Author: Annant Ppangarkar

सोमवार, ०५ ऑगस्ट मुळा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होत असून मुळा नदीला आलेल्या पुरामुळे संगमनेर व पारनेर तालुक्यांना जोडणारा साकुर नजीकचा मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडापासून मुळा नदीचा उगम होत असून नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साकुर नजीकच्या मांडवे येथील पुलाच्या माध्यमातून संगमनेर-पारनेर हे दोन तालुके जोडले गेले आहे. सद्यस्थितीत रविवारी हा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील संपर्काचा मार्ग…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट  शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे मंत्री विखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी उपस्थित होते. सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान,‌ इंदिरा गांधी,‌ श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व…

Read More

धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवा एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घ्या, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी रविवार, ०४ ऑगस्ट मुंबई : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत. पुणे परिसरातील…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट  राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील वाद सर्वश्रुत असताना गेल्या दोन दिवसात या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या टीकाटिप्पणीनंतर आता विखे यांच्यावर पलटवार करत आमदार रोहित पवार यांचा संदर्भ देत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. अहमदनगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देताना मंत्री विखे यांनी तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे म्हटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि थोरात यांनी या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान राधाकृष्ण…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३४३.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगरमध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भिमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठवरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावे‌‌, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्याच्या ७६.६६% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. आज दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील गोदावरी…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट पाच लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपयांवर तडजोड करणाऱ्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. थोरबोले लोणीकंद (पुणे) पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. एका ३२ वर्षीय व्यक्ती विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्ज आला होता. या तक्रार अर्जाचा तपास सहाय्यक निरीक्षक थोरबोले यांच्याकडे सोपविण्यात आला होता. थोरबोले यांनी तपासात त्यांच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तसेच भविष्यात त्रास न देण्यासाठी पाच लाख रुपयांची…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत गलिच्छ पातळी गाठणार्‍या भाजपला धक्क्यावर धक्के बसूनही त्या पक्षाचे नेते सुधारण्याचं नाव घेत नाहीएत. या घाणेरड्या राजकारणाचे फटके लोकसभेत पडले तरी हे नेते पक्षाला खड्ड्यात घालण्याची एकही संधी सोडत नाहीत, हे अनिल देशमुख यांच्यावरील कथित पलटवाराने दाखवून दिलं आहे. राज्यात गेल्या दहा वर्षातील राजकीय उलथापालथीचं केंद्र हे भाजपच होतं आणि आहे. या घटनांमागे असलेल्या अनेकांची नावं आता हळूहळू पुढे येऊ लागली आहेत. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात ज्या काही घटना घडल्या त्यामागच्या घडामोडी पाहिल्या की भाजपने महाराष्ट्राचं राजकारण किती खाली नेलं हे दिसून येतं. आघाडी सरकारमधले गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईत समित कदम…

Read More

शनिवार, ०३ ऑगस्ट संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील अत्याचार, धर्मांतर प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत शनिवारी न्यायालयाने तिसऱ्यांदा ५ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत. फिर्यादी अल्पवयीन असताना देखील आरोपींनी तिला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तिला फसवून मंचर येथे नेत अटकेतील आरोपी युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना लग्नासाठी मंचरवरून चाकण येथे नेले. त्यानंतर तेथून दुसऱ्या गाडीतून मुंबई येथे पाठवून दिले होते. मुंबईत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच तिचे धर्मांतर देखील…

Read More

शनिवार, ०३ ऑगस्ट  संगमनेरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या माध्यमातून अनेक जण गुन्हेगारीकडे वळत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढीस लागल्याने हे धंदे बंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी दिला आहे. संगमनेर शहराच्या अनेक भागात गल्लोगल्ली मटक्याची दुकाने थाटली गेली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचा रस्त्यावर आता नागरिकांना देखील त्रास होऊ लागला आहे. बहुचर्चित ठरलेल्या शक्तिमान टॉवर्समध्ये देखील अनेक अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी आपले दुकाने सुरू केले असून पोलीस यंत्रणाच्या नजरेसमोर हे सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, गांजाची सिगारेट, उत्तेजक औषधी…

Read More

शनिवार, ०३ ऑगस्ट  काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून यातून रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. आमदार थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर मूलभूत गरजांची पूर्तता करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. यातून तालुक्यात अनेक विकास काम मार्गी लागले आहे. थोरात यांचे सुसंस्कृत नेतृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका व केलेल्या विकास कामांच्या बळावर संगमनेर तालुका राज्य पातळीवर ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. या रस्त्यांचे होणार काम… कासारा दुमाला ते सावंत वस्ती रस्ता मजबुतीकरण…

Read More

शनिवार, ०३ ऑगस्ट | अनंत पांगारकर संगमनेर मधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये समावेश असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर जामीन मंजूर केला आहे. कपाटे यांना जामीन मंजूर झाल्याने ठेविदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अपिलामध्ये जाणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय आसामी भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे ८१ कोटी रुपयांचा कागदोपत्री घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याचा मुख्य ठपका चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह…

Read More

विशेष लेख… ३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अवयव दान दिवस साजरा केला जातो. याच दिवशी देशातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचे आठवण म्हणून २०१० पासून हा दिवस राष्ट्रीय अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जातो. एखाद्याला नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करने हा एक उदात्य मार्ग असु शकतो. अवयवदान दिनानिमित्त आपण जागरूकता वाढवूया आणि अधिकाधिक लोकांना अवयवदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करूया एका अवयवदात्यामुळे आठ पेक्षा अधिक लोकांना याचा उपयोग होतो. अवयवदानाच्या माध्यमातून आपले मौल्यवान अवयव दान करण्याचा संकल्प करण्याची आणि पुढे येण्याची संधी आपल्या सर्वांना आहे. अवयवदान जागृती वाढल्याने अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळू शकते, अवयवदानाचे…

Read More

मुंबई | प्रवीण पुरो  करातून येणारा पैसा फुकट वाटण्यासाठी नाही, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबविण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार असून याप्रकरणी काय निकाल येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १४ ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. मात्र ही योजना भ्रष्ट कृती असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.…

Read More

शनिवार, ०३ ऑगस्ट  विशेष प्रतिनिधी | मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे नियोजनही सूरू आहे. असे असताना आता ”महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत, असे विधान करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब शिर्डीत साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा करणार असल्याचा प्रश्न केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कॉग्रेसची चांगलीच कान उघडणी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघे एकत्र आलो. विशेष…

Read More

जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा: डॉ. तांबे  दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या: प्रभावती घोगरे  हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ: डॉ. पिपाडा  शुक्रवार, ०२ ऑगस्ट आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल अथवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर त्याचे पद घालविण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही. आता या उलट परिस्थिती असून विरोधी सरपंच आहे, म्हणून पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष नेऊन ठेवले आहे. पाणी योजना बंद पाडली जाते. मात्र माणसाला प्यायला पाणी देण्याच्या योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाही, जिरवाजिरवी आणि…

Read More

शुक्रवार, ०२ जुलै  दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी रात्री संगमनेर पोलिसांनी बेकायदा चालविल्या जात असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरातून कत्तलीसाठी निर्दयतेने अन्नपाण्यावाचून डांबून, बांधून ठेवलेल्या डझनभरापेक्षा अधिक जिवंत जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेमध्ये दाखल केले. वेळेत पोलीस पोचले नसते तर या जनावरांची देखील कत्तल अटळ होती. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू या अवैध धंद्याला संगमनेर पोलिसांसह नगर पोलिसांचे आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाया होत नसल्याच्या चर्चा सातत्याने होत या संदर्भात ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने देखील वृत्तमालिका सुरू ठेवत सातत्याने यावर प्रकाश टाकला आहे. या अवैध धंद्याचाच एक भाग असलेले संगमनेरमधील बेकायदा कत्तलखाने वारंवार टाकलेल्या छाप्यानंतर देखील सुरूच आहे. त्यामुळे…

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त शुक्रवारी सकाळी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध होताच काही वेळातच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे आभार मानले आहे. महाराष्ट्र संवाद न्यूजने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीची लिंक… https://maharashtrasanvadnews.com/?p=16569 देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांच्या नावाने बांधलेल्या या वास्तूचे दुरवस्था झाल्याने या संदर्भात ॲड. सैफुद्दीन शेख यांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना पत्र देत त्यांचे लक्ष वेधले होते. तसेच या संदर्भातील…

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून नील अहवाल पाठविण्यासाठी तसेच भविष्यात तक्रार झालेला त्रास न होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६) या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध पुण्याच्या लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत प्रथम पाच लाख व तडजोडीनंतर एक लाख रुपये लाचेची मागणी केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिस हवालदारावर कारवाई होत नाही तोच सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल लाखाच्या पटीत लाच मागणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वरकमाईची चटक लागल्याचे…

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नगर जिल्ह्यातून सात लाख महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या या अर्जांची छाननी करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या कक्षाला भेट दिल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा दैनंदिन आढावा, तालुकास्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजन यामुळे सात लाख महिलांचे अर्ज भरून घेण्यात यश आले आहे. अर्जाच्या छाननी साठी स्वतंत्र कक्ष……

Read More

शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाली असून देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांची अवहेलना होत असल्याची तक्रार करत मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्न तातडीने लक्ष घालण्याची मागणी ॲड. सैफुद्दीन शेख यांनी केली आहे. ॲड. शेख यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून हे सांस्कृतिक भवन व शॉपिंग सेंटर बांधले आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून या इमारतीची दुरवस्था झाली असून तेथे मोठ्या…

Read More