Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चाळीस आमदारांनी शिवसेनेतून फुटत भाजपाशी हातमिळवणी करीत सरकार स्थापन केले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांना, शिवसेनेच्या आमदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, याची प्रचिती पून्हा आली. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात येणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी शिवसैनिकांनी अडविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांना टार्गेट केले. यावेळी ‘पन्नास खोके गद्दार ओके’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मंत्री झाल्यानंतर पाटील प्रथमत:च धुळे दौऱ्यावर आले होते. शिंदे गटाच्यावतीने मुंबईत बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने सायंकाळी धुळ्यात सैनिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तालुक्यातील मेंगाळवाडी येथील मिराबाई रामभाऊ मेंगाळ या आदीवासी महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. माजी मंत्री, कॉग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून अखेर मृत महिलेच्या कुटूंबियांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची मदत मिळाली. मदतीचा धनादेश मृत महिलेच्या कुटूंबियांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये मेंगाळवाडी येथील मिराबाई मेंगाळ या आदीवासी महिलेचा मृत्यू झाला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मृत महिलेच्या कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचवेळी थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मेंगाळ कुटूंबियांना मदतही करण्यात आली होती. माजी मंत्री थोरात यांनी प्रशासनाला तातडीने या कुटूंबियाला शासकीय मदत मिळवून देण्याच्या…

Read More

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या अडीच वर्षात केवळ लुटीचा एकमेव कार्यक्रम सुरू होता. त्यातून वाळूमाफिया आणि बगलबच्चे यांना मोकळे रान मिळाले होते. त्याला नव्या सरकारच्या काळात अटकाव आला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या हस्ते संगमनेरमध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह राजेंद्र गोंदकर, रविंद्र अनासपुरे,…

Read More

संगमनेरमधील चौपदरीकरणाच्या कामांचे मंत्री पटेलांच्या हस्ते व महसूल मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विकास योजनांच्या कामांसाठी केंद्राकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी सांगितले. संगमनेरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० घुलेवाडी ते संगमनेर रस्ता तसेच राज्यमार्ग क्रमांक ७१ अ या ६० किलोमीटर पर्यंतच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.…

Read More

राज्यात 7675 ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबल्या महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपत असलेल्या राज्यातील 7675 ग्रामपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमण्यात येणार आहे. नव्याने येणाऱ्या प्रशासन राज मुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. 7675 ग्रामपंचायतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 204 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान 7649 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. आठ ग्रामपंचायतची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 ग्राम पंचायतींचा यात समावेश आहे. मतदार याद्या, नव्याने करावयाची प्रभाग रचना यासाठी साधारणतः दोन-तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचा कालावधी जज-जसा…

Read More

लायन्स इनरव्हील दांडिया महोत्सव महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनेक वर्षाच्या सुरू असलेल्या उत्सवावर गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट घोंगावत होते. कोरोना निर्बंधानंतरचा पहिलाच नवरात्र उत्सव पार पडत असून या उत्साहात लयबद्ध तालावर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना देखील ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. लायन्स इनरव्हीलच्या वतीने मालपाणी लॉन्स मध्ये डीजे दांडिया नाईट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यासह नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इनरव्हील जिल्हा उपाध्यक्ष रचना मालपाणी, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट राजेश लाहोटी, इनरव्हीलच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, मयूर ज्वेलर्सचे महेश मयूर, वैशाली मयूर आदी यावेळी उपस्थित होते. दोन वर्षाच्या खंडानंतर नवरात्र…

Read More

माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचा ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेतील अंतर्गत कुरघोड्यांना कंटाळून बाहेर पडलेले आणि काँग्रेसमध्ये न रमलेले जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन हाती बांधले आहे. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर पुणे जिल्ह्यातील खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा रस्ता निवडल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे मोठी पडझड झाली होती. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या रूपाने ही पडझड रोखण्यासाठी आणि शिवसेना मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठी मदत मिळणार आहे. दांगट यांच्या माध्यमातून ठाकरे आता…

Read More

अश्लील चाळे करणारे युगूल मोठ्या प्रमाणात आढळले २८ युवक-युवतींना ताब्यात घेवून समज देत सोडले महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी शहरातील अनेक कॉफी शॉप, कॅफे शॉपवर अचानक छापे टाकले. पोलिसांना या ठिकाणी अनेक महाविद्यालयीन युवक-युवती चाळे करतांना आढळले असून या प्रेमी युगुलांना पकडत त्यांना पोलीस ठाण्यात आणत कारवाई सुरु केली आहे. दरम्यान कारवाईचे वृत्त शहरभर पसरल्याने खळबळ उडाली आहे. कारवाईच्या ठिकाणी आणि पोलिस ठाण्यात बघ्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पोलिस ठाण्यात आणलेल्या युगूलांना पोलिसांनी त्यांची माहिती घेत समज देवून सोडून दिले तर कॅफे चालकांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू होती.  संगमनेर पोलिसांची गेल्या काही वषार्तील…

Read More

अहमदनगर जिल्ह्यातील सातशे शाळा बंद होण्याच्या मार्गावर  महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क एकीकडे दिल्लीतील केजरीवाल सरकार शिक्षणाला प्राधान्य देत आपल्या बजेट मधील मोठा हिस्सा शिक्षणावर खर्च करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात खर्च कमी करण्याच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 700 शाळांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जवळपास 700 शाळांमधील दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकार अंधारात ढकलणार आहे. याशिवाय 1321 शिक्षकांचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. यापूर्वीच्या सरकारने लागू केलेला शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली नव्या सरकारकडून सुरू असल्याचे दिसते. दिल्लीतील केजरीवाल सरकारने शिक्षणावर भर देताना सरकारी शाळांमध्ये मोठी…

Read More

शेतकऱ्यांचे गेट बंद आंदोलन, दोघांवर गुन्हा दाखल  महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पिकअप गाडी पुढे-मागे घेण्याच्या कारणावरुन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी व्यापारी आणि त्याच्या नातेवाईकाकडून मारहाण करण्याची घटना घडली. तालुक्यातील रणखांब येथील शेतकरी किरण बारवे यांना झालेल्या मारहाणीमूळे शेतकऱ्यांनी संबधितांवर कारवाईसाठी दोन तास कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेटबंद आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले गेले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिक-पुणे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटना घडली त्यावेळी वाहतुक पोलिसांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले. शेतकऱ्याला…

Read More

अध्यक्ष बाबा ओहोळ यांचे प्रतिपादन आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क थोरात कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. ही संगमनेरात विकासाची संस्कृती आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी. असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2022 – 2023 या गळित हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे,…

Read More

भल्या पहाटेच्या कारवाईत उत्तर जिल्हाप्रमुख मौलानाला पोलिसांनी घेतले ताब्यात  महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दहशतवादी संघटनांशी निगडीत असलेल्या पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया ‘पीएफआय’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे धागेदोरे आता संगमनेरपर्यत येऊन पोहचले आहेत. या संघटनेशी निगडीत असल्याच्या कारणावरुन नगर जिल्ह्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यात संगमनेरमधील एका मौलानाचा समावेश आहे. मंगळवारी भल्या पहाटे स्थानिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणादेखील कार्यरत होती. संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द येथे आणि नगर शहरात ही कारवाई करण्यात आली. नगरमधून या संघटनेशी निगडीत असलेल्या विभागीय अध्यक्षाला तर संगमनेर खुर्द येथून उत्तर जिल्हाप्रमुख असलेल्या एका मौलानाला ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात सुरु असलेल्या कारवाईबद्दल गोपनीयता बाळगली…

Read More

उपअधीक्षकांच्या पथकाला अवघ्या दिड दिवसांत यश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीला धाक दाखवत तिचे अपहरण करुन तिला घेवून तीन दिवस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यास पोलीस उपअधीक्षकांचे पथक यशस्वी ठरले आहे. अवघ्या दीड दिवसात पथकाने जिल्ह्याच्या श्रीगोंद्यात ही यशस्वी कामगिरी केली आहे. घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याची उकल करण्यास स्थानिक पोलीस अयशस्वी ठरले असतांना उपअधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कामगिरीमुळे मुलगी सुखरुप पालकांच्या ताब्यात मिळाली आहे. साकुर येथील एका महिलेची अल्पवयीन मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिला आरोपी अमोल बापू खेमनर याने पंधरा दिवसांपूर्वी पळवून नेत पून्हा घरी आणून सोडले होते. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला चांगलीच तंबी दिली होती.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शेअर मार्केट मधील व्यवहारात तोटा आल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मुंबईतील मुलुंडमध्ये राहणाऱ्या लेखापरीक्षकाने दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी लेखा परीक्षक असलेल्या आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय फिर्यादीस 16 लाख 12 हजार 500 रुपये देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील सविता कानवडे यांनी आपल्या ओळखीच्या असलेल्या मुंबई येथील राजेश मुलजीभाई रूपारेल या लेखापरीक्षकाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. संबंधित महिलेचे ट्रेडिंग अकाउंट आरोपी राजेश रूपारेल यांनी हाताळले होते. शेअर मार्केटच्या या व्यवहारात कानवडे यांना तोटा सोसावा लागला. त्यामुळे रूपारेल यांनी कायदेशीर रक्कम देण्याची जबाबदारी स्वीकारत…

Read More

संगमनेर, महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी अपात्र शिधापत्रिकाधारक आणि उच्च गटातील लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे, या योजनेतून मुदतीत बाहेर न पडल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे. गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी “राज्य सरकारने अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा” ही योजना एका शासन निर्णयाच्या आधारे सुरु केली आहे. अपात्र रेशनकार्डधारक, उच्च गटातील लाभार्थ्यांनी बाहेर पडणे आवश्यक आहे. असे लाभार्थी मुदतीत बाहेर पडले नाही तर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. शहरी भागासाठी ५९०००/- रुपये आणि…

Read More