Author: Annant Ppangarkar
ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ मंगळवार, दि. ३ सप्टेंबर मुंबई : ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा आयोजन मुंबई येथे मंगळवारी करण्यात आले होते. “विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण” अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई / संगमनेर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा मागण्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मान्य कराव्या, असा इशारा देत एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूरसह राज्याच्या अनेक भागातील कर्मचारी संपात उतरल्याने आता ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबलेली दिसत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी सोमवारी राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात आली, तर मंगळवारपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्यावतीने निदर्शने व द्वारसभा आयोजित करण्यात आली होती, त्याचवेळी सरकारला संपावर जाण्याचा…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगमनेरमधील वकील शरीफ पठाण आणि त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार घडला होता. हल्ल्याच्या घटनेपासून फरार असलेल्या आरोपींना संगमनेरच्या न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता औरंगाबाद खंडपीठातही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले आहे. ॲड. पठाण यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा ते मागे घेत नाहीत, या कारणावरून अशपाक इब्राहिम पटेल (रा. साकुर), सादिक रज्जाक शेख, आयाज रज्जाक शेख, आयान सादीक शेख, जुनेद सादीक शेख, कदीर नुरमोहम्मद उर्फ लतिफ शेख, इमरान बशीर शेख (सर्व रा. संगमनेर) यांनी वकील शरीफ शेख आणि त्यांच्या भावाला शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ कोयता, गज, दांडके, हॉकी स्टिकच्या…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी…
आजचे राशीभविष्य मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर २०२४ मेष – जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. आज कोणावरही विसंबून राहू नका. आळस करू नका. भाग्य तुमच्या पाठीशी आहे. वृषभ – आज अचानक धनलाभ संभवतो. शुभ दिवस परंतु अतिशय खर्चिक असा दिवस. आज शक्यतो प्रवास करू नका. मिथुन – संतती आज आपल्याला खुश ठेवेल. संध्याकाळ नंतर आर्थिक समस्या सुटतील. कर्क – आज घरी बसा, आराम करा. आनंदी दिवस. मध्यांनी मात्र मानसन्मानाची आणि होण्याची शक्यता. सिंह – प्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी. आजचा दिवस भाग्यशाली. आज जे मागाल ते मिळेल. कन्या – आईकडच्या नातलगाकडून, मामा कडून आर्थिक फायदा संभवतो. मान सन्मानात वाढ होईल. तुळ…
सोमवार, ०२ सप्टेंबर वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे रविवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणावेळी आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. यातून मुस्लिम समाजाच्या भावना देखील मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या आहेत. नितेश राणेंनी मुस्लिम समुदाय विषय केलेले वक्तव्य त्यांना भोवले असून सामाजिक कार्यकर्ते आसिफ चांदसाहब शेख त्यांच्या तक्रारीवरून नगरच्या तोफखाना पोलीस…
गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ सोमवार, दि. २ सप्टेंबर पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली असून रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान आंदेकर यांचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आंदेकर यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचा देखील तपास केला जात असून या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते.…
जाणून घ्या… आजचे राशीभविष्य सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४ मेष – आज भाग्येश शनी कर्म स्थानात असल्याने बऱ्याच दिवसानंतर अडकलेली कामे मार्गे लागतील. आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदाराबरोबर सहलीचा आनंद घ्याल. वृषभ – व्ययेश मंगळ धनस्थानी असल्याने अचानक प्रवासाचे योग. अचानक खर्च वाढतील. ओळखीचा कोणालाही फायदा घेऊ देऊ नका. मिथुन – जन्मस्थानी असलेल्या मंगळामुळे आज तुमच्या स्वभावातील शांतता भंग पावेल. कर्क – अचानक धनलाभाचे योग येतील. आज जोडीदार तुम्हाला समजून घेईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक समस्या दूर होतील. सिंह – जन्मस्थानी असलेल्या सूर्य चंद्रामुळे नोकरीच्या ठिकाणी प्रकर्षाने आपला प्रभाव जाणवेल. अडकलेली कामे पूर्णत्वास न्याल. कन्या – आर्थिक फसवणूक होऊ…
निळवंडे धरण, कालवे नक्की कोणी केले हे जनतेला माहिती सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सभा उत्साहात रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम केले, मात्र ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता फोटो काढत आहे. मात्र वस्तुस्थिती तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. भेदभाव निर्माण करत चांगल्या वातावरणात काही लोक विष कालविण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करत दहशत निर्माण करत आहे. मात्र अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांचा पुढील काळात बंदोबस्त करू, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विरोधकांना फटकारले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – फॅब्रिकेशन व्यवसायासाठी भागीदार म्हणून घेतलेल्या बाप-लेकाची न वटणाऱ्या धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राध्यापकाला दोन गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने कारावास आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दोन खटल्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. ईश्वर देविदास फापाळे (रा. घोडेकर मळा, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. या संदर्भात सुरुवातीला मुरलीधर किसन काकडे यांनी संगमनेरच्या न्यायालयात सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यावसायिक प्राध्यापक ईश्वर देविदास फापाळे यांच्या विरोधात प्रत्येकी दीड लाखाचे दोन आणि साडेतीन लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स १३८ प्रमाणे ॲड. राजेश भुतडा यांच्यामार्फत…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – कायद्याची पायमल्ली करत, राजरोसपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचे तीन टन गोमांस आणि तीन लाखाची पिकअप जीप जप्त केली आहे. गेल्या काही दिवसातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार झाला आहे. सादिक मुनीर शहा (वय २५ वर्ष, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या आरोपीचे नाव असून कारवाई केलेल्या कत्तलखान्याचा चालक असलेला कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा.…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर तालुका दूध संघासह तालुक्यात गाव पातळीवरील संस्थांवर सौर ऊर्जा युनिट बसविले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकी ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत १२५० गाईंचा गट करून २५ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, रक्त तपासणीसह गाय भरणीसाठी दूध संघाच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची (राजहंस दूध) वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार थोरात यांच्या उपस्थितीत आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ.…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर जगाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश देणारे, हिंदवी स्वराज्याचे कर्तेधर्ते, महाराष्ट्राचं अराध्य दैवत, राजाधिराज, योगीराज छत्रपती शिवाजी महाराज जिथे असतील तिथे आज काय म्हणत असतील? ज्या राज्याच्या आणि देशाच्या कल्याणासाठी जिवाचं रान केलं त्या राज्यात होत असलेल्या अवहेलनेने राजे निश्चितच अश्रू ढाळत असतील. ते आज आहेत, अशी साधी कल्पनाही या सत्तेला चिरडून टाकण्याला कारण ठरली असती. ज्या छत्रपतींच्या अवमानतेची एकही संधी ज्यांनी सोडली नाही, ते आज चार-चारदा माफी मागायचं ढोंग करत आहेत. माफी मागितली म्हणजे सारी पापं धुवून निघाली, अशी त्यांची धारणा झालेली दिसते. यामुळे कोणीतरी चिरकूट वरळीत गोविंदांच्या नाच्यांमध्ये महाराजांची माफी मागतो. ह्यांना जनाची नाहीच पण मनाचीही…
आजचे राशीभविष्य रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ मेष – दशमेश स्वस्थानी असल्याने उत्साही दिवस. राहू नेपच्यून अचानक लांबचे प्रवास योग दर्शवतात. सगेसोयरे, नातलग आज तुमच्यावर अतिशय खुश असतील. वृषभ – जन्मस्थानी असलेले हर्षल गुरु आज भरभरून आर्थिक लाभ दर्शवतात. सप्तमेश मंगळ धनस्थानी डोळ्याला इजा दर्शवितो. डोळ्यांबाबत सावध राहा. मिथुन – आज कटकटीचा दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे व्यवहार सुरळीत होतील. धनस्थानातील चंद्र, बुध आर्थिक समस्या सोडवतील. कर्क – जन्मस्थानी असलेले चंद्र बुध मानसिक शांतता प्रदान करतील. भाऊबंद, सगेसोयरे मात्र आजच्या दिवशी त्रास देण्याची शक्यता. सिंह – स्वस्थानी असलेला रवी व सप्तमात असलेला शनि मंद गतीने प्रगती दर्शवितो. आजच्या दिवशी…
शनिवार, दि. ३१ ऑगस्ट संगमनेर – चुलत भावांमधील वादातील शेत जमीन नांगरल्याचा राग येऊन रात्रीच्या वेळी कुऱ्हाडीने वार करत तर अन्य आरोपींनी काठ्या, लाथाबुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका आरोपीला दोषी ठरवत पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य पाच आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. सुरेंद्र देवराम तांगडकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिंद्र देवराम तांगडकर या अन्य आरोपींचा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या समावेश आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शनिवारी या…
शनिवार, ३१ ऑगस्ट “महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, तसंच…
शनिवार ३१ ऑगस्ट शिर्डी – सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती…
शनिवार, दि. ३१ऑगस्ट पालघर : १३ दिवस झाले तरी गावाकडील आई वडील आणि बहिणीची संपर्क झाला नाही. त्यामुळे मनात हजारो शंका निर्माण होत चलबिचल सुरू झाली आणि त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडील घरी जाऊन दरवाजा उघडून बघतो तर काय, घरात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीत त्याला आई-वडिल आणि बहिणीचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आले. समोरच दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. राज्यात दररोज येथे धक्कादायक घटना समोर येत असतानाच या घटनेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात…
शनिवार, ३१ ऑगस्ट नागपूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार फुके यांच्या मृत भावाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार परिणय फुके, फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (वय ७२), आई रमा (वय ६७), नितीन फुके (वय ४०), पत्नी डॉक्टर परिणीता फुके (वय ४१) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुके यांचे मृत भाऊ संकेत फुके यांची पत्नी प्रिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार संकेत फुके यांना किडनीचा आजार होता. लग्नाच्या वेळी फुके…
शनिवार, ३१ ऑगस्ट शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये येत असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंदोबस्तासाठीच्या ताफ्यातील पोलीस जीपला अपघात झाला. अपघातग्रस्त जीपने अन्य काही वाहनांना धडक दिल्याने या वाहनांचेदेखील नुकसान झाले तर अपघातात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे जखमी झाले आहे. अपघातातील जखमींवर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन उपस्थित होते. महसूल मंत्री राधाकृष्ण…
