Author: Annant Ppangarkar

दि. ९ मार्च रक्तपेढीच्या तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी रक्तपेढी चालकाकडे एक लाख दहा हजाराची लाच मागणाऱ्या उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या अस्थिरोगतज्ञाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अश्विनी किशनराव गोरे (वय ४२ वर्षे) व डॉ. प्रितम तुकाराम राऊत (वय ४८ वर्षे, दोघे रा. क्वॉटर्स क्र.३, क्लास १ क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर दांपत्याची नावे आहेत. डॉ. अश्विनी गोरे या उदगीरच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्याकडे प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग १ या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांनी…

Read More

दि. ८ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरून महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असून हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पक्षांतर्गत सर्व्हेनंतर भाजपकडून तब्बल डझनभर खासदारांची तिकिटे कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात टीव्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप महाराष्ट्रात ३६ पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची…

Read More

दि. ८ मार्च, संगमनेर राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना त्याचे उल्लंघन करत एका पिकअपमधून निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली ३६ जिवंत वासरांची सुटका करत ही वासरे संगमनेर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अबूबकर इसाक शहा (रा. ममदापुर, ता. राहता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना कत्तलीच्या उद्देशाने एका पीकअप मधून जिवंत वासरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…

Read More

दि. ८ मार्च प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये देखील भारतीय मुलींची कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत आहे. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्यावतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट व विविध क्रीडा स्पर्धांमुळे तालुक्यातील मुली व महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्यावतीने महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, पद्मा थोरात, सुनंदा जोर्वेकर, शितल…

Read More

नाशिक, दि. ८ मार्च कॉलेज परिसरात कॅफे चालवून विद्यार्थ्यांना चुकीच्या कृत्यासाठी आडोसा करून देतो, थांब तुझ्यावर कारवाई करतो असे धमकावत कॅफे चालकाकडून दरमहा २००० ते ३००० रुपये हप्त्याच्या रूपात उकळणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुवारी अडीच हजार रुपये घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड, नाशिक) असे लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. लाचखोर गोसावी हा पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत आहे.शहरातील एका कॉलेजच्या परिसरात तक्रारदाराचे कॅफे आहे. या कॅफेमध्ये येणाऱ्या जोडप्यांना प्रायव्हसी मिळावी यासाठी तेथे व्यवस्था (आडोसा) करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोसावी याने कॅफे चालकाची भेट घेत त्याच्यावर कारवाईचा…

Read More

अहमदनगर, दि. ७ मार्च केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये नव्याने आलेल्या लोकांमुळे जुन्या निष्ठावंतांवर अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या एका निर्णयामुळे संगमनेर भाजपाची अंतर्गत धुसफूस समोर आली, असे असले तरी स्वतःचाच निर्णय पुन्हा फिरविण्याची आफत भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर ओढावली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातही विखे व्हर्सेस भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील हा संघर्ष सातत्याने बघावयास मिळत आहे. नव्या जुन्यातील संघर्ष आणि अंतर्गत वादामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे दिसत आहे. बुधवारी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द केल्याचा स्वतःचाच दिलेला आदेश गुरुवारी पुन्हा २४ तासाच्या आत फिरविण्याची व आहे तीच कार्यकारिणी…

Read More

कोल्हापूर, दि. ७ मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाहेर पडताना गद्दारीचा शिक्का माथी बसलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटातील काही खासदारांचा पत्ता भाजप कट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काहीही करा, पण उमेदवारी द्या, धनुष्यबाण मिळणार नसेल तर कमळावर लढू! असं साकडं या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातल आहे. या मागणीसाठी खासदारांनी दबाव गट तयार केला अजून दोन दिवसात ते एकत्रित भेटणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. शिवसेना फुटीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तेरा खासदार गेले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी आणि भरपूर निधी असा शब्द त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी…

Read More

संगमनेर दि. ६ मार्च युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी निलेश थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जयश्री थोरात यांची या माध्यमातून सक्रिय राजकारणात वाटचाल सुरू झाली असून या माध्यमातून नव्या युवा पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घेषणा केली. डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. अभ्यासू आणि सेवाभावी…

Read More

संगमनेर, दि. ६ मार्च गंभीर दुखापतीने मैदानाबाहेर रहावे लागलेल्या बेसबॉलपटू तुषार सोनावणे याची संगमनेरचे  आर्थो सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी यशस्वीरित्या लिगामेंट शस्त्रक्रिया केल्याने तुषार सोनावणेची अखिल भारतीय आंतरविद्यापिठ स्पर्धेच्या पुणे विद्यापिठ संघात निवड झाल्याची माहीती संगमनेर तालुका बेसबॉल असोशिएशनचे अध्यक्ष वैभव दिवेकर यांनी दिली. दिवेकर यांनी सांगितले की, तुषार सोनावणे हा एक उत्कृष्ट बेसबॉलपटू असून अनेक स्पर्धांमध्ये संगमनेर महाविद्यालयाचे प्रतीनिधीत्व करीत उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आला आहे. मात्र काही दिवसांपुर्वी त्याचा रस्ते अपघात होऊन पायाचे लिगामेंट फाटून तो जायबंदी झाला व त्यामुळे अनफिट होऊन घरी बसावे लागले होते. आम्ही त्यास अस्थिरोगतज्ञ डॉ. सौरभ पगडाल यांच्याकडे नेले असता त्यांनी शस्त्रक्रिया…

Read More

संगमनेर दि. ६ मविआ सरकारच्या काळातील रामेश्वर देवस्थानच्या निधीला महायुती सरकारने सत्तेवर येताच दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याने रामेश्वर देवस्थान सुशोभीकरण व सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला. यात रामेश्वर देवस्थानच्या ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश होता. राज्यात सत्तांतर होताच महायुती सरकारने या निधीला स्थगिती दिल्याने देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर आधीच्या सहा कोटी रुपयांच्या निधीत…

Read More

लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेश काँग्रेसची मुंबई वगळून २० लोकसभा मतदारसंघाची चर्चा – नाना पटोले लोकसभेचे उमेदवार स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन देणार, जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर मुंबई, दि. ५ मार्च लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस पक्षाने आज मुंबई वगळता राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उमेदवार देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केले जाईल. काँग्रेसच्या पक्षाच्या संभाव्य जागांवरील स्थानिक पदाधिकारी यांचे मते व राजकीय परिस्थिती याची चर्चा करण्यात आली. मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे…

Read More

अहमदनगर, दि. ५ अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये २ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.…

Read More

अहमदनगर, दि.५ भारतीय सैन्यात भरतीसाठीची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळास भेट देऊन प्रोफाइल तयार करावी व २२ मार्च, २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे, (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सैन्यदलात अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ऑफिस असिस्टंट, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी आणि ८ वी पास), मिलिटरी पोलिसांसाठी अग्निवीर महिला प्रवर्ग आणि एनए सप्टेंबर मधील नियमित प्रवेशासाठी अर्ज खुले आहेत. फार्मा, टप्पा ०१ मध्ये उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना सविस्तरपणे वाचाव्यात. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती,…

Read More

सोलापूर, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने शेकडोने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या बीडमध्ये साडेतीन हजार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोक तयार आहेत. निवडणुकीत एवढे उमेदवार उभे राहताय की, आता यांचे चिन्हच दिसणार नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल तर, आधी दोन कोटी मराठा घेऊन आलो होतो आता चार कोटी मराठा घेऊन येईल असा दणदणीत इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगे सोलापूरमधील सभेत बोलत होते. ते म्हणाले समाजाने लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मराठा समाजाचा आहे. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. फडणवीसांची भाषा…

Read More

अहमदनगर, दि. ३ नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीमध्‍ये कौशल्‍य शिक्षणाला दिलेले प्राधान्‍य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ निर्माण करण्‍याचे काम विद्यापीठाच्‍या उपकेंद्रातून व्‍हावे अशी अपेक्षा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अहमदनगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झाले. उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुरदृष्‍य प्रणालीव्‍दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्‍यासह व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य उपस्थित होते.…

Read More

संगमनेर, दि. ३ ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे हे सहकाराचे मॉडेल हे भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले. युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. लंडन विद्यापीठाचे डीन जिरेमी स्मिथ, वरिष्ठ पत्रकार नाथाली मायरोथ, चैतन्य मार्कपवार यांचा समावेश होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. सुजित खिलारी, संभाजी वाकचौरे आदींसह विविध अधिकारी…

Read More

प्रवीण पुरो (मुंबई) बुडत्याचा पाय खोलात गेला की तो बाहेर येण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असतो. संकटच ते. यातून बाहेर पडण्यासाठी मग आसपासच्यांना आणाभाका कराव्या लागतात. हे संकट सर्वच ठिकाणी असतं. ते सामाजिक जीवनात असं संकट आ वासून उभं असतं, तसा राजकीय आणि आर्थिक जीवनातही त्याचा फटका बसत असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित अनंतराव पवार हे ही अशाच संकटात सापडल्याचं दिसतं. गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी करून त्यांनी आपल्यावरच्या संकटाला वाट मोकळी करून दिली. हे संकट दूर करण्यासाठी त्यांनी राज्यातील जनतेला विकास पर्वाची आठवण करून देणारं पत्र लिहिलं आहे. हे पत्र बाहेर आल्यापासून या पत्राचा राज्यातील जनता शोध आणि बोध घेत…

Read More

संगमनेर दि. – २ एसएमबीटी ही संस्था आता देशातील आरोग्य सेवेचा ब्रँड नेम ठरली आहे. दररोज हजारो शस्त्रक्रिया एसएमबीटीमध्ये होत आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्णांना सोयीस्कर व्हावे यासाठी अमृतवाहिनी रोलर हॉस्पिटलमध्ये एसएमबीटीची बाह्य रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन नासिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेरमधील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा त्वरित व माफक दरात उपलब्ध व्हाव्या, या हेतूने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी क्लिनिकचा पूर्णवेळ सुपर स्पेशालिटी बाह्य रुग्ण विभाग शनिवारी सुरू करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे बोलत होते. माजी आमदार तांबे यांच्यासह…

Read More

संगमनेर, दि. २ संगमनेर शहर व तालुका हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे ५ मार्चपर्यंत बंद न झाल्यास नाशिकला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख तथा राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांनी दिला असून यासंबंधीचे निवेदन पोलीस उपाधीक्षकांना देण्यात आले आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्याच्या हद्दीमध्ये दारू, मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री आदी प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ढाबे व हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. परवानगी असलेल्या बार चालक, दारू विक्रेत्यांकडून रात्री बारा ते एक वाजेपर्यंत बेकायदेशीर रित्या दारू विक्री सुरू असते. यापूर्वी…

Read More

मुंबई, दि. १ मार्च महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर महाराष्ट्राला लाज आणणारी घटना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.आमदारांच्या धक्काबुक्की प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी आमदारांची जनतेच्या मुलभूत प्रश्नापेक्षा स्वतःच्या, वैयक्तिक प्रश्नांसाठी कुरघोडी चाललेली आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मंत्र्यांवर खोक्यांचे आमदार तुटून पडतात हे खोक्याचे…

Read More