Author: Annant Ppangarkar

अहमदनगर – सोनईजवळ चर्चच्या धर्मगुरूने दोन अल्पवयीन मुलींच्या अंगात सैतान आल्याचे सांगत या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी मंगळवारी पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच सोनई पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना पुढील तपासा संदर्भात सूचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रूपवते यांनी बालिका आणि महिलांवर होणारे अशा प्रकारचे आघात संतापजनक असल्याचे सांगत अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या व झाल्या प्रकाराने हादरलेल्या पीडित गरीब दोन्ही अल्पवयीन मुलींना लवकरात लवकर जिल्हा बालकल्याण समिती पुढे नेण्याचे व संरक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.…

Read More

नाशिक – पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच स्वतःच्या डोक्यात सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अशोक नजन (वय ४० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव असून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. नजन काल रात्री शिवजयंतीचा बंदोबस्त करून उशिरा घरी परतले होते. सकाळी साडेनऊ वाजता अंबड पोलीस ठाण्यात आलेल्या नजन यांनी आपल्या केबिनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या हजेरी मास्टरच्या लक्षात आला. नजन…

Read More

संगमनेर – शहर आणि लगतच्या उपनगरांना जोडणारा तसेच गंगामाई घाटाकडे जाणारा स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल खचून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. स्थानिक नागरिकांसह संगमनेरकर पूल दुरुस्तीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे, मात्र या पुलाचे बांधकाम भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळेच रखडल्याचा व नागरिकांच्या त्रासाला पालकमंत्री विखे पाटीलच जबाबदार असल्याचा आरोप संगमनेर नगर परिषदेतील माजी युवा नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे. या संदर्भात कलंत्री म्हणाले, ऑक्टोंबर २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पूल खचल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी केली. या पुलाच्या बांधकामासाठी निधी…

Read More

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ‘एक्स’द्वारे आभार मानले आहे. तांबे सोमवारी संगमनेरमध्ये असताना त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुचार केला. शिक्षक बांधवांना विद्यार्थांना ज्ञानदान करण्याचं काम सोडून इतर शिक्षणेत्तर कामांत जुंपवल्यास हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. ही भूमिका मी वारंवार मांडत आलो आहे. आज राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा शिक्षक बांधवांच्या या मागणीला दुजोरा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार ! काय म्हणाले तांबे… ऐका व्हिडिओ… जे विद्यार्थी उद्याचा उज्ज्वल भारत घडवणार आहेत, त्यांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असलेल्या शिक्षक बांधवांना ज्ञानदानाचं सोडून इतर कामांतून कायमस्वरूपी दिलासा…

Read More

संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संगमनेर नगर परिषदेच्यावतीने सालाबाद प्रमाणे, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपालिका रांजणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत संगमनेरमधील विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांसह नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालिकेतील कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. प्रारंभी नगरपरिषद प्रांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संगमनेरचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे,…

Read More

संगमनेर – समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे तसेच आदर्श लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे अभिवादन जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी समवेत नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी होते. तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव, लोकशाही, गरिबांचे कल्याण ही शिकवण दिली. समाजातील अठरापगड जाती-जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारले. स्वाभिमानाची शिकवण दिली. बलाढ्य शक्ती विरुद्ध लढताना स्वराज्यातील गोरगरिबांच्या हिताचे…

Read More

नवी दिल्ली – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून ३१ मार्च २०२४ पर्यंत घालण्यात आलेली कांद्यावरील निर्यात बंदी अखेर केंद्र सरकारने मागे घेतली आहे. त्यासोबतच मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. (MSP) एमएसपीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्यातीला मंजूरी देण्यात आली. देशातील कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. मात्र सरकारने त्याआधीच निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय…

Read More

संगमनेर – नामांकित कंपनीच्या नावाने बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून संगमनेर पोलिसांनी ९० बनावट गॅस रेग्युलेटर जप्त केले आहे. संबंधित विक्रेत्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. शहरातील सय्यद बाबा चौकात असलेल्या भारत स्टील नावाच्या दुकानात स्वयंपाक घरात नेहमीच वापरल्या जाणाऱ्या गॅस टाकीसाठीच्या बनावट गॅस रेग्युलेटरची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. संबंधित ठिकाणी शनिवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून यासंबंधी खात्री करण्यात आली. बनावट ग्राहकाने रेग्युलेटर खरेदी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी दुकानाची झाडाझडती घेतली…

Read More

येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला सत्तेवरून पाठविण्याचा संकल्प करा: काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही: काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचाराने अर्थव्यवस्थेची पिछेहाट: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोणावळा – काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर लोणावळा येथे पार पडले. या शिबिरात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, आमदार, आजी-माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार व…

Read More

प्रवीण पूरो (मुंबई) सार्वजनिक वा व्यक्तिगत जीवनात माणसाने स्वत:बरोबरच समाजासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं भले वाटत असेल. इतर प्राण्यांकडून तशी अपेक्षा नसते. उलट अनेकदा हे प्राणी मालकाशी इमान राखतात. माणूस नावाचा प्राणी हा त्याला सर्वाधिक अपवाद ठरतो. गेल्या काही काळापासून आपल्या राज्यात राजकीय उलथापालथीची प्रकरणं हाताळली की माणसाची बेईमानी किती खोलवर पोहोचलीय ते कळून येतं. या बेईमानीची झलक राजकारणातले एक प्यादे बनलेले अशोक चव्हाण यांच्याकडून नुकतीच राज्यातल्या जनतेला पहायला मिळाली. देशाचं भलं करण्यासाठी म्हणे ते भाजपत प्रवेश करते झाले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान चव्हाण यांच्याविषयी काय बोलले? चव्हाण यांच्यावर कोणत्या भाषेत कोरडं ओढलं? हे सार्‍यांनी ऐकलं. त्याच मोदींच्या…

Read More

संगमनेर – सहकार विभागाच्या छापेमारीत संगमनेर तालुक्यातील साकुर येथील दोन सावकारांवर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्त्वाचे दस्त लागल्याचे बोलले जाते. सावकाराच्या सततच्या तगाद्याला कंटाळून साकुरमधील एका दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या आणि ही कारवाई झाली. सहकार खात्याचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पथकांनी राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे (रा. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्या दोघा सावकारांविरोधात सावकारी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आले आहे. यासंदर्भात साकुर येथीलच संगीता व विलास दौलत वाकचौरे या दाम्पत्याने सावकाराच्या जाचातून मुक्ती मिळण्यासाठी बुधवारी (१४ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी…

Read More

मंचर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतला. या भीषण अपघातात पेटत्या कारमधील तिघांचा होळपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे मंचरजवळ असलेल्या भोरवाडी येथे हा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्विफ्टकार जागीच जळून खाक झाली. यामुळे या गाडीतील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने कारचा चालक आणि टेम्पोचा चालक अपघातातून बचावले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मंचर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर असलेली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने…

Read More

संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उत्साहात सोमवारी (ता. १९ फेब्रुवारी) साजरी केली जाणार आहे, अशी माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी दिली. सोमवारी सकाळी नगर परिषदेच्या प्रांगणात नऊ वाजता संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साडेनऊ वाजता मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. नगरपरिषदेच्या प्रांगणातून सुरू होणारी ही मिरवणूक शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी येणार…

Read More

संगमनेर – महिला भगिनींचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. दुर्दैवाने ज्या महिला भगिनींवर एकलपणाचे दुःख आले, त्या सर्वांना आधार देत त्यांना आदर व सन्मान देण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांनी केले. स्वर्गीय नानासाहेब गुंजाळ प्रतिष्ठानच्यावतीने संगमनेर खुर्दमध्ये श्रीमती रोहिणी गुंजाळ यांच्या पुढाकारातून एकल महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोनशे एकल महिलांना आवळा व जांभूळ वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी थोरात बोलत होत्या. रोहिणी गुंजाळ यांच्यासह सरपंच श्वेता मंडलीक, जयश्री शिंदे, रोहिणी कदम, स्वाती गोसावी, दिपाली गडगे, श्रीमती पवार मॅडम यांच्यासह सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या. थोरात म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती…

Read More

संगमनेर – दरोड्यासह विविध प्रकारच्या चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संगमनेरमधील विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर याला संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी सहा महिन्यांसाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर (रा. पंपिंग स्टेशन संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन आणि घारगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध स्वरूपाचे तब्बल नऊ गुन्हे दाखल असून यामध्ये दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे, शिवीगाळ, दमदाटी, जखमी करणे आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव संगमनेर…

Read More

मुंबई – गुरुवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण असलेल्या बैठकीला जे सात आमदार गैरहजर होते त्यांनी पक्षाला गैरहजर राहण्याचे कारण पत्राच्या माध्यमातून कळविले होते, अशी माहिती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी (ता. १५ फेब्रुवारी) काँग्रेसची महत्त्वाची बैठक विधिमंडळात पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे 30 पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर थोरातांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याच्या चर्चे संदर्भात थोरात म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्हालाही प्रसार माध्यमांकडूनच याबद्दल…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर घरच्यांनीच केलेल्या गद्दारीमुळे सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या माजी मुख्यमंत्री शिवसेना शहरप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारचा संगमनेरचा जनसंवाद दौरा त्यांच्या भाषणाने, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जाहीररीत्या केलेल्या कौतुकाने चर्चेत आला असताना दुसरीकडे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी निघालेली मोटार सायकल रॅली चर्चेत आली आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना फोडत शिंदे गटाने त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अनेक जण ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सोबत जाण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेत पुन्हा एकदा पक्षांतर्गत घडामोडी घडल्या आणि उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. यात अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलत…

Read More

संगमनेर – तुम्ही आणि तुमच्या पुढच्या पिढ्या या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जगणार आहेत की भाजपच्या हुकूमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत, हे ठरविणारी येणारी निवडणूक आहे. लढाई मोठी आहे असे सांगत भाजपने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडत ज्या भ्रष्ट लोकांविरोधात आरडाओरडा केला, ज्यांच्या-ज्यांच्यावर चिखल उडविला त्यांचीच धुनी धुण्याची वेळ त्यांच्यावर आली. ज्यांना फोडाफोडी शिवाय दुसरा धंदा नाही कपट कारस्थान, नीच कारस्थान करणारे गृहमंत्री ‘फोडणवीस’ हे घरफोडे मंत्री आहेत, अशा शब्दात भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये आले होते यावेळी ते बोलत होते. ठाकरे यांच्या समवेत…

Read More

संगमनेर – पाठ्यक्रमासह विविध कलाविष्कार आणि खेळांमध्ये नैपूण्य दाखवणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चमकले. जम्मु-काश्मिरमध्ये झालेल्या ९ व्या राष्ट्रीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण करताना ३५ सुवर्णसह तब्बल ४५ पदकांची लयलुट केली. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर ध्रुव ग्लोबल स्कूलला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक देवून गौरविण्यात आले आहे. स्पोर्ट्स डान्सच्या वैयक्तिक प्रकारात ९ वर्षांखालील गटात तेजस्विनी क्षितीज मोहापात्रा हिने हर हर गंगे नृत्य सादर करीत सुवर्ण पदक मिळवले. १३ वर्षांखालील गटात रित चेतन राजपालने राधाराणी नृत्यावर तर, १७ वर्षांखालील गटात सौम्या सचिन जोशीने सुवर्ण पदक मिळवताना शाळेच्या कामगिरीचा आलेख उंचावला. युगल प्रकारातही हाच…

Read More

रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचीही चव्हाणांवर टीका… काँग्रेसने अशोक चव्हाण यांना आणि त्यांच्या वडिलांना खूप काही दिले मात्र आता काँग्रेसच्या तत्त्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की ज्यामुळे चव्हाण यांना काँग्रेसच सोडावी लागली? चव्हाण यांच्यावर काही दबाव होता का? असा सवाल उपस्थित करत ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असावेत, अशी थेट सडकून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार…

Read More