून गौण खनिज तस्करांशी संबंधितांची नावे देखील पुढे येऊ लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी खांडगावमध्ये झालेल्या कारवाईमध्ये चेतन साकोरे तर काल रात्री केलेल्या कारवाईत राहुल घुले याचे नाव समोर आले आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू तस्करी, गौण खनिज लूट थांबविण्यासाठी राज्यभरात नवे वाळू धोरण आणले आहे. महाराष्ट्र दिनापासून या नव्या धोरणाची राज्यात विशेष अहमदनगरमध्ये…
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कळस बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २० विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. शिष्यवृती परीक्षा २०२३ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे कंसात मिळालेले गुण: शौर्य सुहास शिंदे (236), कावेरी राजेंद्र खताळ (232), आरुष अंकुश वाकचौरे (220), तनुजा रमेश ढगे (194), आदिती किसन मेंगाळ (190), दर्शन संतोष कातोरे (190), श्रेया माधव कोल्हाळ (190), सनती संदीप ढगे (190), ध्रुव ज्ञानदेव ढगे (180), दिव्या सुखदेव वाकचौरे (180), चैतन्य अरविंद पवार (174), सार्थक सुरेश मेंगाळ (162), साई संतोष ढगे (162), आदिती सुरेश वाकचौरे (162), अक्षरा सुनील शिर्के (154), स्वाती काशिनाथ डोके (146), भाग्यश्री संजय काळे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्य युद्ध सुरु आहे. यामध्ये पवार यांचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याने त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही, असं महत्त्वाचं विधान काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर थोरात यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देश सध्या ज्या परिस्थितीतून जातो आहे. अशा अडचणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे. यामध्ये पवार साहेबांचे मोठे महत्त्व आहे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लढाई करत…
