Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील अवैध व्यवसायांवर आणि अतिक्रमणांवर प्रशासनाने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर नगर परिषद आणि शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या तब्बल सात अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर फिरवून ते पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध कत्तलखाना चालकांचे धाबे दणाणले आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, कादरी नगर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष मोहिमेचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी संगमनेर नगरपरिषदेने वेदांत वाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर दररोज सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. मद्य खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हा मार्ग शहरातील प्रमुख व वर्दळीचा असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. तसेच काही मद्यधुंद व्यक्तींकडून परिसरात गोंधळ घालण्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदारांची मिलीभगत आता सामान्य नागरिकांच्या जीवावर उठू लागली आहे. प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील शनी मंदिरासमोर अवघ्या एक महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला दगडी रस्ता महिना उलटायच्या आतच पूर्णपणे उखडला आहे. प्रशासनाच्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे संगमनेरकर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत प्रशासकीय ढिषाळपणाचे जाहीर वाभाडे काढले आहेत. तसेच प्रशासनाला जागे करण्यासाठी थेट ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलनाचा सणसणीत इशारा दिला आहे. रस्ता की मृत्यूचा…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचे वातावरण राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, मात्र नवीन कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक दडपण कमी होईल. व्यापारात धनलाभाचे योग असून नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यास मदत करेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधुर होतील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि अतिक्रमणमुक्त मोहिमेअंतर्गत संगमनेर नगरपालिका प्रशासनाने आज मोठी कारवाई केली. अकोले बायपासवरील बीएड कॉलेजसमोरील अनधिकृत भाजीपाला मार्केट पालिकेच्या पथकाने पूर्णपणे हटवले. मात्र, या कारवाई दरम्यान पालिका कर्मचारी, पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागून पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात दोन कर्मचाऱ्यांचे कपडे फाटल्याची धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी एका विक्रेत्याला ताब्यात घेतले असून त्याने मद्यप्राशन केले असल्याचे बोलले जात आहे. संगमनेर नगरपालिकेने शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्ते आणि चौक मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील पेटीत हायस्कूल परिसरातील चौकात…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली असून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयाला धुडकावून लावत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर स्वतः अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी राज्यातील तब्बल ८१ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र ठरवून महायुती सरकारने महिलांच्या विश्वासाला तडा दिला असून ही महिलांची सरळसरळ फसवणूक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवून मतदान केले म्हणूनच हे सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेत आल्यानंतर त्याच महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने केले आहे. ८१ लाख महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे त्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरण्यासारखे आहे, असे थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा ढासळत चालली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहरातून बुलेट दुचाकीच्या सायलेन्सर मधून मोठमोठे आवाज काढत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू साळुंखे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून बस स्थानक आणि नवीन नगर रोड परिसरात हा युवक आपल्या बुलेटमधून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढून नागरिकांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून स्थानिक व्यापाऱ्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सावंत यांनी या तरुणावर पाळत ठेवली. दुपारच्या सुमारास हा युवक पुन्हा बस स्थानक परिसरात आपल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: समनापूर बायपास चौफुली येथे महिनाभरापूर्वी झालेल्या गंभीर आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार आणि जुनेद शेख यांना अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अरबाजला पोलिसांनी थेट पुण्यातून ताब्यात घेतले, तर जुनेदला संगमनेरमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे संगमनेर आणि परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सुमारे एका महिन्यापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी फिर्यादीवर चाकूने तब्बल ७ वार केले होते.…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या मोठ्या बदलांमधून जात आहे. बँक खात्यांची पडताळणी आणि ई-केवायसी मोहिमेनंतर या योजनेतील तब्बल ८१ लाख महिला अपात्र ठरल्या असून, सध्या लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ६६ लाखांवरून १ कोटी ८५ लाखांवर आली आहे. योजनेच्या सुरुवातीला २.४० कोटी लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र बँकांकडून मिळालेल्या माहितीनंतर बनावट लाभार्थी, पुरुष, सरकारी कर्मचारी आणि प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तींनीही याचे लाभ घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे राज्य सरकारने पडताळणीची प्रक्रिया कडक केली असून, यामुळे शासनाची दरमहा १२०० कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. याशिवाय, ६५ वर्षांवरील वयोमर्यादेच्या अटीमुळे सुमारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकाम, तीव्र ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरच्या त्रासाला कंटाळून अखेर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आजपासून (१ जून) उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. गावालगत अव्याहतपणे सुरू असलेल्या या खाणकामामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय, क्रेशरमधून उडणाऱ्या धूळ प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि…

Read More

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र अखेर संपले असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी तब्बल ११ जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचा तिढा सुटून उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे आता राज्यातील विधानपरिषदेचा हा रणसंग्राम अधिकच चुरशीचा आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ४ जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. जागावाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित होताच भारतीय जनता पक्षाने…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. मानसिक शांतता लाभेल आणि जुन्या चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, विशेषतः जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल असून आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत कमालीचे यश मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गतीने पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन भागीदारी किंवा करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. समाजात मान-सन्मान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून शोरूमचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एका ग्राहकाला आणि त्यांच्या ज्येष्ठ सासऱ्यांना लोखंडी रॉड, स्क्रू-ड्रायव्हर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह १० ते १५ अनोळखी कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोरूमसारख्या सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणी ग्राहकाला झालेल्या या अमानुष मारहाणीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात स्वप्निल रोहिदास सातपुते (वय २५, रा. कासारा दुमाला, संगमनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी…

Read More

प्रवीण पुरो – राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी आपल्याकडे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेवर खरोखरच उपकार केले आहेत. महेश झगडे यांच्यानंतर त्या तोडीचा अधिकारी या खात्याला मिळाला आणि राज्यातील जनतेला हायसे वाटले असल्यास नवल नाही. मुंढेजी, सनदी अधिकारी म्हणून आपल्याकडे आजवर आलेल्या जबाबदाऱ्यांना आपण न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी कमी पडलात, तिथे आपल्यावर टीकाही झाली. तरीही जिथे जाऊ तिथे जनतेला न्याय देऊ, हे ब्रीद घेऊन आपली वाटचाल सुरू आहे, याचे समाधान आहे. राज्यातील भ्रष्ट खात्यांचा आणि त्या खात्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम आपल्या नावावर नोंदले गेले आहेच. पण तिथे वावरणाऱ्या दलालांचाही बिमोड आपण…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि सकारात्मक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक क्षेत्रात जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. अडकलेली कामे गतीने पूर्ण होतील आणि मनातील चिंता दूर होईल. व्यापारी वर्गाला आज मोठा आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. घरात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याचे नियोजन होऊ शकते. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे विचार मनात येतील. मानसिक…

Read More

समनापूर | बाबा जाधव: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून समनापूर येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी विचार मंचच्या वतीने आयोजित या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या कमालीचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महोत्सवाची सुरुवात उद्या रविवारी (३१ मे) सकाळी ठीक ९ वाजता समनापूर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या शासकीय पूजनाने होईल. यानंतर सोहळ्याचा मुख्य आणि भव्य कार्यक्रम मंगळवारी (२ जून) सायंकाळी ६ वाजता स्थानिक मालोबा मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. मुख्य कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्शवत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा विशेष सत्कार करून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव व पीकविमा मिळत नसल्याने सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, कुटुंबातील सदस्यांसह आनंदात वेळ बितेल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये कमालीचे यश मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. कौटुंबिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण सुनावणी दरम्यान, विविध गंभीर कलमांसह जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. राजेंद्र बापू गडगे (वय ५३ वर्षे) असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र गडगे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८, ३१९, ३५६, ३५२, ३५३, ३३६(४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More