Author: Annant Ppangarkar
आजचे राशिभविष्य मेष – आजच्या दिवशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा समाजात मोठा प्रभाव पडेल. सार्वजनिक जीवनात मान, सन्मान आणि नवीन प्रतिष्ठा लाभण्याचे योग आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील, परंतु कामाच्या निमित्ताने धावपळ वाढू शकते. स्वतःमधील कलागुणांचा वापर करण्यासाठी आणि नवीन विचारसरणीला वाव देण्यासाठी हा काळ उत्तम आहे. वृषभ – तुमची जिद्द आणि चिकाटी आजच्या दिवशी खूप वाढेल, ज्यामुळे काही कठीण कामे तुम्ही धैर्याने पूर्ण कराल. प्रभावशाली व्यक्तींशी झालेली भेट भविष्यात फायदेशीर ठरू शकते, मात्र सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे हिताचे ठरेल. मिथुन – व्यवसायात आज मोठी उलाढाल होण्याची शक्यता असून आर्थिक बाजू बळकट होईल. कौटुंबिक जीवनात सुख आणि सुसंवाद टिकून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१५ जुलै) पहाटे तीन-चार वाजेच्या सुमारास खांडगाव शिवारात ही घटना घडली. आरोपी गणेश चंद्रभान गायकवाड याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला घरातून बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार पीडितेच्या नातेवाईकांनी पाहिला असता, आरोपीने तुझ्या आईकडे जाऊ नको, नाहीतर कोण काय करते मी बघतो आणि एखाद्याला मारून टाकीन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.…
अहिल्यानगर: श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांना अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस अंमलदार शंकर चौधरी हे यापूर्वी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत होते. मात्र, त्यांच्यावर गुटखा तस्करीशी संबंधित कथित आरोप झाल्यानंतर त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर नुकतेच त्यांचे सराईत गुन्हेगारांसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. तसेच वाळू तस्करी व इतर गंभीर गुन्ह्यांतील संशयितांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केला होता. दरम्यान, श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायिक आकाश…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या केमिकलयुक्त ताडी विक्रीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकाने मंगळवारी सकाळी छापा टाकून कारवाई केली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका फिटनेस क्लबच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये हा काळा धंदा सुरू होता. या कारवाईत पथकाने तब्बल २२० लिटर केमिकलयुक्त ताडीचा मोठा साठा हस्तगत करून तो जागेवरच नष्ट केला आहे. या प्रकरणी सुनीता शेखय्या गुत्तेदार (वय ४४, रा. घारगाव) या महिला आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, उपनिरीक्षक गोकुळ नायकोडी, महिला जवान स्वाती फटांगरे, सरस्वती वराट, जवान दत्ता…
युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या खरीप हंगामाने वेग घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजरी, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी युरिया खताची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, बाजारात युरियाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाच्या ताब्यातील युरियाचा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक विजय राहणे, सचिन दिघे, सरपंच नवनाथ कातोरे, संदीप गुंजाळ, अमोल गुंजाळ, शुभम गुंजाळ, योगेश गव्हाणे, अरुण गुंजाळ, सागर वामन, नामदेव शिंदे, सुनील लांडगे,…
आजचे राशिभविष्य मेष – आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असली तरी घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेणे टाळा. व्यवसायात भागीदारीतून चांगला नफा मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल राहील, जुनी येणी वसूल होऊ शकतात. सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन – आज तुम्हाला कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन योजना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण ताजं असताना, त्याबद्दल रामभक्तांमध्ये संताप असताना आता श्रीरामाच्या नावानं झालेला एक गंभीर घोटाळा समोर आला आहे. बीएड आणि शिक्षक प्रशिक्षण कॉलेजांचं कागदांवरील साम्राज्य उघडकीस आलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अनेक कॉलेज शेतांमध्ये, ओसाड जागांवर नोंदणीकृत आहेत. तिथे गेल्यावर दिसणारी परिस्थिती वेगळीच आहे. काही कॉलेज लहान शाळांच्या परिसरांमध्ये भरत आहेत. काही ठिकाणी तर एकाच पत्त्यावर तीन-तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष पडताळणीत अनेक त्रुटी आणि गायब पत्ते सापडल्यानंतरही बरकतउल्ला विद्यापीठाने केवळ एका नोटरी शपथपत्राच्या आधारावर १२५ खासगी बीएड कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवला आहे. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अहिल्यानगर शहरातून संगमनेर तालुक्यातील ‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीमधील बी-१ आणि बी-२ या गाळ्यांमध्ये एका वाईन शॉपचे स्थलांतर प्रस्तावित आहे. मात्र, या स्थलांतरामुळे परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि स्थानिक व्यवसायांवर विपरीत परिणाम होणार असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येत आमदार अमोल खताळ यांना देखील विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे. या निवेदनावर विनीत देवेंद्र मेहता, कल्पेश चिमनलाल मेहता, भीमाशंकर रावबा चकोर, सिद्धार्थ ओझा, हर्षवर्धन खुळे यांच्यासह प्रमुख व्यावसायिकांच्या सह्या आहेत. या हरकतीमध्ये स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. अहिल्यानगरहून संगमनेर तालुक्यात वाईन शॉप स्थलांतरित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, संगमनेर तालुक्यात नव्या दमाच्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नव्या निवडीमध्ये काही पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. या नव्या निवडीनुसार संगमनेर तालुकाप्रमुखपदी अमर कतारी आणि भीमाशंकर पावसे, संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ३२ गावांसाठी तालुकाप्रमुख म्हणून प्रकाश गायकवाड यांचीदेखील तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून ग्रामीण भागासाठी सदाशिव हासे तर शहरी भागासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : माणसाला आयुष्याच्या प्रवासाने भाकरीची खरी किंमत शिकवली आहे. त्याच भाकरीच्या भुकेने निर्माण झालेल्या समृद्ध साहित्यातून सामान्य माणसाच्या जगण्याच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे टिपल्या गेल्या आहेत. त्यामुळेच नारायण सुर्वे यांच्यासारख्या थोर कवीचे साहित्य माणसाला संकटांशी लढण्याची, जगण्याची हिंमत आणि नवी शक्ती देते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनी केले. संगमनेर येथील साहित्य कला व सांस्कृतिक संघ आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य जत्रा’ कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या साहित्य सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने मुळा नदीपात्रात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठाबाई विकास घुले असे मृत महिलेचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे पठार भागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई या घरच्यांना शेतात जात असल्याचे सांगून निघाल्या होत्या, मात्र त्या दीर्घकाळ परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला घारगाव पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. शोध सुरू असताना टेकडवाडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येठेवाडी गावाच्या शिवारातून अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या एका लाल रंगाच्या टाटा डंपरवर पोलिसांनी छापा टाकून चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. येठेवाडी गावाच्या शिवारातून एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा डंपर (क्रमांक MH 20 DT 0239) बेकायदेशीररीत्या वाळू भरून १९ मैल मार्गे घारगावच्या दिशेने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर संकट, अपुरा पाऊस, वाढलेली उष्णता आणि दुष्काळाच्या दाहकतेवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे ही आता प्रत्येकाची नैतिक जबाबदारी बनली आहे. या पार्श्वभूमीवर, चालू वर्षी दंडकारण्य अभियानांतर्गत सर्वांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे अत्यंत जबाबदारीने संगोपन करावे. वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करणे हीच खरी मानवतेची आणि ईश्वराची सर्वोत्तम सेवा ठरेल, असे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दंडकारण्य अभियानाच्या विशेष नियोजन बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, प्रकल्प प्रमुख…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आणि धनलाभ घडवून आणणारा ठरेल. गजकेसरी योगामुळे कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, मात्र कोणाशीही बोलताना कठोर शब्दांचा वापर करणे टाळावे. वृषभ- आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन हितसंबंध जोडले जातील, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. नवीन गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घेताना घाई गडबड करू नका, अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन- आज मनात कोणताही संभ्रम न ठेवता कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि घरातील जुन्या समस्या दूर होतील. तब्येतीची थोडी काळजी घ्या आणि…
पुणे: सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ टोलनाक्याजवळ दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी येथे मुक्कामी आल्यानंतर हा अपघात घडला. नांदेड जिल्ह्यातील एका दिंडीच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या वारकरी महिलांना धडक दिली. या अपघातात सांगली जिल्ह्यातील नंदा पवार, माधवी सलगरे आणि राजश्री भोसले या तीन महिलांचा मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. चालू खरीप हंगामात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी या योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसाधारण पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि उर्जावान राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम असून केलेल्या मेहनतीला चांगले यश मिळेल. दुपारनंतर आर्थिक अडचणी दूर होतील, मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती झाल्यास घाईगडबड न करता तो निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ शुभकारक ठरेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि कुटुंबासोबत उत्तम भोजनाचा आनंद घेता येईल. वृषभ- तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायाच्या निमित्ताने नवीन प्रवासाचे योग जुळून येत आहेत. आज तुम्ही तुमच्या गोड…
नाशिक: जयहिंद लोकचळवळीच्या कृषी विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला. नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यात राज्यभरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येतो. कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास अण्णा शिंदे, आमदार मनोज कायंदे, जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष…
अमोल शेलकर अयोध्या राम मंदिराची उभारणी हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. देश-विदेशातून सामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई या मंदिरासाठी दान केली. परंतु, गेल्या काही दिवसांत समोर आलेले मीडिया रिपोर्ट्स, मंदिराचे माजी कर्मचारी आणि स्थानिक साधू-संतांचे दावे पाहिले तर या श्रद्धेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा आढावा घेतल्यास दोन मुख्य प्रकारच्या गंभीर गडबडी समोर येतात, ज्यामध्ये पहिली पैशांच्या व दागिन्यांच्या चोरीची आणि दुसरी जमीन खरेदीतील कोट्यवधींच्या घोटाळ्याची आहे. राम मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते आणि तिथे एकूण ३५ दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्या भरल्यानंतर त्यातील दान सुरक्षित लोखंडी पेट्यांमध्ये साठवले जाते आणि तिथून अवघ्या…
पुण्याच्या द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ला पहिल्याच पावसाने दिलेल्या तडाख्याने राज्य सरकारची चांगलीच फजिती झाली. या घटनेवर झालेल्या टिकेने ‘महाराष्ट्राची बदनामी झाली’ अशी ओरड करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत बसलेल्यांच्या अंदाजाचा पुरता फजितवाडा झाला. कॅनडापासून अमेरिकेपर्यंतच्या पायाभूत सुविधांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर) प्रगती गाठणाऱ्या पाश्चात्य देशांची मदत घेऊनही व्हायचं तेच झालं. प्रचंड मोठी आश्वासनं दिल्यावरही ती खोटी ठरावीत ही तर लाजीरवाणी गोष्ट आहे. अतिपावसाने मिसिंग लिंकला लागलेली गळती आणि त्याच्या कमानीला बसलेले हादरे ही प्रशासनाच्या एकूणच कारभाराच्या चिंधड्या उडवणारी घटना आहे. आता टीका झाल्यावर नमतं घेण्याऐवजी सत्ताधारी ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, ती पाहता यांना झाल्या प्रकारचा ना खेद आहे ना चिंता. राज्य…
