Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रक्षक दलाच्या तातडीच्या हालचालीमुळे हा प्रकार लगेच समोर आला असून पुढील तपासाला मदत झाली आहे. दि. 9 मे रोजी रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास रक्षक दलाची गाडी शहरात नियमित राऊंडवर होती. त्यावेळी नगरपालिका गेटसमोरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये एक संशयित व्यक्ती असल्याचा कॉल रक्षक दलाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे एटीएमची लाईट बंद असल्याची शंका वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रकार संशयास्पद वाटताच रक्षक दलाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदारांचा सत्कार करत ५० डझन फुलस्केप वह्या भेट दिल्या. या वह्या गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वापरल्या जाणार आहेत. आमदार अमोल खताळ पाटील यांचा आणि युवा कार्यकर्ते सुवेद इनामदार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने उत्साहात भर पडली होती. स्वतःचा वाढदिवस असतानाही सुवेद इनामदार यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य देत हा उपक्रम राबवला. ही बाब लक्षात घेत, आमदार अमोल खताळ पाटील यांनी सुवेद इनामदार यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुवेद इनामदार,…
दोन बहिणींच्या छेडछाड प्रकरणी संगमनेरमध्ये एकावर गुन्हा; ‘BNS’ आणि ‘पोक्सो’ कलमान्वये कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्रीसाठी आणि मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (१० मे २०२६) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सध्या आपल्या माहेरी वास्तव्यास आहे. दि. ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची १४ वर्षीय लहान बहीण घराबाहेर फिरत…
ज्या लोकशाहीने भारताचा पाया भक्कम करून ठेवला त्याच लोकशाहीला खुलेआम दावणीला लावण्यात आलं आहे. हे आधी महाराष्ट्र, हरियाणात झालं ते आता पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालं. चोरीच्या मार्गाने मिळालेल्या सत्तेला दोष देण्याऐवजी माध्यमं या सत्तेला भाजपचं एकवीसावं राज्य गणतात तेव्हा माध्यमांच्या एकूणच मानसिकतेचा विचार करावा लागतो. सार्याच यंत्रणा नीतीभ्रष्ट आणि लाचार झालेल्या पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. सत्ताधार्यांविरोधी केलेल्या एकाही तक्रारीची दखल घ्यायची नाही, सत्तेतल्या नेत्यांना स्वैर वागू द्यावं, अशी डोळेझाक यंत्रणांनी केल्याचा गैरफायदा या निवडणुकीत उघडपणे घेतला गेला. याची दखल घेण्याऐवजी सत्ता मिळाल्याचं कोण कौतुक माध्यमं करत आहेत. सर्वच क्षेत्रात भारत घसरत चालला असताना सत्तेला जाब विचारावं असं वाटायचं माध्यमांनी सोडून…
लोक विचारतात, तुला याच्यात नेमकं काय दिसतं? ठीक आहे, तर आज सांगतो, मला राहुलमध्ये काय दिसतं. हिंदुस्थानच्या इतिहासात ५००० वर्षात सर्वात जास्त खालच्या पातळीची टीका जर कुणावर झाली असेल तर तो राहुल गांधी आहे. एवढी टीका सहन करूनही तो जनसामान्यांच्या प्रश्नांपासून तसुभरही ढळलेला नाही. कित्येक वर्ष देशाच्या राजकारणात सत्तेत असणाऱ्या घराण्याचा तो वारसदार आहे. आणि तरीही तो ना हिटलर आहे, ना चंगेज खान, ना ईदी अमीन. त्याने कधी कोणते अमानवीय किंवा अक्षम्य कृत्य केलेले नाही. त्याची एकच चूक, तो एका विशिष्ट घराण्यात जन्माला आला. त्याला हटवण्यासाठी, हादरवण्यासाठी, खाली खेचण्यासाठी अनेक वर्षांपासून एक व्यवस्थित निधीपुरवठा केलेली, समन्वयित आणि संघटित मोहीम सुरू…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीचा वारसा जपणाया महाराष्ट्रात सध्या वैचारिक संघर्षाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वारकरी संप्रदायावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांविरोधात ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार समर्थन केले आहे. विकास लवांडे सारख्या प्रवृत्तींना योग्य धडा शिकवण्याचे काम भंडारे महाराजांनी केले असून, ही कृती लाखो वारकरी भाविकांच्या भावनांचेच प्रतिबिंब असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे. आमदार अमोल खताळ यांनी आपल्या समाज माध्यमावरील अकाउंट मध्ये म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय हा केवळ एक मार्ग नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संतपरंपरेचा आणि हिंदू अस्मितेचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. गेल्या काही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि मानवतेची शिकवण देणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कठीण काळातही आपला विचार ठामपणे मांडण्यासाठी धीरोदत्तपणे संकटांना सामोरे जाण्याची शिकवण दिली आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असून, पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे असे हल्ले चिंतेची बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आळंदी येथे संत परंपरेचा समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने शाईफेक केली. या घटनेचा निषेध करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तब्बल १२ वर्षे चाललेल्या एका महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी शुक्रवारी (८ मे २०२६) या खटल्याचा निकाल दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल भैय्याजी बागडे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होता. आरोपींच्या वतीने न्यायालयात ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. सुजाता गोडसे यांनी सहकार्य केले. या प्रकरणाची पार्श्वभूमी २०१४ सालातील आहे. पीडित मुलगी १७ वर्षे ६ महिने वयाची असताना,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: लोणीच्या पिंपरी निर्मळ परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत १० मे पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या तपासात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा संबंधित गर्भवती महिलांच्या पतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तपासाची व्याप्ती आता पुण्यापर्यंत पोहोचली असून नेवासा येथील मुख्य आरोपी डॉक्टरने ज्यांच्याकडून हे मशिन खरेदी केले होते, त्या पुण्याच्या दोन आरोपींना लवकरच कागद घेऊन पुढील…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक बाजू मजबूत राहण्यासोबतच एखादी जुनी गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र संध्याकाळच्या वेळी जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. व्यवसायात काही नवीन संधी चालून येतील, पण घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक ओढाताण होऊ शकते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. प्रिय व्यक्तीशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ योगासनांसाठी द्यावा. मिथुन: आजचा दिवस धावपळीचा असला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विकास कामांत अग्रस्थानी असलेल्या संगमनेर तालुक्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः पीक विम्याच्या वाटपात संगमनेर तालुक्याला पूर्णपणे डावलण्यात आले असून, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या पदरी ‘शून्य’ टक्के पीक विमा पडला आहे. हा प्रकार म्हणजे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संगमनेरच्या शेतकऱ्यांशी खेळलेला एक राजकीय डाव असल्याची टीका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी केली आहे. या संदर्भात आनंद वर्पे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आणि विस्तारित आहे. पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: आपल्याला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक प्रबळ कृती कार्यक्रम आखण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांच्या प्रमुखांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी येथे केले. १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संगमनेर येथील डाव्या संघटनांच्या वतीने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व ‘ताम्रपट’ कादंबरीचे लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते संभाजी भगत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. पठारे म्हणाले की, मराठी हीच…
शिर्डी: शिंदेसेनेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीमध्ये वाढत्या तक्रारी आणि संघटनात्मक त्रुटींची दखल घेत, जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथे आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच नव्या जोमाने काम करणारी नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील वाढते मतभेद, संघटनात्मक कामातील मरगळ आणि तक्रारींचा ओघ पाहता हा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमनेर, शिर्डी, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर या तालुक्यांमधील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सामंत यांनी जिल्हा संघटनेची दक्षिण व उत्तर अशा…
आजचे राशीभविष्य: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ उत्तम आहे, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ: आर्थिक बाबतीत आजचा दिवस प्रगतीकारक ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवावा लागेल. व्यापारात नवीन संधी मिळण्याची शक्यता असून गुंतवणूक करताना विचारपूर्वक पाऊल उचलावे. मिथुन: आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि एखादी चांगली बातमी समजेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि आनंदाचे वातावरण असेल. कर्क: आजचा दिवस थोडा धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. विनाकारण चिंता करणे टाळावे आणि सकारात्मक विचार ठेवावा. अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत, ज्यामुळे आर्थिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, जामखेड: नगरपरिषदेमध्ये आपल्या मुला-मुलीचा जन्मदाखला मिळवण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील लिपिक अभिजित जालीम भैसडे आणि कंत्राटी मदतनीस अहमद इलियास शेख अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराने नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या मुलांच्या जन्मदाखल्यासाठी नगरपालिकेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला होता. हे दाखले देण्यासाठी लिपिक भैसडे याने दीड हजार रुपये प्रति दाखला याप्रमाणे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम अग्निशमन दलातील कंत्राटी मदतनीस अहमद शेख याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. याबाबत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर लोणी परिसरातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश करताना एका डॉक्टर्स एजंटला रंगेहाथ पकडले होते. चौकशीअंती यात श्रीरामपूर मधील नामांकित डॉक्टरचा समावेश असल्याचे समोर आल्याने या डॉक्टरलाही बेड्या ठोकण्यात आल्या असून, राहता न्यायालयाने या नराधमांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात आणखी काही डॉक्टर एजंट सामील असल्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे. एकिकडे शासन स्तरावर ‘बेटी बचाओ’चे नारे दिले जात असताना, दुसरीकडे समाजातील काही पांढरपेशी डॉक्टर कोवळ्या कळ्यांचा गर्भातच गळा घोटण्याचे पाप करत असल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे. पिंपरी निर्मळ येथील छाप्यादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये यापूर्वी डॉ.…
आजचे राशीभविष्य: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसायात धनलाभाचे योग असून जुनी थकलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक परिश्रम करावे लागतील. धावपळ वाढल्यामुळे थोडा थकवा जाणवेल, परंतु कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नका. जवळच्या मित्राकडून मोलाचा सल्ला मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील. मिथुन: तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज तुम्ही अनेक समस्या सोडवू शकाल. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस…
संगमनेर तालुक्यात भीषण अपघात; आयशर टेम्पोच्या धडकेत चुलती-पुतणीचा जागीच मृत्यू महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारातील मोधळवाडी घाटात मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. एका भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात चुलती आणि पुतणीचा जागीच मृत्यू झाला. जया दत्तात्रय थोरात (वय २९) आणि अस्मिता दादाभाऊ थोरात (वय १६, दोन्ही रा. मोधळवाडी) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जया थोरात आणि अस्मिता थोरात या दुचाकीवरून मोधळवाडी घाट उतरत होत्या. याच वेळी समोरून घाट चढून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: ‘सौ शहरी एक संगमनेर’ या व्हाट्सअप ग्रुपवर काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर मधील श्याम तिवारी यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या संगमनेर मधील बहुतांशी व्हाट्सअप ग्रुप, समाज माध्यमांवर कोणाबद्दलही आक्षेपार्ह भाषेत टीकाटिप्पणी करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रकार सुरू आहे. गेल्या काही दिवसात समाज माध्यमांवर केलेल्या अशा प्रकारच्या टीका टिपणीमुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमातून टीकाटिप्पणी आक्षेपार्ह स्वरूपात होत असल्याने अशा…
मेष आजचा दिवस प्रगतीकारक आणि नवीन संधी प्राप्त करून देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असला तरी, जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करा. वृषभ आज तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी थोडे अधिक कष्ट करावे लागतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. व्यापारात नवीन करार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक ओढाताण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासावर लक्ष…
