Author: Annant Ppangarkar
संगमनेर: संगमनेर शहराच्या भविष्यातील गरजा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहराला नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी निळवंडे धरणापासून शहराकडे येणाऱ्या मुख्य पाईपलाईनची तसेच धरणाजवळील बॉल व्हॉल्व्हची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करून कामात सुधारणा करण्याच्या आवश्यक सूचना दिल्या. शहराच्या पाणीपुरवठा सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेचीही यावेळी पाहणी करण्यात आली. या जागेची निश्चिती केल्यानंतर नगराध्यक्षांनी संगमनेर नगरपरिषदेच्या पंपिंग स्टेशनला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. या संपूर्ण पाहणी दौऱ्यात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई…
संगमनेर: मुंबई येथे संपन्न झालेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, जयहिंद लोक चळवळ तसेच विविध सामाजिक, राजकीय व पुरोगामी संघटनांच्या वतीने के. बी. दादा देशमुख सभागृहात अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तांबे यांनी राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती या संघटना पुरोगामी विचार आणि भक्कम वैचारिक अधिष्ठान असणारी नवी पिढी घडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्र सेवा दलाचे नेते आणि माजी…
संगमनेर, प्रतिनिधी – श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत अवाढव्य दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित ‘वाहतूक सेना’ आणि ‘रिक्षा सेने’च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या अन्यायकारक दंडवसुलीविरोधात १ मार्चपासून संगमनेर शहर व तालुक्यात ‘रिक्षा बंद’ करण्याचा निर्धार रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे. वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या जाचक दंडवसुलीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख आणि तालुकाप्रमुख अशोक बढे यांनी प्रशासनावर खळबळजनक आरोप केले आहेत. आरटीओ…
दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले नाते अधिक दृढ होईल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींबाबत जागरुक राहा. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबतच्या संवादात गोडवा ठेवा, जेणेकरून तुमचे नाते अधिक बहरेल. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे डोके शांत ठेवून निर्णय घ्या.…
संगमनेर | प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकार आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी ९७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून उपलब्ध सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. या विकासकामामुळे केवळ रस्तेच सुधारणार नाहीत, तर तालुक्याच्या दळणवळण क्षेत्राला खऱ्या अर्थाने ‘प्रगतीचे स्वातंत्र्य’ मिळणार आहे. कोणत्याही प्रगत समाजासाठी दळणवळणाचे स्वातंत्र्य हे प्रगतीचे पहिले पाऊल असते. या निधीतून होणारी कामे नागरिकांना खराब रस्त्यांच्या जाचातून मुक्त करणार असून, त्यांना सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचे स्वातंत्र्य मिळेल. संगमनेर पंचायत समिती ते तळेगाव फाटा, तळेगाव फाटा ते…
संगमनेर, प्रतिनिधी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव समिती’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अमोल डुकरे यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचे भव्य नियोजन केले जाणार आहे. या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी दीपक वन्नम आणि प्रकाश गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच उत्सवाच्या प्रभावी नियोजनासाठी कार्याध्यक्ष म्हणून दत्तू नाईक, संजय सोनवणे आणि दीपक साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या आर्थिक नियोजनासाठी खजिनदारपदी राजू सातपुते, अमित चव्हाण, भाऊसाहेब हासे आणि फैसल सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपत आणि सर्व शिवप्रेमींना सोबत…
शेवगाव | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांनी आखेगाव रोडवर सापळा रचून एका इसमास बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, आखेगाव रोडने एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या स्कॉर्पिओमधून एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन शेवगावकडे येत आहे. या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हॉटेल रिलॅक्स इन परिसरात नाकाबंदी केली.…
नाशिक: नाशिकमध्ये बालविवाहाची एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी आडगाव पोलिसांनी पीडित मुलीच्या सासरच्या आणि माहेरच्या अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे केवळ १४ ते १५ वर्षे वय असलेल्या या मुलीचा विवाह नातेवाईकांनी बळजबरीने लावून दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये पीडित मुलीचे वडील, मामा, मामी आणि मावशी यांनी संगनमत करून तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी लावून दिला. हा विवाह मुलीच्या इच्छेविरुद्ध आणि कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आला होता. लग्नानंतर सासरी गेल्यानंतर पीडित मुलीवर सतत अत्याचार करण्यात आले. हा छळ आणि अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर पीडित मुलीने धाडस…
संगमनेर, प्रतिनिधी – भारतीय राजकारणात ‘स्वराज’ हा शब्द सर्वप्रथम प्रचलित करण्याचे कार्य दादाभाई नवरोजी यांनी केले. दादाभाईंनी केलेली ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाची मीमांसा हाच भारतीय राष्ट्रवादाचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि प्रसिद्ध राजकीय भाष्यकार ॲड. अनिल नौरीया यांनी केले. ॲड. नौरीया पुढे यांनी दादाभाई नवरोजी आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक व भावनिक नाते उलगडताना त्यांनी या गौरवशाली इतिहासाचा विसर पडत असल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. दादाभाई नवरोजींच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद गुजराती, मराठी, उर्दू आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये झाला होता, ज्यातून त्यांच्या विचारांचा प्रसार देशभर झाला. त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय तेव्हा येत असे, जेव्हा ते दिल्लीला जात…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक असून गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. व्यापारात नवीन संधी प्राप्त होतील, परंतु घाईने कोणताही व्यवहार करू नका. आर्थिक नियोजन करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित…
संगमनेर: पोलीस म्हंटले की डोळ्यांसमोर येते ती गुन्हेगारांवर वचक ठेवणारी कठोर प्रतिमा आणि खाकी वर्दी. पण याच खाकी वर्दीच्या मागे एक अत्यंत संवेदनशील आणि मायेचा ओलावा जपणारा माणूस दडलेला असतो, याचे हृदयस्पर्शी दर्शन शिर्डीत घडले आहे. सहा वर्षांपूर्वी नियतीने अनाथ केलेल्या चार निराधार भावंडांच्या आयुष्यात प्रकाशदूत बनून आलेले अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पुन्हा एकदा या मुलांची भेट घेऊन माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली आहे. या कहाणीची सुरुवात एका अत्यंत वेदनादायी घटनेने झाली होती. सहा वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खुपटी येथील तुकाराम हारके आणि संगीता हारके या शेतमजूर दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. दारिद्र्यामुळे आणि…
झरेकाठी, वार्ताहर: खळी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवत ‘एक पाहुणा – एक आंबा रोप’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे. दिखाऊपणा आणि अवाजवी खर्चाला फाटा देत चौधरी कुटुंबाने लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना कलमी आंब्याची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश दिला. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब डोळे व पत्रकार सोमनाथ डोळे यांचे भाचे ऋषिकेश आणि राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव दाढकर यांची कन्या साक्षी यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्याची आगळीवेगळी पद्धत. पारंपरिक शाल-श्रीफळाऐवजी प्रत्येकाला कलमी आंब्याचे रोप देऊन…
संगमनेर, प्रतिनिधी – केंद्र सरकारने नुकतेच लागू केलेले चार कामगार कायदे (लेबर कोड) रद्द करावेत आणि ‘बी.व्ही.जी. रामजी’ योजना बंद करून पुन्हा ‘मनरेगा’ योजना सुरू करावी, या मागणीसाठी संगमनेर तालुका तंबाखू (जर्दा) कामगार युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०२५ मध्ये अस्तित्वात आणलेले चार लेबर कोड हे पूर्णपणे कामगारविरोधी आहेत. हे कायदे लागू करताना कामगारांच्या हिताचे जुने २९ कायदे रद्द करण्यात आले असून, भांडवलदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या…
संगमनेर (विशेष प्रतिनिधी): शासन ‘प्रशासन आपल्या दारी’चा डांगोरा पिटत जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत असले, तरी संगमनेर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे एका सर्वसामान्य नागरिकाला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी चक्क मृत्यूला साद घालण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असूनही जर जमिनीचा ताबा मिळत नसेल, तर हे प्रशासन नेमके कोणाच्या दावणीला बांधले आहे, असा संतप्त सवाल उपोषणकर्ते गणेश रासने यांनी उपस्थित केला आहे. प्रशासकीय ढिम्म कारभारामुळे हतबल झालेल्या रासने यांनी आता थेट ‘माझा बळी घेतल्यावरच जमीन मोकळी करणार का?’ असा सवाल विचारत तहसीलदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संगमनेर येथील रहिवासी गणेश अनंत रासने यांची वडगाव पान शिवारात गट नंबर…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कष्टाचे कौतुक केले जाईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा मुहूर्त उत्तम आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. संध्याकाळी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर घाई करू नका. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण संयमाने घेतल्यास तुम्ही सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. मिथुन…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये संपत आहे, अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकताच अधिकृत आदेश पारित केला असून, मंगळवारपासून (दि. ९ फेब्रुवारी) या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’ सुरू झाले आहे. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे न्यायालयात प्रलंबित असल्याने, जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयाअभावी निवडणुका घेणे शक्य नसल्याने शासनाने हा प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार तालुक्यातील अकलापूर, आंबी दुमाला, आबी खालसा, औरंगपूर, भोजदरी, बोटा, चंदनापूरी, चणेगाव, चिखली, चिंचपूर बु., दाढ खुर्द, देवगाव, देवकौठे, डिग्रस, हिवरगाव पठार, हिवरगाव…
संगमनेर, प्रतिनिधी – तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लारपूर येथे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली. या घटनेचे पडसाद संगमनेर शहरात उमटले असून, राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने बस स्थानक परिसरात आज दुपारी ३ वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. देशातील अस्पृश्यता, सतीप्रथा आणि जातीभेदाविरुद्ध लढा देऊन बहुजन समाज, महिला व शेतकऱ्यांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या महापुरुषाच्या पुतळ्यावर झालेला हा हल्ला अत्यंत खेदजनक आणि गंभीर स्वरूपाचा आहे. हा केवळ एका पुतळ्यावर झालेला हल्ला नसून तो सामाजिक समता आणि मानवतावादी विचारांवर झालेला आघात आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या घटनेमुळे संपूर्ण देशातील…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ठाम इशारा देत आमदार अमोल खताळ यांनी शहर पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तात्काळ कारवाईचे कडक आदेश दिले आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर आता निर्णायक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सध्या शहरातील विविध भागांत सुमारे २८ बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कत्तलखान्यांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारी तसेच पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या आणि गाणी म्हणत सार्वजनिक शांतता व वातावरण दूषित करणाऱ्या ११ महिलांवर कोतवाली पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा बस स्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून प्रवाशांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक मुगडे, प्रवीण पाटील आणि त्यांच्या पथकाने…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील देवतळे (देवगाव) आणि देवगड (हिवरगाव पावसा) या दोन गावांमधील श्री खंडोबा मंदिरांमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकताच येथे मोठा यात्रोत्सव पार पडला होता, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी रात्री दोन्ही मंदिरांमधील गाभाऱ्यात प्रवेश करून कटरच्या साहाय्याने दानपेट्या कापल्या आणि त्यातील रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी केवळ कागदी नोटांची चोरी केली असून चिल्लर पैसे मंदिरांतच सोडून दिले आहेत. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या दोन्ही मंदिरांमधील अंतर अवघ्या दोन किलोमीटरचे असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चोरी करताना…
