Author: Annant Ppangarkar
संगमनेर: तालुक्यातील ऐतिहासिक व स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरी येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ‘उत्सव माझ्या कुंकवाचा’ हा अनोखा महिला सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. जाकमत बाबा मित्र मंडळ, आदिशक्ती फाउंडेशन आणि शिवसेना महायुती यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो महिलांनी ऐतिहासिक महाकाय वटवृक्षाला सात फेरे मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. या सोहळ्यात धार्मिक परंपरेसोबतच महिला सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आमदार खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ,…
संगमनेर: पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी स्वागत केले असून, हा निकाल म्हणजे त्या निष्पाप चिमुकलीला मिळालेला खऱ्या अर्थाने न्याय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही निष्पाप बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना समाजात किंवा कायद्यात कोणतीही दया दाखवली जाऊ नये, असे स्पष्ट करत अशा गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हाच ठाम संदेश या निर्णयातून समाजाला गेला असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नमूद केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्फत संगमनेर उपविभागातील गुन्हेगारांविरुद्ध पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी हा निर्णय दिला. त्यांनी उपविभागातील एकूण ८ सराईत गुन्हेगारांचा गुन्हेगारी आलेख तपासून त्यांना अहिल्यानगर जिल्हा, तसेच शेजारील जिल्ह्यांच्या सीमांमधून ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडाली असून नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये ही कठोर कारवाई करण्यात…
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निकाल दिला आहे. ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मरेपर्यंत फाशीची कठोर शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत संपूर्ण सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे. महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती, ज्यानंतर अख्ख्या राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि समाजाला नवी दिशा देण्यासाठी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दिनांक १ जुलै) कोळवाडे येथे सकाळी १० वाजता भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोरगरीब आणि आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कटिबद्ध असणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कोळवाडे येथील जय हिंद आदिवासी आश्रम शाळा परिसरात हा मेळावा पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण मेळाव्याला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर तालुका युवक…
संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली असतानाही केंद्र व राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सातत्याने दिशाभूल केली आहे. हा महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग अचानक का रद्द करण्यात आला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला पाहिजे, अशी आक्रमक मागणी घारगाव येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर होईपर्यंत आता कोणत्याही राजकीय पक्षाचा आडोसा न घेता, थेट राजकारणविरहीत तीव्र जन-आंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, हा परिसरात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरचे युवा विमा अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झाली असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा ‘सीओटी’ आणि ‘एमडीआरटी’ सन्मान पटकावला आहे. टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी असलेल्या आदित्य कडलग यांनी केवळ पाच महिन्यांत यंदाचे ‘एमडीआरटी’ (Million Dollar Round Table) मानांकन मिळवून आपल्या यशाचे सातत्य राखले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंगापूर येथे २२ ते २५ ऑगस्ट २०२७ दरम्यान आयोजित होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत त्यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. आदित्य यांनी २०२३ मध्ये विमा क्षेत्रात पदार्पण करताच पहिल्याच वर्षी एमडीआरटीचा बहुमान मिळवला होता, तर २०२४ मध्ये एकाच वर्षात सलग…
आजचे राशिभविष्य मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक असणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ उत्तम असून कार्यालयातील वरिष्ठ तुमच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदेशीर करार होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील, परंतु गुंतवणुकीचे निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. वृषभ : गेल्या काही दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे आज पूर्णत्वास जातील. व्यापार आणि व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग निर्माण होत आहेत. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष यश लाभेल. आरोग्याच्या दृष्टीने आज थोडी काळजी घेणे आवश्यक आहे; वाढत्या उष्णतेमुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान अन्य सहा आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गस्त घालत होते. याच दरम्यान, जमजम कॉलनीतील सरकार लॉन्सजवळील एका मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असल्याची आणि…
भाऊ चासकर – NEET पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सहन कराव्या लागलेल्या गैरसोयी यांच्या बातम्यांची शाई वाळत नाही तोच पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महाटीईटी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा कारभार यापूर्वीही वादग्रस्त राहिला आहे. पेपरफुटी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. काही अधिकाऱ्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. तरीही त्यातून परीक्षा परिषदेने कोणताही धडा शिकलेला नाही, हे दुर्दैवी आहे. शालेय कामकाज, दैनंदिन अध्यापन, विविध उपक्रमांचे फोटो व माहिती अपलोड करणे, असंख्य लिंक भरणे आणि तत्सम इतर अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांनी प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत, विविध आजारांना सामोरे जात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर जवळील कासारा दुमाला येथील भोलेनाथ दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतील सर्वच मुलांना स्कूल बॅग, वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. या सामाजिक उपक्रमासाठी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन राजेश गुंजाळ यांनी संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. संस्थेच्या स्थापनेला ४४ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे सहा कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच संस्थेचे दैनंदिन दूध संकलन सुमारे ४५००…
अकोले: चांगले शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मुख्य पाया असून, शिक्षकांचे समर्पित योगदान आणि त्याला लाभलेली ग्रामस्थांची भक्कम साथ यांमुळेच शिंदेवाडी शाळा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे, असे गौरवोद्गार विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी काढले. तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे श्री व श्रीमती रामनारायणजी बुब ट्रस्टच्या वतीने शाळेसाठी अत्याधुनिक इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड व ३५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच अनिकेत बॅटरी हाऊसकडून शाळेला इन्व्हर्टर बॅटरी देणगी म्हणून देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याच्या लोकार्पण व वाटप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अनिल गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच संतोष आंबरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून…
भांडुपचे एकेकाळचे अनभिषिक्त नेते, ज्यांच्या नावावर गिरणी कामगारांच्या असंख्य चळवळी झाल्या; जे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील काही मोजक्या नेत्यांमधील एक होते, अशा दिना बामा पाटील यांची पुण्याई अनेक वर्षे त्यांचे पुत्र खासदार संजय पाटील यांच्या कामी आली. सत्तरीच्या दशकात मुंबईत विशेषत: भांडुप, मुलुंड आणि पूर्व उपनगरात सामान्यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिना बामा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख मोठा होता. या विभागाचे आमदार म्हणून त्यांनी १९८५ मध्ये निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ते विजयी झाले. शिवसेनेसारख्या बालेकिल्ल्यात एक काँग्रेसचा कार्यकर्ता विजयी होऊ शकतो, हे तेव्हा दिनांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. इतकी लोकप्रियता या नेत्याची होती. मुंबईची कामगार चळवळ असो की गिरणी कामगारांची…
आजचे राशिभविष्य मेष: व्यावसायिक पातळीवर चढ-उतार पाहायला मिळतील, मात्र त्यामुळे खचून न जाता धैर्याने काम करावे. भविष्याचा विचार करता आज घेतलेले आर्थिक निर्णय दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यासाठी संबंधितांशी संवाद साधावा लागेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांकडून सुखद वार्ता समजेल. वृषभ: आज एखादा महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जुन्या कष्टांचे योग्य फळ मिळाल्याने समाधान लाभेल. घर किंवा मालमत्तेशी संबंधित मोठे निर्णय कौटुंबिक संमतीने यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मोठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने नियोजित परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. या अत्यंत संतापजनक प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आणि कष्टावर पुन्हा एकदा पाणी फिरले असून, यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत घणाघात केला आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे तरुणांचे भविष्य पूर्णपणे धोक्यात आले असून, या गैरप्रकाराला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या सत्ताकाळात पेपरफुटी ही जणू नित्याचीच बाब बनली असून, कोणतीही भरती प्रक्रिया किंवा पात्रता परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: NEET परीक्षांमधील गोंधळानंतर आता महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर उद्या होणारी परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या तब्बल ४ लाख २८ हजार उमेदवारांवर मोठा अन्याय झाला असून, राज्यातील ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश यातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याची घणाघाती टीका विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. महाराष्ट्रात आता ‘पेपरफुटी’ हीच नवी ‘परीक्षा पद्धत’ झाली आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत आमदार तांबे यांनी सरकारवर निशाणा साधला. सातत्याने होणाऱ्या अशा गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर ‘दुहेरी निष्ठा’ दाखवल्याचा आरोप करत, त्यांना पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघात किंवा भाजपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदू संमेलनात उपस्थित राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि त्यांच्या संस्थापकांची स्तुती करणाऱ्या नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा ही केवळ आणि केवळ पोलीस दलाच्या कर्तव्याशी आणि निष्पक्षतेशीच असायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यात भरवली जाणारी हिंदू संमेलने ही वरकरणी अराजकीय दाखवली जात असली तरी त्यामागे निश्चितपणे राजकीय हेतू…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. कोणत्याही नवीन योजनांवर विचार करताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील, मात्र मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नवीन गुंतवणूक करताना घाई गडबड करू नका. वृषभ: व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय लाभदायी ठरेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील आणि पूर्वी घेतलेले कष्ट आता सार्थकी लागतील. प्रगतीचा वेग वाढल्यामुळे काही प्रमाणात अतिरिक्त भांडवलाची गरज भासू शकते. नोकरदार वर्गाला नवीन प्रकल्पांची जबाबदारी मिळेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मिथुन: तुमच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या आणि अवैध गर्भपात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या गुन्ह्याची व्याप्ती आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरली आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या अत्यंत बारकाईने तपासादरम्यान काल या प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली. डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय ५४, रा. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो बीएएमएस असून या रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असून, आज आरोपीला राहता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने तंत्रज्ञानाची कास धरत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कारखान्याच्या नूतन व अद्यावत अशा भव्य प्रशासकीय इमारतीच्या छतावर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, याचे भव्य लोकार्पण नुकतेच झाले. विजेची वाढती मागणी आणि निर्माण होणारा तुटवडा पाहता, भविष्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज बनली असून थोरात कारखान्याचा हा प्रकल्प इतर कारखान्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. या विशेष लोकार्पण सोहळ्याला कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक, कार्यकारी संचालक…
