Author: Annant Ppangarkar

संगमनेर (प्रतिनिधी): मालपाणी फाऊंडेशन संचलित ध्रुव ग्लोबल स्कूलने आपल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची परंपरा जपत यावर्षी मेवाडच्या गौरवशाली इतिहासावर आधारित भव्य ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन केले आहे. शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता मालपाणी लॉन्स येथे हा प्रेरणादायी सोहळा पार पडणार असून, यामध्ये शाळेच्या माध्यमिक विभागातील ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महानाट्याच्या माध्यमातून परकीय आक्रमकांना तब्बल तीन शतके रोखून धरणारे बाप्पा रावल यांच्यापासून ते अटकेपार झेंडा फडकवणारे महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला जाणार आहे. प्रेक्षकांना यावेळी राणी पद्मिनीचा ऐतिहासिक जोहर, वीर गोरा आणि बादल यांचे अचाट शौर्य, पन्नादाईंचा सर्वोच्च त्याग आणि दानशूर भामाशाह यांच्या दातृत्वाची गाथा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहराचा नावलौकिक आणि वैभव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शहरात प्रशासकीय राजवट असताना जनसामान्यांच्या प्रश्नांवर ब्र काढायला तयार नसलेले महायुतीचे पदाधिकारी आता निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अचानक सक्रिय झाले आहेत.  नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी अद्याप आपल्या पदाचा कार्यभारही हाती घेतलेला नसताना मुख्याधिकाऱ्यांना निवेदने देऊन आंदोलनाचा पवित्रा घेणे, ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याची खरमरीत टीका माजी नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपराव पुंड यांनी केली आहे. दिलीपराव पुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महायुतीच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला आहे. ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संगमनेरने विकासाची…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी सहकारी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर्जप्रकरणे आणि कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा वापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या संचालक मंडळासह २२ जणांविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश फुलचंद गांधी, बाळासाहेब सहादु हाडवळे, नंदू सुभाष वर्पे, सूर्यभान शेटे, नंदू कारभारी खेमनार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, जिजाबापु पोपट शिंगोटे, नामदेव गोविंद आहेर, सुधाकर बाजीराव जाधव, रंगनाथ किसन सानप, अमोल दादासाहेब गुंजाळ, संतोष संपत सातपुते, राजेंद्र…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे आज पूर्णत्वास जातील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रकल्पांची आखणी करण्यासाठी हा उत्तम काळ असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर विश्रांती घ्या.…

Read More

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपीने ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि त्यांना वाचवण्यासाठी धावलेला एक नागरिक गंभीर जखमी झाले असून, फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रॅक्टरवर झडप घालून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका टेम्पो चोरीचा (MH 14 AH 369) गुन्हा दाखल असून हा टेम्पो संशयित आरोपी लक्ष्मीकांत काळू मुंजाळ (रा. कमालपूर) याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कर्मचारी अजित पठारे व प्रसाद साळवे यांनी…

Read More

मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागात ‘प्रकाश योजना’ कार्यान्वित करण्यासह सुरक्षिततेच्या विविध प्रभावी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर- मंत्रालयातील दालनात झालेल्या या सविस्तर चर्चेत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कृषी आणि दूध व्यवसायात प्रगत आहे. पशुपालनामुळे महिला आणि शेतकऱ्यांचा चारा काढण्यासाठी शेतात सातत्याने वावर असतो,…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा करताना उधळलेला गुलाल आणि कचरा साफ करण्याच्या किरकोळ कारणावरून मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) संगमनेरच्या इंदिरा नगर भागात मोठा राडा झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, नवनिर्वाचित नगरसेविका वनिता गाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच गाडे कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल झाला असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा नगरमधील गल्ली क्रमांक ४ मध्ये मंगळवारी (२३ डिसेंबर) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. निवडणुकीच्या मिरवणुकीनंतर परिसरात पडलेला गुलाल स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेची अग्निशामक गाडी बोलावण्यात आली होती. पाण्याचा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख आघाड्यांसोबतच आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या या निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील सर्व ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करून ताकदीने निवडणूक लढवली जाणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संगमनेर व फॉरेस्ट वाहतूकदार संघटना आणि किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले नाक्यावरील लालतारा कार्यालयामध्ये गुरुवारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. बापू कानवडे होते. बैठकीची अध्यक्षीय सूचना…

Read More

अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज- जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि वन्यजीव संरक्षणाकरिता वनविभाग आता अधिक गतिमान झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १४ रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बुधवारी निळवंडे येथे करण्यात आले. या नवीन वाहनांमुळे वनविभागाच्या ताफ्याचे बळ वाढले असून, बिबट्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीत होणारे त्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडे जलद प्रतिसाद वाहनांची कमतरता होती. ही गरज ओळखून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४…

Read More

अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मानवामधील वाढता संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. केवळ पिंजरे लावून किंवा गस्त घालून बिबट्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत असल्याने, वन विभागाने पुण्यातील ‘डी.ए.डी.ए. रिसर्च फाऊंडेशन’ संचलित ‘डावेल लाईफसायन्सेस’ यांच्या सहकार्याने ‘एआय वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेली ही यंत्रणा आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही यंत्रणा गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या पारंपरिक उपायांच्या पलीकडे जाऊन काम करते. यामध्ये प्रगत ‘कॉम्प्युटर व्हिजन’ आणि ‘डीप लर्निंग अल्गोरिदम’चा वापर करण्यात आला आहे. अनेकदा शेतातील सामान्य सेन्सर वाऱ्यामुळे हलणारी…

Read More

मेष- उद्याचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. वृषभ- आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असून कुटुंबासोबत तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. अनावश्यक खर्च टाळणे तुमच्या हिताचे ठरेल. मिथुन- नोकरीत सकारात्मक बदलाचे संकेत असून मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि प्रवासाचे योग येतील. बोलण्यावर संयम ठेवा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. कर्क- तुम्हाला उद्या मानसिक शांतता लाभेल आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कामाचा…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर  राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक गोंधळात सापडले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा थेट इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून संगमनेरने अनेक बाबतीत विकासाची मोठी भरारी घेतली आहे. एकीकडे शांत आणि संयमी असे थोरात-तांबे यांचे नेतृत्व राज्यभरात ओळखले जाते. या अनुषंगाने संगमनेरने शांत आणि सुसंस्कृत शहराचे स्वतंत्र असे अस्तित्व राज्याच्या पटलावर…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल आणि नवीन प्रकल्पांची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. आर्थिक आवक चांगली असली तरी संध्याकाळपर्यंत अनपेक्षित खर्च वाढू शकतात. आरोग्याच्या बाबतीत थोडे जागरूक राहा, विशेषतः डोकेदुखीचा त्रास संभवतो. कौटुंबिक जीवनात भावंडांशी असलेले जुने वाद मिटल्याने घरात आनंदी वातावरण राहील. वृषभ – तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभल्याने कठीण कामेही वेळेत पूर्ण होतील. जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक केली असल्यास आज मोठा आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. मात्र, बाहेरचे अन्न खाणे टाळावे कारण पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. जोडीदारासोबत धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. मिथुन -…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये सोमवारी रात्री एका नगरसेवकासह १७ जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा नवनिर्वाचित नगरसेवकाकडून अशाच घटनेची पुनरावृत्ती आज (मंगळवारी) पुन्हा झाल्याचा नवीन प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ माजली आहे. संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. मिरवणुकीतील गुलाल धुऊन काढण्यासाठी व कचरा काढण्यासाठी फिर्यादीने नगरपालिकेचे वाहन बोलावले या किरकोळ कारणावरून फिर्यादी महिला आणि साक्षीदारांना नवनिर्वाचित नगरसेविकेसह काही जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सात आरोपींसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशोदा राजेंद्र अभंग (वय…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच भारतनगर भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.नवनिर्वाचित विजयी सदस्य नूर महंमद शेख यांची मिरवणूक सुरू असताना एका कुटुंबावर लोखंडी रॉड, चॉपर आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या खळबळजनक घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,२२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास फिर्यादी रिक्षा चालक मुजीब शमशुद्दीन शेख (वय ४०, रा. भारतनगर, संगमनेर) हे आपल्या घरी असताना, यावेळी नवनिर्वाचित विजयी उमेदवार नूर महंमद शेख यांची मिरवणूक या भागातून जात होती. मिरवणूक फिर्यादींच्या घरासमोर आली असता, आरोपींनी…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज- शहरातील मदिनानगर भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली असून, तब्बल ७०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जनावरे, मांस आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. मदिनानगरमधील गल्ली क्रमांक चारमध्ये काही इसमांनी गोवंश जनावरे आणि वासरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बांधून ठेवल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, बारवकर यांनी तातडीने पोलीस पथकासह रविवारी रात्री…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू आणि ३ लाख रुपये किमतीची टाटा झेनॉन पिकअप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आश्वी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना पानोडी गावच्या शिवारातील कॅनॉलवर एक संशयास्पद टाटा कंपनीची पिकअप गाडी दिसून आली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता ऋषिकेश…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन – आज तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्क – मानसिक शांतता लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सिंह – तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. कठीण कामे सहज पूर्ण होतील.…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-अकोले-नारायणगाव-राजगुरुनगर-चाकण या मूळ आराखड्यानुसारच झाला पाहिजे, या मागणीसाठी आता जनआंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज नांदूर खंदरमाळ फाटा (संगमनेर) येथे या मार्गावरील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि रेल्वे कृती समितीची महत्त्वपूर्ण विचारमंथन बैठक सोमवारी पार पडली. आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे मूळ मार्गानेच सरळ रेषेत जावी यासाठी सर्वपक्षीय आंदोलन उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपल्या या मागणीसाठी नुकताच अकोले-संगमनेर भव्य मोर्चा काढला होता. 22 किलोमीटरचे अंतर पार करत संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चामध्ये संबंधित सर्व आमदार खासदारांनी एकत्र बैठक…

Read More

अमोल शेलकर – (राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र – TEAM RGSS) विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर झालेली ही पहिलीच जनतेतील निवडणूक होती. या निकालाने हे सिद्ध केले आहे की, संगमनेरच्या मतदारांनी विधानसभेला झालेली चूक वेळीच दुरुस्त करून साहेबांनी गमावलेला जनाधार पुन्हा व्याजासकट, एका भव्यदिव्य विजयाच्या रूपाने त्यांच्या पदरात टाकला आहे. साहेब म्हटले की एकनिष्ठ, पक्षनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठतेचा संगम, हेच या विजयाने पुन्हा अधोरेखित केले. २०२४ ला झालेला तो राजकीय अपघात मागील वर्षभरात कोणीही विसरू शकले नव्हते. शहर असो की गाव, साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते एका योग्य संधीची वाट पाहत होते. अखेर नगरपालिकेच्या निमित्ताने ही संधी चालून…

Read More