Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी- ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजित दादा पवार यांच्या आकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांनी आज पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले. याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. थोरात यांनी पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, 1990 पासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘पोक्सो’सह ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – सर्वांसाठी मानवाधिकार संघटना’ यांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, कलिम पठाण या सराईत गुन्हेगाराने पाच महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. पोलीस प्रशासनाने ३१ जानेवारी २०२६ रोजी आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी, घरफोडी, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीवर…
आजचे राशिभविष्य: मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळाल्याने प्रलंबित येणी वसूल होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करणे हिताचे ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. वृषभ आज तुम्हाला नशिबापेक्षा कष्टावर जास्त विश्वास ठेवावा लागेल. व्यापार किंवा व्यवसायात काही नवीन करार होण्याची शक्यता आहे, परंतु घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर…
संगमनेर, प्रतिनिधी – राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ यांची निवड करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे नाना स्मारक येथे रविवारी तालुका अध्यक्ष राम चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राच्या विशेष बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्र सेवा दलाची विचारधारा, समाजप्रबोधन, युवक संघटन आणि संविधान मूल्यांच्या संरक्षणासह लोकशाही बळकटीकरणावर भर देण्यात आला. आगामी काळात संगमनेर तालुक्यात संघटनेचा विस्तार करून सामाजिक, शैक्षणिक आणि लोकजागृतीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी…
संगमनेर, प्रतिनिधी – श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ‘ब’ वर्गात समावेश झाला असून, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावरून आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. हिवरगाव पावसा येथील प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड खंडोबा यात्रोत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी पत्नी नीलम खताळ यांच्यासह खंडोबा मल्हार मार्तंडाची महाआरती केली. यावेळी त्यांनी रथाचे सारथ्य करत भाविकांचा उत्साह वाढवला. यात्रोत्सवानिमित्त आयोजित अश्व व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. देवस्थान परिसरातील रस्त्यांची कामे आणि पुलाचा प्रश्न आधीच मार्गी लावला असून, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक व पाणीपुरवठ्यासाठीची उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण…
संगमनेर, प्रतिनिधी – मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याण्याऐवजी ते प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या आणि दिशाहीन सरकारचा दाखला असून, सर्वसामान्यांच्या हितापेक्षा केवळ घोषणाबाजीला यात प्राधान्य देण्यात आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आजच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही प्रभावी उपाय योजले गेलेले नाहीत. ठप्प झालेली वेतनवाढ, बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि खासगी गुंतवणुकीतील मंदी ही…
संगमनेर, प्रतिनिधी – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा असून, विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे एक खंबीर पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. आमदार खताळ म्हणाले की, या अर्थसंकल्पात बळीराजाच्या कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. ‘व्हर्च्युअल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स’ या बहुभाषिक एआय (AI) टूलमुळे शेतकऱ्यांना आधुनिक माहिती सहज मिळणार असून, कोकणातील नारळ बागायतदारांसाठीची विशेष योजना आणि मत्स्योद्योगातील तरतुदी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या आहेत. तरुणांच्या भविष्याचा विचार करून १५ हजार शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ आणि गेमिंग-VFX क्षेत्रात २० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा…
संगमनेर, प्रतिनिधी – अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल ३४ अट्टल गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे (तडीपारीचे) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राइम डेटाबेस’ तयार केला असून, त्याद्वारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीच्या प्रस्तावातील गुन्हेगार___ श्रीरामपूर शहर व तालुका- योगेश सचिन गुंजाळ (२३ वर्षे, बेलापूर बुद्रुक), भारत विष्णू धोत्रे (३० वर्षे, तीन बाजारतळ), तंजील गफार खान (२५ वर्षे, हुसेन नगर), प्रशांत संजय थोरात (२७ वर्षे, शिरसगाव), मनोज…
संगमनेर, प्रतिनिधी – भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या पायी दिंडीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील साईबाबा मंदिर परिसरात मुक्कामी असलेल्या दिंडीच्या पालखीतील ३६० ग्रॅम चांदीच्या पादुका आणि एक मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. घारगाव येथील ‘साई सह्याद्री तरुण मित्र मंडळाची’ पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे शिर्डीकडे प्रस्थान करत असताना २९ जानेवारी रोजी चंदनापुरी येथे मुक्कामी थांबली होती. शुक्रवारी (३० जानेवारी) पहाटेच्या सुमारास चोरट्याने संधी साधून पालखीतील चांदीच्या पादुका चोरल्या. त्याचवेळी मंदिरात झोपलेल्या एका भाविकाचा मोबाईलही लंपास करण्यात आला. सखाराम कुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या…
13 वर्षांहून अधिक काळ राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली त्या अजित पवारांचं अकाली जाणं ही महाराष्ट्रातील काम करणार्या तमाम कार्यकर्त्यांसाठी अपरिमित हानी होय. दादा आज आपल्यात नाहीत, याचं शल्य आज सारेच व्यक्त करत आहेत. दादांना त्यांच्या सडेतोडपणाला दोष देत होते ते आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेही हळहळत आहेत, यावरून या नेत्याची महाराष्ट्राची असलेली नाळ स्पष्ट दिसते. त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला अगदी सामान्यातला सामान्य माणूस खाली हाताने परत येईल, असं कधी झालं नाही. यामुळे प्रत्येकजण दादांच्या अकाली जाण्यावर हळहळला आहे. काम होणार नसेल तर होणार नाही, असं सांगणारा मंत्रालयातील एक मंत्री म्हणजे दादा होत. बेकायदा कामं आणू नका असं…
आजचे राशिभविष्य: मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्यात आर्थिक फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा ठरू शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे…
मुंबई: विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली असून, दिलीप वळसे-पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा…
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य आहे, अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मित्रांच्या मदतीने काही महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात. मिथुन मिथुन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात…
संगमनेर (प्रतिनिधी): नवीन लोकप्रतिनिधीचा कट्टर समर्थक अशी बिरूदावली मिरवून, स्वतःची लायकी नसताना सातत्याने कोणावरही अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिनेश फटांगरे या विकृत माणसाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेससह तालुक्यातील तरुणांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावरही अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने संगमनेर तालुक्यातून मोठी संतापाची लाट उठली असून, या प्रवृत्तीविरोधात आता नगरसेवकांसह नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत संगमनेर तालुक्यातील तरुणांनी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनेश फटांगरे या विकृत व विध्वंसक प्रवृत्तीने सातत्याने चांगल्या गोष्टींना विरोध केला आहे. सध्याचे नवीन लोकप्रतिनिधी यांचा कट्टर समर्थक म्हणून वावरताना त्याने…
संगमनेर, प्रतिनिधी – येथील पंचायत समिती जवळ असलेल्या ‘किसान ऑटोमोबाईल्स’च्या नवीन स्पेअर पार्टसच्या गोडाऊनला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील नवीन मोटार पार्टस जळून खाक झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार शेख शोएब फरीद यांच्या मालकीचे हे किसान ऑटोमोबाईल्सचे गोडाऊन असून, अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोडाऊनमध्ये ऑईल आणि रबरी पार्टस असल्याने आगीची तीव्रता प्रचंड वाढली होती. घटनेची माहिती देऊनही अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यास तब्बल दीड तासाचा विलंब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, नगरपालिकेचे अग्निशमन दल येण्यापूर्वी थोरात कारखान्याच्या फायर फायटरने…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर विकृत पोस्ट टाकणारा शिवसेना शिंदे गटाचा माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याच्यावर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग धरून त्याने ‘दैनिक युवावार्ता’चे संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ‘पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत’ पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या फटांगरे विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिनेश फटांगरे केवळ संपादकांची बदनामी करून थांबला नाही, तर त्याने विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्यावरही गलिच्छ भाषेत टीका केली आहे. या विकृतीचा निषेध…
अकोले, प्रतिनिधी – शेळकेवाडी (ता. अकोले) येथील ‘हॉटेल संकेत बार अँड लॉजिंग’ वर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (३० जानेवारी) धाड टाकली. या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेल मॅनेजरला अटक केली असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या हॉटेल संकेतमध्ये मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान लॉजिंगच्या…
संगमनेर: येथील रहिवासी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य भगवानराव जोशी सर यांच्या पत्नी मनिषा (वय ७५) यांचे गुरुवारी, (दिनांक २९ जानेवारी २०२६) सायंकाळी ५:०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जोशी परिवारावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागरिकांनी जोशी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पती प्राचार्य भगवानराव जोशी सर, पत्रकार गिरीश आणि श्रीहरी हे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनिषा जोशी या प्रेमळ आणि सुस्वभावी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी संगमनेर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस शुभ आहे. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल, त्यामुळे…
श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू विक्री विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राहाता तालुक्यातील निमगाव एम.आय.डी.सी. परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर यांनी या मोहिमेत हातभट्टीच्या गावठी दारूने भरलेले एक चारचाकी वाहन पकडले आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा क्रमांक MH.05.AJ.5794 असून, त्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू आढळून आली. याप्रकरणी आरोपी आकाश गोरख गायकवाड (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली गाडी आणि दारू असा एकूण १,३०,५०० रुपयांचा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला आहे. सदरची यशस्वी कारवाई…
