Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध सुगंधित तंबाखू, मावा आणि गुटखा विक्रेत्यांविरोधात जोरदार धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान ७ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सुमारे २,९९,९९० रुपये किमतीचा अवैध पानमसाला, मावा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून एकूण १४ आरोपींविरुद्ध ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांना…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन हिक्किम: जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध ‘हिक्किम’ पोस्ट ऑफिसमधून भारताच्या पंतप्रधानांना एक थेट पत्र पाठवण्यात आले आहे. वाढती असहिष्णुता, नफरत आणि सामाजिक विभाजनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी संगमनेर येथील वकिल समीर लामखडे यांनी पत्राद्वारे केली आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत संगमनेरमधील वकिलाने लिहिलेलं हे पत्र चर्चेत आलं आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे. मात्र, सध्या देशात ज्या प्रकारे असहिष्णुता आणि नफरतीचे वातावरण पसरत आहे, तसेच लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेवर गंभीर…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र बोलताना संयम बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड टाळा. वृषभ- आज तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. नवीन आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन करारांची शक्यता आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन- आजचा दिवस तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची परीक्षा घेणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही त्यावर सहजरीत्या मात कराल. प्रवासाचे योग…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. नेवासा येथील कुख्यात लष्करे टोळीतील प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण आणि सादिक बशीर शेख या ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. तर कटाचा थेट व पुरेसा पुरावा न मिळाल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे आणि सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या ५ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रधान…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: नेपाळमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या धडकताच संगमनेरसह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची धडधड वाढली होती. संगमनेरच्या घुलेवाडी येथील निर्मला गुंजाळ यांच्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत २४ ऑगस्टला नेपाळला गेलेले ४५ पर्यटक या प्रलयात अडकल्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने सर्व पर्यटक पूर्णपणे सुखरूप असून ते आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनीही प्रशासनाचा पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. २६ ऑगस्टच्या दुपारनंतर नेपाळमध्ये महाप्रलयाने थैमान घातल्याच्या बातम्या वाहिन्यांवर झळकताच पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. संगमनेरमधील निवृत्त शिक्षक हिरालाल पगडाल यांच्यासह अनेक भाविकांचे नातेवाईक चिंतेत…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेर शहरासाठी केवळ एक विकास प्रकल्प नसून, तो प्रत्येक संगमनेरकराच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या मनात ज्या स्वरूपाचे स्मारक आहे, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याला पूर्णपणे न्याय देणारे भव्य-दिव्य, दिमाखदार आणि पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे स्मारकच उभारण्यात येईल. स्मारकाच्या उभारणीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यासाठी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी स्पष्ट भूमिका माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलीप पुंड यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना दिलेला स्वाभिमान, लोककल्याणकारी राज्यकारभार, सर्वधर्मसमभाव, दूरदृष्टी…
Annant Ppangarkar नेवासा / श्रीगोंदा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व बंदी असलेल्या गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी सोनई आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी ५ विविध ठिकाणी छापे टाकून ही मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत एकूण ८९,३६६ रुपये किमतीचा बंदी असलेला पानमसाला, मावा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून ८ आरोपींवर ५ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस…
Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि ऊर्जावान राहील. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता असून कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वृषभ – आज तुम्हाला कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थितीत बळकट सुधारणा दिसून येईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी दिवस अनुकूल आहे, मात्र घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक जीवनात गोडवा राहील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. मिथुन – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील अवैध मावा आणि सुगंधीत तंबाखू बनविणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी धाडी टाकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रिक मशीन, सुगंधीत तंबाखू आणि माव्यासह एकूण ४ लाख ३९ हजार ४८६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ५ आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शहरात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची दोन विशेष पथके तयार करून शहरात अवैध गुटखा व…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ गडावर परिसरातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने आज गुरुवारी मोठ्या उत्साहात यात्रा पार पडत आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरी होणारी ही यात्रा सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यात्रेनिमित्त निमोण येथे अश्विनाथ गडावर जाणाऱ्या मानाच्या काठीचे पूजन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आर्किटेक्ट बी. आर. चकोर, सोमनाथ धोंडीबा घुगे, ज्ञानेश्वर धोंडीबा घुगे, ॲड. ज्ञानेश्वर सांगळे, चंद्रकांत घुगे, साहेबराव मंडलिक यांच्यासह विविध मान्यवर आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे संत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीक्षेत्र सरला बेटचे विद्यमान मठाधिपती महंत श्री रामगिरी महाराज यांच्या आयोजनाखाली एकूण ५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वीचा विश्वविक्रम- “वंदे मातरम्”चे एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी केलेल्या सामूहिक गायनाचा यापूर्वीचा विश्वविक्रम १ लाख ४ हजार ६३७ सहभागींच्या नावावर होता. हा विक्रम १२ जानेवारी २०१० रोजी पुणे येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनने आयोजित केलेल्या “अंतर्नाद” या…
संगमनेर | मोहसीन शेख – ईद-ए-मिलाद निमित्ताने बुधवारी (२६ ऑगस्ट) संगमनेर शहरात काढण्यात आलेला ईद मिलाद जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धार्मिक उत्सवाला सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांततेची जोड देत जुलूस यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजक, सहभागी नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलीस प्रशासनाने जुलूस शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोजकांशी संवाद साधत आवश्यक सूचना केल्या होत्या. पोलीस प्रशासनाच्या सूचनांना आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत संयम आणि शिस्तीचे दर्शन घडविले. हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीत शांतता, संयम, बंधुभाव आणि समाजात सलोखा निर्माण…
आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा काळ खूप अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. वृषभ- आज तुम्हाला कामात थोडे धैर्य आणि संयम ठेवावा लागेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यास मानसिक शांतता मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासाच्या दृष्टीने चांगला राहील. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मित्र आणि प्रियजनांसोबत…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश आणि कर्तेपणाच्या अहंकारापासून मुक्ती असेल, तर त्याच कर्माचे रूपांतर साधनेत होते. कर्माचे डोळे म्हणजे ज्ञान आणि अहंकार सोडणे हाच खरा संन्यास आहे, अशा अत्यंत साध्या पण जीवनाला भावस्पर्श करणार्या सूत्रातून गीतेतील ज्ञान-कर्म-संन्यासयोगाचा गाभा उलगडत गीता विशारद्, उद्योजक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी यांनी संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले. राजस्थान युवक मंडळाच्या चार दिवसीय ‘मनशांती आणि जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप ज्ञानेश्वरीच्या रसाळ ओव्या, भगवद्गीतेतील श्लोकांचे सहज विवेचन आणि आधुनिक जीवनाशी त्यांची घालून दिलेली सांगड यामुळे आत्मपरीक्षणाचा अनुभव ठरला. पुढील वर्षापासून या व्याख्यानमालेत ‘एक अध्याय, दोन दिवस’…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: वाहनात लिफ्ट देण्याचा बहाणा करून एकट्या-दुकट्या ज्येष्ठ महिलांना मारहाणीची धमकी देत त्यांचे दागिने लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका महिला आरोपीसह तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून कार, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा तब्बल आठ लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मिरजगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले साखळी चोरीचे (चैन स्नॅचिंग) दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. नागलवाडी (ता. कर्जत) येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला द्वारकाबाई उत्तम डाडर या २० ऑगस्ट २०२६ रोजी मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था असलेल्या ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड’ने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, बँकेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ ९००१:२०१५ (ISO 9001:2015) मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनाचे सर्टिफिकेट हस्तांतरण आणि बँकेच्या अद्ययावत कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन नुकतेच माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, हे मानांकन बँकेच्या उच्च दर्जाच्या ग्राहक सेवा, कार्यपद्धती आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे निदर्शक आहे. बँक डिजिटलायझेशनचे धोरण स्वीकारून, विविध विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करत ग्रामीण भागातील ग्राहकांना जागतिक दर्जाच्या…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या निवासी वीज जोडणीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ओटीएसपी (OTSP) योजनेतून निवासी वीज जोडणीसाठी १० लाख १ हजार ७९७ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याने गेल्या चार दशकांपासून वीजेची वाट पाहणाऱ्या डोळासणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पठार भागातील डोळासणे परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या चाळीस वर्षांपासून हक्काच्या निवासी वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत होते. स्थानिक नागरिकांची ही मूलभूत गरज ओळखून आमदार अमोल…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: शहरातील पाईपलाईन रोड भागात पत्रकाराला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीविरुद्ध तोफखाना पोलिसांनी आता कडक कायदेशीर कारवाई केली आहे. टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सततची दहशत लक्षात घेता पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे संघटित गुन्हेगारीविरोधी ‘कलम १११’ हे वाढीव कलम जोडले आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील या सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत होणार आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) फिर्यादीचे सुपुत्र सार्थक थोरात हे आपल्या मारुती आल्टो कारने भिस्तबाग चौक ते एकविरा चौकाकडे जात होते. त्यावेळी मोपेड मोटरसायकलवरील चालकाने कारला पाठीमागून धडक दिली आणि…
आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस व्यवसाय आणि कामाच्या दृष्टीने प्रगतीचा आहे. कामातील पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील आणि धनलाभाचे योग बनत आहेत. वृषभ – आज तुमचे मन नवीन योजनांकडे अधिक आकर्षित होईल. कार्यालयातील वातावरण उत्साही राहील आणि अध्यात्माकडे कल वाढेल. धार्मिक कार्यावर अथवा प्रवासावर खर्च होण्याची शक्यता आहे. मिथुन – कलात्मक आणि सर्जनशील कामांमध्ये आज विशेष यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कर्क – मनासारखी कामे करण्याची संधी मिळाल्याने मोठा आनंद होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या विचारांचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरणात…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि गोपनीयता अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये उसनवारीवर किंवा केवळ मौखिक आदेशाच्या आधारे नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यांना येत्या १० सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांच्या मूळ जागी परत पाठवण्याची कारवाई पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ही कडक पावले उचलण्यात आली आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांनी प्रशासकीय प्रक्रियेला बगल देत आपल्या सोयीनुसार इतर कार्यालयांतून अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या…
