Author: Annant Ppangarkar

शिर्डी: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अविस्मरणीय करण्यासाठी एक सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. विधान भवनात या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, स्वप्नील काळे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली आहे. या महोत्सवांतर्गत जलाशय परिसराचे सुशोभीकरण करणे,…

Read More

आजचे सविस्तर राशिभविष्य: बुधवार, ११ मार्च २०२६ मेष आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आज आपल्याला कामाच्या ठिकाणी संयम ठेवावा लागेल. सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. नवीन वस्तू खरेदी करण्याचे बेत आखले जातील. व्यापारात मध्यम फळ मिळेल. मान-सन्मानात वृद्धी होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण कठीण कामे सहज पूर्ण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात महार वतन इनाम जमिनीवर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या आईच्या पश्चात चिखली येथील महार वतन जमीन वारसा हक्काने त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असून, ती त्यांच्या सामायिक ताब्यात आहे. दरम्यानच्या काळात, चिखली ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार बांधकामाचा निधी मंजूर करून घेतला होता. या…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर शहराला शिस्त लावण्याच्या नावाखाली संगमनेर नगरपरिषदेने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन नगर रस्त्यावरील ज्या जागांवरून गरिबांच्या हातगाड्या आणि छोटी दुकाने हटवण्यात आली, तिथे आता चक्क आलिशान चारचाकी गाड्यांनी तळ ठोकला आहे. यामुळे ही मोहीम नेमकी शहर सुशोभीकरणासाठी होती की श्रीमंतांच्या बेकायदेशीर पार्किंगला रान मोकळे करून देण्यासाठी, त्यांचे पार्किंगचे चोचले पुरविण्यासाठी असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गाजावाजा करत, फौजफाटा घेऊन शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीला अडथळा होतो, शहराचे विद्रूपीकरण होते असे कारण देत अनेक हातावर…

Read More

श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो-इन्व्हेस्टर’ कंपनीवर श्रीरामपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर परिसरात बेकायदेशीरपणे गुंतवणूक स्वीकारून लोकांची लूट केली जात होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी कोणतीही अधिकृत तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन हा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईसाठी पोलीस पथकाने २६ डिसेंबर २०२५ रोजी भोकर शिवारातील संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे निष्पन्न केले. झडतीदरम्यान ९ पासबुक, १० चेकबुक, हिशोबाची वही, लॅपटॉप, संगणक, रोख रक्कम…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – मक्याच्या उधारी पोटी दिलेला धनादेश न वटल्याच्या कारणावरून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांनी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात फिर्यादी पक्षाला आपला दावा कायदेशीर रित्या सिद्ध करता आला नाही. वावी (ता. सिन्नर) येथील महावीर ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर मिलिंद रमेश गंगवाल यांनी कोपरगाव तालुक्यातील डांगेवाडी येथील नितीन माधव कांडेकर आणि नारायण माधव कांडेकर यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात ७ लाख ७० हजार रुपयांच्या धनादेश अनादराबाबत ही तक्रार दाखल केली होती. ​फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी पोल्ट्री व्यवसायासाठी घेतलेल्या मक्याच्या उधारीपोटी नोव्हेंबर २०१९ मध्ये ७ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या संगमनेर पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाका येथे मोठ्या शिताफीने आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी व्यापाऱ्याची सुटका करत आरोपींकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक UP-70-HR-9272) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दिली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने तपास करत या दोघा सराईतांना सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघेही राहणार नवघर गल्ली, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दहशत माजवली होती, मात्र पोलीस त्यांच्या मागावर असतानाही ते सातत्याने गुंगारा देत होते. या आरोपींचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. शहर…

Read More

आजचे राशीभविष्य: मंगळवार, १० मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि ऊर्जेचे कौतुक होईल, ज्यामुळे कामाचा वेग वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम राखणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असून विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमची जिद्द आणि चिकाटी यामुळे कठीण कामेही सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील ओलावा वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – रंगपंचमीच्या उत्सवाच्या दिवशीच कॅनलच्या पाण्यात पडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे रविवारी (८ मार्च) सायंकाळी ही घटना घडली. वाजिद मोहसीन शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. कुरण परिसरातील कॅनलजवळ असताना पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यानंतर कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. वाजिदच्या अशा अकाली जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.…

Read More

अहिल्यानगर: जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. गॅस पुरवठ्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला गॅस पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत अचानक तपासणी करण्यात येणार असून, जर कोणी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. गॅस वितरकांनी ग्राहकांना वेळेत सेवा द्यावी…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ​वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. घरातील थोरामोठ्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, परंतु घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. ​मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस धावपळीचा ठरेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट…

Read More

शिर्डी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामध्ये घातपाताची शक्यता वाटत नसली तरी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपाती चौकशी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका मांडली. केवळ एखाद्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत, त्यांनी संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची तपासणी करण्याची मागणी केली. खराब हवामान असताना उड्डाणाची परवानगी का दिली आणि विमान दुसऱ्या विमानतळावर का वळवले नाही, या प्रश्नांचा शोध घेऊन दोषींवर कठोर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कमी पटसंख्येचे कारण पुढे करत राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला असून, या निर्णयाविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेने संगमनेरमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसर आणि प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील २५८ शाळा बंद करण्याबाबत माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छात्र भारतीच्या मते, शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून तो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे. सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब, दलित, आदिवासी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सदैव सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून राज्याला परिचित आहे. याच परंपरेत आता आधुनिक सुरक्षेची जोड देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि संगमनेर नगरपरिषदेच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच ‘रक्षक दल’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महिला, मुली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी हे दल चोवीस तास सेवेसाठी सज्ज झाले असून, आज रविवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या दलाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.…

Read More

महिला दिन विशेष… जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा होत असताना समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. संगमनेरच्या राजकीय पटलावर गेल्या डिसेंबरमध्ये एका तरुण, सुशिक्षित आणि धडाडीच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. निवडणुकीच्या राजकारणात एकीकडे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेली महायुती शून्यावर बाद होण्याची स्थिती निर्माण झाली असताना अनपेक्षितपणे धक्कादायक निकाल समोर आला. या विजयातून जिने प्रस्थापितांना विचार करायला भाग पाडले आहे. त्या म्हणजे संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी. उच्च शिक्षणाची शिदोरी आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून समाजकारणात उतरलेल्या साक्षी सूर्यवंशी यांनी अत्यंत कमी कालावधीत महिलांच्या हक्कासाठी लढणारे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून…

Read More

अमेरिका खरोखरच भारताचा मित्र आहे की आणखी कोण? आजवरच्या इतिहासात भारताच्या उपयोगी न आलेल्या पहिल्या देशात ज्याचं नाव घ्यायचं ते राष्ट्र म्हणजे अमेरिका. तो जर कोणाचा मित्र होत असेल तर त्यामागे प्रचंड सौदेबाजी आलीच म्हणून समजा. या सौद्यासाठी तो मित्राचीच काय पण सग्यांचीही गय करत नाही. तो आपल्या मित्राची आब राखेल हे कदापि शक्य नाही. अमेरिकेचा हा अनुभव जगातल्या अनेक देशांच्या पदरी असताना भारताने त्याच्यासाठी उघडलेली दारं हा आता गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. विशाखापट्टणम इथे आयोजित ‘मिलन 2026’ या नौदल संचलनासाठी आपण पाचारण केलेल्या इराण नौदलाच्या आयआरआयएस देना या लढाऊ जहाजावर मागच्या दाराने हल्ला करून अमेरिकेने भारताला औकात दाखवण्याचा…

Read More

आजचे राशिभविष्य: रविवार, ८ मार्च २०२६ ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. ​वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवाल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. ​मिथुन: विचारांमध्ये स्पष्टता ठेवा, यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग असून तो सुखद होईल. ​कर्क: आज तुम्हाला भाग्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी “जय भवानी, जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या घोषणांनी संगमनेर शहर शनिवारी अक्षरशः दणाणून गेले. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने तब्बल सात तास शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ऐतिहासिक देखावे, ढोल-ताशांचा कडकडाट, अघोरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि अफजलखान वधाचा जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संगमनेर नगरपालिकेपासून मिरवणुकीला उत्साहात सुरुवात करण्यात झाली. यावेळी शिवचरित्रकार एस. झेड. देशमुख, नीलम खताळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह…

Read More

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त काल संगमनेर शहरात निघालेली ऐतिहासिक पारंपारिक मिरवणूक म्हणजे केवळ एक सोहळा नव्हता, तर ते संगमनेरकरांच्या अखंडतेचे आणि अलोट प्रेमाचे दर्शन ठरले, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी म्हटले आहे. या ऐतिहासिक मिरवणुकीच्या आरतीचे मानकरी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे ठरले. त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, कोपरगाव तालुका प्रमुख भरत मोरे, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शिवज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच शिवसेना महिला आघाडी आणि तमाम सर्वपक्षीय शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कतारी-चव्हाण म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवजयंती उत्सव…

Read More