Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: संगमनेर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोन महिन्यांत दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खताळ यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर प्रकरणावर सभागृहात जोरदार आवाज उठवला होता. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, जून २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला तब्बल ६९ टक्के वाढीव दराने मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने निविदा मंजूर होण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अखंडित भीज पावसामुळे ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सावरगावतळ येथे तर बुधवारी सकाळी तीन शेतकऱ्यांची राहती घरे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सावरगावतळ येथील वयोवृद्ध शेतकरी कारभारी दशरथ थिटमे, दादाभाऊ एकनाथ नेहे आणि भाऊसाहेब विठोबा नेहे या तिघांच्या घरांच्या भिंती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे या सर्व कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून, त्यांच्यासमोर आता सुरक्षित निवाऱ्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: संगमनेर आणि परिसरातील हजारो कामगार बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगार रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या जाणता राजा मार्गावरील, स्टेट बँकेसमोरील इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारण्यात येत असून, लवकरच ते सर्वसामान्य नागरिकांच्या आणि कामगारांच्या सेवेत दाखल होणार आहे. ​आजवर कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या संगमनेरमधील हजारो कामगारांना किरकोळ तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नाशिक किंवा अहिल्यानगर येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. या लांबच्या प्रवासामुळे कामगारांचा मोठा वेळ आणि पैसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील शेख (गुड्डू इंजिनिअर) यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात प्रशासकीय कारभारात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी हे हायटेक पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुजम्मील शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे. या मागणीच्या पूर्ततेकडे आता संगमनेरकरांचे लक्ष याकडे लागले आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामे, आर्थिक बाबी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर खडाजंगी चर्चा होत असते. अशा वेळी सभागृहात आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नक्की काय भूमिका मांडतात, हे प्रत्येक नागरिकाला घरबसल्या कळावे यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन आश्वी: पावसाळा सुरू होताच आश्वी खुर्द आणि परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराचे दर्शन घडू लागले असून, रविवारी सकाळी एका शेतकरी दाम्पत्याला मृत्यूचा थरारक अनुभव आला. आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी रामनाथ क्षिरसागर (वय ४४) आणि त्यांच्या पत्नी योगिता क्षिरसागर (वय ३८) हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या गायींसाठी चारा कापत असताना, त्यांच्या अवघ्या दोन फुटांवर ११ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी अचानक तुटून कोसळली. सुदैवाने या तारेला रबराचे आवरण असल्याने आणि दाम्पत्य काही अंतरावर असल्याने एक मोठा अनर्थ टळला. मुख्य वीजवाहिनी जमिनीवर पडताना मोठा स्फोट झाला आणि हवेत ठिणग्या उडाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज बुद्धीचा योग्य वापर करून तुम्ही अवघड कामेही सहज सोपी कराल. कार्यक्षेत्रात तुमच्या नवीन कल्पनांचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनाची एकाग्रता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कामात चुका होणार नाहीत. ​वृषभ – आज तुमचे मन थोडे विचलित राहू शकते. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. पैशांची देवाणघेवाण करताना किंवा कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ​मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आनंदाचा असेल. तुमच्या प्रभावी बोलण्याने लोक प्रभावित होतील आणि समाजात तुमचा मान वाढेल. अचानक धनलाभ होण्याचे योग असून जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  श्रीरामपूर:  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवरिुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सन २०२५ व २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील एकूण ६८ सराईत आरोपींवर हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्यानुसार मानवी जीवितास किंवा मालमत्तेस भय, इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ व ५६ च्या तरतुदीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर:  भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज, (मंगळवारी ७ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून हे आदेश जारी केले आहेत. हवामान विभागाने अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. तालुक्यामध्ये आधीच काही भागांत अतिवृष्टी झाली असल्याने निर्माण झालेली स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आज (मंगळवारी) दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या महामार्गावरील मलबा हटवण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे घाटातील मोठे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळून थेट रस्त्यावर आला आहे. यामुळे या महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या येणारी-जाणारी वाहने एकाच बाजूने वळविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या रस्त्यावरील मोठे दगड आणि मलबा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले असून भंडारदरा, मुळा आणि कुकडी समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पुनर्वसु नक्षत्राच्या सरींचे तांडव सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. भंडारदरा धरण आज (मंगळवारी) संध्याकाळपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मुळा नदीला छोटा पूर आल्याने धरणाचा साठा ३० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने भंडारदरा आणि मुळा पाणलोटातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर- भंडारदरा धरण क्षेत्रात रविवारी आणि सोमवारी झालेल्या तुफान…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज चंद्र बाराव्या स्थानी असल्याने आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला किंवा शारीरिक अस्वस्थता जाणवू शकते. इतरांच्या कामात नाहक हस्तक्षेप करणे टाळावे, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी आणि कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार आज करू नयेत. ​वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. चंद्र लाभ स्थानात असल्यामुळे धनवृद्धी आणि नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी नवीन करार किंवा सौदे यशस्वी होतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. ​मिथुन – नोकरी आणि व्यवसायामध्ये आज आपल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामगिरीवर प्रसन्न राहतील, ज्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोठ्या प्रमाणावर चोरी (अपहार) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याचे पडसाद उमटत आहेत. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत संगमनेर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, याप्रकरणी संगमनेरमध्ये ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात २५ जून २०२६ रोजी या दान चोरीप्रकरणी एफआयआर क्रमांक ९०/२०२६ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, हा गुन्हा केवळ अयोध्येपुरता मर्यादित नसून यामुळे संपूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासातून संगमनेरकरांची लवकरच शंभर टक्के मुक्तता होईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आणि मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहयोगातून मालपाणी फार्मच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुसज्ज श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष केंद्राचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जय मालपाणी…

Read More

अनंत पांगारकर- कचऱ्याचे साम्राज्य, जागोजागी पडलेले ढीग आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकलेल्या एखाद्या शहराचे रूप पालटून त्याला राज्यातील एक प्रगतशील, स्वच्छ आणि ‘झाडांचे शहर’ बनवणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असते. मात्र, जेव्हा एखादी महिला आपल्या शहराला केवळ एक भौगोलिक क्षेत्र न मानता स्वतःचे मोठे घर मानते, तेव्हा तिथे परिवर्तनाची एक नवी आणि सोनेरी पहाट उजाडते. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नेमका हाच अद्भूत चमत्कार संगमनेर शहरात करून दाखवला आहे. म्हणूनच, ‘कचऱ्यात हरवलेली बाई’ अशी स्वतःची प्रांजळ आणि सार्थ ओळख करून घेत, त्यांनी कचरा निर्मूलनाचा आणि शहर सौंदर्यीकरणाचा जो वसा घेतला, तो आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – या राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले गेल्याने भविष्यात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आज तुमची काही कठीण कामे सुलभ होतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल. वृषभ – आज आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उत्तम दिवस असून जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेले प्रकल्प गतीने पुढे सरकतील. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी कानावर आल्याने घरातील वातावरण प्रफुल्लित राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रिमझिम पावसाच्या धारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि विठूनामाच्या जयघोषात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसह आगमन झाले. यावेळी वारकरी संप्रदायाचे पाईक आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे भक्तीभावाने स्वागत करून दर्शन व पूजन केले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह अनेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन रविवारी (दिनांक १२ जुलै) संगमनेर-लोणी रोडवरील गणपती मंदिराजवळील वसंत लॉन्स येथे होणार असल्याची माहिती पत्रकार गौतम गायकवाड यांनी दिली. सन २०११ पासून प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी या सामाजिक उपक्रमाचे सातत्याने व विनामूल्य आयोजन करण्यात येत आहे. डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आला आहे. यापूर्वी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कालकथित प्रेमानंद रूपवते, कालकथित स्नेहाजाताई रुपवते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे,…

Read More

प्रिय डीजी सदानंद दाते साहेब, अत्यंत सचोटीचे पोलीस अधिकारी म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याकडे पाहत आहे. कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, कठोर अशा असंख्य उपाध्या आपल्या नावामागे आहेत. देशात जबाबदारी पेलताना आपण महाराष्ट्रात आल्यानंतर पोलीस दलात सारं काही अलबेल होईल, आपल्यासारखा प्रामाणिक कारभार करण्याचा प्रयत्न आपल्या हाताखालचे अधिकारी व कर्मचारी करतील, अशी धारणा होती. एखाद्या संस्थेचा कारभार त्या संस्थेच्या प्रमुखाच्या नावाने ओळखला जातो. संस्थेतील यशापयश प्रमुखाच्याच खात्यावर नोंदवले जाते. यामुळे आपल्यासारखा कारभार इतरांनीही करावा, ही अपेक्षा गैर नाही. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. सक्षम नेतृत्व असूनही महाराष्ट्राच्या पोलिसांना झालंय काय, असा प्रश्न आता पडू लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती माधव जामदार…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष – आज सार्वजनिक कार्यक्रमात मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज काही कारणांमुळे मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. खर्चात विनाकारण वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. वृषभ – आजचा दिवस नवीन कामाच्या नियोजनासाठी अत्यंत अनुकूल आहे. मनात आशेचे नवीन किरण निर्माण होतील. आर्थिक बाबतीत घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. लांबचा प्रवास आज टाळावा. व्यापारात प्रगती होईल आणि नवीन दिशा मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. मिथुन – व्यवसायाच्या बाबतीत आज अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने मन थोडे निराश होऊ शकते, परंतु संयम ठेवावा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने परिसरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकूण १२१ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेत प्रतिबंधक कारवाईची विशेष मोहीम आणि समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्म्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेअंतर्गत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी हजर होते, यामध्ये सर्वाधिक ३५ आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तर १७ आरोपी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील होते. या सर्व गुन्हेगारांचे प्रथम गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित इंट्रोगेशन फॉर्म भरून…

Read More