Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात आज (शुक्रवारी ४ जून) दुपारी एक वाजेच्या सुमारास एका चालत्या कंटेनरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. हा कंटेनर पुण्याहून नाशिकच्या दिशेने नवीन चारचाकी गाड्या घेऊन जात होता. कृष्णा लॉन्स परिसरात पोहोचताच कंटेनरमधून अचानक धूर निघू लागला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ती आटोक्याबाहेर गेली. घटनेच गांभीर्य ओळखून तात्काळ घुलेवाडी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे चालक आकाश बनसोडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर शिर्डी पोलिसांनी धाडसी कारवाई केली. सावळीविहीर जवळ सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६ जनावरांची सुटका केली असून, एकूण ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गंगापूरच्या दिशेने गोवंशाची बेकायदेशीर तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. यावेळी गंगापूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिंद्रा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे:  जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील एका दिमाखदार सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. तांबे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला. पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शिका डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश ठाकूर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य, साजदा निहाल…

Read More

संपादकीय अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत जे नाट्य घडले, त्याने केवळ जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेतले. ‘नॉट रिचेबल’ उमेदवार, थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा इशारा देणारे बंडखोर नेते आणि पडद्यामागे फिरलेली सूत्रे… हा सगळा घटनाक्रम एखाद्या थ्रिलर सिनेमालाही मागे टाकणारा होता. पण सरतेशेवटी, महायुतीचे (भाजप) अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. या संपूर्ण प्रकरणाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते; गरज असते ती योग्य वेळी अचूक ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याची, जी किमया आ. संग्राम जगताप आणि माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या जोडीने करून दाखवली. अहिल्यानगरमध्ये सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू मजबूत राहील, जुनी येणे बाकी असलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात एखाद्या धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी (दि. २ जून) तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशानंतर सरपंच निर्मला राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाला पुन्हा सुरुवात केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी होणार आहे. घुलेवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. येथील लोकनियुक्त सरपंच निर्मला राऊत, तसेच सदस्य दत्तात्रय राऊत, सोनाली गिरी आणि अनिल राऊत यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ उठवला, अशी तक्रार शिवसेना…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे. एकूण १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून १८ जून रोजी या निवडणूक होत आहे. आज या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे होते. त्यानुसार, १७ पैकी अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल १५० कोटी खर्च केले असून एका उमेदवाराला माघार घेण्यासाठी २५ कोटी दिल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’ ऐवजी ‘नॉमिनेशन सिस्टिम’ आणायची आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने सर्व नैतिक मूल्ये पायदळी तुडवली असून, चालू असलेल्या विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडताना म्हटले की, विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मर्यादित मतदार असतात. मात्र, या मर्यादित मतदारांच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’ असा उघड खेळ सुरू आहे.…

Read More

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विविध मतदारसंघांत उमेदवारांनी माघार घेतल्याने काही ठिकाणी निवडणूक केवळ औपचारिकता राहिली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे विक्रम काकडे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. मविआचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दुश्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे: पुण्यातील प्रमुख आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका ४८ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रचंड दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिला अधिकाऱ्याने पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाच्यता करत स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होती. याच कार्यालयात काम करणाऱ्या एका अन्य महिला कर्मचाऱ्याने तिच्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म बदलण्यासाठी वारंवार दबाव…

Read More

विशेष प्रतिनिधी | संगमनेर: शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या अधिकृत कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणून पालिका कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पेटीट सर्कल परिसरातील भाजी व फळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. यावर तोडगा म्हणून नगरपालिकेने मेडिकव्हर हॉस्पिटलसमोरील जागेत शेड उभारून ३८ पदपथ विक्रेत्यांसाठी पर्यायी गाळ्यांची व्यवस्था केली होती. या गाळ्यांचे वाटप करण्यासाठी प्रशासनाकडून आधीच पूर्वसूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, काही विक्रेत्यांनी नव्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या चालणाऱ्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने १ जून रोजी ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईत बागडपट्टी रोडवरील सदगुरू ऑटो सर्व्हिसच्या पाठीमागे नरेश नागेश यनगुल (वय ४५) आणि दिनकर मच्छिंद्र दोंडकर (वय ४०) यांना पकडण्यात आले. तसेच नवरंग व्यायामशाळेजवळील सटवाई मंदिराच्या मागे प्रदीप…

Read More

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशा वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले “वाकचौरे आता थांबणार नाहीत” हे विधान केवळ एक राजकीय टिप्पणी नसून आगामी राजकीय समीकरणांचे संकेत देणारे ठरले आहे. राजकारणात नेत्यांची उपस्थिती आणि अनुपस्थिती यालाही अनेक अर्थ असतात. मंगळवारी (२ जून) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना छेडले असता त्यांनी केलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दलचे वक्तव्य यामुळे चर्चांना अधिक उधाण आले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: दर्शन रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. ३० मे) पार पडलेल्या या शिबिरात ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ११८ कृत्रिम अवयवांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जयपूर फूट, कृत्रिम हात आणि अत्याधुनिक ‘LN-4’ प्रोस्थेटिक हातांचा समावेश होता. या आधुनिक कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांगांना दैनंदिन कामे करणे अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला एक नवी बळकटी मिळाली आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेर, मुंबईचे रत्ननिधी फाऊंडेशन आणि रियांश मल्टिट्रेड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला लाभार्थी आणि संगमनेरकर नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी नगरसेविका रचना मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या आपण कौशल्याने पार पाडाल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती राहील, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक क्षेत्रात केलेले जुने प्रयत्न आता यश देऊ लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज आपल्याला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली आर्थिक कामे मार्गी झाल्याने मनातील मोठी चिंता दूर होईल. व्यवसायात भागीदारांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील आणि नवीन योजनांवर काम सुरू करता येईल. समाजात मानसन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत घालवणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील ऐतिहासिक सर डि.एम. पेटीट हायस्कूल परिसरातील कष्टकरी भाजी विक्रेत्यांवर संगमनेर नगर परिषदेने अचानक केलेल्या या एकतर्फी आणि अन्यायकारक भूमिकेविरोधात संगमनेर नगर परिषदेतील एकमेव विरोधी शिंदे गटाच्या शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी थेट रस्त्यावर उतरत अनोखे आंदोलन केले. सर्व भाजी विक्रेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी स्वतः सोबत भाजीपाल्याची पाटी घेतली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या. यावेळी नगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात जोरदार निषेध घोषणा दिल्या. या गांधीगिरी आंदोलनाने लक्ष वेधून घेतले असून, जोपर्यंत प्रशासनासोबत सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत पालिकेने पुढील कोणतीही कारवाई थांबवावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी संगमनेर नगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनाकडून अन्न भेसळविरोधी विशेष मोहीम तीव्र करण्यात आली असून, या अंतर्गत राहुरी आणि नेवासा तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न विभागाचे सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिली आहे. या मोहिमेदरम्यान राहुरी येथील ‘शिवशक्ती आईस्क्रीम’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. तेथून ‘शिवशक्ती’ ब्रँडच्या गुलकंद आणि अमेरिकन नट्स आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. हे आईस्क्रीम दर्जाहीन असल्याच्या संशयावरून प्रशासनाने ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स जप्त केले आहेत. दुसऱ्या कारवाईत नेवासा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुरोगामी विचारांचे खंदे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि दीर्घ योगदानाची दखल घेऊन हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात येत आहे. येत्या ४ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात डॉ. तांबे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पेशाने एम. एस. सर्जन असलेले डॉ. सुधीर तांबे यांनी केवळ वैद्यकीय सेवाच केली नाही, तर संगमनेरचे नगराध्यक्ष पद सांभाळताना पालिकेच्या कारभाराला एक…

Read More

संगमनेर/पारनेर : पारनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील एका ४० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह डोलनर वस्तीवरील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. २) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सुरुवातीला महिलेची ओळख पटली नव्हती. मात्र काही तासांच्या तपासानंतर मृत महिलेची ओळख जिजाबाई काशिनाथ जाधव (वय ४०, रा. मांडे बुद्रुक, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी पटली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संबंधित महिला विहिरीत कशी पडली, हा अपघात आहे की आत्महत्या अथवा अन्य काही कारण आहे, याबाबत…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील, जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदार मिळतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आज नको त्या वादात पडणे टाळा, अन्यथा मानसिक त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.…

Read More