Author: Annant Ppangarkar

अहिल्यानगर – राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला‌.  सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब, कष्टकऱ्यांच्या पाठिशी कर्डिले नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार, प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण…

Read More

संगमनेर – शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विकासाला मोठा आधार मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून, शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व अनमोल आहे. भाकड जनावरांसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केली. राजहंस दूध संघ येथे आज (शुक्रवार १७ ऑक्टोंबर) वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हॉइस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे, गोरखनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले की, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध…

Read More

संगमनेर – माजी मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. थोरात म्हणाले की, कर्डिले यांच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी आणि ‘ग्रामीण शहाणपण’ असलेले लोकनेते हरपले आहेत. अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दुग्धविकास मंत्री म्हणून काम केलेले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांची भावना जाणणारे नेतृत्व होते, असे थोरात यांनी नमूद केले. तसेच, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम प्रभावी ठरले. मुद्देगिरीने बोलणारे आणि माणसांची कदर करणारे नेतृत्व गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड…

Read More

संगमनेर – वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या माध्यमातून देशभरात नावलौकिक मिळवणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाने आता संगमनेरच्या मनोरंजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. शहराच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून जाणवणारी अत्याधुनिक चित्रपटगृहाची पोकळी भरून काढत, या उद्योग समूहाने दोन पडद्यांचा समावेश असलेल्या ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’ची उभारणी केली आहे.आज (शुक्रवार, दि. १७) सायंकाळी या मल्टिप्लेक्सचा भव्य शुभारंभ होत आहे. या नव्या मल्टिप्लेक्समुळे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक येथे करावी लागणारी ‘वारी’ आता थांबणार आहे. ‘गाय छाप’मुळे देशात परिचित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाने गेल्या दोन दशकांत वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या क्षेत्रात मोठी व्यावसायिक क्रांती घडवली आहे. शिर्डी येथील वॉटरपार्कपासून सुरू झालेला हा प्रवास आशिया खंडातील…

Read More

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तांबे म्हणाले की, ‘प्रस्थापित नसतानाही आपल्या कर्तृत्वाने दोन दशकांहून अधिक काळ अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे कर्डिले साहेबांचे जाणं अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारं आहे. दुःख व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले तांबे… प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून मागील दोन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वातून एक वेगळाच दबदबा निर्माण करणारे माजी मंत्री, राहुरी विधानसभेचे आमदार व अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि…

Read More

अहिल्यानगर: भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून कर्डीले यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे शिवाजीराव कर्डीले यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तेथे आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. राहुरीच्या आमदारकीसोबतच शिवाजीराव कर्डीले यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही होते. अनेकदा…

Read More

आजचा दिवस धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण एकादशी आणि दिवाळीची सुरुवात यानिमित्ताने होत आहे. आज रमा एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होते, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच आज वसूबारस आहे. मेष (Aries): व्यस्तता आणि धावपळ राहील पण आर्थिक लाभ होतील. व्यवसायाच्या योजना भविष्यात फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. अतिउत्साहात जास्त खर्च टाळावा. वृषभ (Taurus): मित्रांच्या भेटीचे योग आहेत. मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन संधी मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मिथुन (Gemini): व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सर्जनशील कामात यश आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कर्क (Cancer):…

Read More

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यात असलेल्या चंदनापुरी घाटात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. संगमनेरहून साकुरच्या दिशेने निघालेली एसटी बस (एमएच ०७ सी ९२५२) चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणाजवळ साईड गटारीच्या अंदाज न आल्याने बसच्या डाव्या बाजूची चाके गटारात गेल्याने बस एका बाजूला पलटी झाली. मात्र शेजारीच डोंगर असल्याने ती डोंगरावर कलल्यामुळे या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरहून साकुरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस जेव्हा चंदनापुरी घाटातून प्रवास करत होती, तेव्हा धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर पलटी झाली. अपघात होताच…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरामध्ये एका कॉलेजमध्ये मजुरी करणाऱ्या महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीतून समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात या संदर्भातील अधिक माहिती समोर येणार आहे.  एका तीस वर्षीय वयाच्या महिलेने या संदर्भात आरोपी विरोधात फिर्याद दिली असून आरोपीचे पूर्ण नाव अद्याप उपलब्ध झाले नाही. या संदर्भात मंगळवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत चांगुलपणाचा आव आणीत तिचा गैरफायदा घेत तिचे सोबत 4 एप्रिल 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 यादरम्यान पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे म्हटले…

Read More

श्रीरामपूर – १२ ते १६ ऑक्टोंबर दरम्यान निर्मळ पिंपरी येथे आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेच्या निमित्ताने देश-परदेशातून जमलेल्या लाखो भाविकांची हातसफाई करत त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या, दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्यीय टोळक्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २३ महिलांसह २६ आरोपींना अटक केली. यांच्या विरोधात लोणी (राहाता), शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. कथेदरम्यान भाविकांचे मौल्यवान दागिने वस्तू चोरी जात असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक…

Read More

संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रलंबित समस्या आणि शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांच्या व्यापक हितासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रभावी पाठपुरावा केला. या भेटीत बाजार समितीच्या एकूण कार्यप्रणालीत अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बदल घडवून आणण्यासाठी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. आमदार तांबे यांनी बाजार समितीच्या आर्थिक सुविधा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता बोलून दाखवली, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर आणि थेट फायदा मिळेल अशा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली. त्यांनी विशेषतः बाजार समितीतील व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणणे, हमाल-माथाडी कामगारांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे, व्यापाऱ्यांसाठी सुलभ आणि…

Read More

अहिल्यानगर: ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना पत्र सादर करून राजीनामा दिला आहे. फाळके यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, त्यांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन २०१८ मध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जवळपास सात वर्षांच्या काळात त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवार…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक धनलाभाचा योग आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. घाईगर्दीत कोणताही निर्णय घेणे टाळा. वृषभ (Taurus): आज तुम्ही भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील आणि कामे पूर्ण झाल्यामुळे आनंदी राहाल. मिथुन (Gemini): कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने झुकू शकतात. तुमचे सकारात्मक आणि संतुलित विचार समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने कामात उत्साह वाटेल. व्यवसायामध्ये नवीन…

Read More

संगमनेर – आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सच्चा शिवसैनिकांचा सन्मान करत उमेदवारी दिली जाणार आहे. विरोधकांना या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ताकद दाखवून दिली जाईल. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाणार असली तरी आघाडी झाली नाही तर सर्वत्र संपूर्ण ताकतीने उमेदवार दिले जाणार असून त्यांच्या विजयासाठी पराकाष्टा केली जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सचिन होते यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळते जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पक्षाने पदावरून हटविल्यानंतर शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्हा प्रमुखपदी सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. नवनियुक्त दोन्ही जिल्हा प्रमुखांनी मंगळवारी…

Read More

नाशिक – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी नाशिकमध्ये एक धक्कादायक फसवणूक केली आहे. न्यायव्यवस्थेचा धाक दाखवून ७२ वर्षीय सेवानिवृत्त वयोवृद्धास ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल ७२ लाख रुपये आरटीजीएसव्दारे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. १२ ऑक्टोबर रोजी ही मोठी रक्कम लाटण्यात आली असून, शहर सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक गंगापूर रोड परिसरात राहतात. २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अज्ञात सायबर चोरट्यांच्या टोळीने त्यांना लक्ष्य केले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी सप्टेंबरच्या अखेरीस सरन्यायाधीश नाशिकमध्ये आले असतानाच, चोरट्यांनी त्यांच्या नावाचा वापर केला. चोरट्यांनी वयोवृद्धाच्या दैनंदिन बँक खात्याची…

Read More

अकोले – अकोले तालुक्यातील देवठाण येथे एका तीन वर्षीय निरागस मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. कुमारी कविता लहानू गांगड (वय ३) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे देवठाण आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवठाण शिवारातील हिवरगाव रस्त्यावर लहानू गांगड यांचे कुटुंब राहते आणि एका शेतकऱ्याकडे ते जमीन वाट्याने कसत आहेत. मंगळवारी सायंकाळी लहानू गांगड हे शेतात गेले होते, तर त्यांची आई घरात होती. घरातून बाहेर अंगणात कविता एकटीच खेळत असताना, सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तिला उचलून नेले. घटनेची…

Read More

मेष – आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे. चंद्र गोचर तुमच्यासाठी शुभ योग घेऊन येत आहे, ज्यामुळे तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. विशेषतः बँकिंग आणि आर्थिक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. बऱ्याच दिवसांपासून असलेली एखादी चिंता किंवा अडचण आज दूर होऊ शकते. जीवनसाथीकडून तुम्हाला चांगले सहकार्य प्राप्त होईल. घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात तुमचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल, कारण मानसिक भटकावामुळे शिक्षणात अडथळे येऊ शकतात. लहान मुलांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि आज तुम्हाला एखादे सुंदर उपहार मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शरीर आणि मनाने स्वस्थ आणि…

Read More

संगमनेर – काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दीपावलीनिमित्त ऊस उत्पादकांना मोठी भेट दिली आहे. २०२४-२०२५ हंगामात गाळप झालेल्या उसासाठी प्रति टन २०० रुपयांप्रमाणे ऊस विकास अनुदान ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. ऊस विकास अनुदान, ठेव व ठेवीवरील व्याज, आणि कामगार बोनस अशा एकूण २५.१० कोटी रुपयांची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. ३२०० रुपये प्रति टन उच्चांकी भाव – कारखान्याने प्रति टन २०० रुपयाप्रमाणे रक्कम वर्ग केल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना यंदा प्रति टन…

Read More

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. मतदार याद्यांमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींवर यावेळी आयोगाचे लक्ष वेधण्यात आले. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, मतदार यादीत लाखो बनावट नावे समाविष्ट असल्याचे आणि अनेक पत्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही त्या ठिकाणी मतदार नोंदवले गेल्याच्या गंभीर त्रुटी शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. या पार्श्वभूमीवर, तांत्रिक साधनांचा वापर करून दुबार मतदार व संशयास्पद नोंदींची तत्काळ छाननी करावी, या त्रुटी त्वरित दुरुस्त…

Read More

अहिल्यानगर: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून प्रारुप आरक्षणाची अधिसूचना १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील एकूण सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियांसाठी (सर्व प्रवर्गांमधील) आरक्षित ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. या प्रारुप आरक्षणासंदर्भात कोणाच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्या लेखी स्वरूपात १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे. पंचायत समितीशी संबंधित…

Read More