Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव व पीकविमा मिळत नसल्याने सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून २ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, कुटुंबातील सदस्यांसह आनंदात वेळ बितेल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये कमालीचे यश मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. कौटुंबिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण सुनावणी दरम्यान, विविध गंभीर कलमांसह जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. राजेंद्र बापू गडगे (वय ५३ वर्षे) असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र गडगे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८, ३१९, ३५६, ३५२, ३५३, ३३६(४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले: कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे व हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनापूर्वी अकोले शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राज्यभर बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सध्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसैनिकांना आगामी संघर्षासाठी सज्ज करण्यासाठी शिर्डीत शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची तोफ या सभेत धडाडणार असून, त्यांच्या झंझावाती मार्गदर्शनामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणार आहे. ही सभा मंगळवारी, (२ जून) दुपारी बारा वाजता शिर्डी येथील एअरपोर्ट रोडवरील ‘साई किमया गार्डन लॉन्स’ येथे पार पडणार आहे. या सभेला माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, भंडारदरा अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील पांजरे नाक्यावर काजवे महोत्सवासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. येथील टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना, ‘माझ्या मुलाला का थांबवले’ या कारणावरून मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले लक्ष्मण बांगर आणि त्यांचा मुलगा साई बाळू बांगर यांनी वनरक्षक चंद्रकांत भरत तळपाडे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांजरे नाक्यावर वाहनांची तपासणी आणि शुल्क आकारणीचे काम सुरू असताना एमएच ०५ ईक्यू २६५१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एक्सएल-६ कार तेथे आली. या कारच्या डॅशबोर्डवर ‘पोलीस’ अशी पाटी आणि लाल-निळ्या रंगाचा एलईडी लाईट लावलेला…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु जोडीदारासोबत बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा फायदेशीर करार होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल आणि मानसन्मान लाभेल. घरातील सदस्यांशी असलेले मतभेद मिटतील आणि वातावरण शांत राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदात जाईल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, राहाता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात असणाऱ्या चंद्रपूर गावातील साठवण तलावात बुडून एमबीए (MBA) शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, २८ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मृत तिघेही लोणी येथील पायरेन्स आयबीएमए (IBMA) कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होते. एकाच वेळी तीन तरुण विद्यार्थ्यांचा अंत झाल्याने महाविद्यालयीन वर्तुळासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे काही विद्यार्थी चंद्रपूर परिसरातील साठवण तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान काही जण पाण्याच्या कडेला गेले असता, पाण्याचा आणि पाण्याच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: पुण्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर, घटनेच्या २८ दिवसांच्या आतच न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित केले आहेत. आरोपीविरोधात ‘प्राईमा फेसी’ (प्रथमदर्शनी) सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आता या खटल्याची सुनावणी दररोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, वैद्यकीय चाचण्या, लैंगिक चाचणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रियकराने केलेल्या फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वीच तिने आपल्या कुटुंबीयांना या नात्याबद्दल सांगून लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबाचाही या विवाहाला होकार होता. मात्र, मे महिन्यात अचानक प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगत तिची फसवणूक केली. प्रियकराने केवळ आपला वापर केल्याचे समजल्याने ही तरुणी तीव्र मानसिक तणावाखाली होती. भावाने तिला समजावून सांगण्याचा आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि आरोपी नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नाशिकमधून ताब्यात घेतले आहे. जयेश गांगुर्डे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, नुकतीच त्याची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती आणि त्याची नाशिक येथे बदलीही करण्यात आली होती. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास गांगुर्डे याच्याकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी त्याने सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर, पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या संभाषणादरम्यान एक लाख रुपये लाच घेण्याचे तडजोडीअंती निश्चित झाले. दरम्यान,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून, त्यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मामासह अन्य १५ नातेवाईकांवर दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या नातेवाईकांवर ११ मे २०२६ रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत होते. या तपासात सहकार्य करण्यासाठी गांगुर्डे यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग येत आहेत. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. अचानक धनखर्च होण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन काळजीपूर्वक करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, पण सहकाऱ्यांशी वाद टाळणे हिताचे राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत आनंदात जाईल. मिथुन: आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी अवैध गोवंश आणि गोमांस तस्करीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकून तब्बल ३९ गोवंश ताब्यात घेतले असून, त्यांची अंदाजे किंमत २६ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २८ आणि २९ मे रोजी साजरा होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच परिसरात कोणत्याही प्रकारे अवैध गोवंश किंवा गोमांसाची वाहतूक व विक्री होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले होते. या सूचनांचे गांभीर्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरालगतच्या अकोले-नाशिक बायपास रोडवरील विठ्ठलनगर येथील विठ्ठल मंदिर आणि ह.भ.प. किसन महाराज हारदे आश्रमाच्या आवारात येत्या ३० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका समाधी भूमीपूजन कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे अनधिकृत असून त्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाने प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात मंडळाच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर येथील विठ्ठल मंदिरात दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दिवंगत ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या समाधीचा भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना कश्यपी धरणावर घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच परिसरातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात आणि मूळ गावी तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, एका धाडसी महिलेच्या सतर्कतेमुळे दोन वर्षांची चिमुरडी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे हरवले आहे. मूळचे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रहिवासी असलेले सचिन कैलास ठोंबरे हे सध्या नाशिकच्या मखमलाबाद भागात वास्तव्यास होते. सुटी साजरी करण्यासाठी सचिन ठोंबरे, त्यांची पत्नी रोहिणी, दोन वर्षांची मुलगी आणि त्यांच्या शेजारी राहणारी दोन मुले…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि संध्याकाळी त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवता येईल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवय कडे लक्ष द्या. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण झाल्याने मनाला मोठी शांतता लाभेल. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग जुळून येत आहेत. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांची भेट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख हे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य देणारे अत्यंत लोकप्रिय व कर्तबगार नेते होते, असे गौरवउद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यातील दृढ संबंधांना उजाळा दिला. विलासरावजींचे बाळासाहेब थोरात यांच्यावर भावासारखे प्रेम होते. त्यांनी मुख्यमंत्री असताना थोरात यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. या दोन्ही नेत्यांची जनमानसाप्रती असलेली तळमळ आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रातील तमाशा रसिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष आणि संगमनेरचे सुपुत्र असलेल्या रघुवीर खेडकर यांनी आपल्या असामान्य कलागुणांच्या जोरावर पारंपरिक लोककलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना होती. मात्र, संगमनेरमधील राजकीय परिवर्तनानंतर आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर यासाठी विशेष पाठपुरावा केला. कांताबाई सातारकर पुरस्कार सोहळ्यादरम्यान संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक/चांदवड: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘महाविकास आघाडी’च्या वतीने चांदवड येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता डावे पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन आणि शासनाकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या बळाच्या वापराचा किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. आतापर्यंत हे आंदोलन केवळ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सुरू होते. मात्र, आंदोलकांची गळचेपी करण्यासाठी शासनाने ज्या प्रकारे बळाचा वापर केला आहे, ते पाहता आता डावे पक्ष आणि शेतकरी संघटना या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर डाव्या आघाडीच्या…
