Author: Annant Ppangarkar

संगमनेर –  संगमनेर शहर पोलिसांनी बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शहरातील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर कॉलेज आणि १३२ केव्ही सबस्टेशनजवळ घडला. हा अपघात एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आला. व्हिडिओमध्ये, यश अनुप अरगडे (वय २०), रा. गुंजाळवाडी, संगमनेर, हा त्याच्या रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (क्रमांक एमएच ०४ एलए २५३१) दुचाकीला मुख्य रस्त्याऐवजी भरधाव वेगात फूटपाथवरून चालवत होता. २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात यश स्वतः आणि त्याचा मित्र प्रतीक सचिन गुंजाळ (वय १८) दोघेही गंभीर जखमी झाले. हा…

Read More

संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक बदल झाले असले तरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे संगमनेरमधील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि हक्काचे मदत केंद्र म्हणून उभे आहे. हे कार्यालय, राजकीय स्थिती कशीही असो, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरचे राजकीय समीकरण बदलले असले तरी, बाळासाहेब थोरात यांचे हे जनसंपर्क कार्यालयाने आजही सामान्य नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच मदतीचे आणि विश्वासाचे केंद्र म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे कार्यालय कायमच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहील, असा विश्वास…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेमध्ये विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी शहरातील त्यांच्या प्रभागात असलेल्या लखमीपुरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न किती गंभीर आहेत, हे अधोरेखित केले. कोट्यवधींची विकासकामे रखडली- तत्कालीन कौन्सिलचा कालावधी संपल्याने मागील चार वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही आणि कौन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित…

Read More

मेष (Aries): आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च जपून करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): तुमच्या मेहनतीचे फळ आज नक्की मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कामात यश मिळवण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करा. मिथुन (Gemini): आज काही निर्णय घेताना सावध राहा. अनावश्यक वादात पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवसभर थोडा तणाव जाणवू शकतो. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक…

Read More

संगमनेर –  घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याने माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असताना, रुग्णालयातील मेडिकल सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर या परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी घुलेवाडी येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयातील प्रशासनाचे काम समाधानकारक नसल्याचे पानसरे यांनी सांगितले. रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत, त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही योग्य मार्गदर्शन केले जात…

Read More

संगमनेर-  पुणे-नाशिक महामार्गावर खांडगावकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दिनेश राजू लोखंडे (वय ३३, रा. संगमनेर खुर्द) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेने संगमनेर परिसरात शोककळा पसरली आहे. दिनेश लोखंडे हा मालपाणी कंपनीत कामाला होता. मंगळवारी रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून घरी परतत होता. त्याचवेळी, अहमदाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या (MH 14 LS 7191) या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दिनेशच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचा डावा पाय पूर्णपणे तुटला होता. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर…

Read More

मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अधिक उत्पादनशील राहण्यासाठी चांगला असू शकतो. तुमच्यात उत्साहाची लाट येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही बऱ्याच काळापासून पुढे ढकललेली कामे पूर्ण करू शकता. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा व्यावसायिक परिस्थितीत तुमचे मत मांडण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला स्थिरता आणि आरामाची गरज वाटू शकते. तुमच्या घरगुती जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. आर्थिक बाबतीत, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या बजेटचे पालन करण्याचा प्रयत्न करा. मिथुन (Gemini)- आज तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल. नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी, महत्त्वाच्या चर्चा करण्यासाठी किंवा काहीतरी…

Read More

संगमनेर –  माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने संगमनेर तालुक्यातील सुमारे १२ हजार असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामामध्ये मदत पोहोचवण्याचं श्रेय घेणाऱ्या इतर लोकप्रतिनिधींवर असंघटित कामगारांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंगसे यांनी टीका केली आहे. मुंगसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, सन २०२२-२३ पासून थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘यशोधन’ कार्यालयाने गावागावात जाऊन गरजू कामगारांना मदत केली. ज्यांना सरकारी योजनांची माहिती नव्हती, त्यांना घरी जाऊन माहिती दिली, फॉर्म भरण्यासाठी मदत केली आणि त्यांना शिष्यवृत्ती, आजारपणात मदत व इतर लाभ मिळवून दिले. यशोधन कार्यालयात दररोज सहा कर्मचारी या कामगारांच्या…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus) – आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोक प्रभावित होतील. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता दिसेल. कर्क (Cancer) – आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जुने वाद मिटू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला (SEC) जोरदार फटकारले आहे. न्यायालयाने राज्यातील या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले असून, ही शेवटची मुदतवाढ असल्याचेही स्पष्ट केले आहे.  यापूर्वी, २०२२ मध्ये न्यायालयाने जे. के. बांठिया आयोगापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी जागा पूर्ववत करून चार महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट २०२५ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन न केल्याने न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून त्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्याचे…

Read More

संगमनेर –  सोमवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी फाटा येथे एक भरधाव वेगातील कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने हॉटेल मालक बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून पुण्याकडे जात असलेल्या एका भरधाव कंटेनरच्या (क्रमांक HR 55 AT 2926) चालकाला झोपेची डुलकी लागली. यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट महामार्गालगतच्या ‘हॉटेल दिव्यांका’ मध्ये शिरला. हा अपघात पहाटे ५ ते ५:१५ च्या सुमारास घडला. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी हॉटेलचे मालक दत्तात्रेय मांडेकर हॉटेलच्या आत झोपले होते. मोठा आवाज झाल्याने त्यांना जाग आली आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा…

Read More

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघे ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कायदेक्षेत्र आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होते, मात्र त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. सोमवारी कामकाजासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. त्यानंतर तातडीने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे उत्तम आकलन, तसेच संविधानाचे सखोल ज्ञान…

Read More

हे राशीभविष्य सर्वसाधारण असून, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार त्यात बदल होऊ शकतो. मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला संयम बाळगावा लागेल. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण तुमच्या मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन (Gemini)- तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क (Cancer)- आज तुम्ही भावनिक होऊ शकता. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. वैयक्तिक संबंधात गोडवा राहील. सिंह (Leo)- आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन…

Read More

मुंबई –  राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत, एकत्रित ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत नवीन २,३९९ उपचारांचा समावेश करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय, पाच लाखांपेक्षा अधिक खर्च असलेल्या अवयव प्रत्यारोपणासारख्या गंभीर उपचारांसाठी वेगळा ‘कॉर्पस निधी’ (Corpus Fund) निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व महिला व…

Read More

अहिल्यानगर –  जिल्ह्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच, धोका असलेल्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, विखे पाटील यांनी प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाने पाच आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांतील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये पारनेर (३), पाथर्डी (३), श्रीगोंदा (८) आणि कर्जत (५) या तालुक्यांतील मंडळांचा…

Read More

अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून…

Read More

नवी दिल्ली –  देशभरातील फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी लावता येणार आहे. आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश मागे घेतला आहे. हा निर्णय फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक मोठा विजय मानला जात आहे. यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी डीजीएचएसच्या संचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी एक पत्र जारी केले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, फिजियोथेरेपिस्ट्स त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरू शकत नाहीत. यामागचे कारण देताना त्यांनी म्हटले होते की, यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि बोगस डॉक्टरांच्या वाढीला चालना मिळू शकते.  ‘डॉक्टर’ ही उपाधी फक्त…

Read More

संगमनेर – राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाच्या सचिवालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या जागेच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार असून, शहरातील जुनी आरक्षणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, यामुळे संगमनेर शहरातील इंदिरानगर, वकील कॉलनी, मालदाड रोड, पद्मनगर, अभंग मळा, स्टेडियम परिसर, गुंजाळ आखाडा यांसारख्या भागांतील हजारो कुटुंब आणि वसाहती या निर्णयामुळे कायदेशीर अडचणीतून बाहेर पडतील आणि त्यांना हव्या असलेल्या नागरी सुविधा मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. १९८० च्या शहर विकास आराखड्यानुसार, शहरातील काही भागांत शेतजमिनी होत्या. या जमिनींवर गार्डन, खेळाचे मैदान, शाळा अशा विविध कारणांसाठी आरक्षण टाकण्यात…

Read More

संगमनेर – सध्या काही कीर्तनकार राजकीय पक्षांचे जाहीर प्रचारक म्हणून काम करत असले, तरी पूर्वीही राजकीय पक्षांचा छुपा प्रचार अनेकदा झालेला आहे, असं मत ‘रिंगण’ मासिकाचे संपादक सचिन परब यांनी व्यक्त केलं.  सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परब बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते. तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, भारत महाराज घोगरे गुरुजी, समाधान महाराज देशमुख आणि पत्रकार-कीर्तनकार शामसुंदर महाराज…

Read More

संगमनेर –  जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. सध्या अहिल्यानगर व धुळे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेने देखील या संदर्भात कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आमदार तांबे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बदली प्रक्रिया पूर्ण…

Read More