Author: Annant Ppangarkar

बुधवार, २१ ऑगस्ट  संगमनेर – पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार संगमनेर नगरपालिका हद्दीतील नोंदणीकृत पथ विक्रेता समितीची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली आहे. आठ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सात सदस्यांची निवड बिनविरोध झाली असून एक जागा रिक्त राहिली आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये दीपक भानुदास साळुंखे (इतर मागासवर्ग), संतोष गंगाधर मुर्तडक, (सर्वसाधारण), महेंद्र मांगीलाल शर्मा (सर्वसाधारण), दीपा सोमनाथ सोनुले (सर्वसाधारण महिला राखीव), सुगंधा किसन धाकतोडे (अनुसूचित जाती महिला राखीव), संजय वसंतराव बागले (विकलांग) व नर्गिस शब्बीर आत्तार (अल्पसंख्यांक) यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ नुसार श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट  बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा राज्यभर निषेध सुरू असताना संगमनेरमध्ये देखील शिवसेना आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून ‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या’, अशा घोषणा देत राज्याच्या गृह खात्याचा निषेध करण्यात आला. महिला संपर्कप्रमुख बेबीताई लांडगे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेरमध्ये बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी बदलापूर अमानवीय घटनेचा निषेध करत नराधम आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. तसेच पीडितांना न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृह खात्याचा घोषणा देत धिक्कार करण्यात आला. राज्याच्या गृहमंत्री पदावर कार्यरत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ सपशेल अपयशी ठरला असल्याचा आरोप…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट गृह विभागाने राज्यातील ८२ पोलीस निरीक्षकांच्या बढतीचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र पोलीस उपाधीक्षक मिळाले आहे. तर गेल्या आठवड्यातच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची देखील बढतीवर नाशिक पोलीस अकादमीत पोलीस उपअधीक्षक म्हणून बदली झाली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाजन यांच्या रिक्त झालेल्या जागी आता पोलीस अधीक्षक आता कोणत्या पोलीस निरीक्षकाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. आगामी सण, उत्सव आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता संगमनेर शहर पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षक मिळतात की महाजन यांच्याकडेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार राहतो हे…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट  पुणे : अल्पवयीन मुलीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला दारूपासून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या मैत्रिणीचा तर आरोपीच्या मित्राचा देखील सहभाग समोर आला आहे. शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. नीचपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी मुलाने तिला अमिष दाखवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत तर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिच्याशी गोड…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, नैतिक मूल्याची घसरण, व्यसनाधिनता यासारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. तरूणांचे प्रमाण यामध्ये वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना समजावून त्या कमी केल्यास निकोप आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल यांनी केले. कलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थींचे मनोबल वाढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने…

Read More

आजचे राशीभविष्य  बुधवार २१ ऑगस्ट २०२४ या राशीसाठी आर्थिक लाभ तर इतर राशींसाठी… मेष— धनस्थानी गुरु, मंगळ, हर्षल युती आज छप्पर फाडके आर्थीक लाभ होण्याची शक्यता. तब्येतीला सांभाळा, पोटाचे आजार होण्याची शक्यता. वृषभ— नवीन वाहन घेण्याची ईच्छा असेल तर ती आज पुर्ण होईल. आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. मिथुन— राशी स्वामी बुध, रवी, शुक्राच्या युतीमधे पराक्रम स्थानी. आज आपल्या हातुन समाजासाठी काहीतरी मोठे कार्य होण्याची शक्यता. कर्क— आज राशीस्वामी अष्टमेशाबरोबर अष्टमस्थानी. सर्व स्वप्न पुर्ण होण्याचा दिवस. सिंह— आज तुमचा आत्मविश्वास तुम्हाला तुमचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत करेल. दुपारनंतर उत्साही वातावरण, घरातील सगळे आज तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतील. कन्या— कोर्ट…

Read More

मंगळवार, २० ऑगस्ट मुंबई : बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश देत त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशीदेखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या…

Read More

आजचे राशीभविष्य –  मंगळवार २० ऑगस्ट २०२४ मेष— कोर्ट कचेरीपासुन सावध रहा. ज्या विषयाची पुर्ण माहीती नाही त्यामधे पडु नका. वृषभ— आज सर्व काम मंद गतीने होतील. बहीणीसाठी खरेदीचा दिवस. आनंदी दिवस. मिथुन— आज प्रवासात दिवस जाईल. घरात आनंदी वातावरण राहील. शक्यतो जबाबदारीने वागा. कर्क— आज चारी बाजुने पैशाचा ओघ राहील. मित्र कंपनीकडुन फसगत होण्याची शक्यता. सिंह— आज सर्वाशी प्रेमाने वागाल. मानसीक ताणतणाव वाढेल. खबरदारी घ्या. कन्या— कारण नसताना चोरीचा आळ येण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. पैसा कुठे अडकवू नका. तुळ— आज शक्यतो प्रवास टाळा. कोणाला जामीन राहु नका. फसगत होण्याची शक्यता. वृश्चीक— स्वतःचे घर घेत असाल तर आज…

Read More

मंगळवार, २० ऑगस्ट  थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या नृत्य स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाने मोठे यश मिळविले. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक व पाचवी ते सातवी गटात द्वितीय क्रमांक मिळवत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाचे नाव साता समुद्रापार नेले. बँकॉकमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ५२ संघ सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून संगमनेरच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंदनेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या राजनदादा शिंदे युवा मंचचे प्रमुख राजनदादा शिंदे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना सुरक्षित नेण्या-आणण्याची जबाबदारी आर्थिकदृष्ट्या स्वीकारून या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी…

Read More

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता सोमवार, १९ ऑगस्ट मुंबई – “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापुर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचून शिंदे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा…

Read More

सोमवार, १९ ऑगस्ट  पुणे – विरोधक राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहे, मात्र याआधी ज्यांनी अनेक योजनांमध्ये कोट्यावधीच्या भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातील जे नेते तुरुंगात जाऊन आले आहेत, तेच जनतेची दिशाभूल करून आपल्या माता भगिनींचा सरकारवरील विश्वास उडावा यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. पुण्यातील मॉडेल कॉलनी मधील सिल्वर रॉक्स येथे नीलम गोऱ्हे यांनी आपले उद्योजक बंधू मंदार पाठक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. अपर्णा पाठक यावेळी उपस्थित होत्या. गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. नारळी पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाचा आजचा हा दिवस सर्वांच्या जीवनात…

Read More

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत महत्त्वाचे स्थान हे भाग्य, थोरात कारखान्याच्या नवीन इमारतीचे पूजन सोमवार, १९ ऑगस्ट संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आर्थिक शिस्त काटकसर आणि पारदर्शकता यामुळे कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून नवी इमारत ही या वैभवशाली परंपरेचा माईल्डस्टोन ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत महत्त्वाचे स्थान ही एकनिष्ठतेमुळे मिळालेली मोठी संधी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या वास्तुशांती व पूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीडब्ल्यूसीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे,…

Read More

सोमवार, १९ ऑगस्ट मुंबई : आम्ही राजकारणात ३० ते ४० वर्षे काढली आहेत. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री बनू नये का? केवळ प्रस्थापितांनीच मुख्यमंत्री बनायला पाहिजे का? उद्धव ठाकरे यांच्यावर नव्हे, तर आमच्यावर अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते व यासाठी त्यांनी गुप्तपणे रणनीती आखली होती. त्यामुळेच त्यांनी भाजपशी युती तोडून मविआचा पर्याय निवडला, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, याची त्यांनी मला कल्पना दिली असती तर मी स्वतः त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती केली असती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले…

Read More

सोमवार, १९ ऑगस्ट  मानधन वाढीसह अन्य मागण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी (२१ ऑगस्ट) मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ॲड. निशाताई शिवूरकर यांनी दिली. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहे. १५ जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय मिटींग, अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे. १२ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे. एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचारी बहिणींच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्र…

Read More

रविवार, १८ ऑगस्ट काँग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पक्षीय भूमिका बजावणारे संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवत काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड केली आहे. यामुळे थोरात यांच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा संगमनेरचे महत्व अधोरेखित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे थोरात यांच्या निवडीची माहिती दिली. स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा…

Read More

रविवार, १८ ऑगस्ट  महामहीम राज्यपालांच्यावतीने देण्यात येणारा “विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार” संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील कामगार पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देत गौरविण्यात आले. अहमदनगरच्या जिल्हा मुख्यालयात पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, गृह उपअधीक्षक हरीश खेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे आदी…

Read More

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. सत्तेवर कोण येईल, हे आज तरी सांगता येत नसलं तरी भाजपप्रणित सत्तेला चीत करण्याची ताकद महाविकास आघाडीकडे निर्माण झाल्याचं चित्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलं आहे. सत्तेवरल्या एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारसाठी लोकसभेचे निकाल खूपच तापदायक आणि संकटाची चाहूल देणारे आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने खिरापतींची वाटमारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण असो, सुशिक्षितांना स्टायपेंड देण्याचा विषय असो वा साठी गाठलेल्या बुजूर्गांसाठी देश तीर्थ पर्यटनाचा निर्णय असो. राज्याकडे खूप पैसा आहे, म्हणून या खिरापतीच्या योजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत.  असं फुकटात देणारं देशातलं पहिलं राज्य…

Read More

अखेर निवडणूक आयोगाने काश्मीर खोऱ्यात अन् दिल्ली सीमावर्तीय हरियाणामधे विधानसभेची निवडणूक जाहीर केली. जम्मू काश्मीरबाबत देशातील सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मधे निकाल दिला देत आदेश दिला होता की, सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया काश्मीर खोऱ्यात पूर्ण करावी. हा आदेश पाळणे त्यांना बंधनकारक आहे. हरियाणा व महाराष्ट्र यांची मुदत ऑक्टोंबरमधे संपते. मात्र राज्यातील निवडणुका जाहीर करणे अपेक्षित असताना सणसुद, अतिवृष्टी ही फालतू कारणे देवून निवडणूक आयोगाने हे सिद्ध केल की, “होय, मी केंद्र सरकारचा पोपट आहे”. लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तेव्हा कडक ४७ डिग्री तापमान ह्या निवडणूक आयोगला दिसले नाही, अन् गप्पा मारतोय पोपट अतिवृष्टीच्या. पितृपक्षाचे कारण देऊन पोपट पुढे म्हणतो की…

Read More

शनिवार, १७ ऑगस्ट शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देतो. त्यातून मोठा लाभ होईल, असे आमिष दाखवून लावलेल्या सापळ्यात अडकलेल्या संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना एका जोडप्याने लाखो रुपयांना फसवले असून या जोडप्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियांका शशांक वडके (राहणार २७६, भिवंडी, जिल्हा ठाणे) या दोघा पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची हकीकत अशी की, संकेत कोकणे (कॉटन किंग, मेनरोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या माध्यमातून भेटलेल्या शशांक वडके याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याची पत्नी प्रियंका हिची एजन्सी असून सहा…

Read More

शनिवार, १७ ऑगस्ट | संगमनेर श्रीरामपूरमधील तृतीयपंथी आयशा पिंकी शेख (वय ३० वर्ष, रा. डावखर रोड, वार्ड नंबर ६) हिने संगमनेरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, आयेशा शेख काही दिवसांपासून संगमनेरमधील जोर्वे रस्त्यावरील एकतानगरमध्ये रिया, कविता, प्रियांका, शंतनु यांच्यासोबत राहत होती. श्रीरामपूरहून आल्यापासून ती तणावामध्ये होती. बुधवारी (दि. १४ ऑगस्ट) रात्री संगमनेर येथील वाबळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे औषध उपचार घेऊन आल्यानंतर रिया व कविता व्यांच्यासोबत एकतानगरमधील घरी थांबली होती. दरम्यान रिया व कविता यांना काहीतरी आणण्यासाठी गावात पाठवले होते. गावातून आल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद असल्याचे बघितले त्यानंतर…

Read More