Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी लावून धरली आहे. तसेच घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. घटनेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : खरीप हंगामाच्या ऐन गर्दीत सातत्याने मागणी करूनही युरिया खत उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर सुमारे दीड तास आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले. महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रशासन व काही शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना मध्यस्थीची विनंती केली. थोरात यांनी तातडीने कृषी विभागाला शासकीय बफर स्टॉकमधील युरिया मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रशासनाने ती मागणी मान्य करताच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. नाशिक-पुणे महामार्गावर मंगळवारी सकाळपासूनच शेतकरी बांधव आणि महिला युरियासाठी पहाटे पाच वाजेपासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गरीब आणि गरजूंना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चा संगमनेरमधील मेडीकव्हर हॉस्पिटलने साफ बट्ट्याबोळ चालवला आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करत त्यांच्याकडून उघडपणे लाचेची उकळपटी करणाऱ्या मेडीकव्हर हॉस्पिटलमधील दोन बड्या धटिंगणांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. रुग्णाच्या आईवर उपचार करण्यासाठी आणि तिचे ऑपरेशन या योजनेतून करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डेटा एंट्री ऑपरेटर सुभाष धाडवड आणि त्याला खतपाणी घालणारा हॉस्पिटलचा मॅनेजर सुजित गायकवाड या दोघांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आवळल्या असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढती अनियमितता, परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थीविरोधी धोरणांमुळे तरुण वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी संगमनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या देशातील शिक्षण क्षेत्रात विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न, विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि विद्यार्थीहिताच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि युवकांमध्ये संतापाची लाट आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित असलेली सर्व महत्त्वाची कामे सहजासहजी मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील. व्यवसायात धनलाभाचे चांगले योग आहेत आणि जोडीदाराचा सल्ला अत्यंत लाभदायक ठरेल. वृषभ – आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. नाहक खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. व्यवसायात घाईगडबडीने कोणतेही आर्थिक निर्णय घेणे टाळा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर अधिक एकाग्रता ठेवण्याचा हा काळ आहे. मिथुन – आजचा दिवस खूप छान आणि लाभदायक सिद्ध होईल. बौद्धिक क्षमता आणि कार्यकुशलता वाढेल. नवीन लोकांशी झालेले संपर्क भविष्यात व्यवसायात फायदेशीर ठरतील. मुलांशी संबंधित असणारे प्रश्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान मोठा गोंधळ उडाला. कॉकरोच जनता पार्टीतर्फे (CJP) पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी व तरुण रस्त्यावर उतरले होते. संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला असता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संसद मार्ग आणि जंतरमंतर परिसरात जोरदार लाठीचार्ज केला. हाय-सिक्युरिटी झोनमध्ये जमा झालेल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र झटापटीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. रेल भवनजवळ पोहोचलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या सर्व तणावपूर्ण परिस्थितीमुळे संसदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी करणे, संवाद साधणे आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हीच खरी लोकशाहीची ओळख असते. मात्र, आंदोलकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणे हे स्पष्टपणे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर केला जात असेल आणि त्यांचे मतभेद दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीचा नाही तर हुकूमशाहीचा मार्ग आहे. सोनम वांगचुक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मन प्रसन्न राहील आणि आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. व्यापारात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरणात सलोखा राहील. प्रवासाचे योग येत आहेत, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी रुग्णालय प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने यात सुधारणा न केल्यास शिवसेनेच्या वतीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विनोद सूर्यवंशी हे आपल्या लहान बाळाला अँटी रेबीज लसीकरणासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता, तेथे आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर न्यायालयीन कामकाजाचे कारण सांगून गैरहजर होते, यामुळे अनेक पालक आपल्या आजारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मोहसीन शेख | संगमनेर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या, हातगाड्या आणि लहान दुकाने क्षणाचाही विलंब न लावता जमीनदोस्त केली. वर्षानुवर्षे कष्टाने उभा केलेला आपला उदरनिर्वाहाचा मार्ग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून अनेक गरीब व्यावसायिक भावनिक झाले होते. या कारवाईदरम्यान संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम अत्यंत पक्षपाती आणि निवडक पद्धतीने राबवली गेल्याची भावना संगमनेरकरांमध्ये निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप…
प्रवीण पुरो अनेक वर्षांच्या ब्रिटिश गुलामगिरीतून बाहेर पडलेला भारत आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना, या देशाच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बुजुर्ग शास्त्रज्ञाला लोकशाहीच्या बचावार्थ आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होय. दिल्लीतील मध्यवर्ती सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या असंख्य घटना या देशात घडूनही यंत्रणा मख्ख बनल्या आहेत. मुसोलिनीच्या सत्तेला जाब विचारणे त्याला अव्यवहारी वाटत होते. सत्तेविरोधात आंदोलन केले की ते दडपून टाकण्याची पद्धत होती; तीच पद्धत आता मध्यवर्ती सरकारने अवलंबलेली दिसते. मुसोलिनीप्रमाणेच मोदींनाही प्रश्न नकोसे झाले आहेत. दिल्लीत होणारी सरकारविरोधातील आंदोलने चिरडून टाकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा उघड वापर करून कुठल्याही परिस्थितीत आंदोलकांना दाद द्यायची नाही,…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणारा ठरेल. तुमच्या गुणांमुळे आणि प्रतिभेने तुम्ही लोकांना प्रभावित करू शकाल, ज्यामुळे समाजात तुमचे वर्तुळ वाढेल आणि महत्त्वाचे संबंध प्रस्थापित होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांचे आणि कार्यशैलीचे कौतुक होईल. आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास, जर तुम्ही हुशारीने निर्णय घेतले तर तुम्हाला अतिरिक्त धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळण्याची उत्तम चिन्हे आहेत, मात्र भागीदारीच्या कामात किंवा सहकाऱ्यांशी बोलताना ताणतणाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. मानसिक पातळीवर आज काहीशी चिंतेची किंवा तणावाची भावना राहू शकते, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश…
संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २५,०२४.८ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत एकूण २५ हजार ४.८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कल सोयाबीन आणि मका लागवडीकडे असून, बाजरीच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळाल्याने काही भागात ऊस लागवडही वाढत आहे, तर बदलत्या वातावरणामुळे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. सध्या तालुक्यात सोयाबीन ८,९४७.१ हेक्टर, मका ९,३४६ हेक्टर, बाजरी ३,६२५.९ हेक्टर, कापूस १,५९१ हेक्टर, भुईमूग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संगमनेर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाने नव्या आणि जुन्या फळीचा मेळ घालत आगामी काळासाठी आपली नवी टीम मैदानात उतरवली आहे. या नव्या नियुक्त्यांनुसार, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी अजय नारायण फटांगरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर, शहराध्यक्ष म्हणून सोमेश्वर सूर्यभान दिवटे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याचसोबत पक्षाचा लढाऊ चेहरा म्हणून ओळखले जाणारे अमोल भारत शेलकर यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…
नवी दिल्ली: देशातील विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उपोषणाचा आज २१वा दिवस होता. जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ आणि लाठीचार्जचे आरोप – पहाटेच्या वेळी जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस जेव्हा वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यासाठी आले, तेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद व शाब्दिक चकमक झाली. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियाद्वारे असा आरोप केला आहे की, आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास वाढल्याने नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील आणि जुने कर्ज फेडण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जातील. परंतु, इतरांच्या खाजगी गोष्टींमध्ये विनाकारण हस्तक्षेप करणे टाळलेले बरे राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. वृषभ – कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला अपेक्षित प्रगती पाहायला मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला मोठा आनंद मिळेल आणि दिवस प्रसन्न राहील. घेतलेली कामे तुम्ही अत्यंत जबाबदारीने आणि कौशल्याने पूर्ण कराल, ज्यामुळे वरिष्ठ आनंदी राहतील. आर्थिक आवक चांगली असली तरी वाढत्या खर्चावर थोडे…
प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी महाराष्ट्रातील हजारो शाळा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘यू डायस २०२५-२६’ च्या अहवालातून समोर आले आहे. राज्यातील एकूण १ लाख ८ हजार १३९ शाळा, २ कोटी १६ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि साडेसात लाख शिक्षकांच्या या अथांग शैक्षणिक परिघात अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. सरासरी एका शाळेत २०० विद्यार्थी आणि सात शिक्षक कार्यरत असतानाही, ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्था पुरती कोलमडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. डिजिटल शिक्षणाचा पाया असलेल्या वीज आणि इंटरनेटची राज्यात प्रचंड दुरवस्था…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: अकोले तालुक्यातील कोतुळ गावात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई करत ६ लाख ११ हजार २३० रुपयांचा बेकायदेशीर गुटखा, सुगंधित तंबाखू आणि एक कार जप्त केली आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. डॉ. कुणाल सोनवणे यांना कोतुळ गावातील रहिवासी शोएब शावीद काझी याने आपल्या घराजवळ एका स्विफ्ट कारमध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने पंचांसमक्ष…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे किंवा रखडलेले पैसे आज परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता आणि त्यात यशही मिळेल. घाईघाईत किंवा कोणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेणे टाळा, तसेच बोलताना संयम बाळगा कारण वाद होण्याची शक्यता आहे. वृषभ – आज तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याचा कमालीचा उत्साह दिसून येईल. तुमची मधुर वाणी आणि नम्र स्वभाव यामुळे तुम्ही इतरांची मने जिंकून घ्याल, ज्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीला भुलून जिओ कंपनीचा पेट्रोल पंप आणि त्याचा परवाना मिळवण्याच्या नादात अहिल्यानगरमधील एका व्यावसायिकाला तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जामखेड येथील कृषी सेवा केंद्र चालक उदय गुलाबराव शिंदे यांनी या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी दोन अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी फेसबुकवर सौरभ अग्रवाल याने टाकलेली पेट्रोल पंपाच्या डीलरशिपची जाहिरात पाहिली होती. तेथील लिंकवर प्रतिसाद दिल्यानंतर सौरभ अग्रवाल आणि स्वतःला ‘शिंदे इंजिनिअर’ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. या भामट्यांनी प्रोसेसिंग फी आणि इतर विविध मंजुरींच्या नावाखाली ऑक्टोबर…
