Author: अनंत पांगारकर
रविवार, २९ सप्टेंबर गुन्हा कुठलाही असो, २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला असो, की त्याआधी मुंबईत झालेले सिरियल बॉम्बस्फोट असोत किंवा गँगरेप असो, आरोपीला एक्सपोज करणं, त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळणं हे तपास यंत्रणेचं काम असतं. कोणत्याही गुन्ह्यात सामील असलेल्यांना लागलीच यमसदनी पाठवणं पोलिसांना अडचणीचं कधीच नसतं. मुंबई पोलिसांमधल्या जाँबाज चार अधिकार्यांना जिवे मारणार्या अजमल कसाब याला तर पोलिसांना जागीच ठार करता आलं असतं. पण या मागचा पाकिस्तानचा हात उघड झाला नसता. असे पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी खरं तर पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. पण कधीकधी पोलीस होत्याचं नव्हतं करतात. बदलापूर घटनेतील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला एका गोळीत संपवणार्या पोलिसांना कोणाला…
शनिवार, २८ सप्टेंबर मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ११ पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. शिवाय राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. राज्यात २८८ विधानसभा मतदार संघ असून निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाचे प्रयत्न असल्याचे सांगत शहरी भागात होत असलेल्या कमी मतदानाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र, पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. निवडणुकीसंबंधी घोषणा लवकरच पत्रकार परिषदेतूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पुरुष मतदारांची…
शनिवार, २८ सप्टेंबर भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. यामुळे खळबळ उडाली असून ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे बंधू असून ते राजकारणात सक्रिय होते. चंदेल रात्री साडेआठ वाजता आपल्या राईस मिल मधून पायी निघून मोबाईलवर बोलत बोलत ते जात असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि न्यायला केबिन दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.…
शनिवार, २८ सप्टेंबर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान ४.०”मध्ये संगमनेर शहरासह तालुक्याने दमदार कामगिरी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून संगमनेर नगर परिषदेने नगरपरिषद गटात राज्यस्तरावर उत्तेजनार्थ सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. याशिवाय तालुक्यातील घुलेवाडी, गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, खांडगाव, पेमगिरी, चिंचोली गुरव, लोहारे, तिगाव या नऊ ग्रामपंचायतींनी अभियानात आपला ठसा उमटविला आहे. राज्यात सर्वाधिक तब्बल साडेपाच कोटी रुपयांची बक्षिसे मिळविणारा संगमनेर एकमेव तालुका ठरला आहे. एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान ४.०”…
शनिवार, दि. २८ सप्टेंबर मेष – मेष राशीच्या लोकांना आज बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन करावे लागेल. जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्याच्या कागदपत्रांवर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. तुम्हाला देखावा करण्याच्या फंदात पडण्याची गरज नाही. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. तुमचे काही काम अपूर्ण राहू शकतात, त्यामुळे तुमच्या मनात त्रास होईल. जर तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल शंका असेल तर ते अजिबात करू नका. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल कारण तुम्ही जे बोलता…
शुक्रवार, २६ सप्टेंबर आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केला होता. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप…
शिर्डीत महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न शुक्रवार, २७ सप्टेंबर शिर्डी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनींला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे,…
शुक्रवार, २७ सप्टेंबर मुंबई : काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली त्यांच्या नावाची पाटी महिलेने फेकून दिली आहे. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्या. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली. मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. या कार्यालय बाहेर हा प्रकार घडला. दरम्यान, ही महिला कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा…
शुक्रवार, २७ सप्टेंबर शेतजमीनीवर कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतजमीनीच्या नोंदी फेरफार करुन देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीची कसबे वणी, ता. दिंडोरी येथे गट क्रमांक ६१७ ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढावयाचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे (रा. ध्रुवनगर, मोतीवाला मेडीकल कॉलेजसमोर रेणुका हाईट्स प्लॕट नंबर ९, सातपुर, नाशिक) यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी…
शुक्रवार, २७ सप्टेंबर पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणात कोरेगाव पार्क पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन तरुण हे अल्पवयीन आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दितील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या “गुड टच बॅड टच” या उपक्रमातून ही घटना समोर आली. हा सगळा प्रकार एप्रिलपासून सुरू होता. पीडित तरुणी…
