Author: Annant Ppangarkar

खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांना नोटीस पाठवल्याची कृषिमंत्र्यांची सभागृहात माहिती महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय कारण? ज्याप्रमाणे मेडिकलमध्ये आपण औषध निर्मिती कंपनीवर कारवाई करतो मेडिकल विक्रेत्यावर नाही, तसाच हा प्रकार आहे. मात्र आपण कृषी सेवा केंद्र चालकांवरच गुन्हे दाखल करता, असे प्रश्न ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले. प्रश्नोत्तराच्या तासात थोरात यांनी खते व बी बियाण्यांच्या विषयावरून सरकारला घेरले. थोरात म्हणाले, बीटी बियान्याशी संबंधित कायदा मी कृषिमंत्री असताना झाला. या माध्यमातून आम्ही बियाण्यांच्या किमतीवर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र, आणखी एक दोषी मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची बातमी समोर येत आहे. 13 जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. यासंदर्भात न्यायालयाने काही वेळांपूर्वीच या संबंधातील शिक्षेचा निर्णय दिला आहे. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा, के. सी. सामरीया, मनोजकुमार जयस्वाल इत्यादींचा या प्रकरणात आरोपींमध्ये समावेश होता. यात दर्डा पिता-पुत्रासह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या…

Read More

इंस्टाग्राम अँपवर जुळले होते सूत बळजबरीने केलेल्या लग्नाला आरोपीच्या नातेवाईकांची होती उपस्थिती महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अल्पवयीन शालेय मुलीला पळवून नेत संगमनेरातील कॅफे सेंटरमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता घारगावच्या पठार भागात एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करत पहिले लग्न झालेले असताना ते लपवून ठेवत तिच्याशी विवाह करून तिच्यावर लग्नाअगोदर आणि लग्नानंतरही बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून केशव बबन काळे याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376(2N) 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते. गेल्या तीन-चार दिवसातील ही दुसरी घटना…

Read More

आज तुम्ही तिकडे जाऊन बसला नाहीतर तुम्ही माझ्याबरोबर या विषयावर भांडला असतात… मंत्री भुजबळ आणि भुसे यांना थोरात यांनी काढला चिमटा मंत्र्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याची ग्वाही… भविष्यात पायाभूत प्रकल्प निर्माण करत असताना पर्यायी व्यवस्था करण्याच्या अध्यक्षांकडून मंत्र्यांना सूचना. महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले. आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात दररोज मोठ्या संख्येने मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. “राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता” अशी सध्या स्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गेल्या पाच महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मे राज्यात किती मुली आणि महिला बेपत्ता झाल्या याबाबत गेल्या आठवड्यात सभागृहात धक्कादायक माहिती दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यातून मुली आणि महिला मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी आज सभागृहात सांगितले की, जानेवारी 23 मे 23 या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यातून 19533 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. आता मात्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. महिलांवरील अत्याचारामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने मणिपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी संगमनेरमध्ये बुधवारी (ता. 26 जुलै) महिलांचा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर बस स्थानकापासून बुधवारी दुपारी तीन वाजता नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. मणिपूरमधील महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. गुन्हेगारीला जात, धर्म, पंथ काही नसून तो गुन्हेगार मानवतेचा दुश्मन असतो. मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराबरोबरच महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. भारताच्या बहुतांशी भागात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात देशभर शांततावादी नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये देखील शांतता प्रिय स्त्री-पुरुष नागरिकांचा शांती मोर्चा येत्या शुक्रवारी (ता.28 जुलै) आयोजित केल्याची माहिती समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली. शिवूरकर यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर अशांत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये शांतता निर्माण करू शकलेले नाही. मणिपूर मधील हिंसाचार आणि तेथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने देशातील संवेदनाशील नागरिक अस्वस्थ झाले आहेत. सरकारने मणिपूर मधील इंटरनेट सेवा बंद केल्याने दहशतीत वाढ झाली आहे. सुमारे 60 हजारावर नागरिक बेघर झाले आहे. दीडशेवर स्त्री-पुरुष मारले गेले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुणवत्तापूर्ण शिक्षणाने देशात अग्रगण्य असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास मान्यता मिळाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व नोडल ऑफिसर प्रा. जी. बी बाचकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना अनिल शिंदे म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने मागील 40 वर्षात गुणवत्तेने देशात आपला नावलौकिक निर्माण केला. या संस्थेच्या सर्व शाखा आयएसओ मानांकित आहे. सर्व आधुनिक सुविधांमुळे अमृतवाहिनी हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे. या संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास नव्याने महात्मा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नशापाणी करण्यासाठी सार्वजनिक जागांचा वापर करणाऱ्या आणि सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या नशेखोरांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचे पाऊल टाकले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत नशेखोरांवर गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी अनपेक्षित केलेल्या या कारवाईमुळे नशेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर शहरातील मोकळ्या जागा, मैदाने, नगरपरिषदेने निर्माण केलेले विविध गार्डन, प्रवरा नदीपात्र, राज हॉटेल ते स्वामी समर्थ मंदिरा दरम्यानचा रस्ता आधी विविध ठिकाणचा वापर दारुडे, गर्दुल्ले, गांजाडी लोक सर्रासपणे करत असल्याने सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण होण्याची चिन्हे होती. पोलिसांकडे या संदर्भात सातत्याने येत असलेल्या तक्रारीची गंभीर दाखल संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घेतली. नशेखोरांमुळे परिसरातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे. यातून या शेतकऱ्यांनी 1754 कोटी रुपयांची केंद्राची मदत लाटली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्याकडून या रकमेची वसुली सुरू केली असून आत्तापर्यंत एक लाख शेतकऱ्यांकडून 93 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना लागू करण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ऑगस्ट पासून राज्य सरकार देखील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- रविवारी पहाटे पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात केलेल्या कारवाईत साडेसहाशे किलो गोमांस आढळून आले. यावेळी चार जिवंत गोवंश जनावरे देखील कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी या जनावरांची कत्तल होण्यापूर्वीच मुक्तता केली आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका वाहनातून गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने जमजम कॉलनी परिसरात जात मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली असता त्यांना एम.एच. 06 जी 3431 या क्रमांकाच्या मॅक्स पिकअप मध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आले. जवळच कत्तलीच्या उद्देशाने बांधलेले चार गोवंश जनावरे देखील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना दिलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना स्थगिती दिली होती. अद्यापही ही स्थगिती कायम होती. स्थगिती उठवितांना दिलेल्या निधीमध्ये पुन्हा एकदा अजित दादांची ‘दादागिरी’ कायम राहिली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेल्या भरत गायकवाड यांनी आपली पत्नी आणि पुतण्याची गोळी घालून सोमवारी पहाटेच्या वेळी हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस दलात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेले गायकवाड पुण्यातील बाणेर परिसरात कुटुंबियासह वास्तव्यास आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गायकवाड यांनी सोमवारी पहाटे चार वाजता पत्नी मोनी गायकवाड (वय 44 वर्षे) व त्यापाठोपाठ दीपक गायकवाड (वय 35 वर्ष) या पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. दोघांची हत्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीशी निगडित नोंदीला हजारो रुपयांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास नोंद होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तरी तलाठ्यांना, मंडळ अधिका-यांना सूचना करून गावागावात शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक, प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे संगमनेरच्या तहसीलदारांकडे केली. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलनं करणार असल्याचा इशारा दिला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात बहुतांश गावातील तलाठी आपल्या सज्जामध्ये प्रामुख्याने हजर राहत नाहीत. तर त्यांचे हाताखालील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्‍या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा अधिकार आहे. या योजनेच्‍या कामाची पूर्तता करताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन ग्रामस्‍थांच्‍या सूचनांप्रमाणे योजनेच्‍या आराखड्यात पुन्‍हा बदल करा. योजनेच्‍या यशस्‍वितेसाठी अधिकाऱ्यांनी सुध्‍दा जबाबदारीने काम करावे. केवळ ठेकेदारांवर विसंबून योजनेची अंमलबजावणी नको. जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामाच्‍या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्‍तुस्थिती पहावी, अशा स्‍पष्‍ट शब्दात राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी रविवारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धडे दिले. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी तालुक्‍यात सुरु असलेल्‍या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्‍या कामांचा आढावा महसूलमंत्री विखे पाटील यांनी घेतला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान हे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून त्यांनी हे वृक्षारोपणाचे मिशन सर्वांना दिले. मागील सतरा वर्षात उघडे-बोडके डोंगर हिरवीगार दिसू लागले असून यावर्षीही जेथे जागा असेल तेथे झाडे लावा. वृक्ष संवर्धन संस्कृती आपल्या तालुक्यात वाढली आहे. वृक्ष जपणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य असून वनराई असेल तर जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. पिंपळगाव कोंझिराच्या काळा खडक येथील डोंगरावर जयहिंद लोकचळवळ व अमृतवाहिनी उद्योग समूहाच्या विद्यमाने आयोजित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडून गद्दार मिंधे गटात सामील झाले असले, तरी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे समोर दिसत असल्याने राज्यातील भाजपचे सरकार कोणत्याही निवडणुका घेत नाही. उलट निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे, असे असले तरी आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युवा सेनेने देखील काम सुरू केल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर संगमनेरात तोफ डागली. उद्धव ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. संगमनेरमध्ये शिवसेना प्रणित युवा सेनेचा युवा संपर्क…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो कर्माचं फळ काय असतं, हे किरीट सोमय्या यांना आज कळून चुकलं असेल. ते कसं पचवावं याच्या चिंतेत ते गर्क असतील. ते या संकटातून सहीसलामत सुटोत, अशी सदिच्छा त्यांना आपण देऊयात. ही मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटात माणसाला मदतीचा हात द्यावा. त्याला आणखी खायित लोटू नये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही अशी आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून जी किरीट सोमय्या या माणसाला कधी कळलीच नाही. कारण डोक्यात अहंकार होता महाराष्ट्राच्या बदनामीचा. महाराष्ट्राच्या बदनामीत या माणसाने इतकं टोक गाठलं की जगातला भ्रष्ट कारभार हा एकट्या महाराष्ट्रातच होत असावा आणि केवळ विरोधकच तो करत असावा, असं…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिवंत गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 76 हजार रुपये किमतीचे गोमांस आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कत्तलखाना चालक जावेद लियाकत शेख (वय 29 वर्षे रा. अलकानगर) याला अटक केली. शहरातील मदिना नगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केल्याची माहिती मिळतात पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, विजय खाडे रोहिदास शिरसाठ व अजित कुर्हे यांनी घटनास्थळी जात छापा टाकला असता तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पथकाने तेथे असलेले गोमांस ताब्यात घेत त्याची मोजणी केली. कारवाई मध्ये पथकाला 76 हजार रुपये किमतीचे 380 किलो गोमांस आढळून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडील पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोकड दुसऱ्या सहप्रवासी महिलेने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथून ब्युटी पार्लर व्यावसायिक महिला उज्वला सातपुते या रिक्षाने जवळ असलेली पंच्याहत्तर हजार रुपयाची रोख रक्कम घेऊन मैत्रिणीच्या बँक खात्यात एचडीएफसी बँकेत भरण्यासाठी संगमनेरकडे येत असताना ही घटना घडली. सकाळी 11 वाजता त्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरून प्रवासी रिक्षात बसून संगमनेरकडे येत होत्या. यावेळी रिक्षात त्या एकट्याच होत्या. दरम्यान रिक्षा घुलेवाडी जवळील म्हसोबा मंदिराजवळ आल्यानंतर दोन महिलांनी रिक्षाला…

Read More