Author: Annant Ppangarkar

विशेष प्रतिनिधी / मुंबई-  बदलापूर येथील चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारचे फेक नरेटिव्ह उघड पाडलेत. न्यायालायाने चौकशी अहवालात हे एन्काउंटर घडवून आणल्याचं म्हटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली. या एन्काऊंटरला पोलीस जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत काढण्यात आलाय. पोलिसांकडील बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलंय. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झाली नाही, तर दुसरीकडे आरोपी…

Read More

संगमनेर – मोहसीन खलील शेख बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी) अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून त्याबदल्यात सामाजिक कार्यकर्त्याकडे…

Read More

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने सोमवारी शहरातील प्रभाग १ मधील पी.जे. आंबरे पाटील कन्या विद्यालयात महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोफत उपचार घेण्यासाठी सकाळपासून अनेक रुग्णांनी गर्दी केली. अनेक रुग्णांवर शिबिरस्थळी उपचार करण्यात आले तर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी नेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला. अधिक माहिती अशी की, शहरातील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी दर रविवारी विविध प्रभागात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १० पेक्षा अधिक प्रभागांमधील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील नगरपालिकेच्या शासकीय जागेत असलेल्या अनधिकृत सागर वाईन्स, सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाविरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदरील दुकानाचे बोगस लायसन्स रद्द व्हावे, नगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमण हटवावे अशा मागण्या उपोषणकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी केल्या आहेत. सदरील दुकान हे अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे बनवून नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांत धूळफेक करत चालवत असल्याचा आरोप बानोबी शेख यांनी केला असून सदरील दुकान तात्काळ बंद करून खोटे कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आता नगरपालिका प्राशासन व उत्पादन शुल्क विभाग काय…

Read More

नाशिक – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून यातील १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देवळा पोलीस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कैलास जगताप (वय ५४ वर्ष, रा. मुंजवाड, सटाणा) असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. हा पोलीस अधिकारी देवळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदारावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करता नोटीस देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक कैलास जगताप (५४, मुंजवाड, सटाणा) याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. २०…

Read More

संगमनेर – ‘एफडी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो’ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ असा संदेश देणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉलला संगमनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालपाणी लॉन्स येथे दि. १६ ते २२ जानेवारी पर्यंत सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. धम्माल, मस्ती, मनोरंजनाबरोबरच संगमनेरकरांनी मुलांचे शिक्षण, लग्न, पेन्शन सारख्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याकरिता कडलग इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व भविष्यकालीन उपायोजनांकरिता क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदविले. ‘एफ डी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो ‘ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्लोगनला संगमनेरकरांनी दाद…

Read More

मुंबई – महायुती सरकार मध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेले मतभेद समोर आले आहे. महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आल, त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या असून १९ जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच काही मंत्र्यांना पालकमंत्री पदावरून डच्चू देण्यात आल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे.…

Read More

मुंबई, दि. १९ : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे. मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील. ठाणे – उपमुख्यमंत्री…

Read More

संगमनेर – अलिबाग (जि. रायगड) येथील साईभक्त वाहनातून शिर्डी येथे जात असताना कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील गावच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला चार अज्ञात लुटारूंनी कार आडवी लावत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना शनिवारी (ता.१८) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अलिबाग येथील साईभक्त प्रवीण वसंत नाईक, अभय रवींद्र ठाकूर, गणेश दत्तात्रय मेस्त्री, ऋषिकेश पडवळ, जयेश जयराज कोंडे, राजेंद्र ठाकूर हे सर्व साईभक्त वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कौठे कमळेश्वर गावच्या पुढे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…

Read More

अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने संगमनेर शहरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या आरोपीच्या दुसऱ्या साथीदार फरार असून पोलिसांनी संबंधित आरोपींकडून सुमारे सहा लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले. गेल्या वर्षी (६ डिसेंबर) संगमनेर शहरातील मालपाणी नगरमध्ये राहत असलेल्या रुपेश मुरलीधर भालेराव (वय ४८, रा. मालपाणीनगर, सुदर्शन बंगला, संगमनेर) यांच्या बंगल्याच्या टेरेस वरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश मिळवत ३ लाख ७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले होते. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं. १०१३/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला…

Read More

अहिल्यानगर – गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा विभाजनासंदर्भात जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजना संदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकार समोर नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. आपण महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही. जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक आणि भरती प्रक्रियेचे समर्थन – जिल्हा सहकारी बँकेच्या कारभार पारदर्शक असून, देशपातळीवर बँकेचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. बँकेची भरती…

Read More

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पक्ष मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणाने प्रस्थापितांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. देशाची सत्ता ही आपला सर्वाधिकार असल्याचा समज झालेले सत्ताधारी भाजपचे पुढारी आणि संघाचे धुरीण विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाचं कधीच कौतुक करू शकत नाहीत. सत्तेची गुलामी करणार्‍या माध्यमांनी तर आपली लाज गेल्या दहा वर्षांपासून खुंटीला टांगून ठेवल्याने राहुल यांच्या भाषणावर आग ओकण्याचे उद्योग यथासांग सुरू ठेवलेत. सरकारविरोधी चार शब्द बोललं की बुडाला आग लागावी असं चित्र माध्यमांचं आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या भाषणानिमित्त त्यांनी ती हौस भागवण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपच्या सत्तेविषयी आणि त्यांच्या निर्णयांविषयी चांगलं काही बोलता येत नसलं की विरोधी पक्ष नेत्याला झोडा, त्याच्या…

Read More

मुंबई – दीर्घकाळ रखडलेली पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त लाभला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई शहराचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित असलेल्या बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बहुचर्चित असलेल्या भरत गोगावले, योगेश कदम आणि इतर तिघा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना सह पालकमंत्री देण्यात आले…

Read More

संगमनेर – दुचाकीवरून नाशिक पुणे मार्गाने संगमनेरकडे येणारे दोघेजण रस्त्यात आडव्या असलेल्या पतंगीच्या मांज्याला अडकून जखमी झाले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर संगमनेर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटने संदर्भात शनिवारी सायंकाळपर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.अनिकेत संजय कटारनवरे (वय २२ वर्ष रा. सिन्नर, जि. नाशिक) व प्रफुल्ल घुसळे (वय २८ वर्ष रा. संगमनेर) अशी दोघा जखमींची नावे असून अनिकेत कटारनवरे याची प्रकृती चिंताजनक असून मांजामुळे त्याच्या गळ्याला मोठी जखम झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरच्या बाह्यवळण रस्त्यावर…

Read More

संगमनेर – जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी संगमनेरचे नंदकुमार बोऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. सांगोला (सोलापूर) येथे पार पडलेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे राज्यातील पदाधिकारी निवडण्यात आले. या बैठकीत संघटनेच्या जिल्हास्तरीय कामाचा आढावा घेण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय नेते म्हणून दौलत नाना शितोळे यांची निवड करण्यात आली तर संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली. राज्यस्तरीय पदाधिकारी, विविध आघाडी आणि समित्यांच्या निवडी देखील यावेळी पार पडल्या. यावेळी संघटनेचे राज्यातील पदाधिकारी, अठरापगड संघटनेचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. राज्य अध्यक्षपदी अंकुश जाधव, युवक अध्यक्षपदी सुधीर नाईक, राज्य…

Read More

नागपूर – राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन देखील अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांचा पेच सुटू शकलेला नाही. २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन समोर असताना देखील अद्यापही पालकमंत्री निवडीस मुहूर्त लागू शकलेला नाही. पालकमंत्री निवडीवरून महायुतीत मतभेद असल्याचे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाष्य करत २६ जानेवारी पूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल असं म्हटले आहे. शुक्रवारी नागपुरात मंत्री बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पालकमंत्री नियुक्तीचा कोणताही पेच नाही. महायुतीचे सरकार असल्याने घटक पक्षांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. येत्या २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल. यापूर्वी बावनकुळे यांनी १५…

Read More

अहिल्यानगर – अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अशा २० अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी ओला यांनी या बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगमनेर पोलीस उपअधीक्षकांचे वाचक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांची घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती मुळुक यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना अर्ज शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे टीएमसीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.…

Read More

मुंबई, दि. १८ : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. शुक्रवारी परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदीचा करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग (प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या) होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून…

Read More

माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा लौकिक देशपातळीवर! संगमनेर – संगमनेरमधील सहकारमहर्षी चषकातून आयपीएलसह देशपातळीवरचे अनेक खेळाडू तयार होतील, असा विश्वास स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी व्यक्त केला. राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात गौरवशाली ठरलेल्या सहकार महर्षी T-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या एस आर एस संघाने 277 धावांचे मोठे आव्हान उभे करून पुण्याच्या पुनीत बालन संघाचा 37 धावांनी पराभव करून मानाचा सहकार महर्षी चषक पटकावला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या 25 व्या वर्षातील क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी…

Read More

२० जानेवारीपासून दुकानासमोर बानोबी शेख करणार उपोषण संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या मालकीच्या मिळकतीवर अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात पालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने येत्या सोमवारपासून (२० जानेवारी) दुकान समोरील रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून या उपोषणात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक सहभागी होणार आहे, अशी माहिती तक्रारकर्त्या बानोबी शेख यांनी दिली आहे. दरम्यान या विषयावरून दोन दिवसांपूर्वी संगमनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी या परिसरातील नागरिक, माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला घेराव घालत संबंधित दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली…

Read More