Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर : शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेली संत्री चोरून नेणाऱ्या एका अट्टल चोराला नगर तालुका पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, यामध्ये चोरीची संत्री, रिकामे कॅरेट आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दशमीगव्हाण येथील शेतकरी पोपट पांडुरंग म्हस्के यांनी त्यांच्या शेतात संत्री विक्रीसाठी नेण्याकरिता ११० रिकामे कॅरेट ठेवले होते. १९ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून संत्र्यांची चोरी केली. २० फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता शेतकरी शेतात गेले असता, त्यांना ९८ कॅरेटसह झाडांवरील फळे चोरीला गेल्याचे लक्षात आले. शेतात टेम्पोच्या टायरचे निशाण आढळल्याने त्यांनी…
अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून सध्या अभिषेक कळमकर फरार असल्याचे समजते. फिर्यादीनुसार, शिरूर तालुक्यातील पीडित युवती तीन महिन्यांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क साधला होता. नोकरीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर कळमकर यांनी तिला कागदपत्रांसह भेटीसाठी बोलावले. एमआयडीसी परिसरातील स्वतःच्या शाळेत कामाला लावून देतो असे सांगून त्यांनी पीडितेचा विश्वास…
झरेकाठी वार्ताहर: संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील आकांक्षा रवींद्र निकम ही तरुणी अहिल्यानगर येथे कामानिमित्त जात असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर अहिल्यानगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील मॅक्स सुपर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आकांक्षा बोल्हेगाव फाटा येथील एमआयडीसीमध्ये कंपनीच्या कामासाठी जात असताना, एका भरधाव मोटरसायकलने आणि विटांनी भरलेल्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता मोठी असून डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, तर संबंधित मोटरसायकल चालक मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आकांक्षाचे वडील रवींद्र चांगदेव निकम यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली…
आजचे राशीभविष्य: २१ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण वादाचे प्रसंग टाळण्यासाठी शब्दांवर ताबा ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल आणि मुलांकडून एखादी शुभवार्ता समजू शकते. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: बौद्धिक कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि नवीन योजना…
पुणे : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका १३ वर्षीय मुलीवर तिच्या आईच्याच मित्रानो लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तत्परता दाखवत २९ वर्षीय आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीची आई विधवा असून आरोपी ज्ञानेश्वर हा त्यांचा जुना मित्र असल्याने कुटुंबाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत, मुलीला शाळेत सोडण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला डीपी रोड परिसरात नेले. तिथे शाळेत पोहोचवण्याऐवजी त्याने गाडी थांबवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा मुलीला शाळेत पोहोचायला अर्धा तास उशीर झाला. मुलगी घरी परतल्यानंतर आईने…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सुरेश विठ्ठल सानप (वय ३४, रा. तिगाव) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:१५ ते २:३० वाजेच्या दरम्यान सानप कुटुंबीय घराशेजारील शेतात ज्वारी कापणीचे काम करत होते. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या बंद घराच्या मुख्य गेटचे कुलूप व कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील ५ हजार रुपये किमतीची साडेतीन ग्रॅमची सोन्याची नथ आणि ३५ हजार रुपये…
अकोले: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या अन्यायाविरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्या प्रेरणेमुळे त्या काळात सर्व समाज महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि स्वराज्याप्रति अतुलनीय निष्ठा दाखवली, त्या प्रेरणेचा शोध घेण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता निर्माण झाली आहे. आजचा समाज तोच असला, तरी शिवरायांच्या काळातील समाजातील विविध घटकांनी जी निष्ठा जपली, ती आजच्या समाजात तितकीशी दिसून येत नाही, असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी केले. तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे आयोजित शिवजयंती उत्सव, शाळेच्या संरक्षक भिंतीचा भूमिपूजन समारंभ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी अनिल…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण प्रशासनाने या उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून नागरिकांची सुटका झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार वाढल्याने शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. कमी दाबाने वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीपंप वारंवार बंद पडत होते, याचा थेट परिणाम पिकांना पाणी देण्यावर आणि शेती उत्पादनावर…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच याठिकाणी मराठी नाटकांचे प्रयोग सुरू होणार आहेत. ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत या नाट्यगृहाची पाहणी केली. संगमनेरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे या शहरात नाटक सादर करण्याची आपली अनेक दिवसांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे दामले यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. नाट्यगृहाच्या भेटीदरम्यान प्रशांत दामले यांनी संपूर्ण वास्तूची बारकाईने पाहणी केली आणि अद्ययावत सुविधांबाबत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले…
संगमनेर, प्रतिनिधी – समाजातील अठरापगड जाती-धर्मातील जनतेला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सामाजिक न्याय, समता, महिलांचा सन्मान, लोकशाही आणि शेतकऱ्यांप्रती असलेला आदर हे महाराजांचे जीवनकार्य आजही जगातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहात ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले. या महानाटकाने आजचा इतिहास आणि सध्याची सामाजिक स्थिती यावर जळजळीत भाष्य करत उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,…
