Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या विशेष कामगिरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. जागतिक पातळीवर युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला इंधनाचा तुटवडा पाहता, इथेनॉल हा भविष्यातील इंधनासाठी एक सक्षम आणि सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर आणि विचारांवर कारखान्यासह सर्व संस्थांची वाटचाल अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. राज्यातील अनेक सहकारी कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून दारूची निर्मिती केली जाते, मात्र थोरात कारखान्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत दारू निर्मितीऐवजी इंडस्ट्रियल…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. वृषभ: आज मनावर थोडे दडपण राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात घाई करणे टाळावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. मिथुन: आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. तुमच्या संवादकौशल्यामुळे इतरांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. कर्क: कामाच्या ठिकाणी आज तुमची प्रशंसा होईल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, जी तुम्ही समर्थपणे पेलू शकाल. घरातील वातावरण…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्र्यांनीही बचतीची नाटकं सुरु केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून विधानभवनात बुलेटवरून पोहोचले तर उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी शिंदे बॅटरी कारने मंत्रालय गाठलं. आणखी एक मंत्री नितेश राणे मंत्रालयासमोरील बंगल्यातून चालत मंत्रालयात पोहोचले. मात्र या मंत्र्यांच्या इव्हेन्टबाजीची नेटकऱ्यांनी चांगलीच खेचली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना चांगलाच आरसा दाखवला. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्ये काटकसरीची एकच स्पर्धा लागली होती. स्वतः मुख्यमंत्री त्यात सहभागी झाल्याने तो एकच चर्चेचा विषय बनला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी वर्षा निवासस्थानातून बुलेटवर प्रवास…

Read More

बेकायदेशीर गर्भपात आणि लिंगनिदान प्रकरण: पुणे येथील दोन डॉक्टर अटकेत! आरोपींची संख्या १६ वर महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये ५ डॉक्टरांचा समावेश आहे. ताज्या अपडेटनुसार, या रॅकेटमध्ये पुणे येथील दोन डॉक्टर आणि एका अन्य व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मशीन्स खरेदीचे मूळ स्त्रोत आणि या रॅकेटमधील अन्य सहभागींचा शोध घेणे सध्या सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या पुणे येथील आरोपींची नावे डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (शिरूर), डॉ. नीलकंठ अशोक जाधव (लोहगाव) आणि…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनाला समाधान मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला आहे. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, परंतु घरातील कामांमुळे थोडा ताण येऊ शकतो. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापार करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि एखादा शुभ समारंभ ठरण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल. मिथुन: दिवसाची सुरुवात थोडी धावपळीची होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना आज सकारात्मक बातमी मिळू शकते.…

Read More

‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर छापा; बोगस डॉक्टर तन्वीर देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहुरी: बनावट पदव्यांच्या आधारे अधिकृत नोंदणी नसताना रुग्णसेवा देऊन लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राहुरीतील एका बोगस डॉक्टरवर मंगळवारी पोलिसांनी कारवाई केली. राहुरी येथील ‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर प्रशासनाने छापा टाकून तन्वीर हारुन देशमुख याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण रुग्णालय राहुरीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश बाबासाहेब मिसाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून प्राप्त झालेल्या गोपनीय आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोग्य विभागाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले समाजात ‘गुरुजी’ या पदाला अत्यंत आदराचे स्थान आहे, मात्र अकोले तालुक्यातील एका घटनेने या पदाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. आपल्या अल्पवयीन मुलाला कार चालवायला देऊन आणि स्वतः मद्याच्या नशेत धुंद राहून एका शिक्षकाने बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित शिक्षकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (३ मे) अकोले तालुक्यातील गुरवझाप पीरसाईनगर येथील शिक्षक रामदास भांगरे हे त्यांच्या कुटुंबासह स्विफ्ट कारने (क्रमांक MH 02 BJ 9347) प्रवास करत होते. यावेळी शिक्षक भांगरे हे स्वतः मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी कारचे नियंत्रण स्वतःकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या कायापालटासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीमधील विविध कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असून, या प्रस्तावाला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाचे औचित साधित त्यांची भेट घेतली होती. या भेटीत आमदार खताळ यांनी वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि पथदिवे यांसारख्या गंभीर समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. वसाहतीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव असल्याने उद्योजक व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर शहर व तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य व्यंगचित्र स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे व जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वात वर्षभर चालणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही स्पर्धा येत्या रविवारी, (१७ मे २०२६) सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत संगमनेर बस स्थानकाजवळील…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन कामाची संधी चालून येईल, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. अनावश्यक खर्च टाळल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यावसायिक क्षेत्रात काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या संयमामुळे तुम्ही त्यावर मात कराल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि जुन्या वादांवर पडदा पडेल. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल, पण सहकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरा.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळी’च्या वतीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेले पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील विज्ञाननिष्ठ विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा दृढ विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. शिबिराच्या समारोप प्रसंगी ते उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधत होते. डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात युवकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. ते म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी तरुणांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होणे ही काळाची गरज आहे. समाजातील आर्थिक विषमता जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल, मात्र घाईघाईने कोणताही मोठा गुंतवणूक निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांततेची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्यामुळे थोडा ताण येऊ शकतो, परंतु नियोजित पद्धतीने काम केल्यास यश नक्की मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. मिथुन: तुमच्या संवादकौशल्यामुळे आज…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रक्षक दलाच्या तातडीच्या हालचालीमुळे हा प्रकार लगेच समोर आला असून पुढील तपासाला मदत झाली आहे. दि. 9 मे रोजी रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास रक्षक दलाची गाडी शहरात नियमित राऊंडवर होती. त्यावेळी नगरपालिका गेटसमोरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये एक संशयित व्यक्ती असल्याचा कॉल रक्षक दलाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे एटीएमची लाईट बंद असल्याची शंका वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रकार संशयास्पद वाटताच रक्षक दलाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदारांचा सत्कार करत ५० डझन फुलस्केप वह्या भेट दिल्या. या वह्या गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वापरल्या जाणार आहेत. आमदार अमोल खताळ पाटील यांचा आणि युवा कार्यकर्ते सुवेद इनामदार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने उत्साहात भर पडली होती. स्वतःचा वाढदिवस असतानाही सुवेद इनामदार यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य देत हा उपक्रम राबवला. ही बाब लक्षात घेत, आमदार अमोल खताळ पाटील यांनी सुवेद इनामदार यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुवेद इनामदार,…

Read More

दोन बहिणींच्या छेडछाड प्रकरणी संगमनेरमध्ये एकावर गुन्हा; ‘BNS’ आणि ‘पोक्सो’ कलमान्वये कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्रीसाठी आणि मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (१० मे २०२६) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सध्या आपल्या माहेरी वास्तव्यास आहे. दि. ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची १४ वर्षीय लहान बहीण घराबाहेर फिरत…

Read More

ज्या लोकशाहीने भारताचा पाया भक्कम करून ठेवला त्याच लोकशाहीला खुलेआम दावणीला लावण्यात आलं आहे. हे आधी महाराष्ट्र, हरियाणात झालं ते आता पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालं. चोरीच्या मार्गाने मिळालेल्या सत्तेला दोष देण्याऐवजी माध्यमं या सत्तेला भाजपचं एकवीसावं राज्य गणतात तेव्हा माध्यमांच्या एकूणच मानसिकतेचा विचार करावा लागतो. सार्‍याच यंत्रणा नीतीभ्रष्ट आणि लाचार झालेल्या पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. सत्ताधार्‍यांविरोधी केलेल्या एकाही तक्रारीची दखल घ्यायची नाही, सत्तेतल्या नेत्यांना स्वैर वागू द्यावं, अशी डोळेझाक यंत्रणांनी केल्याचा गैरफायदा या निवडणुकीत उघडपणे घेतला गेला. याची दखल घेण्याऐवजी सत्ता मिळाल्याचं कोण कौतुक माध्यमं करत आहेत.  सर्वच क्षेत्रात भारत घसरत चालला असताना सत्तेला जाब विचारावं असं वाटायचं माध्यमांनी सोडून…

Read More

लोक विचारतात, तुला याच्यात नेमकं काय दिसतं? ठीक आहे, तर आज सांगतो, मला राहुलमध्ये काय दिसतं. हिंदुस्थानच्या इतिहासात ५००० वर्षात सर्वात जास्त खालच्या पातळीची टीका जर कुणावर झाली असेल तर तो राहुल गांधी आहे. एवढी टीका सहन करूनही तो जनसामान्यांच्या प्रश्नांपासून तसुभरही ढळलेला नाही. कित्येक वर्ष देशाच्या राजकारणात सत्तेत असणाऱ्या घराण्याचा तो वारसदार आहे. आणि तरीही तो ना हिटलर आहे, ना चंगेज खान, ना ईदी अमीन. त्याने कधी कोणते अमानवीय किंवा अक्षम्य कृत्य केलेले नाही. त्याची एकच चूक, तो एका विशिष्ट घराण्यात जन्माला आला. त्याला हटवण्यासाठी, हादरवण्यासाठी, खाली खेचण्यासाठी अनेक वर्षांपासून एक व्यवस्थित निधीपुरवठा केलेली, समन्वयित आणि संघटित मोहीम सुरू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीचा वारसा जपणाया महाराष्ट्रात सध्या वैचारिक संघर्षाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वारकरी संप्रदायावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांविरोधात ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार समर्थन केले आहे. विकास लवांडे सारख्या प्रवृत्तींना योग्य धडा शिकवण्याचे काम भंडारे महाराजांनी केले असून, ही कृती लाखो वारकरी भाविकांच्या भावनांचेच प्रतिबिंब असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे. आमदार अमोल खताळ यांनी आपल्या समाज माध्यमावरील अकाउंट मध्ये म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय हा केवळ एक मार्ग नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संतपरंपरेचा आणि हिंदू अस्मितेचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. गेल्या काही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि मानवतेची शिकवण देणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कठीण काळातही आपला विचार ठामपणे मांडण्यासाठी धीरोदत्तपणे संकटांना सामोरे जाण्याची शिकवण दिली आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असून, पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे असे हल्ले चिंतेची बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आळंदी येथे संत परंपरेचा समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने शाईफेक केली. या घटनेचा निषेध करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,…

Read More