Author: Annant Ppangarkar

संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या अवकाळी पावसाने आणि पठार भागातील काही गावांमध्ये झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत जांबुत खुर्द आणि जांबुत बुद्रुक या दोन गावांना सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे १२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहर आणि तालुक्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणगाव, साकूर, घारगाव, जांबुत यांसह अनेक गावांत पाऊस झाला, मात्र पठार भागातील काही ठराविक पट्ट्यात पावसासोबतच मोठी गारपीट…

Read More

दैनिक राशिभविष्य: २२ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापारामध्ये वृद्धी होईल आणि नवीन गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवणे फायदेशीर ठरेल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. नोकरीमध्ये कामाचा ताण जाणवेल,…

Read More

संगमनेर | मोहसीन शेख  तालुक्यातील वडगाव पान येथे तीन दिवसांपूर्वी एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा विविध स्तरांतून तीव्र निषेध केला जात असतानाच, संगमनेर शहरातील मुस्लिम समाजाने रमजान ईदच्या निमित्ताने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मुस्लिम बांधवांनी आज पीडित मुलीच्या निवासस्थानी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचा हात दिला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे पीडित कुटुंब सध्या मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. अशा कठीण काळात त्यांना धीर देण्यासाठी संगमनेर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुढाकार घेतला. ईदचा सण असतानाही त्याचे औचित्य साधत मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी पीडित…

Read More

अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील तहसील कार्यालयात आपली ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या राहुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत मंजूर झालेले ३० हजार रुपये मिळवून देण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने सापळा रचला आणि बाबासाहेब राऊत याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.…

Read More

आजचे सविस्तर राशिभविष्य : शनिवार, २१ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा उत्साह घेऊन येईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल असून नशिबाची उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. वृषभ आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. गुंतवणुकीचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. मिथुन व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस प्रगतीकारक राहील. नवीन…

Read More

मुंबई: नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रूपाली चाकणकर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे. खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे आणि त्याच्यासोबतचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून त्या कार्यालयात उपस्थित नव्हत्या आणि आपल्या पथकाच्या संपर्कातही नसल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला एका ३५ वर्षीय महिलेवर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रंगारगल्ली परिसरातील शनिमंदिरासमोर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम गेल्या १५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत टाकून देण्यात आले आहे. ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून अन्य कामांकडे लक्ष वळवल्याने या भागातील रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यामुळे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी आणि भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रंगारगल्ली परिसरातून शनिमंदिर, स्वामी समर्थ मंदिर, साईबाबा मंदिर, संतोषी माता मंदिर आणि गंगामाई मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. प्रवरा नदी तीरावर जाण्यासाठी देखील हा मुख्य मार्ग आहे. मात्र, या ठिकाणी एसटीपीच्या कामासाठी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी समाजाचे स्वप्न पाहिले, मात्र दुर्दैवाने त्यांचे हे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण अद्यापही पूर्णतः यशस्वी झालेलो नाही, अशी खंत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथील प्रवरा नदीकाठच्या गंगामाई घाटावर भव्य ‘अभिवादन सभा’ झाली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक लढ्याला मानवंदना दिली. डॉ. तांबे म्हणाले, १९२७ मध्ये महाड येथे झालेला हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो…

Read More

आजचे सविस्तर राशिभविष्य : शुक्रवार, २० मार्च २०२६ ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाला नवी ओळख मिळेल. जुन्या प्रलंबित कामांना गती मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असून जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. ​वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजित गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. घरातील वडीलधार्‍यांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला मोठा लाभ होईल. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवा. ​मिथुन: तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही आज कठीण…

Read More

अहिल्यानगर, प्रतिनिधी –  पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सावेडी उपनगरातील अशोकनगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी रवींद्र नारायण राजहंस हे सावेडी येथील जॉगिंग पार्कजवळ थांबलेले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून दिली. त्यांनी एका पत्त्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने राजहंस यांचा विश्वास संपादन केला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश्य द्रव पदार्थ एकूण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अमानवीय कृत्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (१७ मार्च) घडली. पीडित मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात असताना हाडकीच्या ओढ्याकडून जाणाऱ्या महादेव मळ्याकडील कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाने तिला अडवले. साधारण ३२ ते ३५ वयोगटातील या व्यक्तीने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवले आणि अचानक आपल्याकडील बाटलीतील अ‍ॅसिडसदृश द्रव पदार्थ तिच्या तोंडावर उजव्या बाजूने फेकला.  या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संगमनेरच्या एका मळ्यात घडली. पीडित मुलगी ही आपल्या ओळखीच्या एका घराकडे खाऊ आणण्यासाठी जात असताना, आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने निर्जन ठिकाणी मुलीचा हात पकडून तिला ओढत नेले आणि तिचे कपडे काढून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या ३६ वर्षीय मातेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध…

Read More

शिर्डी, विशेष प्रतिनिधी- तीर्थक्षेत्र शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आस्था सिंग (रा. सतना, मध्य प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव शिवार येथील ‘हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम’मध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे. पाडव्याच्या दिवशी समोर आलेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणे समोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आस्था सिंग आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी बुधवारी या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. मात्र, त्याच रात्री उशिरा आस्था राहत असलेल्या खोलीतून जोरात ओरडण्याचे आणि…

Read More

नाशिक रोड (प्रतिनिधी): इतिहास सांगतो की ज्या-ज्या वेळी शेअर बाजार कोसळतो, त्यानंतर तो पुन्हा सावरतो आणि वाढतो. सध्या इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या मनातही चिंतेचे युद्ध सुरू आहे. मात्र, अशा काळात विचलित न होता संयमाने गुंतवणूक सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुमची गुंतवणूक मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीनंतरचे नियोजन अशा दीर्घकालीन ध्येयासाठी असेल, तर युद्धाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या मनातील भीतीचे युद्ध थांबवा, असे प्रतिपादन तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. नाशिक रोड येथील जय भवानी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे हॉटेल हरियालीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘म्युच्युअल फंडाद्वारे पेन्शनचे नियोजन व सायबर सिक्युरिटी’ या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रमात…

Read More

आजचे राशीभविष्य: गुरुवार, १९ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होऊन वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने चालल्यास मोठे लाभ होतील. मिथुन: आज तुम्हाला बौद्धिक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीकारक ठरेल.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर झालेल्या अमानवीय ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या भ्याड हल्ल्यातील आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाद्वारे शिवसेनेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये पीडित विद्यार्थिनीला तातडीने उत्तम वैद्यकीय उपचार आणि शासनाकडून भरीव आर्थिक नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर भरदिवसा झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी वडगाव पान आणि तळेगाव फाटा परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी महामार्ग अडवत जोरदार ‘रास्ता रोको’ केला आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांसह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही संतापजनक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातील रस्ते विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमांतून रस्ता अनुदानासाठी एकूण १५७.६० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या मोठ्या निधीतून संगमनेर शहराच्या वाट्याला ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले होते.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शालेय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.  या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, सुवर्णकार समाज संघटनेसह सराफ, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, मेनरोड या शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता आपला तीव्र निषेध नोंदवला. प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस ठाण्यावर नेलेल्या मूक मोर्चेकर्‍यांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपाधीक्षक कार्यालयाचे मोरे आणि नायब तहसीलदार माळवे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे काल एका अल्पवयीन मुलीवर ॲसिडसदृश पदार्थाने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अद्याप आरोपींचा पत्ता लागलेला नसला तरी दहा पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२४(१) आणि १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह सायबर…

Read More