Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शेकडो वर्षांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या संगमनेरच्या मानाच्या पहिल्या गणपती श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या गणेशोत्सव २०२६ च्या अध्यक्षपदी रोशन आमले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रंगारगल्ली येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात मंडळाच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटणकर, तर उपाध्यक्षपदी संकेत काजळे व ऋषिकेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदाची जबाबदारी अक्षय ढोरे यांच्याकडे तर सहसचिवपदाची जबाबदारी प्रथमेश गरुडकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मंडळाच्या तिजोरीची धुरा खजिनदार देवेंद्र काळे व कैलास बुरसे सांभाळणार असून प्रकल्पप्रमुख…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची अवैध तस्करी, विक्री व बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी वाहन असा तब्बल ५ लाख ३८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (८ ऑगस्ट) रोजी रात्री संगमनेर शहरातील जनता राजा मैदानाजवळील शिवाजीनगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर बातमी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. बातमीच्या आधारे पथकाने तातडीने रचून छापा टाकला. या कारवाईत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नातवाला वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या आजोबांचा नातवासोबतच बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) आणि सर्वेश संतोष गुळवे (वय १३, दोघेही रा. गुळवे वस्ती, सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी मृत झालेल्या आजोबा-नातवाची नावे आहेत. गुळवे वस्तीवर राहणाऱ्या गुळवे कुटुंबाच्या घराशेजारीच शेततळे आहे. रविवारी सायंकाळी सर्वेशचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. हा प्रकार त्याच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात येताच तिने तात्काळ आरडाओरड केली. आवाज ऐकून जवळच असलेल्या आजोबा पांडुरंग गुळवे यांनी क्षणाचाही विचार न…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील आणि तुमचे निर्णय कौतुकास्पद ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने जुने मतभेद दूर होतील. आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले धन परत मिळू शकते. व्यवसायात नवीन योजना राबवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मनात सकारात्मक विचार ठेवा आणि नको त्या वादांपासून दूर राहा. मिथुन – आजच्या दिवशी बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या जोरावर तुम्ही अनेक कठीण कामे सहज पूर्ण कराल. समाजात मानसन्मान वाढेल. नवीन व्यक्तींशी झालेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी रविवारी क्रांती दिनी संगमनेरमध्ये टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या दुपारी उशिरापर्यंत ही वाहतूक सुरळीत केली जात होती. तर आपल्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर जनसागर उसळला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पूर्वी मंजूर झालेल्या सरळ रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन उभे केले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः समृद्धी महामार्गावर तर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरमध्ये हिवरगाव पावसा येथील टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यासह राहुल…
बाबरी मशीद पाडण्याचा विषय असो, की राम मंदिर उभारण्याचा. या दोन्ही विषयांमध्ये शक्य झालं तिथे पैशांवर हात मारण्याचा प्रकार अत्यंत खुबीने पार पाडला गेला आहे. चंपतराय बन्सल नावाच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षाने राम मंदिराला पुरतं बदनाम करून टाकलंच. शिवाय रामाच्या नावाचं सोंग घेऊन धर्माच्या नावाने उत्तम ढोंग करू शकतो, असं उसने जगाला दाखवून दिलं आहे. प्रचंड माया जमवलेला हा चंपतराय म्हणतोय, “माझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही… माझ्या मागे लागलात तर मी भल्याभल्यांना आडवं करेन,” असं धमकावत त्याने भाजपबरोबरच आरएसएसच्या नेत्यांनाही घेरलंय. कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा ज्याच्यावर आरोप आहे, अशी व्यक्ती थेट आव्हान देऊ शकते, हे म्हणजे ‘सबकी उंगली…
अमोल शेलकर ९ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा झाली आणि संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या निर्णायक लढ्याला सुरुवात झाली. महात्मा गांधींनी दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारा ठरला. ब्रिटिश सत्तेने प्रमुख नेत्यांना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; मात्र नेतृत्वाला तुरुंगात डांबले तरी जनतेतील स्वातंत्र्याची भावना कैद करता आली नाही. उलट हे आंदोलन सामान्य भारतीयांच्या हातात गेले आणि ब्रिटिश साम्राज्याच्या पायाभरणीलाच हादरा बसला. ‘भारत छोडो’ आंदोलन अचानक निर्माण झालेले आंदोलन नव्हते. जवळपास दोन शतकांच्या ब्रिटिश राजवटीने भारतीय जनतेच्या आर्थिक, सामाजिक आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाच्या मागणीसाठी पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने आज रविवारी ऐतिहासिक चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शविल्याने या प्रश्नाला एक नवे वळण मिळाले आहे. कृती समितीने आमदार खताळ यांच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, त्यांना केवळ घोषणा व बैठकांपर्यंत न थांबता चक्काजाम आंदोलनात आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष सहभागी होण्याचे थेट आवाहन केले आहे. आमदारांच्या आमरण उपोषणाच्या भूमिकेनंतर आंदोलनात काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रेल्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुकेवाडी येथील आग्नेश्वर मळा येथे घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भानुदास शिंदे (वय ५३) यांच्या बंद घराची कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने घरातील ४ लाख ४० हजार रुपयांचा साडेतीन तोळ्यांचा राणीहार, १ लाख २० हजार रुपयांचा १ तोळ्याचा नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या, १ तोळ्याची आणखी एक सोन्याची साखळी, अर्धा तोळ्याचे कानातील जोड, सोन्याचे ओम पान, कानातील बाळी, नाकातील नथ, मोरणी आणि चांदीचे जोडवे व छल्ला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरणाऱ्या नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार असून नाशिक-पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर सकाळी नऊ वाजता तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. संगमनेर, सिन्नर, अकोले, नारायणगाव, जुन्नर, मंचर, खेड आणि चाकण या संपूर्ण पट्ट्यातील जनतेच्या हक्काच्या या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नागरिक, युवक आणि महिला या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत. नाशिक-पुणे-मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या विकासासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी १९९८ पासून या थेट रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून ते केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महारेलपर्यंत केलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे गोदावरी व कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे रेल्वे हा लाखो नागरिकांच्या विकासाशी थेट जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा गंभीर आणि तांत्रिक प्रश्नावर वस्तुनिष्ठ भूमिका मांडण्याऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साईबाबांच्या नावाचा आधार घेत शिर्डी मार्गाला विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. “शिर्डी रेल्वेला विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील” अशा आशयाचे विधान करणे हे…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी किंवा बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जवळच्या नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. वृषभ- आजचा दिवस संयम आणि शांततेने घालवण्याचा आहे. मानसिक स्थिरतेसाठी योग आणि ध्यानाचा सहारा घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात, परंतु…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर (प्रतिनिधी): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने ३५७ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित बफर स्टॉक विक्रीसाठी खुला केला आहे. कृषी विभागाच्या या नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामासाठी तालुक्याला एकूण ७०० मेट्रिक टन युरियाचा साठा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३४९ मेट्रिक टन युरिया त्वरित उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, सध्या शेतीकामांचा वेग वाढल्याने युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी नाशिक-पुणे रेल्वे कृती समिती संगमनेरच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जीएमआरटी हे रेल्वेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत मांडणाऱ्या डॉ. काकोडकर यांच्या समितीकडून रेल्वेच्या बाजूने सकारात्मक अभिप्रायाची अपेक्षा करणे म्हणजे आंदोलनाच्या तोंडावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे डॉ. काकोडकर यांना या समितीतून तत्काळ हटवावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा रोखठोक इशारा देण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) प्रकल्पाच्या कारणास्तव रेल्वे प्रकल्पात अडथळे निर्माण होत असताना, यावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्यभरात एसटी बसेसची अत्यंत केविलवाणी अवस्था झालेली असताना आणि प्रवाशांच्या भरमसाठ तक्रारी असताना, नाशिक-पुणे मार्गावरील बसेसला संगमनेर येथे थांबा मिळवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आता आगामी आंदोलनाच्या तोंडावर कमिट्या स्थापन करून केवळ देखावा केला जात असून, हा जनतेच्या आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने केला आहे. परिवहन विभागातर्फे रेल्वेसंदर्भात समिती स्थापन करून जनतेची सरळ सरळ दिशाभूल केली जात आहे. जर राज्य सरकारला हा मार्ग खरोखरच करायचा होता, तर महारेलकडे वर्ग केलेले १ हजार कोटी रुपये माघारी का बोलावले, असा रोकडा सवाल कृती समितीने विचारला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री…
आजचे राशीभविष्य मेष – आजच्या दिवशी कामाचा ताण अधिक राहील, तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा नाहक वाद निर्माण होऊ शकतात. वृषभ – आजचा दिवस भाग्याचा आणि मनःशांती देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा योग्य वापर कराल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि मानसन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण अत्यंत प्रसन्न राहील. मिथुन – थांबलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. नवीन धाडसी निर्णय घेण्यासाठी आणि मनोरंजनासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत मात्र उधळपट्टी टाळावी आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. कर्क – कामाच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली असून आमदार अमोल खताळ आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पातील तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या प्रस्तावित संरेखनामुळे (अलाईनमेंट) खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (GMRT) प्रकल्पावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे कामात विलंब होत असल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या तांत्रिक समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरासह तालुक्यात आता सर्व विवाह सोहळे वेळेत आणि मुहूर्तावर पार पडणार असून रात्री १० वाजेनंतर डीजे व बँड वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालणारी नवी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यांमधील वाढता अनिष्ट पायंडा, वेळेचा अपव्यय आणि कायद्याचे होणारे उल्लंघन रोखण्यासाठी संगमनेर तालुका लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख वसंतराव कुटे यांच्या पुढाकारातून आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत लॉन्स येथे आयोजित संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सध्या विवाह सोहळ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत कर्कश्श आवाजात चालणारे हळदीचे कार्यक्रम आणि लग्नाची वेळ टळून गेल्यानंतरही निघणाऱ्या मिरवणुकींमुळे पाहुण्यांपासून ते…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ३३/११ केव्ही राजापूर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रमोद शिवराम हासे (रा. राजापूर, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणच्या कुरण शाखेचे सहाय्यक अभियंता दुर्गेश अनिल जगताप यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी रात्री राजापूर कृषी फीडरवरील लोडशेडिंगच्या कारणावरून आरोपीने कार्यालयाच्या फोनवर संपर्क साधून कर्मचाऱ्याला धमकी दिली होती. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी आरोपीने राजापूर उपकेंद्रात जाऊन परस्पर गुंजाळवाडी येथील एबी स्विच अनाधिकृतपणे उघडला. तसेच ड्युटीवर असलेल्या यंत्रचालक कर्मचाऱ्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला आणि वीज वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेला धोका…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अकोले तालुक्यातील एका गंभीर प्रकरणात संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी (५ ऑगस्ट) आरोपी युवकाची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. किरण किसन सावंत असे मुक्तता करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून अवघ्या सहा महिन्यात या खटल्याचा न्यायालयाने निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा ठपका ठेवत अकोले पोलीस ठाण्यात किरण किसन सावंत या १९ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, १० डिसेंबर २०२५ रोजी अकोले तालुक्यातील एक…
