Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाची पार्श्वभूमी आणि धरणांमधील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. सिंचन भवन येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या महामंडळांचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, जयवंत गवळी यांच्यासह मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ३५७.५ टीएमसी म्हणजेच २५ टक्के इतकाच शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेत कमालीचा कमी आहे. चालू वर्षात आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे…
पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला आहे. एखाद्या व्यक्तीने अधिक काळ कार्यभार सांभाळला म्हणून त्याचे कौतुक करायला कोणाची ना नाही. यासाठी त्याच्या नावावर कामेही जमा असावीत. निमित्तमात्र आणि हौसमौज म्हणून असले कार्यक्रम होतच असतात, तसे या उत्सवाचे व्हायला नको. दुर्दैवाने त्यामागे असलेला कुटील डाव पाहिला की, या उत्सवाचा उबग आल्याशिवाय राहत नाही. मोदींनी अधिक काळ पंतप्रधानपद सांभाळले असे दाखवताना ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहून किती महान होते, हे पुढे आणण्याचा पद्धतशीर आटापिटा सुरू आहे. कोणाचा कार्यकाळ किती, याहून त्याचा कार्यकाळ ‘कसा’ होता, याची मोजदाद करायची असते. पण आजकाल त्याचा विचार करण्याचा…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा ऊर्जावान राहील. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील, परंतु विनाकारण खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला काही मानसिक तणाव जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. संयम आणि शांतता राखणे आज हितकारक ठरेल. व्यापार्यांना आज मोठा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाबावी लागेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराची उत्तम साथ लाभल्याने मन प्रसन्न राहील. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवनवीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत, त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे, देश जर महासत्ता करायचा असेल, तर आधी गाव आणि शेतकरी समृद्ध करणे गरजेचे असून आपले गाव हेच आपले खरे तीर्थक्षेत्र मानले पाहिजे, असे प्रतिपादन पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. संगमनेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील शनिवारच्या व्याख्यानात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात पेरे पाटील यांनी अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण, बालविवाह, भ्रष्टाचार आणि ग्रामविकास यांसारख्या गंभीर विषयांवर अत्यंत रोखठोक भाषेत विचार मांडले. सध्या बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून धने, जिरे, हळद, तिखट,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक २ ने एका कारवाईत बनावट परदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून पोपट भास्कर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर भागात एका व्यक्तीकडून नामांकित ब्रँडची बनावट दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ‘इम्पेरियल ब्लू’ आणि ‘रॉयल स्टॅग’ या नामांकित ब्रँड्सच्या व्हिस्कीच्या बनावट असलेल्या एकूण ११७ बाटल्या, एक दुचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग दिसत आहेत, परंतु घाईघाईने कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवाद साधल्यास मनाला शांतता लाभेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. वृषभ: आज आर्थिक नियोजनावर भर देणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येऊ शकतात, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. जुन्या वादांवर पडदा पडेल आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. संध्याकाळच्या वेळी थोडा थकवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे धाडसी आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या धडाकेबाज प्रशासकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात असून, या एकाच निर्णयाने राज्यातील गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत गुटख्यावरील कारवायांमध्ये केवळ लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेतेच पोलिसांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – सध्याच्या विवाह पद्धतीमध्ये मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि यामुळे वधूपित्याला सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर रामायणाचार्य ढोक महाराज यांनी अत्यंत परखड शब्दांत टीका केली आहे. विवाह सोहळ्यांमध्ये शिस्त राखण्यासाठी गावागावांत युवकांचे ‘दांडके मंडळ’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. गुंजाळ मळा येथे आयोजित प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या आठव्या पर्वात ते बोलत होते. या सोहळ्यात ढोक महाराज यांनी आपल्या ओजस्वी, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी निरूपणातून रामकथेचे विविध पैलू उलगडले. त्यांच्या वाणीतील सात्त्विकता आणि कथनशैलीमुळे संपूर्ण धर्ममंडप भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उभे राहिलेले हे रामकथा सत्संगाचे…
संगमनेर: देशात सध्या सुरू असलेली लढाई ही केवळ सत्तेची नसून विचारधारेची आहे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे एकच असून राज्यघटना, संतांचे विचार, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारसरणी हा आपल्या सर्वांचा सामायिक पाया आहे, आम्ही फक्त दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहोत इतकाच काय तो फरक आहे, शरद पवार हे प्रतिगामी विचारधारा कधीही स्वीकारू शकत नाहीत, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुका दूध संघाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. थोरात यांच्या या राजकीय विधानामुळे राजकारणात नवे संकेत जुळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यात बहुचर्चित असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी महायुती सरकारच्या आर्थिक नियोजनावर आणि या योजनेच्या निधी वाटपावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वळवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून सरकारच्या या कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. उत्कर्षाताई रूपवते यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे तब्बल ३४४.७४ कोटी रुपये एका शासन निर्णयाच्या (जीआर) माध्यमातून लुबाडण्यात आले आहेत. ही केवळ निधीची…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत वैचारिक सुसंवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधान लाभेल. व्यवसायात नवीन योजनांवर काम करण्यासाठी अनुकूल काळ आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मन हलके होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात घाईगडबड करणे टाळावे, अन्यथा नुकसान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात गुरुवारी (दि. ११ जून) मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील १४ पोलीस निरीक्षक आणि ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या यादीशिवाय आणखीनही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे. कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकड आणि काही अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून जनहितार्थ हे बदली आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही पदग्रहण अवधी न घेता तातडीने नव्या जागी हजर होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहराच्या लगतच असलेल्या आढा ओढा परिसरामध्ये एक धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. या भागात एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आढा ओढा परिसरात एक मृतदेह जळालेल्या स्थितीत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती तात्काळ संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेर शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह अंदाजे पन्नास वर्षे वयाच्या पुरुष जातीच्या व्यक्तीचा असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने अखेर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकोले नाका परिसरात राहणाऱ्या राहुल भारत सोनवणे (वय २४ वर्षे) या धोकादायक व्यक्तीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सोनवणे याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, लुटमार, जबरी चोरी आणि घातक शस्त्रांनी गंभीर मारहाण करणे यांसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रशासनाने यापूर्वी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, तसेच त्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या धडपडीत आजचा माणूस स्वतःचे आरोग्य, नातेसंबंध आणि आनंद हरवून बसत आहे. एव्हरेस्टसारखी यशाची उत्तुंग शिखरे सर केली, तरी आयुष्याच्या प्रवासात माणूस एकटा राहता कामा नये. यशाबरोबरच माणसाला आपल्या आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त आयएएस अधिकारी व नाम फाऊंडेशनचे व्याख्याते इंद्रजीत देशमुख (काका) यांनी येथे केले. पूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटणकर यांच्या हस्ते इंद्रजीत देशमुख यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना देशमुख यांनी ईश्वरनिष्ठ संतांच्या मांदियाळीत या सप्ताहाची सुरुवात होत असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन येवला: येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकऱ्यांसमोर सध्या एक मोठे संकट उभे राहिले आहे. येथील ‘वर्मा कंपनी’कडून गेल्या महिनाभरापासून रासायनिक आणि दूषित सांडपाणी उघड्यावर तसेच शेताच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील शेतीचे आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कंपनीतून निघणारे हे घातक केमिकलचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हे पाणी आता शेतीसाठी किंवा पिण्यासाठी अजिबात योग्य राहिलेले नाही. दुर्दैवाने, याच विहिरींचे पाणी पिकांना दिल्याने शेतातील पिके जळून खाक होत आहेत, तर सुपीक जमीन सातत्याने नापीक बनत चालली आहे. या दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर): कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बोटा येथील पाच भाविक गंभीर जखमी झाले. पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील बोटा (ता. संगमनेर) या आपल्या गावाकडे कारने परतत असलेल्या भाविकांच्या कारला (कार क्रमांक एम एच १४ एन डी ३३७८) समोरून येणाऱ्या दुसऱ्या पिकअप वाहनाने (एम एच २४ बी डब्लू २८६२) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत कारमधील जिजाभाऊ दत्तात्रय शेळके, चालक शिवाजी शांताराम मेंगाळ,…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, परंतु कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन लोकांशी झालेल्या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मानसिक शांतता लाभेल. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी…
अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून स्फोटक पदार्थ वाहून नेत असताना हा स्फोट झाला असून, यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण अकोले परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप उत्तम ताजने (रा. औरंगपूर) हा व्यक्ती आपल्या दुचाकीवरून स्फोटक पदार्थ घेऊन जात होता. औरंगपूर फाट्याजवळ अचानक या स्फोटक पदार्थांचा तीव्र स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण आणि थरारक होता की, स्फोटाच्या तीव्रतेमुळे संबंधित दुचाकी तब्बल ५० फुटांपेक्षा अधिक उंच हवेत उडाली. धक्कादायक बाब…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अध्यात्मावर बोलणे आणि त्याचा उपदेश करणे सोपे असते, मात्र त्यानुसार जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. अध्यात्माला बदनाम करू नका. जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसेच मानवाचे जीवन अध्यात्माशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते तथा गगनबावड्याचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी केले. स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गगनगिरी महाराजांच्या तपश्चर्या, त्याग, योगसाधना आणि लोककल्याणकारी कार्याचा भावपूर्ण आढावा घेत उपस्थित भाविकांचे प्रबोधन केले. नंदकुमार पोवार म्हणाले की, गगनगिरी महाराजांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक आत्मा पावन होतो. कृतज्ञता व्यक्त करताना कधीही कमीपणा वाटून घेऊ नये. महाराजांनी…
